LATEST ARTICLES

तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय प्रवासाचा उलगडा होणार; ८ ऑगस्ट रोजी पुण्यात प्रकट मुलाखत

0
Newsworldmarathi Pune: अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, प्रशासकीय कारकिर्दीतील धाडसी निर्णयांचा आणि जनहितासाठी केलेल्या कामांचा उलगडा करणारी विशेष प्रकट मुलाखत शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. “भविष्यवेध – संवाद भविष्याचा” या उपक्रमांतर्गत “अनस्टॉपेबल तुकाराम” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या मुलाखतीत तुकाराम मुंढे आपल्या बालपणापासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) केलेल्या उल्लेखनीय प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधणार आहेत. विविध पदांवर कार्यरत असताना घेतलेले कठोर निर्णय, आलेली आव्हाने, प्रशासनातील अनुभव, पारदर्शक कारभाराची भूमिका तसेच समाजहितासाठी केलेल्या उपक्रमांबाबत ते उपस्थितांशी संवाद साधतील. ही विशेष मुलाखत प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप घेणार असून, त्यांच्या प्रश्नांमधून तुकाराम मुंढे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणार आहेत. पुणे लोकल कनेक्ट आणि माय जनसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून होणारी गर्दी लक्षात घेता, पूर्वनोंदणी करण्यासाठी. https://myjansevak.com/event/unstoppable-tukaram या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन आयोजक अमित रुके आणि विरेश आंधळकर यांनी केले आहे.

कोसळणाऱ्या पावसात, गुडघाभर चिखलात, महिला शेतकऱ्यांचा ‘फ्रेंडशिप डे’ जोरात!

Newsworldmarathi Pune: नव्या ‘लाइफस्टाईल’मध्ये मैत्री दिन धडाक्यात साजरा होत असतानाच, या आणि अशा उत्सवाची पुसटशीही कल्पना नसलेल्या आणि रोज केवळ १०-१२ तास डोंगरदऱ्यांत, रानावनात, ऐन पावसात भात लावणी करणाऱ्या, शेतीत राबराब राबणाऱ्या महिला शेतकऱ्यांनी रविवारी आयुष्यातील पहिलावहिला मैत्री दिन अनुभवला! हा क्षण पाहून भारावलेल्या महिला शेतकऱ्यांनी बांधावर एकत्र येत खरोखरीच मैत्री दिन फुलविला.. या साऱ्याचे निमित्त ठरले, ते नवी मुंबईतील ‘आरबीजी फाऊंडेशन’ने ‘फ्रेंडशिप डे’चे औचित्य साधून हाती घेतलेल्या ‘चला बांधावर जाऊ, महिला शेतकऱ्यांना बळ देऊ’! या उपक्रमाचे! फाऊंडेशनच्या अध्यक्षा मधुरा गेठे यांनी शेतीत जाऊन ५०० महिलांना रेनकोट देऊन, अनोखा ‘मैत्री दिन’ उत्साहात साजरा केला. शेतकरी हा पोशिंदा आहे. प्रतिकूल हवामानातही तो शेतात राबून समाजाच्या अन्नाची गरज पूर्ण करतो. त्याच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी महिलांना बांधावर जात रेनकोट देण्यात आले. पावसाने जोर धरल्याने सध्या भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. पावसाचा जोर किती आणि कसाही असला तरीही, भातलावणी थांबत नाही. या कामात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतकरी ऐन पावसात दिवसभर राबत असतात. पावसापासून बचावासाठी डोक्यावर काही नसले तरीही ही मंडळी आनंदाने भातलावणी करीत असतात. मात्र, अशा पावसात शेतकरी महिला भिजू नयेत, याकरिता फाऊंडेशनच्या माध्यमातून रेनकोटचे वाटप करण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील कसारा परिसरातील भातलावणी करणाऱ्या महिला शेतकरी, शेतकरी बांधवांसह गोविंद तळपाडे, संतोष कचरे, राजेंद्र बागुल, मारोती काशिदे, पंकज मनोहर, जगदीश जाधव, उत्तम वाघ आदी उपस्थित होते. महिला शेतकरी फोरम ! महिला शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महिला शेतकरी फोरम सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मधुरा गेठे यांनी जाहीर आहे. महिला शेतकरी, राज्य सरकार आणि सरकारचे विविध कृषी विभाग यांना एकत्र आणून हा फोरम काम करणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांचा समावेश असेल.
“घर, मुलाबाळांचा सांभाळून करून महिला आता शेतीतही आघाडीवर आहेत, हे चित्र आशादायी आहे. शेतीतील कष्टातून हाती काय लागेल, याची हमी नसतानाही महिला शेतकरी प्रचंड मेहनत घेतात. त्यात पाऊस, वारा याची चिंता न करता महिला दिवस-दिवस राबत आहेत, अशा महिलांसोबत मैत्रीचे नाते जोडून सामाजिक धागा घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.”
मधुरा गेठे, अध्यक्षा, आरबीजी फाऊंडेशन, नवी मुंबई.

अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्काराने माजी मंत्री दिलीप कांबळे व आमदार अमित गोरखे सन्मानीत

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहर जिल्हा मातंग समजाच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित असा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल माजी मंत्री दिलीप कांबळे तर समाजामध्ये शैक्षणिक व समाज जागृती मध्ये उल्लेखनीय योगदान असणारे युवा आमदार अमित गोरखे यांना आज प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आमदार सुनील कांबळे ,पुणे शहर मातंग समाजाचे स्वागताध्यक्ष अनिल हातागळे ,सचिव अँड.महेश सकट,समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक एकनाथ सुगावकर, नगरसेविका मृणाल कांबळे, वृशाली रिठे, माजी नगरसेवक आंनद रिठे, बापू कांबळे, डॉ.भरत वैरागे, स्वाती लोखंडे तसेच अशोक लोखंडे,प्रकाश वैराळ, रवि आरडे, निलेश वाघमारे,दत्ता जाधव ,सचिन जोगदंड, राजू अडागळे, रामभाऊ कसबे यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .या पुरस्काराचे स्वरूप मानपत्र,सन्मानचिन्ह,शाल श्रीफळ असे होते . लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावर्षी माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच वीर लढवय्या फकीरा पुरस्कार दुर्गेश हातागळे व दिगंबर जोगदंड यांना, तर सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार कोमल शिंदे यांना प्रदान करण्यात आला. स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरात भव्य सभा मंडपात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, मातंग समाजाचे पदाधिकारी, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या विचारांवर आधारित समाजकार्य अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचेही यावेळी वक्त्यांनी नमूद केले. पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे नियोजन आणि संयोजन उत्कृष्टरीत्या करण्यात आले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले. कार्यक्रमामुळे अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर आणि समाजातील कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा; २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा

0
Newsworldmarathi Pune: आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या लाखो वारकऱ्यांना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा ( डायल १०८) अंतर्गत २७ रुग्णवाहिका २४ तास सेवेत तैनात करण्यात आल्या होत्या. या सेवेमार्फत एकूण २,४४५ वारकऱ्यांना वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. राज्यात महाराष्ट्र्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा बीव्हीजीद्वारे संचालित केली जाते. वारकऱ्यांना तात्काळ आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पंढरपूर येथे विशेष नियंत्रण कक्ष उभारण्यात आला होता. या नियंत्रण कक्षातून पालखी सोहळ्याचे सातत्याने निरीक्षण करून आवश्यकतेनुसार तात्काळ रुग्णवाहिका पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. या नियंत्रण कक्षाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन सेवा व्यवस्थेची पाहणी केली.
Oplus_16908288
याबाबत प्रतिक्रिया देताना बीव्हीजीचे चेअरमन हणमंतराव गायकवाड म्हणाले, “पंढरीच्या वारीत भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमचे भाग्य आहे. आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश अबिटकर यांच्या सूचनेनुसार आम्ही अल्पावधीत २७ रुग्णवाहिकांचे नियोजन केले. वारकऱ्यांना सुरक्षित व आरोग्यमय वारीचा अनुभव मिळावा, यासाठी बीव्हीजीचे आरोग्यदूत अहोरात्र सेवेत कार्यरत होते.” मानाच्या दहा पालख्यांसाठी १०८ रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या पालख्यांमध्ये संत निवृत्तीनाथ महाराज (त्र्यंबकेश्वर), संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), संत सोपानकाका महाराज (सासवड), संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), संत तुकाराम महाराज (देहू), संत नामदेव महाराज (पंढरपूर), संत एकनाथ महाराज (पैठण), रुक्मिणी माता (कौडानेपूर, अमरावती), संत निळोबाराय (पिंपळनेर, पारनेर) आणि संत चांगाटेश्वर महाराज (सासवड) यांचा समावेश होता. आषाढी वारीदरम्यान ‘गुड समरीटन’ स्वयंसेवकांनी ॲपचा प्रभावी वापर करून आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ माहिती १०८ नियंत्रण कक्षापर्यंत पोहोचवली. त्यामुळे रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मोठी मदत झाली. याबाबत स्वयंसेवक दयानंद मेंशेके म्हणाले, “आषाढी वारीपूर्वी शासनामार्फत आयोजित प्रशिक्षणामुळे आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचा आत्मविश्वास मिळाला. एक महिला भाविक बेशुद्ध पडताच मी तात्काळ ‘गुड समरीटन’ ॲपद्वारे माहिती दिली. ॲप प्रभावीपणे कार्यरत असल्याने १०८ रुग्णवाहिका अल्पावधीत घटनास्थळी पोहोचली आणि संबंधित महिलेला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले.”

दप्तराविना शाळा उपक्रमात भातुकलीतून आनंददायी शिक्षण

0
Newsworldmarathi Pune: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, शनिवार पेठ येथील पूर्व प्राथमिक विभागात शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना कृतीतून शिकण्याचा आनंद मिळावा आणि दैनंदिन जीवनातील विविध गोष्टींची प्रत्यक्ष ओळख व्हावी, या उद्देशाने भातुकलीचा खेळ आयोजित करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी भातुकलीचा खेळ मांडण्यात आला होता. भातुकलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या भांड्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाजी धुणे, सोलणे, किसणे, चिरणे, पुरी लाटणे, दाणे कुटणे अशा विविध सोप्या कृती उत्साहाने आणि आनंदाने केल्या. या सर्व कृती करताना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने सहभाग नोंदवला. या कृतीशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील विविध वस्तू, त्यांचा उपयोग आणि विविध कृतींची प्रत्यक्ष ओळख झाली. तसेच विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत वाढ होण्यास, सूक्ष्म स्नायूंच्या विकासास तसेच निरीक्षण क्षमता आणि कृतीतून शिकण्याच्या सवयीला चालना मिळाली. खेळाच्या माध्यमातून शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी आनंददायी अनुभव घेतला. शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व प्राथमिक विभागातील शिक्षकांनी या उपक्रमाचे नियोजन व आयोजन केले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, आत्मविश्वास वाढविणे आणि शिक्षण अधिक आनंददायी व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

लोहगाव जमिनीच्या विक्री प्रकरणात साडेपाच कोटी रुपयांची फसवणूक करणार्‍या सुभाष दुगड, राजेंद्र दुगडसह ५ जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0
पुणे : Pune Crime Court News । न्यायालयात दावा चालू असताना लोहगाव येथील जमिनीबाबत कोणतीही पूर्वसंमती न घेता परस्पर विक्री करुन ५ कोटी ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सुभाष दुगड, राजेंद्र दुगड यांच्यासह ५ जणांची न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. याबाबत रवींद्र नौपातलाल साकला (वय ६३, रा. आर एन एस अॅलेक्झांड्रा रोड, घोरपडी) यांनी लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सुभाष उत्तमचंद दुगड Subhash Uttamchand Dugad, राजेंद्र उत्तमचंद दुगड Rajendra Uttamchand Dugad (रा. बिबवेवाडी) संदेश अशोक भन्साळी Sandesh Ashok Bhansali (रा. राज् र ता खेड), शेख उमर लतीफ इनामदार Sheikh Umar Latif Inamdar (रा. चदंननगर), भास्कर रेड्डी नारायण कल्लरी रेड्डी Bhaskar Reddy Narayan Kallari Reddy (रा. बी. कवडे रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हा प्रकार लोहगाव येथील सर्वे नंबर १६३, NEW नंबर ८/१/२ एकूण क्षेत्र १ हेक्टर ८ आर पैकी नार येथे व वेगवेगळ्या शासकीय दुय्यम निबंधक कार्यालयात २०१० ते सप्टेंबर २०२५ दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रवींद्र साकला हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांची लोहगाव येथे जमीन आहे. आरोपी सुभाष दुगड, राजेंद्र दुगड व इतरांनी या जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांचा न्यायालयात दावा चालू आहे. असे असताना आरोपींनी आपसात कट रचून साकला यांची कोणतीही संमती न घेता जमिनीची परस्पर विक्री केली. त्याचे ५ कोटी ७० लाख रुपये स्वीकारुन फिर्यादी यांचे आर्थिक नुकसान पोहचवुन फसवणूक केली आहे. लोहगाव पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. लोहगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी पाच जणांना न्यायालयात हजर केले होते. आरोपी यांनी तयार केलेले बनावट कुलमुख्यत्यार पत्र, बनावट खरेदी खत हस्तगत करायचे आहे. त्यांनी कोणाकोणाकडून पैसे घेतले, त्याची माहिती घेऊन ते हस्तगत करायचे आहेत. यातील आरोपी मेहबुब अब्दुल गफार शेख हा फरार असून आरोपीच्या मदतीने त्याचा शोध घ्यायचा आहे. मेहबुब शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी फसवणूकीचे आर्थिक गुन्हे दाखल आहेत. तसेच NEW Iडळ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का प्रति कारवाई करण्यात आली होती. तसेच भास्कर रेड्डी आणि सुभाष दुगड यांच्यावरही यापूर्वी गुन्हे दाखल आहे. त्यांच्याकडे तपासासाठी पोलीस कोठडी मिळाली, अशी पोलिसांनी विनंती केली. बचाव पक्षाच्या वकिलांनी त्याला विरोध करत हा सर्व कागदोपत्री पुरावा आहे, त्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. त्यानंतर न्यायालयाने त्यांचे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

उच्च न्यायालयात दावा प्रलंबित असतानाच कोट्यवधींचा जमीन व्यवहार; मोक्का आरोपीसह सहा जणांविरोधात गुन्हा

Newsworldmarathi Pune: उच्च न्यायालयात जमीन मालकीचा वाद प्रलंबित असतानाच संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांचा जमीन व्यवहार करून मूळ जमीनमालकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींपैकी मेहबूब अब्दुल गफार शेख हा हडपसर-कोंढवा आणि काळेपडळ परिसरातील कुख्यात गुंड रिझवान उर्फ टिपू सत्तार पठाण याच्या संघटित गुन्हेगारी टोळीतील सदस्य असून, तो मोक्का (MCOCA) प्रकरणातील सहआरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित जमीन रविंद्र साकला यांच्या मालकीची व ताब्यातील असून या जमिनीबाबत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका प्रलंबित आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाही आरोपींनी संगनमताने पूर्वनियोजित कट रचून बनावट खरेदीखत तयार केले, त्याची शासनाकडे नोंदणी करून जमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप आहे. या व्यवहारातून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात सुभाष उत्तमचंद दुगड, राजेंद्र उत्तमचंद दुगड, संदेश अशोक भन्साळी यांच्यासह मेहबूब शेख याची एजंट म्हणून भूमिका असण्याची शक्यता तपासात नाकारता येत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच आरोपींनी न्यायालयात दावा प्रलंबित असल्याची माहिती असूनही व्यवहार केल्याने मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी अवैध दस्तऐवज तयार करून मूळ जमीनमालक रविंद्र साकला यांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या संपूर्ण व्यवहारामागील आर्थिक साखळी, बनावट कागदपत्रांची निर्मिती, तसेच गुन्हेगारी टोळीशी असलेले संभाव्य संबंध याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणी लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पुणे शिवसेनेला नवा चेहरा; हेमंत बागुल यांच्यावर युवासेना महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले युवा नेतृत्व हेमंत बागुल यांच्यावर शिवसेनेकडून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांची युवासेना पुणे महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे शहरातील शिवसेना संघटनेला नव्या दमाचे नेतृत्व मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना राज्यभरात संघटनात्मक बांधणीवर भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात संघटना अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने हेमंत बागुल यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे बोलले जात आहे. युवा कार्यकर्त्यांमध्ये चांगला संपर्क, विविध सामाजिक उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि संघटन कौशल्य यामुळे बागुल यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला आहे. युवासेना महानगर अध्यक्ष म्हणून बागुल यांच्यासमोर पुण्यात युवकांना पक्षाशी जोडणे, संघटन विस्तार करणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका घेणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढविण्याचे मोठे आव्हान असणार आहे. या नियुक्तीनंतर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेमंत बागुल यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पुण्यातील शिवसेनेला नवसंजीवनी मिळेल, तसेच युवकांमध्ये पक्षाची पकड अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळात बागुल यांच्या नेतृत्वाखाली युवासेना शहरात विविध सामाजिक, संघटनात्मक आणि जनहिताचे उपक्रम राबविणार असल्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

भाजप महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ पदी अमोल कविटकर यांची नियुक्ती

0
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या महत्त्वपूर्ण पदावर श्री. अमोल कविटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे अधिकृत पत्र आज भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाकडून जारी करण्यात आले असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. पक्ष संघटनेचे कार्य अधिक प्रभावी, गतिमान आणि सुयोग्य पद्धतीने राबविण्यासाठी तसेच राज्यभरातील दौऱ्यांचे नियोजन, माध्यमांशी समन्वय आणि विविध संघटनात्मक उपक्रमांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमोल कविटकर यांनी यापूर्वीही पक्ष संघटना, जनसंपर्क, माध्यम समन्वय आणि विविध राजकीय व सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान दिले आहे. २०२३-२०२६ या कालावधीत त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख ही जबाबदारी देण्यात आली होती. शिवाय इलेक्ट्रॉनिक मीडियात १२ वर्षे बातमीदार ते ब्युरो चिफ या पदावर कार्यरत होते. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यक्षमतेचा लाभ पक्ष संघटनेला निश्चितच होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून श्री. अमोल कविटकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांनी नव्या जबाबदारीत यशस्वी कार्य करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी उल्लेखनीय योगदान द्यावे, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
“भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या ‘दौरा समन्वयक – माध्यम विभाग’ या जबाबदारीसाठी माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचा मी मनःपूर्वक ऋणी आहे. ही नियुक्ती माझ्यासाठी सन्मानाबरोबरच मोठी जबाबदारी आहे. नेतृत्वाने व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवत, पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी, माध्यम समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी आणि प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे व समर्पित भावनेने पार पाडण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पक्षाने दिलेल्या या संधीबद्दल सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार !
– अमोल कविटकर

Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!

0
Newsworldmarathi Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार पार्थ पवार (Parth Pawar engagement) आणि कायनात दारा (Kaiynaat Dara) यांचा साखरपुडा आज पुण्यात होत आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता साखरपुड्याचा मुहूर्त नियोजित आहे. या साखरपुडा सोहळ्यासाठी खास पण मोजक्या पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. पार्थ पवार आणि कायनात दारा यांचा यांचा हा साखरपुडा सोहळा येरवडा येथील हॉटेल द रिट्स कार्लटोन येथे होत आहे. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व 40 आमदार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह विविध पक्षातील 15 खासदारही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे, सुधा मूर्ती, सी एम रमेश, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योजक मोहित कंबोज यांचा निमंत्रितांमध्ये समावेश आहे. तसेच या साखरपुड्याला काही विशेष पाहुण्यांना देखील आमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षातील प्रमुख नेत्यांना साखरपुड्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह २७ फेब्रुवारी २०२७ रोजी बारामती येथे संपन्न होणार आहे. त्यापूर्वी आज (बुधवारी, ता२९) साध्या आणि कौटुंबिक वातावरणात, मोजक्या नातेवाईकांच्या व फक्त निमंत्रित यांच्या उपस्थितीत साखरपुडा समारंभ पार पडणार आहे. पार्थ पवार यांच्या होणाऱ्या पत्नी कायनात दारा या मूळच्या चंदीगड येथील आहेत, व सध्या दिल्ली येथे वास्तव्यास आहेत.