LATEST ARTICLES
लोहगाव जमिनीच्या विक्री प्रकरणात साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करणार्या सुभाष दुगड, राजेंद्र दुगडसह ५ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
पुणे : Pune Crime Court News । न्यायालयात दावा चालू असताना लोहगाव येथील जमिनीबाबत कोणतीही पूर्वसंमती न घेता परस्पर विक्री करुन ५ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सुभाष दुगड, राजेंद्र दुगड यांच्यासह ५ जणांची न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबत रवींद्र नौपातलाल साकला (वय ६३, रा. आर एन एस अॅलेक्झांड्रा रोड, घोरपडी) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुभाष उत्तमचंद दुगड Subhash Uttamchand Dugad, राजेंद्र उत्तमचंद दुगड Rajendra Uttamchand Dugad (रा. बिबवेवाडी) संदेश अशोक भन्साळी Sandesh Ashok Bhansali (रा. राज् र ता खेड), शेख उमर लतीफ इनामदार Sheikh Umar Latif Inamdar (रा. चदंननगर), भास्कर रेड्डी नारायण कल्लरी रेड्डी Bhaskar Reddy Narayan Kallari Reddy (रा. बी. कवडे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार लोहगाव येथील सर्वे नंबर १६३, NEW नंबर ८/१/२ एकूण क्षेत्र १ हेक्टर ८ आर पैकी नार येथे व वेगवेगळ्या शासकीय दुय्यम निबंधक कार्यालयात २०१० ते सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र साकला हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची लोहगाव येथे जमीन आहे. आरोपी सुभाष दुगड, राजेंद्र दुगड व इतरांनी या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांचा न्यायालयात दावा चालू आहे. असे असताना आरोपींनी आपसात कट रचून साकला यांची कोणतीही संमती न घेता जमिनीची परस्पर विक्री केली. त्याचे ५ कोटी ७० लाख रुपये स्वीकारुन फिर्यादी यांचे आर्थिक नुकसान पोहचवुन फसवणूक केली आहे. लोहगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
लोहगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी पाच जणांना न्यायालयात हजर केले होते. आरोपी यांनी तयार केलेले बनावट कुलमुख्यत्यार पत्र, बनावट खरेदी खत हस्तगत करायचे आहे. त्यांनी कोणाकोणाकडून पैसे घेतले, त्याची माहिती घेऊन ते हस्तगत करायचे आहेत.
यातील आरोपी मेहबुब अब्दुल गफार शेख हा फरार असून आरोपीच्या मदतीने त्याचा शोध घ्यायचा आहे. मेहबुब शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी फसवणूकीचे आर्थिक गुन्हे दाखल आहेत. तसेच NEW Iडळ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का प्रति कारवाई करण्यात आली होती. तसेच भास्कर रेड्डी आणि सुभाष दुगड यांच्यावरही यापूर्वी गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडे तपासासाठी पोलीस कोठडी मिळाली, अशी पोलिसांनी विनंती केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला विरोध करत हा सर्व कागदोपत्री पुरावा आहे, त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यांचे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
उच्च न्यायालयात दावा प्रलंबित असतानाच कोट्यवधींचा जमीन व्यवहार; मोक्का आरोपीसह सहा जणांविरोधात गुन्हा
Newsworldmarathi Pune: उच्च न्यायालयात जमीन मालकीचा वाद प्रलंबित असतानाच संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा जमीन व्यवहार करून मूळ जमीनमालकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी मेहबूब अब्दुल गफार शेख हा हडपसर-कोंढवा आणि काळेपडळ परिसरातील कुख्यात गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्या संघटित गुन्हेगारी टोळीतील सदस्य असून, तो मोक्का (MCOCA) प्रकरणातील सहआरोपी असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जमीन रविंद्र साकला यांच्या मालकीची व ताब्यातील असून या जमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका प्रलंबित आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही आरोपींनी संगनमताने पूर्वनियोजित कट रचून बनावट खरेदीखत तयार केले, त्याची शासनाकडे नोंदणी करून जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात सुभाष उत्तमचंद दुगड, राजेंद्र उत्तमचंद दुगड, संदेश अशोक भन्साळी यांच्यासह मेहबूब शेख याची एजंट म्हणून भूमिका असण्याची शक्यता तपासात नाकारता येत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपींनी न्यायालयात दावा प्रलंबित असल्याची माहिती असूनही व्यवहार केल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अवैध दस्तऐवज तयार करून मूळ जमीनमालक रविंद्र साकला यांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या संपूर्ण व्यवहारामागील आर्थिक साखळी, बनावट कागदपत्रांची निर्मिती, तसेच गुन्हेगारी टोळीशी असलेले संभाव्य संबंध याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पुणे शिवसेनेला नवा चेहरा; हेमंत बागुल यांच्यावर युवासेना महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी
Newsworldmarathi Pune: पुण्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा नेतृत्व हेमंत बागुल यांच्यावर शिवसेनेकडून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची युवासेना पुणे महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे शहरातील शिवसेना संघटनेला नव्या दमाचे नेतृत्व मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यभरात संघटनात्मक बांधणीवर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हेमंत बागुल यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगला संपर्क, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य यामुळे बागुल यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला आहे.
युवासेना महानगर अध्यक्ष म्हणून बागुल यांच्यासमोर पुण्यात युवकांना पक्षाशी जोडणे, संघटन विस्तार करणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेमंत बागुल यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुण्यातील शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, तसेच युवकांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात बागुल यांच्या नेतृत्वाखाली युवासेना शहरात विविध सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताचे उपक्रम राबविणार असल्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ पदी अमोल कविटकर यांची नियुक्ती
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या महत्त्वपूर्ण पदावर श्री. अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र आज भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून जारी करण्यात आले असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.
पक्ष संघटनेचे कार्य अधिक प्रभावी, गतिमान आणि सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी तसेच राज्यभरातील दौऱ्यांचे नियोजन, माध्यमांशी समन्वय आणि विविध संघटनात्मक उपक्रमांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे.
अमोल कविटकर यांनी यापूर्वीही पक्ष संघटना, जनसंपर्क, माध्यम समन्वय आणि विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे. २०२३-२०२६ या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय इलेक्ट्रॉनिक मीडियात १२ वर्षे बातमीदार ते ब्युरो चिफ या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ पक्ष संघटनेला निश्चितच होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून श्री. अमोल कविटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी नव्या जबाबदारीत यशस्वी कार्य करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उल्लेखनीय योगदान द्यावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
“भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या जबाबदारीसाठी माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. ही नियुक्ती माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. नेतृत्वाने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवत, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, माध्यम समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आणि प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पक्षाने दिलेल्या या संधीबद्दल सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार !– अमोल कविटकर
Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार (Parth Pawar engagement) आणि कायनात दारा (Kaiynaat Dara) यांचा साखरपुडा आज पुण्यात होत आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता साखरपुड्याचा मुहूर्त नियोजित आहे. या साखरपुडा सोहळ्यासाठी खास पण मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.
पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा यांचा हा साखरपुडा सोहळा येरवडा येथील हॉटेल द रिट्स कार्लटोन येथे होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 40 आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध पक्षातील 15 खासदारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे, सुधा मूर्ती, सी एम रमेश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योजक मोहित कंबोज यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. तसेच या साखरपुड्याला काही विशेष पाहुण्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना साखरपुड्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार
खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी आज (बुधवारी, ता२९) साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील आहेत, व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत.
आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात दत्तगुरूंची आरती
Newsworldmarathi Pune: उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन दत्तगुरूंची विधिवत आरती केली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात त्यांनी दत्तगुरूंचे दर्शन घेत राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
यावेळी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनीही या प्रसंगी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार ॲड. सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषा खेडेकर, विश्वस्त डॉ. पराग काळकर तसेच महेंद्रशेठ गाडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
धार्मिक परंपरा जपत सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सातत्याने पुढाकार घेणाऱ्या दत्त मंदिर ट्रस्टतर्फे विविध मान्यवरांना मंदिरात आमंत्रित करून दर्शन व आरतीचे आयोजन केले जाते. त्याच परंपरेचा भाग म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमानंतर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या विविध उपक्रमांची माहिती देत भविष्यातील धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांबाबतही चर्चा केली. उपस्थित भाविकांनी दत्तगुरूंच्या जयघोषात आरतीचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता झाली.
इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा पदग्रहण समारंभ उत्साहात
Newsworldmarathi Pune: समाजसेवा” ‘सामाजिक बांधिलकी आणि मैत्रीची परंपरा जपणाऱ्या इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटिनमचा पदग्रहण समारंभ 17 जुलै रोजी नुकताच पुणे येथे पार पडला ‘या सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट चेअरमन डॉ दीपशिखा पाठक उपस्थित होत्या.त्यांच्या शुभहस्ते मीना राठोड यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी अध्यक्ष कल्पना बोरा यांनी मागील वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा सादर करत क्लबच्या उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला क्लबच्या चार्टर प्रेसिडेंट मंगल वायकर यांनी क्लबचा गेल्या सोळा वर्षांचा प्रेरणादायी प्रवास प्रभावी शब्दात मांडला आणि विविध सभासदांचा त्यांच्या विशेष कार्यासाठी भेटवस्तू देऊन गौरव केला.
डॉ. दीपशिखा पाठक यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात असोसिएशनच्या प्रेसिडेंट विनूथा हरीश यांच्य*महिला सबलीकरण’ ‘सक्षमीकरण व सशक्तिकरण*या त्रिसूत्रीचा आपल्या प्रकल्पांद्वारेí प्रभावीपणे प्रचार व प्रसार करण्याचे आव्हान केले. तसेच इनरव्हीलच्या Grow and Flourish या थीम वरती मार्गदर्शन केले डॉ दीपशिखा पाठक यांच्या शुभहस्ते अध्यक्षपदी मीना राठोड, उपाध्यक्षपदी वृषाली शिरुडकर, सचिवपदी पूजा माळुंजकर, कोषाध्यक्ष माधुरी बोरा,आय एस ओ संगीता गोवळकर एडिटर वैशाली खुले यांचा पदग्रहण समारंभ झाला.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबवण्यात आले कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन मंजुश्री उपासनी यांनी केले तर आभार वृषाली शिरोडकर यांनी मांडले.हा पदग्रहण सोहळा एकूणच अविस्मरणीय ठरला.
ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून एसआयआर मोहिमेला गती; बीएलओंसमवेत घराघरांत मतदारांशी संवाद
Newsworldmarathi Pune: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरुडचे आमदार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी SIR मोहिमेला अधिक गती देण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्यासह कोथरुड मधील घराघरांत भेटी देत मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी नागरिकांकडून भरलेले एसआयआर गणना फॉर्म स्वीकारून मोहिमेबाबत जनजागृतीही करण्यात आली.
या भेटीदरम्यान ना. पाटील यांनी मतदारांना एसआयआर मोहिमेचे महत्त्व समजावून सांगत; प्रत्येक मतदाराची माहिती अचूक आणि अद्ययावत राहणे ही लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे सांगितले. मतदार यादी अधिक पारदर्शक, अचूक आणि विश्वासार्ह करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
विशेष म्हणजे यावेळी चंद्रकांतदादांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत; ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नव्हते, अशा सर्वांना आवश्यक मार्गदर्शन करुन फॅार्म भरुन घेतले. तसेच, भरलेले फॉर्म तत्काळ स्वीकारून संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया देखील यावेळी पार पडली.
“मतदार यादीतील अचूकता ही सशक्त लोकशाहीचा पाया आहे. प्रत्येक मतदाराचे नाव यादीत समाविष्ट असावे, कोणीही मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगाकडूनही या मोहिमेला ८ ॲागस्टपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने एसआयआर मोहिमेत सहभागी होऊन आपला SIR फॉर्म वेळेत भरून बीएलओंकडे जमा करावा,” असे आवाहन ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.
कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आरोग्य शिबिर; ३०० हमाल बांधवांची डोळे तपासणी
Newsworldmarathi Pune: सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देणे, वेळेवर आरोग्य तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन डॉ. राजेश शहा यांनी केले.
जयराज ग्रुपचे संस्थापक कै. हिराभाई शहा यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित डोळे तपासणी शिबिर, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी, बीएमडी (बोन मिनरल डेन्सिटी) तपासणी तसेच रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे, पुना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष दीपक बोरा, अडते असोसिएशनचे माजी अध्यक्ष विलास भुजबळ, पुणे हॉस्पिटलचे ट्रस्टी अशोक ओसवाल, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचे अध्यक्ष मिलिंद पाटील, जयराज ग्रुपचे संचालक धवल शहा, श्री पूना गुजराती बंधू समाजाचे खजिनदार हरीश शहा तसेच अमनोरा एस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात मोठ्या प्रमाणावर हमाल बांधव आणि व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला. यावेळी ३०० हमाल बांधवांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच २०० जणांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले, तर २५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंदणी करण्यात आली. याशिवाय ३० महिलांची ब्रेस्ट कॅन्सर तपासणी करण्यात आली आणि १८ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
कै. हिराभाई शहा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या आरोग्य उपक्रमाला व्यापारी, हमाल बांधव आणि विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाज्योती व वनार्टीतील कोट्यवधींच्या निविदांची चौकशीची मागणी; प्रशांत वावगे व चंदनसिंग यांना पदावरून हटविण्याची मागणी
Newsworldmarathi Pune: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) तसेच वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) येथील कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी नेते रोहन सुरवसे पाटील यांनी महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात महाज्योतीचे वित्त व लेखा अधिकारी तथा वनार्टीचे प्रभारी संचालक प्रशांत वावगे आणि महाज्योतीचे टेंडर सल्लागार चंदनसिंग यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या निविदांमध्ये अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांची स्वतंत्र उच्चस्तरीय समिती किंवा सक्षम तपास यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, प्रशांत वावगे हे महाज्योतीमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांच्या बदलीनंतर प्रभारी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधी रुपयांच्या निविदा मंजूर झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व निविदांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वनार्टीच्या प्रभारी संचालकपदाची जबाबदारी सांभाळत असतानाही त्यांच्या कार्यकाळात काही निविदा विशिष्ट संस्थांना देण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून या व्यवहारांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
टेंडर सल्लागार चंदनसिंग यांच्याविरोधातही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अनेक वर्षे टेंडर सल्लागार म्हणून कार्यरत राहून त्यांनी स्वतःच्या किंवा संबंधित संस्थांना तसेच परिचित संस्थांना कोट्यवधी रुपयांच्या निविदा मिळवून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विविध व्यक्तींच्या नावाने संस्था किंवा कंपन्या स्थापन करून निविदा वळविण्यात आल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच प्रशांत वावगे आणि चंदनसिंग यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त करून त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रोहन सुरवसे पाटील यांनी प्रशांत वावगे यांना महाज्योती व वनार्टीतील सर्व पदांवरून तात्काळ दूर करणे, चंदनसिंग यांची टेंडर सल्लागार म्हणून नियुक्ती रद्द करणे, त्यांच्या कार्यकाळातील सर्व निविदांची चौकशी करणे, दोषी आढळल्यास फौजदारी व विभागीय कारवाई करणे, शासनाच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे तसेच चंदनसिंग यांच्याशी संबंधित संस्थांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकून सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेतून वगळण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार
रोहन सुरवसे पाटील यांनी इशारा दिला की, महाज्योतीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी या निवेदनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली नाही, तर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात येईल. तसेच या कथित आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री स्तरावर लावून धरली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

