LATEST ARTICLES

शरद पवार यांना डिस्चार्ज

0
Newaworldmarathi Pune: ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांची प्रकृती स्थिर असून उपचारांना त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांना आज Ruby Hall Clinic येथून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँट यांनी दिलेल्या माहितीनुसार, आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर पवार यांची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील काही दिवस त्यांनी पूर्ण विश्रांती घ्यावी, असा सल्ला वैद्यकीय पथकाने दिला आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार सुरू राहणार असून, प्रकृतीनुसार ते लवकरच सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील, असेही सांगण्यात आले.

‘लव्ह यू दादा’; अजित पवारांना भावूक पत्र

0
Newaworldmarathi Mumbai; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Amol Mitkari यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने माजी उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांना उद्देशून एक अत्यंत भावनिक पत्र लिहिले आहे. विमान अपघातात झालेल्या अजित पवारांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी आजही कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या मनात ताजी आहे. या पार्श्वभूमीवर मिटकरी यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या आठवणींना उजाळा देत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. पत्रात त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण सांगितली आहे. अनेकांसाठी अमोल मिटकरी हे कदाचित वादग्रस्त व्यक्तिमत्त्व असेल, मात्र एका छोट्या समूहातून आलेल्या कार्यकर्त्याला अजित दादांनीच आपलेसे केले, असे ते म्हणतात. आयुष्यात वडिलांनंतर जर कोणी खऱ्या अर्थाने माया, जिव्हाळा आणि आधार दिला असेल तर ते फक्त दादांनीच, अशी कृतज्ञ भावना त्यांनी व्यक्त केली. एक काळ असा होता की समाज, नातेवाईक आणि अगदी स्वतःच्या कुटुंबीयांनीही त्यांना दूर लोटले होते. अशा कठीण काळात दादांनीच त्यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उभारी दिली. राजकीय प्रवासात चुका झाल्या, टीका झाली, तरीही दादांनी कधी साथ सोडली नाही. मोठ्या भावाच्या मायेने त्यांनी चुका समजावून सांगितल्या आणि पुढे जाण्याची ताकद दिली. वाढदिवस असो किंवा दुःखाचा प्रसंग, दादांचा फोन हा नेहमी आधार देणारा असायचा, असे मिटकरी लिहितात. पत्राच्या शेवटी त्यांनी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाने दादांना हिरावून घेतल्याची खंत व्यक्त करत देवावरचा रागही व्यक्त केला. “दादा, तुमच्यामुळेच मी विठ्ठलाच्या प्रेमात पडलो; पण त्यानेच तुम्हाला दूर नेले,” असे म्हणत ‘लव्ह यू दादा’ या शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६’ला गडकरी-फडणवीस उपस्थित; ₹४२ हजार कोटींच्या गुंतवणुकीची नोंद

0
नागपूर : ‘अॅडव्हान्टेज विदर्भ २०२६’ या आंतरराष्ट्रीय व्यवसाय परिषदेला नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विदर्भाच्या औद्योगिक क्षमतेला चालना देणाऱ्या या परिषदेत तब्बल २३ देशांतील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती आणि धोरणकर्त्यांनी सहभाग नोंदवला. परिषदेतून ₹४२ हजार कोटींच्या सामंजस्य करारांची नोंद झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. गडकरी यांनी अशा परिषदांमुळे स्थानिक उद्योगांना जागतिक बाजारपेठेचे दार खुले होत असल्याचे नमूद केले. निर्यातवाढ आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भाला ‘ग्रोथ इंजिन’ बनविण्याची क्षमता असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या गुंतवणूक धोरणांचा उल्लेख करत विदर्भ हे उदयोन्मुख गुंतवणूककेंद्र ठरत असल्याचे स्पष्ट केले. पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि सुलभ परवानगी प्रक्रिया यांवर शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेत उत्पादन, ऊर्जा, औद्योगिक पार्क आणि निर्यात क्षेत्रातील गुंतवणूक प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली. ही परिषद ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली. संस्थापक डॉ. जितेंद्र जोशी यांनी जागतिक नेटवर्कची माहिती देत विदर्भासाठी आंतरराष्ट्रीय संधींचे नवे दालन उघडल्याचा दावा केला.

घोषणा माझा दादा करणार होता : सुप्रिया सुळे

0
Newaworldmarathi Pune : बारामतीच्या खासदार Supriya Sule यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या विवाहाची घोषणा लवकरच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. रेवती यांचा विवाह नागपूरमधील उद्योगपती कुटुंबातील सरंग लखानी यांच्याशी ठरल्याचे सांगितले जाते. सरंग हे उद्योगपती अरुण लखानी यांचे सुपुत्र असून त्यांचा उद्योग समूह पाणी व्यवस्थापन व पायाभूत सुविधा क्षेत्रात कार्यरत आहे. या पार्श्वभूमीवर लखानी कुटुंबाची सामाजिक व वैचारिक पार्श्वभूमी चर्चेत आली आहे. विशेषतः त्यांचे Rashtriya Swayamsevak Sangh (आरएसएस) सोबत संबंध आहेत का, याबाबत सोशल मीडियावर चर्चा रंगली. संघाचे सरसंघचालक Mohan Bhagwat यांच्यासोबतचा अरुण लखानी यांचा एक छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर या चर्चेला उधाण आले. तथापि, यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी उपलब्ध नाही. दरम्यान, पुण्यातील कार्यक्रमात बोलताना सुळे भावुक झाल्या. “रेवती आणि सरंगचे लग्न माझ्या दादाच्या डोळ्यासमोर ठरले. या आनंदाची घोषणा माझा दादा करणार होता; पण आज तो आपल्यात नाही,” असे त्या म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक Sharad Pawar यांच्या कुटुंबातील हा विवाह असल्याने त्याकडे राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर या विवाहाची चर्चा सुरू असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

‘दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते – रोहित पवार

0
Newaworldmarathi Mumbai : नरेश अरोरा यांच्या कॉन्ट्रॅक्टबाबत काहींची ठाम भूमिका होती; मात्र अजित पवार यांची भूमिका वेगळी असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. या प्रकरणी आपण कोणावरही थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसल्याचे स्पष्ट करत संबंधित घडामोडींची लवकरात लवकर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. “दादांना उशीर का झाला, हे मी बोलून दाखवले; ते गाडीने गेले असते तरी दुर्घटना टळली असती,” असेही ते म्हणाले. अजित पवार यांच्या अपघाताबाबत “हा अपघात की घातपात?” हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे सांगत गेल्या काही महिन्यांत दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते, असा दावा पवार यांनी केला. सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून अपघाताचे खरे कारण समोर यावे, अशी मागणी त्यांनी केली असावी, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएसोबत जाणार होता का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले असून सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सर्व मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांकडून पुणे जिल्ह्याच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा

0
Newaworldmarathi Pune : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे जिल्ह्यातील वर्ष २०२६-२७ च्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारुप आराखडे अंतिम करण्यासाठी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. शासनाने ठरवून दिलेल्या वित्तीय मर्यादेपेक्षा अतिरिक्त निधीची मागणी या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याअध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थान येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्यमंत्र्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे आणि प्रधान सचिव श्रीकर परदेशी, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आदी उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त कार्यालयातून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, ज्ञानेश्वर कटके, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, पुणे शहराचे महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते. यावेळी यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शरद सोनवणे, पालक सचिव व्ही. राधा, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे शहरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. या बैठकीत श्री. डुडी यांनी जिल्ह्यांच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना आणि प्रारुप आरखडयाबाबत दूरदृष्यप्रणालीद्वारे सादरीकरण केले.

पुणे मेट्रोत ‘रुपे ऑन-द-गो’ची सुविधा सुरू

0
पुणे : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आणि महामेट्रोच्या सहयोगाने, विशेष अ‍ॅक्वायरर बँक म्हणून एचडीएफसी बँकेच्या सहभागातून पुणे मेट्रोमध्ये ‘रुपे ऑन-द-गो’ (ओटीजी) कार्ड स्वीकारण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना त्यांच्या विद्यमान किंवा नव्या रुपे ऑन-द-गो कार्डद्वारे थेट मेट्रो प्रवास करता येणार असून, संपर्करहित आणि इंटरऑपरेबल डिजिटल पेमेंट प्रणालीमुळे तिकीट प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. पुणे मेट्रोत सध्या कागदी तिकीट, मोबाइल क्यूआर तिकीट तसेच एचडीएफसी बँकेचे ‘वन पुणे एनसीएमसी रुपे कार्ड’ उपलब्ध असताना आता ओपन-लूप रुपे ऑन-द-गो प्रणालीमुळे प्रवास अधिक सोयीस्कर झाला आहे. मेट्रोच्या सर्व २९ कार्यरत स्थानकांवर ‘टॅप अँड ट्रॅव्हल’ची सुविधा उपलब्ध झाली असून, प्रत्येक मार्गिकेसाठी स्वतंत्र तिकीट खरेदी करण्याची गरज उरणार नाही. दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी आणि कार्यालयीन कर्मचारी यांना एकाच कार्डवर संपूर्ण नेटवर्कमध्ये प्रवास करता येणार आहे. तसेच या कार्डद्वारे विविध बस व मेट्रो सेवांमध्ये इंटरऑपरेबिलिटी साधली जाणार असून, ऑफलाइन पेमेंटची सुविधाही उपलब्ध असल्याने कमी नेटवर्क असलेल्या भागांमध्येही प्रवाशांना अडथळा येणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले

प्रभाग ३४ मध्ये ट्राफिक सिग्नल स्थलांतराची मागणी; नगरसेविका कोमल नवले यांचे निवेदन

0
Newaworldmarathhi Pune: प्रभाग क्रमांक ३४ मधील सिंहगड रोड परिसरात वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर ट्राफिक सिग्नलचे योग्य नियोजन करण्याची मागणी पुढे आली आहे. सिंहगड रोडलगत असलेल्या राजयोग सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सध्या बसवण्यात आलेला ट्राफिक सिग्नल स्थलांतरित करून तो लायगुडे हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मुख्य चौकात बसवण्यात यावा, तसेच त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका कोमल नवले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर यांना निवेदन सादर केले. सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर निवासी व व्यावसायिक विकास सुरू असून, वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या ट्राफिक सिग्नलच्या ठिकाणामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नगरसेविका कोमल नवले यांनी सांगितले की, “सिंहगड रस्त्यावरील वाढत्या डेव्हलपमेंटमुळे भविष्यातील ट्राफिक समस्यांचा विचार करून नियोजनबद्ध पावले उचलणे गरजेचे आहे. वाहतूक समस्येबाबत जागरूक राहून काम करण्याचा माझा निर्धार आहे. त्यामुळेच आज हे निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर संबंधित काम पूर्ण करून घेण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.” या मागणीमुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रभाग 34 मध्ये आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

0
पुणे महानगरपालिका सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत भांडवली निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन खडकवासला विधानसभेचे आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. प्रभाग ३४ अंतर्गत साईधाम टाकी ते पारी कंपनी चौक धायरी सर्वे नं ३० येथील सुमारे ८०० मीटर पाणीपुरवठा लाईन टाकण्याचे काम तसेच वडगाव बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज नगर, मारुती चवड कॉलनी व वडगाव बुद्रुक समाज मंदिर परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांसाठी नगरसेवक हरिदास चरवड, नगरसेविका कोमल नवले, नगरसेविका जयश्री भूमकर, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी नगरसेवक श्रीकांत जगताप, नगरसेवक सचिन मोरे, माजी नगरसेवक बाळासाहेब नवले यांच्यासह माजी स्व. सदस्य गंगाधर भडावळे, सागर भूमकर, सारंग नवले, मंडलाध्यक्ष यशवंत लायगुडे, तुषार पोकळे, आशुतोष पोकळे, सुमित बेनकर, रमेश चरवड, सचिन मनेंरे, शहाजी वांजळे, बाळासाहेब पौरे (काका), दत्तात्रय देशपांडे, अतुल बोरा, अतुल काजळे, संदीप चवड, प्रकाश लिम्हण, स्वप्रिल घाटे, सुनील कांबळे, चंद्रकांत पवळे, मंगेश पायगुडे, अभिजित आढाव, सिद्धांत घोलप, मुकुंद कांबळे, बाळासाहेब चरवड, पांडुरंग वानखेडे महाराज, मुगुट पासलकर, सुरेंद्र गायकवाड, प्रकाश माने, गुलाबराव पाटील जितू बुजवले, ज्ञानेश्वर साठे, रमेश मंडळी, परमेश्वर शिंगणापूर, दत्ता पिसे, सदाशिव गाडेकर, अमोल मिरेकर, सुरेश बोडके, निलेश पायगुडे , महेश भिसे, अमोल गंगावणे, अतुल फाळके, सतीश नलावडे, अनिल गायकवाड, माऊली नलावडे, गणेश नलावडे, विठ्ठल फाळके, भगवान मिसाळ, मनोहर महाजन, सुनील बर्गे, मोतीराम जाधव, रमजान शेख, पप्पू ढेबे, शिवाजी पवार, सचिन खंडागळे, विजय यादव, योगेश कोळेकर, डॉ. रॉय, अमोल नलावडे, विजय नलावडे, प्रदीप टाकले, भारत भूषण ओझा, दत्ता माने, सिद्धेश्वर सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे साहेब आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार भीमराव तापकीर यांनी नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. तसेच येथील चारही भाजप नगरसेवक प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

उद्योजक नितीन देसाई यांच्या व्यक्तिमत्वात कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाचा अनोखा मिलाफ: डॉ. राजेश शहा

0
Newaworldmarathi Pune : ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई हे केवळ देसाई उद्योग समुहापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्यातील अंगभुत कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वाच्या गुणांमुळे अनेक संस्थांचे ते खंबीर पाठीराखे होते, अशा शब्दात दिवंगत ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई यांना दी पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. दिवंगत ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई यांना अभिवादन करण्यासाठी श्री पूना गुजराथी बंधू समाज, दी पूना गुजराती केळवणी मंडळ, दी पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन, एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटल आणि जनसेवा फौंडेशन यांच्यावतीने आयोजित प्रार्थना आणि श्रद्धांजली सभेत डॉ. राजेश शहा बोलत होते. या प्रार्थना सभेच्या प्रारंभी एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटलच्या चमुतर्फे अग्निहोत्र संस्कार करण्यात आला. यावेळी बोलताना दी पूना गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन राजेश शहा म्हणाले की, ज्या ज्या संस्थांवर नितीन देसाई कार्यरत होते, त्या संस्थांवर काम करण्याची संधी नितीन देसाई यांनी मला दिली. लहान भावाप्रमाणे त्यांनी मला वागवले. माझ्या प्रत्येक प्रस्तावाला त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यांचे प्रोत्साहन आणि सहकार्यामुळेच अनेक प्रकल्प सिध्दीस गेले. प्रत्येक प्रकल्पावर त्यांचे बारकाईने लक्ष असे. त्या प्रकल्पाशी संबंधित घडामोडी आणि प्रगती जाणून घेत त्यांच्या अनुभवी नजरेतून ते योग्य त्या सूचना देखील करायचे. नितीन देसाई यांच्या निधनामुळे अनेक संस्था आणि गुजराती समाज पोरका झाला असल्याची भावना, डॉ. राजेश शहा यांनी सद्गतीत होऊन सांगितले. यावेळी बोलताना श्री पूना गुजराथी बंधू समाजचे कार्यकारी विश्वस्त नैनेश नंदू म्हणाले की, नितीन देसाई हे केवळ उद्योजक नव्हते तर सामाजिक भान जपणारे आणि प्रत्यक्ष कृतीतून समाजाला मदत करणारे व्यक्तीमत्व होते. शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात समाजाने प्रगती करावी, असाच दृष्टीकोन त्यांनी कायम बाळगला. यावेळी बोलताना एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटलचे वैद्यकीय संचालक डॉ. राहुल देशपांडे म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून नितीन देसाई स्वतः रुग्णालयाच्या कामात सक्रीय होते. नेत्रदान चळवळीपासून मोतीबिंदूच्या लाखो मोफत शस्त्रक्रिया नितीन देसाई यांच्या नेतृत्वाखाली झाल्या. अंध मुलींबाबत त्यांच्या मनात कणव आणि ममत्व होते. ग्रामीण भागातील अंध मुली आणि तिरळेपणाने त्रस्त मुलींच्या शस्त्रक्रीया करण्यावर त्यांचा विशेष भर होता. दृष्टीशी संबंधित अनेक समस्या बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात. मात्र, माहिती आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावामुळे मनुष्य जीवनभर दृष्टीला मुकतो, या वास्तवामुळे नितीन देसाई व्यथित व्हायचे. त्यामुळेच अंधत्व आणि तिरळेपणा या समस्यांबाबत ते कायम जागरूक होते. यावेळी बोलताना ए.व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव म्हणाले की, नितीन देसाई यांच्या मनात गरिबांविषयी सदैव करूणाभाव असायचा. कोणत्याही सामाजिक किंवा शैक्षणिक उपक्रमात त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. त्यांच्या जाण्याने कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. यावेळी बोलताना जनसेवा फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विनोद शहा म्हणाले की, जनसेवा फौंडेशनशी नितीन देसाई गेल्या ३० वर्षांपासून संबंधित होते. ज्येष्ठांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे, या भावनेतून त्यांनी कायमच माझ्या कार्याला सक्रिय पाठिंबा दिला. कोणत्याही प्रकल्प साकारताना येणाऱ्या आर्थिक अडचणींमध्ये नितीन देसाई कायमच खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या सहकार्यामुळेच मी ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करू शकलो. यावेळी बोलताना पुण्यभूषण फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. सतीश देसाई म्हणाले की, १९८० नंतरच्या माझ्या सार्वजनिक जीवनात नगरसेवक म्हणून मी काम करीत असताना दारूवाला पुलाच्या अलीकडे देसाई बिडीवाले नावाची एक व्यापारी पेढी आहे आणि नितीन देसाई हे व्यापारी दिवसभर तिथे असायचे असे मला माहित होते. नितीन देसाई यांच्याशी परिचय झाल्यानंतर महाबळेश्वर येथील त्यांच्या बंगल्यावर समाज जीवनाला शिस्त लावून दिशा देण्याच्या दृष्टीने माझ्यासह अनेक जण विचारमंथन करण्यासाठी जमत होतो. नितीन देसाई यांच्याबरोबरची मैत्री दृढ झाल्यानंतर नितीन देसाई म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तर संस्था आहेत, असे माझ्या लक्षात आले. मानवी जीवनाच्या मर्यादा लक्षात घेता, त्या मर्यादित काळात एखादी व्यक्ती किती मोठे काम करू शकते आणि एवढे मोठे काम उभे करूनही आपल्यातील नम्रता कशी टिकवून ठेवू शकतो, याचे नितीन देसाई हे मूर्तीमंत उदाहरण आहे. आमच्या पुण्यभूषण फौंडेशनचा २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार नितीन देसाई यांना देता आला, याचा आनंद वाटतो. यावेळी बोलताना डॉ. चंद्रकांत रावळ म्हणाले की, नितीन देसाई हे माझ्यासाठी फ्रेंड, फिलासॉफर आणि गाईड होते. अनेक संस्थांना त्यांचे मार्गदर्शन लाभल्याने त्या संस्थांनी प्रगतीची शिखरे गाठली. महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा यांसह अनेक राज्यांमध्ये त्यांनी कायम मदत केली. ते पर्यावरण प्रेमी होते. त्यांचे दातृत्व सजग होते. दिलेल्या मदतीचे नक्की काय सकारात्मक परिणाम आणि बदल होत आहेत, याची माहिती ते सातत्याने घेत असत. ज्या संस्थांशी ते संबंधित होते, त्यांना कायम दोन पावले पुढे जाऊन मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. यावेळी नितीन देसाई यांची नातवंडे इलिना राजन नवानी, आरूषा राजन नवानी आणि रियान जय पारीख यांनी मनोगताव्दारे नितीन देसाई यांना आदरांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवारांसह अनेक संस्थांचे पदाधिकाऱ्यांनी नितीन देसाई यांना शब्दसुमने अर्पण केली. यावेळी विविध संस्थांचे सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.