LATEST ARTICLES

कोंढवा- येवलेवाडीत बोगस मतदारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत; निवडणूक पारदर्शक व्हावी उदयसिंह मुळीक यांची मागणी

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या २०१७ साली झालेल्या निवडणुकांदरम्यान कोंढवा–येवलेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस मतदार नोंद झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये आजही सुरू आहे. त्या काळात मतदार यादीत बाहेरील व्यक्तींची नावे समाविष्ट झाल्याचे तसेच वास्तव्यात नसलेल्या नागरिकांची नोंद आढळल्याचे आरोप स्थानिक पातळीवर करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर यंदा होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह मुळीक यांनी केली आहे. कोंढवा–येवलेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते, नागरिक संघटना आणि जागरूक मतदारांनी पोलीस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदार यादी तपासणीसह सर्व प्रक्रिया काटेकोरपणे राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मतदार नोंदणी, पत्त्यांची पडताळणी, तसेच संशयास्पद नोंदींची सखोल चौकशी करण्यात यावी, असे मत नागरिकांचे आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहण्यासाठी प्रशासनाने वेळीच ठोस पावले उचलावीत, अन्यथा लोकशाहीच्या रक्षणासाठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे. येणाऱ्या निवडणुकांत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारी गंभीरपणे घ्याव्यात, अशी सर्वसामान्य अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराचा धडाका; तब्बल १०९ उमेदवारांच्या प्रचारात मोहोळ प्रत्यक्ष सहभागी

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी संध्याकाळी थंडावल्या. या संपूर्ण प्रचारकाळात केंद्रीय राज्यमंत्री आणि पुणे महापालिका निवडणुकीतील भाजपाचे ‘कॅप्टन’ मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरात अक्षरशः प्रचाराचा धडाका उडवला. तब्बल २७ प्रभागांचा प्रत्यक्ष दौरा करत १०९ उमेदवारांच्या प्रचारात ते स्वतः मैदानात उतरले आणि पदयात्रा, बाईक रॅली, मतदारांशी गाठीभेटी, कॉर्नर सभा यांमधून संपूर्ण पुणे ढवळून काढले. या प्रचारादरम्यान मोहोळ यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांचा, पायाभूत सुविधांचा आणि पुण्याच्या बदलत्या चेहऱ्याचा प्रभावीपणे आढावा मतदारांसमोर मांडला. ‘ट्रिपल इंजिन सरकार’मुळे पुण्याला मिळालेली मेट्रो, रिंग रोड, नदी पुनरुज्जीवन, २४ तास समान पाणीपुरवठा योजना, विमानतळाचे आधुनिकीकरण अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी पुण्याच्या भविष्यासाठी भाजपचाच पर्याय सक्षम असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याबाबत बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘पुणेकरांनी विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासनाला पसंती दिली आहे. जनतेचा प्रतिसाद पाहता भाजपाला या निवडणुकीत १२० ते १२५ जागा मिळतील आणि पुण्याचा महापौर भाजपचाच होईल, याबाबत आम्हाला पूर्ण खात्री आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारची भक्कम साथ आगामी काळातही मिळणार आहे.” संपूर्ण प्रचारकाळात मोहोळ यांनी सामान्य नागरिकांपासून व्यापारी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, झोपडपट्टीवासीय, आयटी कर्मचारी अशा विविध घटकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, सुरक्षा आणि पर्यावरणपूरक विकास या प्रमुख मुद्द्यांवर भाजपची ठोस भूमिका त्यांनी मतदारांसमोर स्पष्ट केली. पुणे महापालिकेच्या या निवडणुकीत भाजपने विकास, सुशासन आणि स्थिर नेतृत्वाचे मॉडेल मांडले असून मोहोळ यांच्या आक्रमक, नियोजित आणि लोकसंपर्काधारित प्रचारामुळे शहरभर भाजपचा आत्मविश्वास आणि सकारात्मक वातावरण दिसून आले. मोहोळ पुढे म्हणाले की, भाजपने संपूर्ण प्रचारकाळात सकारात्मक व विकासकेंद्रित मुद्द्यांवर भर दिला. प्रचाराची पातळी न घसरवता पुणेकरांच्या भविष्यासाठी ठोस अजेंड्यासह जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. २०१७ नंतर ट्रिपल इंजिन सरकारमुळे पुण्यात विकासाला मोठी गती मिळाली असून मेट्रोचे काम देशात सर्वाधिक वेगाने सुरू आहे, असेही त्यांनी नमूद केले. निवडणूक निकालानंतर कोणत्याही अन्य पक्षासोबत जाणार नाही, असे स्पष्ट करत पुणेकरांच्या अपेक्षांनुसार भाजप स्वतंत्रपणे जबाबदारी सांभाळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री चंद्रकांतदादांचा पाच महापालिकांमध्ये प्रचाराचा झंझावात; एकूण १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा, १० पत्रकार परिषदांच्या माध्यमातून प्रचार

Newsworldmarathi Pune: मंत्री चंद्रकांतदादा महापालिका निवडणुकीत प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. १०० पेक्षा जास्त बैठका, घरोघरी भेटी ५० चौक सभांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षासाठी प्रचार केला. यामध्ये कोथरुड मधील चौक सभा ही लक्षवेधी ठरली. राज्यातील २९ महापालिकांचा प्रचाराच्या तोफा आज थंडावला आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेची जबाबदारी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे होती. यावेळी पहिल्या दिवसापासून ना. पाटील यांचा प्रचारात सक्रिय सहभाग होता. वेळोवेळी पदाधिकाऱ्यांसोबत बैठका, १०० पेक्षा जास्त बैठका, ५० चौक सभा आणि १० पत्रकार परिषदा यामाध्यमातून भारतीय जनता पक्षासाठी प्रचार केला. या संपूर्ण काळातील कोथरुड मधील चौक सभा ही अतिशय लक्षवेधी आणि चर्चेत राहिली. कारण सभेसाठी कोणतीही व्यवस्था नसताना, गाडीच्या टपावर उभे राहुन त्यांनी नागरिकांना संबोधित केले होते.

कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे प्रभाग २५ मध्ये मोठा विजय होणार : राघवेंद्र बाप्पू मानकर

0
Newsworldmarathi Pune: गेल्या दहा दिवसांत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम, घरोघरी पोहोचलेला प्रचार आणि नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद यामुळे प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई परिसरात पुणे शहरातील सर्वात मोठ्या विजयाचा विश्वास भाजपाचे उमेदवार राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी व्यक्त केला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आयोजित भव्य बाईक रॅलीदरम्यान ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद मोठी आहे. या ताकदीच्या जोरावर अवघ्या दहा दिवसांत पक्षाचे कार्यकर्ते घराघरांत पोहोचले. आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील मंडल अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, प्रभाग अध्यक्ष, बूथ प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यामुळे या प्रभागात पुण्यातील सर्वात मोठ्या विजयाचा आम्हाला विश्वास असल्याचे मानकर यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, माजी नगरसेविका गायत्री खडके, उदय लेले, मंडल अध्यक्ष अमित कंक, शहर चिटणीस मनोज खत्री, मंडल सरचिटणीस निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, शहर पदाधिकारी प्रणव गंजीवाले, महिला आघाडीच्या मोहना गद्रे, रुपाली कदम, सुरेखाताई पाषाणकर, उज्वलाताई पावटेकर, प्रभाग अध्यक्ष सुनील रसाळ, युवा मोर्चाचे श्रेयस लेले तसेच सर्व भाजपा बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बाप्पू मानकर मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य बाईक रॅलीतून विजयाची चाहूल; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळांचा ठाम विश्वास

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आज पार पडलेली भव्य बाईक रॅली ही केवळ प्रचारापुरती मर्यादित नसून भाजपाच्या निश्चित विजयाची स्पष्ट नांदी असल्याचा ठाम दावा केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी केला. रॅलीला मिळालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, तरुणांचा प्रचंड जोश आणि महिलांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग पाहता १६ तारखेला हा प्रभाग भाजपाच्याच पारड्यात ४–० ने जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रॅलीदरम्यान संपूर्ण प्रभागात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी फुलांच्या वर्षावात, घोषणांच्या गजरात आणि कमळाच्या जयघोषात भाजपाच्या चारही उमेदवारांचे नागरिकांनी जाहीर स्वागत केले. या दृश्यांमधून मतदारांनी आधीच आपला कौल दिल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत होते. “प्रभागातील चारही उमेदवारांना दिलेले प्रत्येक मत म्हणजे थेट पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आहे. हे उमेदवार केवळ निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे, तर प्रभागाचा सर्वांगीण व दीर्घकालीन विकास घडवण्यासाठी मैदानात उतरले आहेत,” असे स्पष्ट शब्दांत मोहोळ यांनी सांगितले. भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर भर देताना ते पुढे म्हणाले, “भारतीय जनता पार्टी ही व्यक्तिकेंद्री नव्हे, तर विचारकेंद्री राजकारण करणारी पार्टी आहे. भाजप विचाराने चालते, संस्कृतीने काम करते आणि निष्ठेने जनतेची सेवा करते. इथे कोणतीही व्यक्ती पक्षापेक्षा मोठी नाही. पक्षातील प्रत्येक उमेदवार स्वच्छ, प्रामाणिक आणि जनतेच्या विश्वासास पात्र आहे—हाच भाजपाचा खरा बळकटीचा आधार आहे.” या रॅलीत तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभागातील एकूण वातावरण पाहता भाजपाच्या बाजूने स्पष्ट लाट निर्माण झाली असून विरोधकांसाठी ही स्थिती चिंताजनक ठरत आहे. “विविध सर्वेक्षणांनुसार पुण्याचा पुढील महापौर भाजपाचाच असणार हे जवळपास निश्चित आहे. प्रभाग क्रमांक ०९ हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असून येथील मतदार नेहमीप्रमाणे कमळालाच मतदान करणार,” असा ठाम विश्वासही मोहोळ यांनी व्यक्त केला. एकूणच, आजच्या भव्य रॅलीतून प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजपाच्या विजयाचे ठोस संकेत मिळाले असून, १६ तारखेला हा प्रभाग भाजपाच्या बाजूने ४–० ने झुकणार, असा स्पष्ट राजकीय संदेश संपूर्ण शहरात गेला आहे. त्यामुळे या प्रभागाकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष वेधले गेले आहे.

झेडपी अन् 125 पंचायत समित्यांचं बिगुल वाजलं; 5 फेब्रुवारीला मतदान, 7 फेब्रुवारीला निकाल

0
Newsworldmarathi Pune: झेडपी निवडणुकांसाठी 15 दिवसांची सुप्रीम कोर्टाने मुदत वाढ दिल्यानंतर आज (दि.13) राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर, 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर केले जातील, राज्याचे मुख्य आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तर, उर्वरित 20 जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात होणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे यांनी स्पष्ट केले. आयोगाच्या या घोषणेनंतर पुणे, सोलापूरसह राज्यातील 12 जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. कोणत्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार ? लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदारांना दोनदा मतदान करावे लागणार असून, यासाठी 1 जुलै 2025 ची यादी वापरली जाणार असून, – नॉमिनेशन ऑफलाईन पद्धतीने दाखल करता येणार आहे. 3 नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे.

लहुजी शक्ती सेनेचा आबा बागुलांसह शिवसेनेच्या पॅनेलला जाहीर पाठिंबा

Newsworldmarathi Pune: लहुजी शक्ती सेनेचे विष्णूभाऊ कसबे यांनी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह संपूर्ण पॅनेलला जाहीर पाठिंबा दर्शवून विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले आहे. प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाला भेट देत विष्णूभाऊ कसबे यांनी आबा बागुल यांच्याकडून प्रचाराचा आढावा घेतला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे कार्य विकासाभिमुख असल्याने तसेच आबा बागुल यांचे आजवरचे कार्य हे लोकोपयोगी असल्याने लहुजी शक्ती सेना आबा बागुल यांच्यासह संपूर्ण पॅनेलला जाहीर पाठींबा देत असून संपूर्ण समाजाची ताकद आबा बागुल यांच्या पाठीशी असल्याचे विष्णूभाऊ कसबे यांनी सांगितले आणि विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहनही समाजबांधवांना केले.या पाठिंब्यामुळे शिवसेनेची ताकद निश्चित वाढल्याची प्रतिक्रिया आबा बागुल यांनी यावेळी दिली.

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागरिकांना आधारवड ठरणार: आबा बागुल

0
Newaworldmarathi Pune: नागरिकांना पायाभूत सुविधांसह आरोग्यसेवेसाठीही व्हिजनमध्ये एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची तरतूद केल्याने ते नागरिकांसाठी निश्चित आधारवड ठरणार असल्याचा विश्वास शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ३६ (ड) सहकारनगर – पद्मावतीचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचाराला सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.विशेषतः महिला वर्गाचा उत्साह लक्षवेधी ठरत आहे.पदयात्रा,कोपरा सभांमधून आबा बागुल यांनी व्हिजनमध्ये मांडलेल्या पंचसूत्रीला लोकांची पसंती मिळत आहे.पंचवार्षिकमध्ये होणारी पाच कामे जी लोकांसाठी महत्वाची आहेत,ते यंदाच्या निवडणुकीत एक वैशिष्टे ठरले आहे. याबाबत आबा बागुल म्हणाले की,जाहीरनामा प्रत्येकजण मांडत असतो पण ते पूर्णत्वास जाते का हे महत्वाचे आहे.आजवर मी जे जे मांडले आहे, ते पूर्ण केलेले आहे.त्यामुळे यंदाही नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीला प्राधान्य दिले आहे. आज खासगी हॉस्पिटलमध्ये महागड्या आरोग्य सेवा लोकांना परवडत नाही.त्यामुळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणीला प्राधान्य असणार आहे. हे ३०० खाटांची क्षमता असलेले सर्व सुविधांनी युक्त रुग्णालय असणार आहे.आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टर, आधुनिक निदान व उपचार सुविधा,सामान्य नागरिकांना परवडणारी, दर्जेदार आरोग्य सेवा,गरीब व मध्यमवर्गीयांसाठी विशेष सवलती व योजना असणार आहेत.एकप्रकारे निरामय आरोग्यासाठी ही भक्कम पायाभरणी असणार आहे.

प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या उमेदवारांचा विजयाचा एल्गार; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भव्य बाईक रॅली

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीला केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष उपस्थिती लावली. भाजपच्या उमेदवारांचा विजयाचा एल्गार यावेळी जोरदारपणे करण्यात आला. रॅलीदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शेकडो दुचाकींसह निघालेल्या या रॅलीमुळे संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “विकास, विश्वास आणि सक्षम नेतृत्वासाठी भाजप” असा संदेश देत मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील महायुती सरकारने राबवलेल्या विकासकामांची माहिती दिली. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून प्रभाग ३८ मधील विकासासाठी सक्षम प्रतिनिधी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले. राणी भोसले या अनुभवी, कार्यक्षम आणि लोकाभिमुख उमेदवार असल्याने त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच प्रभाग ३८ मधील भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यामध्ये राणी भोसले यांच्यासह अश्विनी चिंधे, संदीप बेलदरे, व्यंकोजी खोपडे आणि प्रतिभा चोरगे यांचा समावेश आहे. सर्व उमेदवार एकत्रितपणे प्रभागाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या बाईक रॅलीमुळे भाजपच्या प्रचाराला नवी ऊर्जा मिळाली असून प्रभाग ३८ मध्ये भाजपच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी

0
Newaworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक २४ (कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल) उमेदवार आणि पक्षाचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांनी अनोख्या आणि शिस्तबद्ध प्रचार पद्धतीने लक्ष वेधले आहे. गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ घरोघरी थेट संपर्क साधताना त्यांनी सुमारे २० लाख पावले चालून प्रभागातील जवळपास ६० हजार नागरिकांशी किमान तीनदा प्रत्यक्ष संवाद साधला आहे. बिडकर यांच्या स्मार्टफोनवरील फिटनेस अॅपनुसार, या कालावधीत त्यांनी दररोज सरासरी १०,५११ पावले चालली आहेत. हे काम जुलै २०२५ पासून सुरू झाले असून, प्रभाग मध्यवर्ती भागात असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निवडणूक काळात पारंपरिक पदयात्रा टाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रचारादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून बिडकर यांनी पदयात्रा नको असे ठरविले होते. त्याऐवजी नियमित घरोघरी भेटींवर भर दिला,”आहे.या काळात त्यांनी प्रभागातील अनेक नागरिकांच्या घरीच सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण घेतले. डिसेंबरमध्ये पक्षाच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्यानंतरही संपर्कात खंड पडू दिला नाही. याबाबत बोलताना बिडकर म्हणाले “नियमित व्यायाम आणि नियंत्रित आहारामुळे मी संपूर्ण काळ फिट राहू शकलो. या २० लाख पावलांमध्ये मला पंढरपूर वारीच्या चार वारी इतके आशीर्वाद मिळाले, याचे अधिक समाधान आहे,” असे ते म्हणाले. प्रभागात विविध धर्म, जाती आणि आर्थिक स्तराचे नागरिक असून, पदयात्रा टाळून केलेल्या या ‘बिडकर पॅटर्न’ चे नागरिकांनी विशेष कौतुक केले आहे. शेवटच्या टप्प्यात पदयात्रा आणि जाहीर सभांचे आयोजन केल्याने प्रभागातील लोकांनी भाजपा उमेदवारांचे स्वागत केले. गणेश बिडकर पुढे म्हणाले, “प्रभाग २४ मध्ये विविध धर्माचे, अठरापगड जातींचे आणि विविध आर्थिक स्तर असलेले मतदार आहेत. या सर्व स्तरांतल्या मतदारांनी पदयात्रा टाळून केलेल्या प्रचाराच्या बिडकर पॅटर्नचे कौतुक केले याचे समाधान आहे. मी चाललेली वीस लाख पावले ही प्रभागाच्या आणि पुण्याच्या प्रगतीसाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे.” या अनोख्या जनसंपर्क अभियानामुळे बिडकर यांची प्रभागातील पकड अधिक घट्ट झाली असून, १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात त्यांचा विजयाचा दावा अधिक बळकट झाला आहे.