Newsworldmarathi Mumbai: ठाणे जिल्ह्यातील शीळ गावातील भोईर कंपाउंड येथे एका लग्नमंडपाला कुत्रा बांधल्याच्या कारणावरून वाद निर्माण होऊन नवरदेवाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवले आहेत.
नवरदेवाची तक्रार
नवरदेव भावेश लोलगे (२७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ मे रोजी त्यांच्या आजीच्या घरासमोर लग्नमंडप उभारण्यात आला होता. विशाल म्हात्रे यांनी त्यांच्या कुत्र्याला मंडपाच्या लाकडाला बांधले, ज्यामुळे कुत्र्याने मंडप फाडला. या घटनेचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावेश यांना विशालच्या पत्नी दर्शना यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर विशाल यांनी लाकडी दांडक्याने भावेश यांच्या डोक्यावर मारले. विशालचा भाऊ अविनाश आणि त्यांची पत्नी धनश्री यांनीही भावेश यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि धमकी दिली.
म्हात्रे कुटुंबाची तक्रार
दर्शना म्हात्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भावेश लोलगे यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्यांच्या घरी येऊन शिवीगाळ केली. त्यांनी फायबर काठीने दर्शना आणि तिच्या भाची अक्षरा रणजित फुलोरे हिला मारहाण केली. विशाल यांनी हस्तक्षेप केल्यावर भावेश यांनी त्यांनाही मारहाण केली. भावेश यांचे भाऊ रवी लोलगे यांनी धनश्री म्हात्रे आणि अक्षरा फुलोरे यांना मारहाण केली, तर ललिता पाटील आणि कविता यांनी शिवीगाळ केली.
या प्रकरणात शीळ डायघर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, पोलिसांनी गुन्हे नोंदवले आहेत. पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments