LATEST ARTICLES

माणसं जोडा,देश आपोआप जोडला जाईल : एकनाथ आव्हाड

0
Newaworldmarathi Pune: आपण सुरक्षित आहोत ते केवळ भारतीय जवानांमुळे. ते तिथे आहेत म्हणून आपण आनंदी जीवन जगू शकतो. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून थांबणे पुरेसे नाही. तर आपापसातील मन आणि मतभिन्नता थांबवली पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे यासाठी माणसं जोडा,देश आपोआप जोडला जाईल असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक मा एकनाथ आव्हाड यांनी विविध उदाहरणं व कथेच्या माध्यमातून केले. आधार सोशल ट्रस्ट पुणे आयोजित मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रिटींग कार्ड स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. गेली आकरा वर्षे आधार सोशल ट्रस्ट प्रत्यक्ष सीमेवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करते.फराळासोबत महाराष्ट्रातील विविध शाळांनी पाठवलेली आकर्षक ग्रिटींग कार्ड सैनिकांना दिले जातात. ते वाचताना त्यांच्या डोळ्यातील आसवं सर्व काही सांगून जातात. देशाच्या दहा सीमांवर हा उपक्रम आधार सोशल ट्रस्ट राबवत आहे अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष चाकणकर यांनी दिली. अतीशय प्रतिकूल परिस्थितीत सैनिक सीमेवर तैनात असतात. आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भावना त्यांच्या पर्यत पोहचवणे गरजेचे असल्याचे विचार चाकणकर यांनी मांडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बि एस एफ असिस्टंट कमांडंट प्रतिक वशिष्ठ, राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर, नगरसेविका जयश्रीताई भूमकर, नगरसेवक सचिन मोरे, स्विकृत नगरसेवक निलेश कोंढाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर चांदगुडे साहेब,नारायण पाटील,शीतल चाकणकर, स्पर्धाप्रमुख सोपान बंदावणे उपस्थित होते. यावर्षी महाराष्ट्र, बेळगाव व गोवा मिळून सतरा हजार ग्रिटींग प्राप्त झाले.ते सर्व ग्रिटींग सीमेवर प्रत्यक्ष देण्यात आल्याची माहिती स्पर्धा प्रमुख सोपान बंदावणे यांनी दिली. यावेळी साईराज वाल्मिकी,दुर्गा पवार, संपदा दुधाट यांनी भावस्पर्शी भाषणे केली. यावेळी महाराष्ट्रातील १६५ शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांना तसेच १७५ विद्यार्थ्यांना आधार सोशल ट्रस्ट मार्फत सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष चाकणकर यांनी, आभार दत्तात्रय पाटील तर सूत्रसंचालन संदीप काकडे यांनी केले.

अध्यक्षपदाची गाडी नाकारून बचतीचा निधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा बाप्पू मानकर यांचा आदर्श निर्णय

0
Newaworldmarathi Pune : भारतीय जनता पार्टीचे प्रभाग २५ मधील नगरसेवक मा. राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची आज विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदभार स्वीकारतानाच बाप्पू मानकर यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारून, त्यातून वाचणारा खर्च गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आज पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीत, प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथील नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर यांची बिनविरोध झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळातील काम हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून करणार असल्याचे सांगितले. गाडीचा मोह टाळला; सेवेला प्राधान्य! अध्यक्षपदी निवड होताच बाप्पू मानकर यांनी एक नवा आदर्श पायंडा घालून दिला. महापालिकेकडून प्रभाग समिती अध्यक्षांना मिळणारी शासकीय चारचाकी गाडी त्यांनी नम्रपणे नाकारली. या वाहनावर होणारा वार्षिक खर्च हा पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ‘गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी’ वर्ग करावा, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाला केली. “नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणाऱ्या अवास्तव सुविधा न घेता, केवळ ‘सेवक’ म्हणून काम करणे हेच माझे ध्येय आहे,” अशी भावना बाप्पू मानकर यांनी यावेळी व्यक्त केली.

पुण्यात सुखसागरनगर येथे राठी परिवाराच्या वतीने संत आशीर्वचन व भजन संध्याचे आयोजन

0
Newaworldmarathi Pune: पुण्यातील सुखसागरनगर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण करणारा संत आशीर्वचन व भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ब्रह्मकालीन परम पूज्य संत महंत श्री अभयरामजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होणार असून, रामस्नेही संप्रदायाचे खेडापा पीठाचार्य श्री 1008 श्री पुरुषोत्तमदासजी महाराज तसेच परम पूज्य संत महंत डॉ. श्री रामप्रसादजी महाराज (श्री बडा रामद्वारा, सुरसागर, जोधपूर) यांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा पार पडणार आहे. श्रीमती मेनाबाई धनराजजी राठी यांच्या पुढाकारातून आणि चुन्नीलाल राठी, मगराज राठी, राजेश राठी, रविंद्र राठी, जितेंद्र राठी, महेश राठी, जुगल राठी व राठी परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नामस्मरण, सत्संग, संत महापुरुषांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत “धनराज निवास”, हेमा मंगल कार्यालय, सुखसागरनगर, पुणे येथे होणार आहे.

“Shining Star” फॅशन शो पुण्यात रंगणार

0
Newaworldmarathi Pune : शहरात फॅशन आणि ग्लॅमरचा जल्लोष अनुभवण्यासाठी “Shining Star” हा भव्य फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स अशा विविध गटांसाठी हा स्पर्धात्मक कार्यक्रम खुला असून सहभागींसाठी मोठ्या संधींचे दार उघडणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना सोन्याची नथ, रोख बक्षिसे, क्राउन तसेच टॉप १० विजेत्यांना सिल्व्हर कॉइन देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागींसाठी सेलिब्रिटी, रील स्टार्स, व्यावसायिक व्यक्तिमत्त्वे आणि दिग्दर्शकांशी भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच जाहिराती, चित्रपट, फोटोशूट, गाणी आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधीही मिळू शकते. हा भव्य कार्यक्रम अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम येथे २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांकडून संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे. “Shining Star” फॅशन शोचे आयोजन नेक्स्टस प्रॉडक्शन आणि चंदुकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर “Newsworld मराठी” असून, फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी हा एक मोठा मंच ठरणार आहे.

सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं… खरसुंडीत चैत्री यात्रा उत्साहात

0
Newsworldmarathi Pune: खरसुंडी (ता. आटपाडी) येथे सिद्धनाथ देवाच्या चैत्री यात्रेला यंदा प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. तब्बल ४० अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानातही भाविकांनी कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता “सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं”चा जयघोष करत सासनकाठी व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. चैत्र शुद्ध अष्टमीपासून यात्रेची सुरुवात झाली. अष्टमीच्या सायंकाळी श्री जोगेश्वरी मंदिर परिसरात सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त पारंपरिक मंगलकार्य व धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावात पार पडले. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी यात्रेत हजेरी लावली. सोमवारपासूनच भाविकांचे आगमन सुरू झाले होते. मंगळवारी पहाटेपासून मंदिर परिसरात मोठी गर्दी उसळली. विविध गावांतील मानाच्या सासनकाठ्या मध्यरात्रीपासूनच मंदिरात दाखल झाल्या. २५ ते १०० फूट उंच सासनकाठ्या रंगीबेरंगी पताकांनी सजवून वाजत-गाजत आणण्यात आल्या. गुलाल व खोबऱ्यांची उधळण करत भाविकांनी भक्तीचा जल्लोष केला. दुपारी सिद्धनाथाची पालखी जोगेश्वरी देवीच्या भेटीसाठी निघाली. पालखी मार्गावर सासनकाठ्यांची मोठी झुंबड उडाली. लाखो भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली. पालखी मंदिरातून बाहेर पडताच जयघोष व गुलाल उधळणीने परिसर दुमदुमला. जोगेश्वरी मंदिरात पालखी पोहोचताच सासनकाठ्यांनी पालखीस टेकून मानवंदना दिली. तीव्र उष्णतेमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला, मात्र भक्तीरसात तल्लीन झालेल्या भाविकांनी सर्व कष्ट विसरून यात्रेचा आनंद लुटला.

बुधवार पेठेतील लॉज प्रकरणात एकटाच आरोपी; सीसीटीव्हीत अन्य कोणीही दिसले नाही : पोलीस आयुक्त अमितेश कुमार

0
Newaworldmarathi Pune: शहरातील चर्चेत असलेल्या बुधवार पेठेतील लॉज प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले असून इतर कोणाचाही सहभाग आढळलेला नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. संबंधित आरोपीने लॉजमध्ये जाऊन आपत्तीजनक कृत्य केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपीला लॉजमधील कर्मचाऱ्यांनी पकडले असता त्याने “स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो आणि सोबत इतर पत्रकार होते” असा दावा केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या सीसीटीव्ही तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणात तो व्यक्ती एकटाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनेपूर्वी दोन तासांचा परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला असून त्यात अन्य कोणीही सहभागी असल्याचे आढळले नाही. दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी फोन आले नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या “अनेक लोक उपस्थित होते, काहींना मारहाण झाली, काही जण पळून गेले” अशा चर्चांनाही त्यांनी फेटाळले. आरोपीला पकडताना काहींनी त्याला मारहाण केल्याचे मात्र त्यांनी मान्य केले. रूपाली पाटील यांनी दिलेल्या अर्जात काही पत्रकारांवर सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र त्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही या सर्व मुद्द्यांची चौकशी सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सदर लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालतो का, याबाबतही पोलीस पडताळणी करत असून आतापर्यंत असे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तपास पुढे सुरू असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

Newsworldmarathi pune: मार्च अखेर आणि एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना बसला असून सुमारे २ लाख ४ हजार ८३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अंदाजे ५ लाख १२ हजार एकर शेतीवर परिणाम झाला असून जवळपास ४ लाख शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन सादर करून पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि मदत वितरणाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आणि त्वरीत मदत जमा करण्यावर भर देण्यात आला आहे. दरम्यान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले. या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, मका, हरभरा आणि ज्वारी यांसारख्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय आंबा, द्राक्षे, केळी, संत्रा, डाळिंब, टरबूज आणि उन्हाळी कांदा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे.
“या आपत्तीत काढणीस आलेल्या गहू, मका, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासोबतच आंबा, द्राक्षे, केळी, संत्रा, डाळिंब, टरबूज आणि उन्हाळी कांदा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.”
— रोहन सुरवसे पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, पुणे.

‘दृष्टी’ एकांकिका ब्रेल लिपीमध्ये प्रसिद्ध व्हावी : योगेश सोमण

0
Newaworldmarathi Pune: पुणे अंधजन मंडळातर्फे आयोजित “आंतरज्योती” ब्रेल साहित्य संमेलनात योगेश सोमण यांनी ही इच्छा व्यक्त केली. “आंतरज्योती” ब्रेल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेश शहा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सिने-अभिनेते,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री योगेश सोमण तसेच ख्यातनाम साहित्यिक, गझलकार, समाजसेविका श्रीमती ममता सपकाळ उपस्थित होते. रामटेकडी,हडपसर येथील संस्थेच्या टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर मध्ये संपन्न झालेल्या मेळाव्यामध्ये दृष्टिबाधितांच्या कल्याणासाठी प्रेरणादायक कार्य करणाऱ्या श्री दत्तात्रय जाधव यांना आंतरज्योती गौरव पुरस्कार देण्यात आला तसेच श्री प्रकाश थोरात,श्री अनिल दिवटे,श्री सतीश निकम यांचा विशेष सन्मान करण्यात आला. एक दिवसीय संमेलनात दृष्टीबाधित रसिकांनी कविता,गाणी सादर केली तसेच स्वरगंधा सांस्कृतिक मंच,पुणे या दृष्टीबाधित कलाकारांचा मराठी-हिन्दी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. दृष्टिबाधित व्यक्तींच्या वाचनाची आवड लक्षात घेऊन गेल्या ६५ वर्षापासून पुणे अंधजन मंडळ या सामाजिक संस्थेतर्फे “आंतरज्योती” नावाचे ब्रेल मधील मराठी मासिक प्रसिद्ध केले जाते.दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणाऱ्या या मासिकामध्ये कथा,कविता,माहितीपर लेख यांचा समावेश असतो.महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राहणारे दृष्टिबाधित व्यक्ती मासिकाच्या सभासद आहेत. पुणे अंधजन मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेश शहा,विश्वस्त श्री धनराज पाटील,कार्यकारी संचालक श्री परवेझ बिलीमोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती काश्मिरा ठाकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. पुणे अंधजन मंडळ ही सामाजिक संस्था गेली ७० वर्षापेक्षा अधिक काळापासून दृष्टिबाधित व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करीत आहे.दृष्टिबाधित व्यक्तीं,विद्यार्थी यांच्या सर्वागीण विकासासाठी संस्थेमार्फत विविध प्रकल्प राबविले जात आहे उदा.दृष्टिहीन निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम,१८ ते ३५ वयोगटातील दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्नीकल ट्रेनिंग सेंटर डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्यावत हॉस्पिटल.आतापर्यंत महाराष्ट्र तसेच भारतामधील अनेक दृष्टिबाधित व्यक्ती संस्थेच्या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन

0
Newaworldmarathi Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघ, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे (वय 62 रा. कोथळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) यांचे प्रदीर्घ आजाराने आज पुण्यात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कोथळे गावी कऱ्हा नदीकाठी आज रात्री नऊ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रकाश भोईटे यांनी पुढारी, देशदूत, ऐक्य, पुण्यनगरी, देशोन्नती या वृत्तपत्रांमध्ये प्रदीर्घकाळ वार्तांकन केले. सध्या ते दैनिक केसरीमध्ये कार्यरत होते. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याबरोबर त्यांनी काम केले आणि संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याबरोबर देखील त्यांनी काम केले. शेतकरी आणि पत्रकारांच्या प्रश्नावरील आंदोलनातही त्यांनी वेळोवेळी सहभाग घेतला होता. दि पूना मर्चन्टस चेबरतर्फे दिला जाणारा कै. वी. ल. गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार, पुणे जिल्हा परिषदेचे ग्रामस्वच्छता अभियान पारितोषिक त्यांना मिळाले होते. महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे महासचिव, राज्य पत्रकार अधिस्वीकृती समिती सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले. पत्रकार हल्ला विरोधी कायद्यासाठी देखील त्यांनी लढा दिला होता. राजकीय विषयावरील बातम्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या अनेक बातम्या राज्यभर गाजल्या. कृषि, सहकार, साखर विषयावरही त्यांनी निर्भीड पत्रकारिता केली. पुरंदर तालुक्यातील कोथळे गावच्या विकासामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला. अनेक लोकाभिमुख कामे त्यांनी गावांमध्ये उभी केली. कोथळे गावातील वाचनालयाचेदेखील अध्यक्ष होते. त्यांच्या पत्नी जयश्री भोईटे या कोथळे गावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत. जेजुरी देवस्थानचे माजी अध्यक्ष अँड धनंजय भोईटे, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय भोईटे, पत्रकार प्रताप भोईटे हे त्यांचे बंधू होत.

स्वरस्वामिनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निधन, वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Asha Bhosle : भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायिका आशा भोसले यांचं निधन झाले आहे. शनिवारी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांचे दुर्दैवी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रमाणेच आशा भोसले यांनीही आपल्या सुरांनी संगीत क्षेत्राला सजवलं. त्यांनी कित्येक आयकॉनिक गाण्यांना आवाज दिला. आशा भोसले यांनी संगीत क्षेत्रातून जितकं प्रेम मिळालं, तितकच त्यांचं वैयक्तिक आयुष्य दु:खात गेलं. वैविध्यपूर्ण गायनासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशा ताईंना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आशा भोसले यांनी आपली बायोग्राफी ‘‘Asha Bhosle: A Life In Music’ मध्ये आपल्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. राम्या शर्मा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.