LATEST ARTICLES

पीएम ‘कॉम्प्रमाईज’ असल्याचा आरोप; युवक काँग्रेसचे गुडलक चौकात आंदोलन

0
Newaworldmarathi Pune: AI Summit दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चांमध्ये देशाचे पंतप्रधान अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील व इतर करार करत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे डेक्कन येथील गुडलक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. “PM is Compromised” हा मुद्दा घेऊन युवक काँग्रेस देशभर आंदोलन करत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. Epstein फाइल्समधील कथित खुलासे, माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख, तसेच संसदेत या विषयांवर चर्चा टाळली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. केंद्र सरकार देशहिताचे प्रश्न टाळत असून अमेरिकेसोबतच्या ट्रेड करारांमुळे देशाचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, AI Summit दरम्यान शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली असून अनेकांना ताब्यात (डिटेन) घेण्यात आले आहे. राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चीब यांनाही अटक करून कोणतीही स्पष्ट कारणे न देता डिटेन केल्याचा आरोप करण्यात आला. अद्याप काही पदाधिकाऱ्यांची सुटका झालेली नसल्याचेही सांगण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्राचे प्रभारी अजय चीकारा व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यानंतर सहप्रभारी शांभवी शुक्ला यांनी “PM कॉम्प्रमाईज आहेत हे देशाला कळण्यासाठी युवक काँग्रेस संपूर्ण देशभर आंदोलन करेल,” असे सांगितले. यावेळी सरचिटणीस प्रथमेश आबनावे, पुणे शहराध्यक्ष सौरभ आमराळे, पुणे जिल्हा अध्यक्ष उमेश पवार, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कौस्तुभ नवले, विवेक कडू, कुणाल काळे, यश कोलते, अक्षय नवगिरे, ऋषिकेश थोरात, सागर धाडवे, आनंद दुबे, सद्दाम शेख, निखिल मलके, रमेश सातपोते, निखिल मलके, मेघशाम धर्मावत, प्रदीप मेहकरे, विकास सुपणर, चैतन्य जयभाये, स्वप्नील बनसोडे, रोहित पाटोळे, स्वरूप केदारी, वीरधवल गाडे, गणेश सहाणे, औदुंबर आगलावे, स्वप्नील शेलार आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाच्या पंतप्रधानांनी अमेरिकेच्या दबावाखाली ट्रेड डील करून देशहिताला तिलांजली दिल्याचा गंभीर प्रश्न आम्ही उपस्थित केला आहे. संसदेत चर्चा न करता मुद्दे दडपले जात आहेत. जनतेच्या हितासाठी आम्ही आंदोलन केले; मात्र शांततेत आंदोलन करूनही आमच्या पदाधिकाऱ्यांना डिटेन करणे हे लोकशाहीविरोधी आहे.
प्रथमेश आबनावे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
लोकशाही मार्गाने प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे. सरकार उत्तर देण्याऐवजी दडपशाही करत आहे.”“सत्य बाहेर येईपर्यंत युवक काँग्रेस आंदोलन सुरू ठेवेल.
सौरभ आमराळे,शहराध्यक्ष, पुणे शहर युवक काँग्रेस

श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी जयंत शहा; विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एकमताने निवड

0
Newaworldmarathi Pune : श्री पूना गुजराती बंधू समाजाच्या अध्यक्षपदी जयंत शहा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. गुजराती समाजाच्या कार्यालयात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सर्व विश्वस्तांनी शहा यांची एकमताने निवड केली. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अनुभवी नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन शहा यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली. यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष नितीन देसाई यांचे ८ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झाले होते. देसाई यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविले होते. अध्यक्षपदी निवड स्वीकारल्यानंतर जयंत शहा म्हणाले “संस्थेच्या परंपरेचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी मी कटिबद्ध आहे. समाजासाठी राबविल्या जाणाऱ्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना अधिक बळ देण्यावर भर राहील, असे त्यांनी नमूद केले.” शहा हे जयराज ग्रुपचे संचालक असून ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, मुंबई (AIAI) तसेच वर्ल्ड ट्रेड सेंटर (MVIRDC) कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट, मुंबईचे सदस्य आहेत. जयंत शहा यांनी गुजरात येथे त्यांच्या वडिलांच्या जन्मगावी दहा वर्षांपूर्वी आई-वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ चॅरिटेबल आयुर्वेदिक कॅन्सर हॉस्पिटल उभारले. तसेच जयराज डेव्हलपर्सच्या माध्यमातून ते गेल्या २५ ते ३० वर्षांपासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. पुण्यात अनेक जैन मंदिरांच्या उभारणीत त्यांचा सहभाग आहे. सन १९१३ मध्ये स्थापन झालेली श्री पूना गुजराती बंधू समाज ही पुण्यातील गुजराती समाजासाठी कार्यरत असलेली ११३ वर्षांची परंपरा असलेली प्रमुख संस्था आहे. सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायिक व आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांना जोडण्याचे काम संस्था सातत्याने करत आहे. संस्थेचे सहा हजारांहून अधिक आजीवन सभासद आहेत. कोंढवा येथील सुमारे चार एकर जागेवर गुजरात भवन, जयराज क्लब व स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात आले आहे. सुमारे २ लाख ५० हजार चौरस फूट परिसरात विकसित या सांस्कृतिक संकुलात विविध क्रीडा व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन केले जाते. शहा यांना सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव असून ते अनेक वर्षांपासून संस्थेशी निगडित आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शहा यांनी व्यक्त केला.

शिवनेरीवर शिवरायांच्या शौर्याचा जागर! छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला मार्गावर चालणे हाच सर्वांगीण विकास: मुख्यमंत्री

Newsworldmarathi Pune: छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा हा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० साली छत्रपती शिवाजी महाराजांची ४०० वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज भारताचा इतिहास आणि भूगोलही वेगळा असता असे नमूद करून फडणवीस म्हणाले. अनेक राजे-रजवाडे मोगलांच्या आधीपत्याखाली काम करत असताना आई जिजाऊंनी घडविलेल्या छत्रपती शिवरायांनी रयतेचे स्वराज्य स्थापन करून हिंदुस्थानाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवरायांनी १८ पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली. ‘हे माझे राज्य नसून रयतेचे राज्य आहे,’ अशी भूमिका त्यांनी घेतली. देव, देश आणि धर्मासाठी लढा देण्याची प्रेरणा देत त्यांनी सामान्य जनतेला मोगलांच्या जोखडातून मुक्त करण्याचे कार्य केले. त्यांच्या राज्यात समता, सन्मान, न्याय आणि स्त्रीसुरक्षा यांना प्राधान्य होते. शेतकरी समाधानी राहील, अन्याय-अत्याचार होणार नाहीत, अशी राज्यव्यवस्था त्यांनी उभी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यकारभारात विविध सुधारणा करताना शिवाजी महाराजांनी सुमारे ५० प्रकारचे कर रद्द करून सुटसुटीत करप्रणाली निर्माण केली. पाणी, जंगल यांचे नियोजन केले. भविष्यातील धोका ओळखून समुद्रमार्गे होणाऱ्या आक्रमणांना रोखण्यासाठी जलदुर्ग उभारले. पोर्तुगीजांवर विजय मिळवून पश्चिम किनारपट्टी सुरक्षित केली. छत्रपतींच्या कारकिर्दीत समुद्रमार्गे आक्रमण करण्याची हिंमत कुणालाही झाली नाही, अशा शब्दात त्यांनी महाराजांचे द्रष्टेपण मांडले. शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष राज्यातील गड किल्ले देत असल्याचे नमूद करीत श्री. फडणवीस पुढे म्हणाले, पंतप्रधानांच्या पुढाकाराने शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून २७ देशांनी एकमताने त्यास मान्यता दिली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारले. त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेले आहेत. शिवरायांच्या कार्याची साक्ष असलेले राज्यातील सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.मराठा सेवा संघाच्या निवेदनावर राज्य सरकार सकारात्मक काम करेल, तसेच मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर विचार करण्यात येईल, अशी ग्वाही देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील आणि जगभरातील शिवप्रेमींना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या

पुण्यात शिवजयंती मिरवणुकीमुळे ट्रॅफिक प्लॅन बदलला; नागरिकांनी कोणता मार्ग वापरावा?

0
Newsworldmarathi Pune: सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवरायांच्या जयंतीनिमित्त शहरात उद्या गुरुवारी (१९ फेब्रुवारी) मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची मोठी गर्दी पहायला मिळते. या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता; तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. गुरुवारी सकाळी ७ पासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग कोणते? शिवाजी रस्ता जिजामाता चौकातून शिवाजी रस्त्यामार्गे स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – खंडुजीबाबा चौक – टिळक चौक – टिळक रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. गणेश रस्त्याने फडके हौद चौक व जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल केळकर रस्ता केळकर रस्त्यामार्गे अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदिर चौकामार्गे बुधवार चौकाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येईल. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणूक सुरू असताना सोन्या मारुती चौकातून पुढे जाईपर्यंत लक्ष्मी रस्त्यावरील वाहने संत कबीर चौक (समर्थ विभाग) मार्गे वळविण्यात येतील. पुरम चौक पुरम चौकातून बाजीराव रस्त्यामार्गे शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पुरम चौक – टिळक रस्ता – अलका टॉकीज चौक – एफ. सी. रस्तामार्गे इच्छितस्थळी जावे. मिरवणूक सुरू झाल्यानंतर अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रस्त्याने फुटक्या बुरुजाकडे जाणारी वाहतूक केळकर रस्त्यामार्गे सरळ पुढे वळविण्यात येईल. मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पूल – बालगंधर्वकडून इच्छितस्थळी जातील. मिरवणुका गाडगीळ पुतळा येथून पुढे जाईपर्यंत शनिवारवाड्याकडे जाणारी वाहतूक कॉसमॉस बँक जंक्शन – बालगंधर्व – टिळक पूलमार्गे वळविण्यात येईल. स. गो. बर्वे चौकातून महापालिका भवनाकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक – जंगली महाराज रस्ता – झाशी राणी चौक येथून इच्छितस्थळी जावे.

अभियंत्याची आत्महत्या; हिंजवडीत हृदयद्रावक घटना

0
पुणे : ऑनलाइन जुगाराच्या व्यसनातून आलेल्या नैराश्यामुळे २४ वर्षीय आयटी अभियंत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिंजवडी आयटी पार्क परिसरात उघडकीस आली आहे. वानवडी येथील रहिवासी असलेला हा तरुण हिंजवडीतील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत होता. मंगळवारी पहाटे कंपनीच्या कॅन्टीनमधील स्वच्छतागृहात मोबाईल चार्जरच्या केबलच्या साहाय्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. बराच वेळ बाहेर न आल्याने सहकाऱ्यांनी पाहणी केली असता हा प्रकार समोर आला. आत्महत्येपूर्वी संबंधित तरुणाने नातेवाईकांना पाठवलेल्या संदेशात ऑनलाइन सट्टा आणि बेटिंगच्या आहारी गेल्याची कबुली दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जुगारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने त्याच्यावर कर्जाचा बोजा वाढला होता. आर्थिक ताण आणि नैराश्य यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून ऑनलाइन जुगाराच्या वाढत्या व्यसनाबाबत चिंतेची भावना व्यक्त केली जात आहे. हिंजवडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे

विद्यार्थिनीचा छळ; बारामतीत प्राध्यापकाविरोधात ‘पॉक्सो’ गुन्हा

0
पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवून मानसिक छळ केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. डिप्लोमा अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीला तिच्या संमतीशिवाय व्हॉट्सअॅपवर अश्लील मजकूर पाठवण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित संदेशांना प्रतिसाद न दिल्यास अंतर्गत परीक्षेतील ३० गुण आपल्या नियंत्रणात असल्याचे सांगून दबाव टाकण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी प्राध्यापकाविरोधात ‘पॉक्सो’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती समोर येताच माळेगाव शहरासह बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिक्षकी पेशावर डाग लावणाऱ्या या प्रकाराबद्दल पालकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, संबंधित महाविद्यालय प्रशासनानेही अंतर्गत चौकशी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली

पुणे एयरपोर्टवर मे अखेर नवे ‘सिक्युरिटी होल्ड एरिया

0
पुणे : प्रतिनिधी पुणे विमानतळावरील नव्या ‘सिक्युरिटी होल्ड एरिया’चे (एसएचए) बांधकाम मार्चअखेर पूर्ण होण्याची शक्यता असून, आवश्यक परवानग्या पूर्ण झाल्यानंतर मेअखेर तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. नागरी विमान सुरक्षा ब्युरोच्या मान्यतेनंतरच हा विभाग कार्यान्वित होणार असल्याने प्रक्रियेस काही काळ लागू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले. नवा एसएचए जुन्या आगमन विभागात उभारण्यात येत असून, त्यामुळे प्रस्थान विभागात अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे चार हजार चौरस मीटर क्षेत्रफळाची वाढ होईल. तसेच १४ नवे ‘चेक-इन’ काउंटर, तीन सुरक्षा तपासणी यंत्रणा आणि दोन बोर्डिंग गेट्स उभारण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुरळीत हालचालीसाठी आणि वाढत्या प्रवासी संख्येचा ताण सांभाळण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. विमानतळ प्रशासनानुसार, २०२५ मध्ये विमानतळावर १ कोटी ६ लाखांहून अधिक प्रवासी हालचाली नोंदल्या गेल्या. २०२६ मध्ये ही संख्या आणखी दहा लाखांनी वाढण्याचा अंदाज आहे. नव्या सुविधेमुळे प्रवाशांना अधिक सुलभ आणि वेगवान सेवा मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे; मात्र मंजुरी प्रक्रियेमुळे होणाऱ्या विलंबाबाबत काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे

मी स्वतःला आजही विद्यार्थीच समजतो. अभिनेता– अनिल कपूर

0
मुंबई : प्रतिनिधी Nayak: The Real Hero या चित्रपटातील भूमिकेसाठी आपण विशेष तयारी केली होती, असा खुलासा अभिनेता Anil Kapoor यांनी केला. दिग्दर्शक S. Shankar यांच्या या चित्रपटात त्यांनी शिवाजी राव या दूरदर्शन पत्रकाराची भूमिका साकारली होती, ज्याला एका दिवसासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते. ही भूमिका संस्मरणीय ठरल्याचे कपूर यांनी नमूद केले. ‘ कपूर म्हणाले, “मी स्वतःला आजही विद्यार्थीच समजतो. अभिनेता म्हणून सतत वाढत राहण्याची माझी इच्छा आहे.” या भूमिकेसाठी त्यांनी ज्येष्ठ रंगभूमी दिग्दर्शक Feroz Abbas Khan यांच्याकडे मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. “महिम येथील त्यांच्या कार्यालयात जाऊन अनेक कार्यशाळा आणि रंगीत तालमी केल्या,” असे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही राजकीय पक्षांकडून संपर्क आल्याचाही त्यांनी उल्लेख केला. मात्र, सध्या तरी रंगभूमीवर एकत्र नाटक करण्याची इच्छा असल्याचे कपूर यांनी सांगितले. “आम्ही अद्याप एकत्र नाटक केलेले नाही; भविष्यात ते ‘नायक’पेक्षाही मोठे ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रोची चाचणी यशस्वी

0
पुणे : प्रतिनिधी हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गावरील पुणे मेट्रोच्या तिसऱ्या मार्गिकेची पहिली ट्रायल रन यशस्वीरीत्या पूर्ण झाली असून, शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. आयटी क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांना दररोज भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडीवर या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सुमारे २३.२०३ किलोमीटर लांबीचा हा संपूर्ण उन्नत मार्ग असून त्यावर एकूण २३ स्थानकांचा समावेश आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणारा हा देशातील पहिला मेट्रो प्रकल्प मानला जातो. सुमारे ८,३१३ कोटी रुपयांच्या खर्चाचा हा प्रकल्प लवकरच प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता असून, हिंजवडी आयटी हब ते शहराचा मध्यवर्ती भाग असा वेगवान आणि सुरक्षित प्रवास आता वास्तवात उतरणार आहे

टी-२० विश्वचषकात भारताची पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत मात

0
नवी दिल्ली : प्रतिनिधी ICC Men’s T20 World Cup स्पर्धेत Indiaने कट्टर प्रतिस्पर्धी Pakistanवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानवरील वर्चस्व भारताने कायम राखले आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने सर्वच आघाड्यांवर वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजी करताना भारताने ठरावीक अंतराने धावा जमवत भक्कम धावसंख्या उभी केली. सलामीवीरांनी संयमी सुरुवात केल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी वेग वाढवत धावगती उंचावली. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत भारताने आव्हानात्मक लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव सुरुवातीपासूनच डळमळीत झाला. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत नियमित अंतराने बळी घेतले. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ निर्धारित धावसंख्येपासून दूर राहिला. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास अधिक बळकट झाला असून उपांत्य फेरीच्या दिशेने संघाने भक्कम पाऊल टाकले आहे. चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून भारताच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.