LATEST ARTICLES

भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ पदी अमोल कविटकर यांची नियुक्ती

0
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या महत्त्वपूर्ण पदावर श्री. अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र आज भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून जारी करण्यात आले असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. पक्ष संघटनेचे कार्य अधिक प्रभावी, गतिमान आणि सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी तसेच राज्यभरातील दौऱ्यांचे नियोजन, माध्यमांशी समन्वय आणि विविध संघटनात्मक उपक्रमांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल कविटकर यांनी यापूर्वीही पक्ष संघटना, जनसंपर्क, माध्यम समन्वय आणि विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे. २०२३-२०२६ या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय इलेक्ट्रॉनिक मीडियात १२ वर्षे बातमीदार ते ब्युरो चिफ या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ पक्ष संघटनेला निश्चितच होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून श्री. अमोल कविटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी नव्या जबाबदारीत यशस्वी कार्य करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उल्लेखनीय योगदान द्यावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
“भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या जबाबदारीसाठी माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. ही नियुक्ती माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. नेतृत्वाने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवत, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, माध्यम समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आणि प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पक्षाने दिलेल्या या संधीबद्दल सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार !
– अमोल कविटकर

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार (Parth Pawar engagement) आणि कायनात दारा (Kaiynaat Dara) यांचा साखरपुडा आज पुण्यात होत आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता साखरपुड्याचा मुहूर्त नियोजित आहे. या साखरपुडा सोहळ्यासाठी खास पण मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा यांचा हा साखरपुडा सोहळा येरवडा येथील हॉटेल द रिट्स कार्लटोन येथे होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 40 आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध पक्षातील 15 खासदारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे, सुधा मूर्ती, सी एम रमेश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योजक मोहित कंबोज यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. तसेच या साखरपुड्याला काही विशेष पाहुण्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना साखरपुड्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी आज (बुधवारी, ता२९) साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील आहेत, व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत.

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दत्तगुरूंची आरती

Newsworldmarathi Pune: उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन दत्तगुरूंची विधिवत आरती केली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात त्यांनी दत्तगुरूंचे दर्शन घेत राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनीही या प्रसंगी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार ॲड. सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर, विश्वस्त डॉ. पराग काळकर तसेच महेंद्रशेठ गाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती. धार्मिक परंपरा जपत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सातत्याने पुढाकार घेणाऱ्या दत्त मंदिर ट्रस्टतर्फे विविध मान्यवरांना मंदिरात आमंत्रित करून दर्शन व आरतीचे आयोजन केले जाते. त्याच परंपरेचा भाग म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमानंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या विविध उपक्रमांची माहिती देत भविष्यातील धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांबाबतही चर्चा केली. उपस्थित भाविकांनी दत्तगुरूंच्या जयघोषात आरतीचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.

इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा पदग्रहण समारंभ उत्साहात

0
Newsworldmarathi Pune: समाजसेवा” ‘सामाजिक बांधिलकी आणि मैत्रीची परंपरा जपणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा पदग्रहण समारंभ 17 जुलै रोजी नुकताच पुणे येथे पार पडला ‘या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ दीपशिखा पाठक उपस्थित होत्या.त्यांच्या शुभहस्ते मीना राठोड यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी अध्यक्ष कल्पना बोरा यांनी मागील वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर करत क्लबच्या उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट मंगल वायकर यांनी क्लबचा गेल्या सोळा वर्षांचा प्रेरणादायी प्रवास प्रभावी शब्दात मांडला आणि विविध सभासदांचा त्यांच्या विशेष कार्यासाठी भेटवस्तू देऊन गौरव केला. डॉ. दीपशिखा पाठक यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात असोसिएशनच्या प्रेसिडेंट विनूथा हरीश यांच्य*महिला सबलीकरण’ ‘सक्षमीकरण व सशक्तिकरण*या त्रिसूत्रीचा आपल्या प्रकल्पांद्वारेí प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्याचे आव्हान केले. तसेच इनरव्हीलच्या Grow and Flourish या थीम वरती मार्गदर्शन केले डॉ दीपशिखा पाठक यांच्या शुभहस्ते अध्यक्षपदी मीना राठोड, उपाध्यक्षपदी वृषाली शिरुडकर, सचिवपदी पूजा माळुंजकर, कोषाध्यक्ष माधुरी बोरा,आय एस ओ संगीता गोवळकर एडिटर वैशाली खुले यांचा पदग्रहण समारंभ झाला. कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन मंजुश्री उपासनी यांनी केले तर आभार वृषाली शिरोडकर यांनी मांडले.हा पदग्रहण सोहळा एकूणच अविस्मरणीय ठरला.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून एसआयआर मोहिमेला गती; बीएलओंसमवेत घराघरांत मतदारांशी संवाद

0
Newsworldmarathi Pune: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी SIR मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासह कोथरुड मधील घराघरांत भेटी देत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून भरलेले एसआयआर गणना फॉर्म स्वीकारून मोहिमेबाबत जनजागृतीही करण्यात आली. या भेटीदरम्यान ना. पाटील यांनी मतदारांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगत; प्रत्येक मतदाराची माहिती अचूक आणि अद्ययावत राहणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी चंद्रकांतदादांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत; ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नव्हते, अशा सर्वांना आवश्यक मार्गदर्शन करुन फॅार्म भरुन घेतले. तसेच, भरलेले फॉर्म तत्काळ स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया देखील यावेळी पार पडली. “मतदार यादीतील अचूकता ही सशक्त लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक मतदाराचे नाव यादीत समाविष्ट असावे, कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडूनही या मोहिमेला ८ ॲागस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन आपला SIR फॉर्म वेळेत भरून बीएलओंकडे जमा करावा,” असे आवाहन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर; ३०० हमाल बांधवांची डोळे तपासणी

0
Newsworldmarathi Pune: सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे, वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेश शहा यांनी केले. जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित डोळे तपासणी शिबिर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, बीएमडी (बोन मिनरल डेन्सिटी) तपासणी तसेच रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे, पुना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष दीपक बोरा, अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, पुणे हॉस्पिटलचे ट्रस्टी अशोक ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद पाटील, जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा, श्री पूना गुजराती बंधू समाजाचे खजिनदार हरीश शहा तसेच अमनोरा एस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबिरात मोठ्या प्रमाणावर हमाल बांधव आणि व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ३०० हमाल बांधवांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी करण्यात आली. याशिवाय ३० महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली आणि १८ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या आरोग्य उपक्रमाला व्यापारी, हमाल बांधव आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाज्योती व वनार्टीतील कोट्यवधींच्या निविदांची चौकशीची मागणी; प्रशांत वावगे व चंदनसिंग यांना पदावरून हटविण्याची मागणी

0
Newsworldmarathi Pune: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तसेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) येथील कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात महाज्योतीचे वित्त व लेखा अधिकारी तथा वनार्टीचे प्रभारी संचालक प्रशांत वावगे आणि महाज्योतीचे टेंडर सल्लागार चंदनसिंग यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या निविदांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र उच्चस्तरीय समिती किंवा सक्षम तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनानुसार, प्रशांत वावगे हे महाज्योतीमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांच्या बदलीनंतर प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या निविदा मंजूर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व निविदांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वनार्टीच्या प्रभारी संचालकपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांच्या कार्यकाळात काही निविदा विशिष्ट संस्थांना देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून या व्यवहारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. टेंडर सल्लागार चंदनसिंग यांच्याविरोधातही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनेक वर्षे टेंडर सल्लागार म्हणून कार्यरत राहून त्यांनी स्वतःच्या किंवा संबंधित संस्थांना तसेच परिचित संस्थांना कोट्यवधी रुपयांच्या निविदा मिळवून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विविध व्यक्तींच्या नावाने संस्था किंवा कंपन्या स्थापन करून निविदा वळविण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच प्रशांत वावगे आणि चंदनसिंग यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रोहन सुरवसे पाटील यांनी प्रशांत वावगे यांना महाज्योती व वनार्टीतील सर्व पदांवरून तात्काळ दूर करणे, चंदनसिंग यांची टेंडर सल्लागार म्हणून नियुक्ती रद्द करणे, त्यांच्या कार्यकाळातील सर्व निविदांची चौकशी करणे, दोषी आढळल्यास फौजदारी व विभागीय कारवाई करणे, शासनाच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे तसेच चंदनसिंग यांच्याशी संबंधित संस्थांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकून सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेतून वगळण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार रोहन सुरवसे पाटील यांनी इशारा दिला की, महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली नाही, तर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येईल. तसेच या कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री स्तरावर लावून धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या ही हातातून साकारतोय बाप्पा….

0
Newsworldmarathi Pune: आयुष्यातील एका वळणावर , रागाच्या भरात नकळत त्यांच्या हातून गुन्हा घडला, त्याची शिक्षा ते प्रामाणिकपणे भोगत आहेत.त्यांना नकारात्मक वातावरणातून बाहेर काढून त्यांच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून एका वेगळ्या आयुष्याचा शब्दश: श्री गणेशा येरवडा मध्यवर्ती कारागृहात संपन्न झाला.निमित्त होते कारागृहातील बंदी बांधवांना गणपती मूर्ती बनवण्याच्या प्रशिक्षणाचे. या सकारात्मक आणि विधायकते ची ही पालखी खांद्यावर पेलली होती जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर आणि त्यांचे चिरंजीव युवा शिल्पकार विराज खटावकर यांनी. महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान- पुणे आणि आदर्श मित्र मंडळ, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यातील चांगला माणूस जागा करण्या साठी गेली बारा वर्षे प्रेरणापथ हा उपक्रम कार्यरत आहे. या प्रकल्पांतर्गत या बांधवांना पर्यावरण पूरक बाप्पाची मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत या बांधवांनी माती मळण्यापासून ते प्रत्यक्ष गणपती मूर्ती बनवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे सहभाग घेतला. महाराष्ट्र कारागृह प्रशासनाचे अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, कारागृह ,कागारगृह उपमहा निरीक्षक श्री योगेश देसाई, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक श्री सुनील ढमाळ, अतिरिक्त अधीक्षक सौ पल्लवी कदम,सामाजिक कार्यकर्ते उदय जगताप, तुरुंग अधिकारी श्री शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा संपन्न झाली. या प्रकल्पाचे समन्वयक आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्रा. डॉ मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनामाची भूमिका स्पष्ट करताना या बांधवांना नैराश्यातून बाहेर काढून त्यांच्या हातून चांगले काम करून घेण्याच्या उद्दिष्टाने प्रेरणापथ प्रकल्प कार्यरत असून त्याला समाजाच्या विविध स्तरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले. जगप्रसिद्ध शिल्पकार विवेक खटावकर यांनी याप्रसंगी बोलताना या बंदी बांधवांमध्ये असलेल्या ऊर्जेला आणि कलात्मकतेला जर योग्य मार्ग आणि वळण मिळाले तर त्यांच्या हातून अनेक चांगल्या कलाकृती घडू शकतील आणि त्याची सुरुवात या कार्यशाळेतून झाली आहे असे सांगून माझ्या कला जीवनातल्या प्रवासातला हा अविस्मरणीय दिवस आहे असे नमूद केले. या कार्यशाळेत शिल्पकार शशिकांत राहूकर, अमित कलाल, रोहित गोळे, कागद काम निर्देशक पुंडलिक खलोलकर, शुभम मेदनकर, प्रवीण सोनवणे, संजय मोरे यांनी मार्गदर्शन केले. *या बंदी बांधवांनी बनवलेल्या गणेश मूर्ती समाजातील विविध मान्यवरांनी खरेदी करून या मंडळींच्या वेगळ्या आयुष्याची सुरुवात करावी असे आवाहन महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्र मंडळ यांच्या वतीने या निमित्ताने करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुरुंग अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी केले. शिक्षक श्री नामदेव शिंदे गुरुजी यांनी आभार प्रदर्शन केले.

पुनीत बालन स्टुडिओजच्या ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार; मनवीर जसरोटिया यांना सर्वोत्कृष्ट संकलनाचा सन्मान

0
Newsworldmarathi Pune : पुनीत बालन स्टुडिओज निर्मित ‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ या माहितीपटासाठी मनवीर जसरोटिया यांना ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये गैर-फीचर चित्रपट (Non-Feature Film) विभागातील सर्वोत्कृष्ट संकलन (Best Editing) या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या पुरस्कारांची घोषणा शनिवारी करण्यात आली. पुनीत बालन स्टुडिओज निर्मित हा माहितीपट खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (National Defence Academy – NDA) या देशातील तिन्ही सैन्यदलांसाठी अधिकारी घडविणाऱ्या अग्रगण्य प्रशिक्षण संस्थेच्या ७५ वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला समर्पित आहे. एनडीएच्या स्थापनेपासून ते जगातील सर्वाधिक प्रतिष्ठित लष्करी प्रशिक्षण संस्थांपैकी एक होईपर्यंतचा प्रवास, त्यातील महत्त्वाचे टप्पे, परंपरा आणि भारतीय सशस्त्र दलासाठी घडविलेल्या अनेक पिढ्यांतील अधिकाऱ्यांचे योगदान या माहितीपटातून प्रभावीपणे उलगडण्यात आले आहे. तनुज भाटिया आणि तनुका लाघाटे यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून मुग्धा कालरा यांनी लेखन केले आहे. दुर्मीळ संग्रहित दृश्ये आणि प्रभावी दृश्यात्मक कथनशैलीच्या माध्यमातून एनडीएचा नेतृत्व, शिस्त आणि उत्कृष्टतेचा वारसा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. या माहितीपटातील मनवीर जसरोटिया यांच्या उत्कृष्ट संकलनाला राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे पुनीत बालन स्टुडिओजच्या अर्थपूर्ण, प्रभावी आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांवर दर्जेदार चित्रपट निर्मिती करण्याच्या वचनबद्धतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.
“‘७५ इयर्स ऑफ एनडीए’ला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार हा आमच्या संपूर्ण टीमसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. हा सन्मान राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या गौरवशाली परंपरेला आणि देशसेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या शूर अधिकाऱ्यांना समर्पित आहे. या प्रेरणादायी प्रवासाचे दस्तऐवजीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नाची सर्वोच्च स्तरावर दखल घेण्यात आल्याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संकलक मनवीर जसरोटिया आणि आमच्या संपूर्ण सर्जनशील टीमचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. हा सन्मान भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला समर्पित आहे.”
– पुनीत बालन, निर्माते

गुरुपौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Newsworldmarathi Pune: गुरुपौर्णिमेनिमित्त कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ ते २९ जुलै या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक उपक्रम पार पडणार असून, भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळच्या सत्रात धार्मिक विधी व पूजा-अर्चा, दुपारच्या सत्रात भजनाचा कार्यक्रम तसेच सायंकाळी भक्तिगीते व भावगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मंदिरात दिवसभर भाविकांसाठी प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. या उत्सवाच्या काळात विविध क्षेत्रांतील मान्यवर मंदिरास भेट देणार असून, भाविकांना आध्यात्मिक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. याबाबत माहिती देताना ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी सांगितले, “गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त भाविकांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विशेष आखणी करण्यात आली असून, सर्वांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा.” यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे, खजिनदार ॲड. सूरज थोरात, विश्वस्त वर्षा थोरवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, विश्वस्त महेंद्रशेठ गाडवे, उत्सव प्रमुख नितीन पंडित तसेच उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर उपस्थित होते.