क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधत इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सातत्याने वेगाने प्रगती करत आहे. ISRL मध्ये पुनित बालन ग्रुपचा प्रवेश हा भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील वाढती व्यावसायिक गती आणि या लीगच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर आघाडीचे गुंतवणूकदार तसेच क्रीडा क्षेत्रातील उद्योजकांचा वाढता विश्वास दर्शवतो.
हा तिसरा सीझन पूर्वीपेक्षा अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक तसेच अविस्मरणीय अनुभव देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे; त्यादृष्टीने आयएसआरएल अशी एक फ्रँचायझी यंत्रणा विकसित करत आहे, जिथे उच्च-स्तरीय रेसिंगचा थरार, मनोरंजन आणि चाहत्यांचा अनुभव यांचा सुरेख मेळ घातला जातो.
या उत्साहात सहभागी व्हा आणि सोशल मीडियावर #Flirt With Dirt याच्यासह ISRL ला फॉलो करा LATEST ARTICLES
नवीन फ्रँचायझी टीमसह पुनित बालन ग्रुपचा इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या तिसऱ्या हंगामात सहभाग
Newsworldmarathi Pune: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) ही भारतातील प्रमुख सुपरक्रॉस रेसिंग लीग, आपल्या तिसऱ्या हंगामासाठी पुनित बालन ग्रुपचे (PBG) नवीन फ्रँचायझी म्हणून अभिमानाने स्वागत करत आहे. पीबीजी रेसिंग या नवीन फ्रँचायझीच्या माध्यमातून पुनित बालन ग्रुपने भारतीय मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. तसेच, देशातील उदयोन्मुख क्रीडा परिसंस्थांचे एक प्रमुख केंद्र म्हणून पुण्याचे वाढते महत्त्व यातून अधिक अधोरेखित होत आहे.
प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट निर्माते आणि क्रीडा क्षेत्राचे पुरस्कर्ते पुनित बालन यांच्या नेतृत्वाखालील ही नवीन फ्रँचायझी, सुपरक्रॉस
रेसिंगमध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी, युवा विकास आणि मोठ्या प्रमाणावरील लीग सहभाग यांचा वारसा घेऊन येते. क्रिकेट, बुद्धिबळ, टेनिस, हँडबॉल, टेबल टेनिस, खो-खो, बॅडमिंटन आणि आर्म रेसलिंग यासारख्या खेळांमध्ये यशस्वी गुंतवणूक आणि मालकी हक्क असलेल्या पुनित बालन ग्रुपचे आयएसआरएल मधील हे आगमन, भारतातील क्रीडा क्षेत्रातील पुढील पिढीसाठी संधी निर्माण करण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या ध्येयातील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
आयएसआरएलमध्ये पीबीजी रेसिंगचा समावेश झाल्यामुळे महाराष्ट्रातील लीगचे स्थान अधिक भक्कम होईल आणि त्याचबरोबर भारतीय सुपरक्रॉसमध्ये क्रीडाप्रेर्मीचा एक नवीन वर्ग आणि चाहत्यांसाठी सहभागाच्या (फॅन एंगेजमेंट) नवनवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे.
‘तरुणांच्या प्रतिभेला प्रेरणा देण्यासाठी आणि मजबूत समुदाय उभारण्यासाठी खेळ हे नेहमीच एक प्रभावी माध्यम राहिले आहे; आणि याच विचारसरणीने गेल्या काही वर्षात आम्ही क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक गुंतवणुकीला दिशा दिली आहे. इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) हे भारतातील रेसिंग क्षेत्रातील एका रोमांचक नवीन पर्वाचे प्रतिनिधित्व करते. महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे शहर, येथील
उत्साही चाहते आणि रेसिंगभोवती विकसित होत असलेल्या संस्कृतीमुळे देशातील सक्रिय मोटरस्पोर्ट हबपैकी एक म्हणून वेगाने उदयास आले आहे. सीझन 3 साठी ISRL मध्ये सहभागी होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही अशा एका फ्रँचायझीची उभारणी करण्यास उत्सुक आहोत जी भारतीय रेसिंगचा ध्यास, उत्कृष्ट कामगिरी आणि त्यातील उत्साह यांचे प्रतिबिंब असेल; तसेच, या माध्यमातून देशातील मोटरस्पोर्टच्या दीर्घकालीन विकासालाही आम्ही हातभार लावू, असे पुनित बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी म्हटले आहे.
आयएसआरएलचे सह-संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, “तिसऱ्या हंगामासाठी पुनित बालन ग्रुपचे ISRL परिवारात स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. भारतीय खेळ तसेच विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या विकासासाठी पुनित बालन यांची असलेली वचनबद्धता, जागतिक दर्जाची क्रीडा परिसंस्था उभारण्याबाबतच्या त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देते. सुपरक्रॉसला भारताच्या मुख्य प्रवाहातील क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य स्थान मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नांवरती, ISRL मध्ये त्यांचा झालेला प्रवेश ही या लीगची प्रगती आणि क्षमता यावरील आणखी एक महत्त्वपूर्ण मोहोर आहे. ही नवीन फ्रँचायझी चाहते तसेच रेसिंग क्षेत्रातील मंडळींमध्ये नवा उत्साह निर्माण करेल. या संयुक्त प्रवासासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधत इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सातत्याने वेगाने प्रगती करत आहे. ISRL मध्ये पुनित बालन ग्रुपचा प्रवेश हा भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील वाढती व्यावसायिक गती आणि या लीगच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर आघाडीचे गुंतवणूकदार तसेच क्रीडा क्षेत्रातील उद्योजकांचा वाढता विश्वास दर्शवतो.
हा तिसरा सीझन पूर्वीपेक्षा अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक तसेच अविस्मरणीय अनुभव देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे; त्यादृष्टीने आयएसआरएल अशी एक फ्रँचायझी यंत्रणा विकसित करत आहे, जिथे उच्च-स्तरीय रेसिंगचा थरार, मनोरंजन आणि चाहत्यांचा अनुभव यांचा सुरेख मेळ घातला जातो.
या उत्साहात सहभागी व्हा आणि सोशल मीडियावर #Flirt With Dirt याच्यासह ISRL ला फॉलो करा
क्रीडा, मनोरंजन, युवा संस्कृती आणि व्यवसाय यांचा संगम साधत इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सातत्याने वेगाने प्रगती करत आहे. ISRL मध्ये पुनित बालन ग्रुपचा प्रवेश हा भारतातील मोटरस्पोर्ट्स क्षेत्रातील वाढती व्यावसायिक गती आणि या लीगच्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर आघाडीचे गुंतवणूकदार तसेच क्रीडा क्षेत्रातील उद्योजकांचा वाढता विश्वास दर्शवतो.
हा तिसरा सीझन पूर्वीपेक्षा अधिक भव्य, वेगवान आणि प्रेक्षकांसाठी अधिक रोमांचक तसेच अविस्मरणीय अनुभव देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे; त्यादृष्टीने आयएसआरएल अशी एक फ्रँचायझी यंत्रणा विकसित करत आहे, जिथे उच्च-स्तरीय रेसिंगचा थरार, मनोरंजन आणि चाहत्यांचा अनुभव यांचा सुरेख मेळ घातला जातो.
या उत्साहात सहभागी व्हा आणि सोशल मीडियावर #Flirt With Dirt याच्यासह ISRL ला फॉलो करा भक्तीच्या वाटेवर काळाचा घाला! जेजुरीत ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Newsworldmarathi Pune : पंढरपूर वारीदरम्यान जेजुरी पालखी मार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून, ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर जेजुरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या महिला वारकरी मार्गक्रमण करत असताना भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या भीषण धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार महिला जखमी झाल्या.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर पालखी मार्गावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, प्रशासनाकडून पुढील तपासानंतर अधिकृत माहिती जाहीर करण्यात येणार आहे.
दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टतर्फे वारकऱ्यांची आरोग्यसेवा
Newsworldmarathi pune: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत आलेल्या वारकरी भाविकांच्या सेवेसाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्यावतीने विशेष वैद्यकीय सेवा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी सेवा आणि औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. याशिवाय ट्रस्टच्यावतीने वारकरी भाविकांसाठी प्रसाद म्हणून १५ हजार गुडदाणीच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले.
आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकरी भाविकांना पायी वारी करताना होणारा शारीरिक त्रास लक्षात घेऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सांधेदुखी, स्नायूंचा त्रास आणि थकवा यासाठी फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. गरजू वारकऱ्यांना आवश्यक औषधांचेही मोफत वाटप करण्यात आले. या वैद्यकीय सेवा उपक्रमासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपस्थित होते. वारकऱ्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळावी यासाठी ट्रस्टतर्फे विशेष नियोजन करण्यात आले होते. या सेवाभावी उपक्रमाला वारकरी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टकडून दरवर्षी सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून भाविकांची सेवा केली जाते. यावर्षी ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य सेवा उपक्रम “सेवा हीच भक्ती” या भावनेतून राबविण्यात आला.
यावेळी ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, तसेच विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.
या उपक्रमासाठी डॉ. प्रमोद ठोंबरे, डॉ. अपूर्वा क्षीरसागर, डॉ. श्रेयस बाफना व डॉ. दिग्विजय शितोळे या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टतर्फे वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर आणि महाप्रसाद
Newsworldmarathi Pune : आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करून पुण्यनगरीत विसाव्यासाठी थांबलेल्या वारकऱ्यांसाठी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वारकऱ्यांसाठी मोफत भोजन व्यवस्था, आरोग्य शिबिर, औषध वाटप तसेच चरण मसाज सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या सेवा उपक्रमाला वारकरी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून. महाप्रसाद सेवेचा तर जवळपास 8 ते 10 हजार वारकऱ्यांनी लाभ घेतला.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसमवेत लाखो भाविक पुणे शहरात मुक्कामी आहेत. या वारकऱ्यांच्या सेवेसाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविले जातात. यंदाच्या आषाढी वारीतही “सेवा हीच साधना” या भावनेतून वारकरी भाविकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली. वारकऱ्यांचा लांब पल्ल्याचा प्रवास, पायी वारी आणि शारीरिक थकवा लक्षात घेऊन आरोग्य तपासणी व औषध वाटपाची सुविधा करण्यात आली होती.
या आरोग्य शिबिरामध्ये वारकऱ्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आवश्यकतेनुसार औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी चरण मसाज सेवाही आयोजित करण्यात आली होती.
या उपक्रमासाठी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. वारकरी भाविकांनी या सेवांचे कौतुक करत ट्रस्टच्या उपक्रमाचे स्वागत केले.
‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किट
Newsworldmarathi Pune : पंढरपूरमध्ये आषाढी वारीच्या कालावधीत बंदोबस्तासाठी येणारे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी पुनीत बालन ग्रुप’कडून जीवनावश्यक वस्तूंचे ९ हजार कीट देण्यात आले आहेत. या किटमध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश असल्याने वारीच्या बंदोबस्ताच्या कालावधीतील पोलीस बांधवाची गैरसोय टळणार आहे आणि परिणामी त्यांना दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना अधिक चांगली सेवा देता येणार आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्यासह अन्य संताच्या पालखी समवेत लाखो वारकरी पंढरपुरमध्ये दर्शनासाठी येत असतात. १५ ते १९ जुलै या कालावधीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यातून मार्गक्रम करत असते. लोणंद, तरडगाव, फलटण, बरड या भागातून पालखीचे मार्गक्रमण होत असताना २७०० पुरुष पोलिस आणि ३०० महिला पोलिस बंदोबस्तासाठी असतात. त्यांच्यासाठी ३ हजार कीट उपलब्ध करुन देण्याची विनंती सातारा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आली होती.
तसेच २५ जुलै रोजी पंढरपुरात भरणाऱ्या आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज या प्रमुख पालख्यांसह राज्यभरातील शेकडो पालख्या आणि दिंड्या पंढरपुरात दाखल होत असतात. या सोहळ्यात सहभागी होऊन विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वैयक्तिक पातळीवर येणाऱ्या भक्तांचीही मोठी संख्या असते. या सर्वांच्या बंदोबस्तासाठी पंढरपुरात ६ हजार ५०० पुरुष पोलिस तर २००० महिला पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
त्यांनाही अशाच प्रकारच्या साहित्याचे किट उपलब्ध करुन देण्याची विनंती पंढरपूर उपविभागीय कार्यालयाकडून युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार बालन यांनी तत्काळ हे कीट उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार सोलापूर ग्रामीण पोलिस दलासाठी ७ हजार तर सातारा ग्रामीण पोलिस दलासाठी २ हजार असे एकूण ९ हजार कीट उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
किटमधील वस्तू
कोलगेट पाऊच, टुथब्रश, पॅराशूट तेल बॉटल, ओडोमास, ग्लुकोज, डेटॉल साबण, शेंगदाणा चिक्की, कापडी मास्क, पाणी बॉटल आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटरी पॅड.
“यंदा पालखीच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाने हजेरी लावली आहे. पण अशाही परिस्थिती पोलिस बांधव हे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची अत्यंत काटेकोरपणे सुरक्षा व्यवस्था बघण्याचं महत्त्वाचं कार्य करत असतात. ही एकप्रकारे सेवाच असून ही सेवा करत असताना त्यांचीही कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांच्या मागणीनुसार दैनंदिन वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. मागील वर्षीही पोलिस बांधवांची या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली होती. मागील वर्षीप्रमाणे यंदाही ही संधी मिळाली, याचं मनापासून समाधान आहे.”– पुनीत बालन, युवा उद्योजक
मोठी बातमी! पुण्यात इमारत कोसळली, 14 लोक अडकल्याची भीती; मोशी परिसरात खळबळ
Newsworldmarathi Pune: मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातही पावसाने कहर केला आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
खडकवासला धरण शंभर टक्के भरले; पुणे महापालिकेकडून जलपूजन
Newsworldmarathi Pune: पुणे शहरासाठी दिलासादायक ठरलेली आनंदाची बातमी म्हणजे खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या जलपूजन सोहळ्यात पुणेकरांना वर्षभर मुबलक व नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि शहरावर पाणीटंचाईचे संकट येऊ नये, अशी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थानिक नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटनेते सोपान उर्फ काका चव्हाण, श्री. सुभाष नाणेकर, नगरसेविका अनिता इंगळे, धनश्री कोल्हे, पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी असल्याचे सांगण्यात आले. धरणे भरली असली तरी पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने पाणी बचत आणि जलसंधारणाला प्राधान्य देत पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
पुणे शहर भविष्यातही जलसमृद्ध राहावे आणि नागरिकांना वर्षभर कोणत्याही अडचणीशिवाय पाणीपुरवठा व्हावा, हीच अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जलपूजनाच्या माध्यमातून जलस्रोतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.
माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदना
Newsworldmarathi Pune: माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… गणपती बाप्पा मोरया अशा गणेशभक्तांनी केलेल्या जयघोषाने झालेल्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत अनोखी मानवंदना दिली. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकतें यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार) तसेच पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते.
शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले.
कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा हरित वारी, स्वच्छता अभियान, अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरती
Newsworldmarathi Pune: श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सोमवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलिस आयुक्त अमितेश गुप्ता यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी महापौरांनी दत्तगुरूंचे दर्शन घेत पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुणेकरांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या १२९ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते दत्त मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, “लहानपणापासून मी दत्त मंदिरात दर्शनासाठी येत आहे. आज दत्तगुरूंची आरती करण्याचा मान मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. महापौरपदाची मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझ्या हातून पुणेकरांच्या हिताचे निर्णय घडावेत, तसेच यंदा समाधानकारक पाऊस होऊन शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे तुडुंब भरावीत, अशी प्रार्थना मी दत्तगुरूंच्या चरणी केली आहे.”
या वेळी मंदिराचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, आर. एम. धारिवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन तसेच विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.
महापौरांच्या हस्ते झालेल्या महाआरतीनंतर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्तगुरूंचे दर्शन घेतले.
‘‘पुणेकरांच्या संरक्षणाचं कर्तव्य बजावत असतानाच श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला येण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती ती आज फळाला आली. त्यातही सपत्नीक आरती करण्याची संधी मिळणं ही आमच्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष मा. पुनीत बालन आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ या सर्वांचे मनापासून आभार!’’– अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे)
पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय! आज मध्यरात्रीपासून पाणी कपात रद्द; १२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा
Newsworldmarathi Pune: पुणेकरांसाठी आणि पुण्यात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे आळंदी येथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आणि वारकरी नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन दिवस आधी पुण्यात मुक्कामासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच शहरात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महापालिकेने आज रात्री १२ वाजेपासून ते येत्या १२ जुलैपर्यंत शहरातील पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या कालावधीत पुणेकरांना नियमित आणि अखंड पाणीपुरवठा केला जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या लाखो भाविकांच्या मुक्कामादरम्यान पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या निर्णयामुळे वारकऱ्यांसोबतच पुणेकरांनाही मोठा दिलासा मिळाला असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी कपातीपासून नागरिकांची तात्पुरती सुटका झाली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, नियमित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारही सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

