Newsworldmarathi Pune : शेतकऱ्यांना कीड व रोगमुक्त दर्जेदार रोपे मिळावीत आणि उत्पादन खर्चात कपात व्हावी यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात नऊ...
Newsworldmarathi Pune : शेतकऱ्यांना कीड व रोगमुक्त दर्जेदार रोपे मिळावीत आणि उत्पादन खर्चात कपात व्हावी यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात नऊ...
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांमुळे आणि विविध विभागांकडून रस्त्यांची खोदाई करून करण्यात आलेल्या कामांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्ते खोदल्यामुळे निर्माण...
Newsworldmarathi Pune : शेतकऱ्यांना कीड व रोगमुक्त दर्जेदार रोपे मिळावीत आणि उत्पादन खर्चात कपात व्हावी यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात नऊ...
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांमुळे आणि विविध विभागांकडून रस्त्यांची खोदाई करून करण्यात आलेल्या कामांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्ते खोदल्यामुळे निर्माण...
Newsworldmarathi Pune : शेतकऱ्यांना कीड व रोगमुक्त दर्जेदार रोपे मिळावीत आणि उत्पादन खर्चात कपात व्हावी यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात नऊ ठिकाणी स्वच्छ रोप निर्मिती केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यातील तीन केंद्रांची स्थापना महाराष्ट्रात केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.
पुण्यात द्राक्ष, नागपुरात संत्रा आणि सोलापुरात डाळिंब या पिकांसाठी खास स्वच्छ रोप निर्मिती केंद्र उभारली जातील. यासाठी केंद्र सरकारकडून ३०० कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचेही चौहान यांनी स्पष्ट केले.
पुण्यात आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन निरीक्षण केल्यानंतर त्यांना अनेक अडचणी जाणवत असल्याचे लक्षात आले असून, रोगमुक्त रोपांची अनुपलब्धता ही मोठी समस्या असल्याचे चौहान यांनी नमूद केले. त्यामुळे उत्पन्नात घट आणि उत्पादन खर्चात वाढ होत आहे.
या नव्या केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च दर्जाची व रोगविरहित रोपे सहज उपलब्ध होतील. यामुळे शेतीत उत्पादनवाढीसोबतच आर्थिक स्थैर्यही मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Newsworldmarathi Pune: पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांमुळे आणि विविध विभागांकडून रस्त्यांची खोदाई करून करण्यात आलेल्या कामांमुळे शहरातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्ते खोदल्यामुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे पुणेकरांना अवकाळी पावसात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे आगामी पावसाळ्यात तरी खड्ड्यांपासून सुटका होईल का, हा प्रश्न शहरवासीयांना सतावत आहे.
या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी पथ विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की, सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ७ जूनपर्यंत पूर्ण करावीत. तसेच ज्या ठेकेदारांनी खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून डांबरीकरणाची कामे पूर्ण केली आहेत, त्यांना पावसाळ्यानंतरच बिलांचे देय दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने सेवावाहिन्या टाकण्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदण्यास परवानगी दिली होती. यासाठी ३१ मेपर्यंत काम पूर्ण करून डांबरीकरण करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, अनेक विभागांची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे समोर आले आहे.
याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली पथ, ड्रेनेज, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीस पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे, विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनिषा शेकटकर आणि पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला असून, कामांची गुणवत्ता राखत वेगाने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रस्त्यांची सुधारणा होऊन पुणेकरांना येत्या पावसाळ्यात दिलासा मिळावा, हा मुख्य उद्देश असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
Newsworldmarathi Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीस मंत्रिमंडळातील सर्व मान्यवर सदस्य उपस्थित होते.
महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे :
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार (आदिवासी विकास विभाग)
धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता ( महसूल विभाग)
राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन. याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली अमरावती, बल्लारपूर- चंद्रपूर, सिन्नर- नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वतः मान्यता (महसूल विभाग)
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार. मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई.
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
Newsworldmarathi Mumbai : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगाने 3 ते 8 जून दरम्यान राज्यातील गुरांचे बाजार बंद ठेवण्याची विनंती करणारे पत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पाठवले. या पत्रावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. हे पत्र ‘विनंती स्वरूपाचं’ असल्याचं गोसेवा आयोगाचं म्हणणं असताना, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र मागे घेण्याचे आदेश दिल्याचा दावा केला आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मुख्यमंत्री कार्यालय किंवा गोसेवा आयोगाकडून मिळालेला नाही.
नेमकं प्रकरण काय?
27 मे रोजी महाराष्ट्र गोसेवा आयोगाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एक पत्र पाठवून बकरी ईदच्या काळात (3 ते 8 जून) गुरांचे बाजार भरवू नयेत, अशी विनंती केली. या पत्रात नमूद करण्यात आले की, बकरी ईदच्या काळात गोवंशाच्या कत्तलीची शक्यता वाढते आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व 1995 (सुधारणा 2015) नुसार राज्यात गोवंश हत्याबंदी आहे. म्हणूनच या आठवड्यात बाजार न भरवण्याबाबत सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं.
विरोध का झाला?
या पत्राविरोधात वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षाने तीव्र आक्षेप नोंदवले. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे पुढे आले:
शेतकरी आणि मजुरांवर परिणाम: केवळ गोवंश नव्हे तर बकरे, शेळ्या, म्हशींचाही व्यवहार होतो. बाजार बंद केल्यास शेतकरी, मजूर, हमाल, कुरैशी समाज आणि वाहतूकदार यांचं उत्पन्न थांबेल.
सल्लागार आयोगाची अधिकार मर्यादा: गोसेवा आयोग सल्लागार संस्था असून प्रशासकीय आदेश देण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही. हे पत्र कायद्याच्या अधिकाराबाहेरचं असल्याचा आरोप.
कायद्यातील विसंगती: कायद्यानुसार खरेदी-विक्री दोन्ही गुन्हा असला तरी बहुतेकवेळा फक्त खरेदी करणाऱ्यांवर कारवाई होते, विक्रेत्यांवर नाही.
गोसेवा आयोगाची बाजू
आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी स्पष्ट केलं की, हे पत्र केवळ विनंती स्वरूपाचं आहे, बंधनकारक नाही. त्यांनी सांगितलं की ईदच्या काळात गोवंशाच्या कत्तलीच्या तक्रारी वाढतात आणि त्या रोखण्यासाठी ही काळजी घेण्यात येते. “हे एक आठवड्याचं आवाहन आहे, आणि कुणी पाळलं नाही तर संबंधित कायद्यांतर्गत तक्रार आल्यावर कारवाई होईल,” असंही त्यांनी म्हटलं.
मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप?
आमदार रईस शेख यांच्या म्हणण्यानुसार, सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास हे पत्र आणून दिलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोसेवा आयोगाला पत्र मागे घेण्यास सांगितल्याचा दावा केला. यासोबतच त्यांनी देवनार कत्तलखान्याचे शुल्क कमी करणे, आधुनिकीकरण करणे आणि मांस बाजार विकेंद्रित करण्याच्या मागण्याही केल्या.
अधिकृत भूमिका काय?
सध्या या संपूर्ण प्रकरणात एकीकडे गोसेवा आयोग पत्र मागे घेतल्याचं नाकारत आहे, तर दुसरीकडे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्र्यांनी ते मागे घेतल्याचा दावा केला आहे. मात्र, मुख्यमंत्री कार्यालय किंवा शासनाकडून याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय किंवा पत्र जाहीर करण्यात आलेलं नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरणावर सध्या संभ्रमाची स्थिती आहे.
Newsworldmarathi Beed: राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द सध्या संकटग्रस्त आणि आव्हानात्मक टप्प्यावर आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय आणि ‘राईट हँड’ म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार गुंतले असल्याचे निष्पन्न झाले. परिणामी, धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
या घडामोडीनंतर मुंडे यांना बेल्स पाल्सी या आजाराने ग्रस्त केले. शारीरिक आणि मानसिक तणावामुळे ते सार्वजनिक जीवनातून दूर राहिले. जवळपास अज्ञातवासात गेलेल्या मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथे विपश्यना ध्यानसत्रात सहभाग घेतला. याच कालावधीत त्यांच्या डोळ्यांचेही ऑपरेशन करण्यात आले.
विपश्यना पूर्ण केल्यानंतर धनंजय मुंडे सोमवारी बीडमध्ये परतले. त्यांच्या या पुनरागमनाकडे राजकीय वर्तुळासह त्यांच्या समर्थकांचेही लक्ष लागले होते. बीडमध्ये आगमन केल्यानंतर मुंडे यांनी सर्वप्रथम माजलगावचे दिवंगत माजी आमदार आर.टी. देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी लातूर येथे झालेल्या अपघातात देशमुख यांचा मृत्यू झाला होता.
धनंजय मुंडे यांच्या या भेटीद्वारे त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत, असा सूर स्थानिक पातळीवर उमटू लागला आहे. विपश्यना आणि उपचारांमुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याची माहितीही सूत्रांकडून समजते.
Newsworldmarathi Pune : नवीन शैक्षणिक वर्ष लवकरच सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने शालेय वाहनांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सोमवारी यासंदर्भात आदेश जारी करत वाहनधारकांना आपली वाहने तपासणीसाठी सादर करण्याचे आणि योग्यता प्रमाणपत्र तातडीने नूतनीकरण करण्याचे आवाहन केले आहे.
आरटीओने स्पष्ट केले आहे की, शाळा आणि महाविद्यालयांमार्फत तसेच खासगी वाहनधारकांकडून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. त्यामुळे अशा सर्व वाहनांची तांत्रिक तपासणी करून त्यांना अद्ययावत फिटनेस प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वाहन तपासणीसाठी दिवे येथील आरटीओ कार्यालयात येऊन संबंधित वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागणार आहे. तपासणीसाठी वाहनांची नोंदणी, विमा, प्रदूषण प्रमाणपत्र, परवाना, फिटनेस अशा सर्व कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे.
आरटीओने ही तपासणी प्रक्रिया साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून वाहनधारकांना गैरसोय होणार नाही. त्यामुळे संबंधितांनी विलंब न करता लवकरात लवकर तपासणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
ही मोहीम विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असून, नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल, असेही आरटीओने स्पष्ट केले आहे.
Newsworldmarathi Team भाग्यश्री जाधव : आज, 3 जून 2025 रोजी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील नाथ्रा गावात जन्मलेल्या मुंडेंनी कोणताही राजकीय वारसा नसतानाही संघर्षातून आपल्या वक्तृत्व, इच्छाशक्ती आणि जनसंपर्काच्या जोरावर राजकारणात सर्वोच्च स्थान मिळवले. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास होता. ऊसतोड मजुरांच्या भागाचा विकास, भाजपला ग्रामीण भागात पोहोचवणे, आणि जनतेसाठी कायम लढा देणे हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते. त्यांनी भाजपला गावागावात नेले. शरद पवारांसारख्या नेत्यांविरुद्ध आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. फडणवीसांच्या राजकीय प्रवासातही त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या नेतृत्वगुणामुळेच युतीला मजबुती मिळाली. 3 जून 2014 रोजी त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील एक तडफदार नेता हरपला.
2009 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघातून निवडून येत गोपीनाथ मुंडे यांनी दिल्ली गाठली. 2014 मध्येही त्यांनी लोकसभेची पुनरावृत्ती केली. मात्र, 1990 ते 1995 हा काळ त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वोत्तम टप्पा मानला जातो. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांविरुद्ध प्रभावी भूमिका बजावली. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे घनिष्ट कौटुंबिक संबंध होते. त्यांनीच महायुती स्थापन करत रामदास आठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी यांना एकत्र आणले.
Oplus_131072
मुंडे यांची राजकीय दृष्टी इतकी दूरगामी होती की, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या तरुण नेत्यावर त्यांनी विश्वास दाखवला. प्रमोद महाजन यांच्यासोबत त्यांनी फडणवीसांना कमी वयात आमदारकीचं तिकीट मिळवून दिलं. 2013 मध्ये प्रदेशाध्यक्ष पदासाठी गडकरी-मुंडे गटात रस्सीखेच सुरू होती. गडकरी गटाने सुधीर मुनगंटीवार यांना तर मुंडे गटाने फडणवीसांना पाठिंबा दिला. मुंडेंच्या ताकदीमुळे फडणवीस प्रदेशाध्यक्ष झाले आणि पुढे 2014 मध्ये मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. गोपीनाथ मुंडेंचे राजकीय योगदान आजही भाजपच्या यशाच्या मुळाशी आहे
आज, 3 जून 2025 रोजी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 11व्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या छोट्याशा गावात 12 डिसेंबर 1949 रोजी एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. कोणताही राजकीय वारसा नसतानाही, आपल्या प्रभावी वक्तृत्व, प्रबळ इच्छाशक्ती आणि जबरदस्त जनसंपर्काच्या बळावर त्यांनी राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण केले.
गोपीनाथ मुंडे यांचे शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत तर उच्चशिक्षण अंबाजोगाईतील महाविद्यालयात बी.कॉम. पर्यंत झाले. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. नाथ्राचे सरपंच म्हणून त्यांनी राजकीय वाटचाल सुरू केली. 1978 मध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि 1980 मध्ये रेणापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष, तसेच भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदही भूषवले.
1985 मध्ये अपयश आलं तरी 1990 ते 2009 पर्यंत ते सलग आमदार राहिले. रेणापूर मतदारसंघ 2009 मध्ये नष्ट झाल्यानंतर त्यांनी परळीमधून यश मिळवले. ऊसतोड मजुरांच्या भागाचा विकास करणे, आणि भाजपसारख्या शहरकेंद्री पक्षाला ग्रामीण भागात पोहोचवणे, हे त्यांच्या कार्याचे मोलाचे योगदान मानले जाते. जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला
Newsworldmarathi Nashik : राज्यातील शाळांमध्ये आता इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. राष्ट्रभक्तीची भावना बालवयातच रुजावी, देशप्रेमाची जाणीव लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.
या उपक्रमाची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात केली. या निर्णयामुळे राष्ट्र प्रथम ही भावना विद्यार्थ्यांमध्ये बळावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) सदस्य, तसेच स्काऊट-गाईड्स यांची मदत घेतली जाणार आहे. राज्यात सध्या सुमारे 2.5 लाख माजी सैनिक आहेत, त्यांच्याच सहकार्याने हा उपक्रम राबवला जाणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली.
हे प्रशिक्षण शारीरिक शिस्त, राष्ट्रनिष्ठा आणि स्वयंशिस्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार असून, लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचे मूल्य बिंबवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, संघभावना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही विकसित होईल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. लवकरच यासंबंधीचे धोरण आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत.
Newsworldmarathi Pune: पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामुळे राज्यात संतापाची लाट असताना, अशातच आता पुण्यात आणखी एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं आहे. पुण्यातील धनकवडीमध्ये ३५ वर्षीय महिलेने सासरच्या छळाला कंटाळून
गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वर्षा तुकाराम रणदिवे (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, वर्षाच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी तुकाराम रणदिवे यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्वला बागाव (वय-५३), योगेश बागाव (वय-३५), वैशाली बागाव (वय-३२), सुवर्णा बागाव (वय-२५) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बागाव आणि रणदिवे हि दोन्ही कुटुंबीय एकमेकांचे शेजारी आहेत. उज्वला आणि तिचा मुलगा योगेश, मुलगी वैशाली आणि सुवर्णा या अनेक दिवसांपासून वर्षा यांना टोमणे देऊन त्यांचा सतत छळ करत होत्या. सातत्याने होणार हा छळ असह्य झाल्याने वर्षा यांनी २४ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या मृत्यूची नोंद केल्यानंतर याप्रकरणी तक्रार देण्यात आली होती.
दरम्यान, याबाबत तपास केला असता आरोपींच्या छळाला कंटाळून वर्षा यांनी आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुढील तपास सहकारनगर पोलीस करीत आहेत.
Newsworldmarathi Pune: शहरातील प्रसिद्ध सराफ बाजार असलेल्या नारायण पेठेतल्या नीलकंठ ज्वेलर्समध्ये मोठा अपहार उघडकीस आला आहे. दुकानात सेल्समन म्हणून कार्यरत असलेल्या प्रतीक नगरकर (३५, रा. कोथरूड) याने तब्बल चार कोटी ५८ लाख रुपयांचे दागिने गुपचूप लंपास केल्याचे समोर आले आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात रविवारी (१ जून) त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वासघाताचं सोनं!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नगरकर हा नारायण पेठेतील पत्र्या मारुती चौकातील नीलकंठ ज्वेलर्समध्ये सेल्मसन म्हणून काम करत होता. त्याच्याकडे अंगठी, सुवर्ण नाणी, वेढणी या आभूषणांची विक्री करणाऱ्या दालनाची जबाबदारी होती.
साधारणतः १ एप्रिल ते २६ मे २०२५ या कालावधीत त्याने चार कोटी ५८ लाख रुपयांचे दागिने चोरल्याचे मोजणीअंती स्पष्ट झाले. तपासासाठी पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. दोन हजार २६२ ग्रॅम वजनाच्या १८० वेढण्या, तसेच दोन हजार ४२६ ग्रॅम वजनाची ९४ सुवर्ण नाणी (कॉइन) असा ऐवज चोरीस गेला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
एवढा ऐवज लंपास
१८० सोन्याच्या वेढण्या – २,२६२ ग्रॅम
९४ सुवर्ण नाणी (कॉइन) – २,४२६ ग्रॅम
एकूण अंदाजे ₹4.58 कोटींची चोरी
पोलिसांची कारवाई सुरू
नीलकंठ ज्वेलर्सचे व्यवस्थापक नितीन डांगे (३७) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत आहे.