LATEST ARTICLES

लोकहिताच्या कामातून जनतेला दिलासा; छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर उत्साहात संपन्न

Newsworldmarathi Pune: सर्वसामान्य नागरिकांच्या शासकीय कामांना गती मिळावी तसेच विविध शासकीय योजना व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले *छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य समाधान शिबिर* उत्साहात व नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडले. या शिबिरामध्ये फेरफार, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड दुरुस्ती, मतदान नोंदणी, आरोग्य सेवा, शासकीय योजना मार्गदर्शन, बँक खाते उघडणे, डीबीटी सेवा, रेशन कार्ड संबंधित कामे, पाणीपुरवठा आदी विविध सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला. अनेक नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास लोकप्रिय आमदार मा. श्री. सिद्धार्थदादा शिरोळे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नगरसेवक रविंद्र सळेगावकर, नगरसेविका पूजाताई जागडे, नगरसेविका अमृताताई म्हेत्रे, सतीश बहिरट, शैलेश बडदे, योगेश बाचल, गणेश बगाडे, सुरेश शिंदे, विकास डाबी व सोमनाथ भोसले यांची उपस्थिती लाभली. नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक सहभाग नोंदवत आवश्यक मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका व स्थायी समिती सदस्य निशा सचिन मानवतकर व सचिन मानवतकर यांनी केले होते. जनतेच्या सेवेसाठी अशाच लोकहिताच्या उपक्रमांद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

दहावीच्या निकालात चाटे शिक्षण समुहाचा पुन्हा एकदा विजयाचा डंका!

Newaworldmarathi Pune : फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावी बोर्ड परीक्षेमध्ये चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांना उत्तुंग यश मिळाले आहे.सालाबादप्रमाणे यावर्षीही चाटे शिक्षण समुहाचा निकाल 100% लागला असून चाटे शिक्षण समुहाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. आज सकाळी दहावीचा निकाल 11:30 वा.घोषित झाल्यानंतर लगेच सायंकाळी ठिक 05:00 वा.चाटे शिक्षण समुहाने चाटे कोचिंग क्लासेस व चाटे स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा रोड बालाजी नगर शाखेवरती सत्कार समारंभ आयोजित केला होता.यावेळी अतिथी म्हणून चाटे शिक्षण समुहाचे पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे लाभले. कार्यक्रमाची सुरुवात अतिथी च्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले प्रा.फुलचंद चाटे सोबत सौ.वैशालीताई चाटे,पुणे विभागीय व्यवस्थापक प्रा.विजय बोबडे व गुणवंत विद्यार्थ्यी,पालक उपस्थित होते.सत्कार समारंभाच्या तत्पूर्वी चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष गोपीचंद चाटे यांनी फोनद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे यांच्या हस्ते यशाचे मानकरी श्रेयसी गायकवाड ९९.२०% दर्श निकम ९९.२० % आर्या जोशी ९८.६०% स्वराली कर्डिले ९८.२०% श्रावणी निंबाळकर ९७.६०% तनु हरमलकर ९७.४०% शाश्वती पवार ९७.६०% वर्धा टिकोले ९७.००% वेदांत डोंगरे ९६.८०% स्वस्ति गायकवाड ९६.८०% आर्या शेवाळे ९६.४०% सोहम टकले ९६.२०% संस्कृती फडके – ९६.२०% प्रांजली पेटकर – ९५.६० % प्रज्ञा ओव्हाळ ९५.४०% पूर्वा शहा ९५.३०% सिद्धी पाटील – ९५.२०% अनुष विश्वकर्मा ९५.००% दिव्या काटेकर ९५.०० % प्रसन्न देशमुख ९४.८०% आदी कणसे ९४.८०% रोहन पुण्ये – ९४.६०% प्रथमेश रंगापुरे ९४.६०% प्रियांशी देशमुख ९४.६०% अक्षरा शिंदे ९४.४०% सार्थक मासकर ९४.२०% अनुजा खोत ९३.८०% भूमी पाटील ९३.८०% आर्या पाटील ९३.४०% सम्यक बनसोडे ९३.२०% कोमल लिंगायत – ९३.२०% प्रगती गमे ९२.८०% वैभव राठोड ९२.६०% अथर्व नागापुरे ९२.६०% माधव आळंदकर ९२.६०% रौनीत यादव ९२.४०% आर्सालन शेख ९२.४०% शिवांजली जाधव ९२.४०% रजनीशा शर्मा ९२.२०% आदित्य सोलवणे ९२.००% श्रेया बिलंबे ९१.८०% विहान ढमाले – ९१.६० % अर्णव माठे ९१.६०% रुहेक्षा कपिले ९१.४०% अपेक्षा मुंढे ९१.४०% प्रतीक घरजाळे ९१.२०% रेवती रावलू ९१.२०% वैष्णवी जव्हेरी ९१.००% कटारिया आयुष : ९०.६०% अनुष्का चव्हाण ९०.२०% अथर्व कदम ९०.२०% रुद्र यादव – ९०.००% जयदीप देसाई ९०.००% साक्षी हेळकर ९०.००% सारंग मारकड ९०.००% यांचा सत्कार केला. सोबतच वर्षभर मेहनत घेतलेल्या शिक्षकांचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते.पालकांनी ही आपले वैयक्तिक मनोगत असे व्यक्त केले की,चाटेचा पॅटर्न सक्सेसफुल झाल्यामुळेच आमच्या पाल्याचा निकाल उत्तम लागला आणि स्वप्नाची सुरूवात छान झाली.त्यानंतर चाटे शिक्षण समुहाचे पुणे विभागीय संचालक प्रा.फुलचंद चाटे यांनी उपस्थित विद्यार्थी व पालकांना अभिनंदन करून दहावी नंतर पुढे काय? याबद्दल मार्गदर्शन केले की,आजचे हे सक्सेस हे एक-दोन दिवसांचे नसून नववी पासूनच शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत आहे व तुमच्यासारख्या पालकांनी दिलेली प्रेरणा आहे. त्यामुळे चाटे पॅटर्न आज फलित ठरला आहे.आजच्या निकालावरती न थांबता लगेच पुढचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी अकरावी-बारावी नंतर च्या प्रवेश प्रक्रियेच्या तयारीला सर्वानी तयारीला लागणे गरजेचे आहे.कारण दहावीच्या परीक्षेपेक्षा जेईई,नीट,सीईटी,एनडीए अशा उच्च शिक्षणासाठीच्या स्पर्धात्मक परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो.अकरावी व बारावी साठी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन आपल्या घराजवळील आणि ज्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेची तयारी करून घेतली जाते अशाठिकाणी अकरावी सायन्स चा प्रवेश घेणे गरजेचे आहे. मित्र किंवा नातेवाईक म्हणतात म्हणून नव्हे तर आपल्या आवडीनुसार विषय व दिशा ठरवा.प्रत्येकाला जीवनाच्या प्रवासात पुढे जायचे असेल तर आपण काय करणार आहोत हे अगोदर निश्चित केले पाहीजे. त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखा स्वत: मधील गुण ओळखा सकारात्मक विचार करा.स्वप्न साकार करण्यावर भर द्या वेळ कोणासाठी थांबत नाही त्यासाठी परीक्षेच्या काही दिवस अगोदर अभ्यास करण्यापेक्षा आतापासूनच दोन वर्ष अभ्यास करा प्रत्येक दिवस आपला आहे असं समजून तयारीला लागा यश तुमचेच आहे कारण तुमच्यासोबत चाटे शिक्षण समूह आहे चाटे शिक्षण समूह आहे.राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षा व त्याचा अभ्यासक्रम इंजिनिअरिंग मेडिकल व विज्ञान शाखेतील शिक्षण आणि अकरावी बारावी सह जेईई नीट सीईटी एनडीए यासारख्या परीक्षा याबाबत ही पालकांना मौलिक मार्गदर्शन केले. सत्कार समारंभ प्रसंगी चाटे स्कूल च्या प्राचार्या नवनीत राजपाल प्राचार्य रणजीत जगताप, प्राचार्य नामदेव माने,गौरव राऊत,प्रशांत जाधव,चाटे स्कूल अँण्ड ज्यू.कॉलेज समन्वयक रत्नाकर सोनवणे अनंत इंगळे ऋषिकेश अहिरराव, प्रकाश खारतोडे,विष्णु पालवे,प्रविण जावळे,श्रीमती सुवर्णा कुलकर्णी व इतर शाखा व्यवस्थापक आदी शिक्षक शिक्षिकेत्तर कर्मचारीवर्ग उपस्थित होते.आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत इंगळे यांनी केले तर रत्नाकर सोनवणे यांनी आभार मानले.

वडगावशेरीत प्लॉटमध्ये घुसखोरी, तोडफोड आणि धमकावल्याप्रकरणी अमित लुंकड, राज ढाकलियासह ३० ते ४० जणांवर गुन्हा

वडगाव शेरी येथील प्लॉटमध्ये ट्रॅक्टर, डंपरसह कम्पाऊंट गेट तोडून सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन जबरदस्तीने प्लॉटचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक अमित लुंकड, राज ढोकलियासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रवींद्र हिरालाल दुगड (वय ५८, रा. पुष्पा हाईटस, बिबवेवाडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अमित लुंकड, राज ढाकलिया (Raj Dhaklia), रुपेश ढाकलिया (Rupesh Dhaklia), बिडकर, अमित लुंकड यांचा मॅनेजर तसेच अन्य ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील सर्व्हे नंबर ३० मध्ये ७ मे रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अमित लुंकड यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत अनेकांनी तक्रारी दिलेल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र दुगड यांचा दुगड ग्रुप नावाने कन्स्ट्रक्शनपचा व्यवसाय आहे. त्यांनी वडगाव शेरी सर्व्हे नंबर ३० मधील ४० गुंठे जागा गलांडे व इतर ७ जणांनी तालेरा यांचे कडून सामाईकपणे घेतली होती. १९९५ ते २००२ पर्यंत त्यापैकी सुमित राठोड यांनी ३४.५ गुंठे जागा खरेदी केली होती. उर्वरित जागा ही लुंकड यांनी खरेदी केली होती. २०२३ मध्ये सुमित राठोड यांच्याकडुन ३१ गुंठे जागा दुगड इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपीच्या नावे व ३.५ गुंठे तेजस प्रविण दुगड यांच्या नावाने खरेदी खताने खरेदी केली होती. दुगड यांनी जागा खरेदी केल्यानंतर त्या जागेच्या ७/१२ वर त्यांचे नाव लागले आहे. तसेच जागा खरेदी करताना या जागेवर सुमित राठोड यांच्या ७ प्लॉटला सात प्रॉपर्टी टॅक्स होते. ते सुद्धा दुगड यांच्या नावावर केलेले आहे. तसेच सुमित राठोड यांच्या नावाचे दोन लाईट मीटर व वॉटर मीटर होत. ते फिर्यादी यांच्या नावावर करुन घेतले होते. या जागेवर बांधकामासाठी संरक्षण मंत्रालयाकडे एमओडीची एनओसी घेतली. फायरची प्रोव्हिजनल एनओसी घेतली. पुणे महानगरपोलिककडे जवळपास ५ कोटी रुपये चलन भरलेले आहे. गौण खनिजची परवानगी घेऊन रॉयल्टीचे पैसे भरले. त्यानंतर या जागेवर कंट्रोल ब्लासिटंगची परवानगी घेतली आहे. जागेवर बांधकामासाठी सर्व परवानग्या घेऊन दोन महिन्यांपासून काम चालु केलेले आहे. त्या ठिकाणी सध्या काम सुरु आहे. या कामाची पाहणी करण्याकरिता दोन सुपरवायझर, दोन वॉचमन, सिनिअर इंजिनिअर यांची नियुक्ती केलेली आहे. ७ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी यांचा मुलगा ऋषभ दुगड यांचा फोन आला. आपला सुपरवायझर विशाल पवार याने फोन करुन कळविले की, अमित लुंकड, राज ढाकलिया, रुपेश ढाकलिया, बिडकर, अमित लुंकडचा मॅनेजर व इतर ३० ते ४० जणा आठ दहा ट्रॅक्टर, दोन तीन डंपर, वॉटर टॅकर घेऊन आलेले असून त्यांनी साईटचे समोरील दोन्ही गेटचे पत्रे तोडले आहेत. त्यांनी त्यांची सर्व वाहने आपल्या प्लॉटमध्ये घुसवली आहेत. त्यानंतर फिर्यादी व त्यांचा मुलगा तातडीने वडगाव शेरी येथील प्लॉटवर गेले. पोलीसही तेथे आले. तेव्हा तेथे अमित लुंकड याने बरोबरचे लोकांना फिर्यादी ला मारण्याच्या धमक्या देऊन इथून तुम्ही निघुन जावा, हा आमचा प्लॉट आहे. त्यावेळी विमाननगरचे पोलीस निरीक्षक आले. त्यांनी फिर्यादी व अमित लुंकड यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेव्हा फिर्यादी यांनी अमित लुंकडच्या गाडीमध्ये हत्यारे आहेत, असे म्हटले असता तो गाडीमध्ये बसुन पळून गेला. तसेच त्यांच्या बंदुके नावाच्या वॉचमनला मारहाण केल्यामुळे तो निघुन गेला होता. प्लॉटचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यावरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड तपास करीत आहेत.

विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरणाची विशेष मोहिम राबवा – रोहन सुरवसे पाटील

Newaworldmarathi Pune: इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तसेच लवकरच १० वीचा निकाल लागणार असल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक विविध दाखले वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम राबविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, एसईबीसी, नॉन-क्रीमीलेयर, ईडब्ल्यूएस, डोमिसाइल आदी विविध कागदपत्रांची आवश्यकता असते. निकालानंतर मोठ्या प्रमाणावर पालक व विद्यार्थी महा-ई-सेवा केंद्रे, सेतू कार्यालये आणि नागरी सुविधा केंद्रांमध्ये गर्दी करत असल्याने सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या वारंवार उद्भवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या अधिक तीव्र झाली असून, त्यामुळे नागरिकांना आवश्यक दाखले वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत असून, प्रवेश प्रक्रियेच्या ऐनवेळी कागदपत्रे उपलब्ध न झाल्यास विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या तांत्रिक समस्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विविध दाखले शासकीय दरानुसार आणि वेळेत उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनाने विशेष शिबिरे किंवा मोहिम राबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अनेक महा-ई-सेवा केंद्रांमध्ये शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रत्येक महा-ई-सेवा केंद्राच्या दर्शनी भागात शासनमान्य दरपत्रक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणीही रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अशोक विद्यालयाचा ९९.३९ टक्के निकाल; गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम

Newaworldmarathi Pune : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाने यंदाही उल्लेखनीय शैक्षणिक यश संपादन करत ९९.३९ टक्के निकालाची भक्कम नोंद केली आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकालासाठी ओळख असलेल्या संस्थेने गेल्या अनेक वर्षांपासूनची उज्ज्वल परंपरा यंदाही कायम राखली. सलग १२ वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा जपत संस्थेने शैक्षणिक क्षेत्रातील आपला वेगळा ठसा अधिक अधोरेखित केला आहे. या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य यू. के. भोसले, कनिष्ठ महाविद्यालय विभागाच्या रेखा दराडे, मनीषा मोलावणे तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची अथक मेहनत आणि नियोजनबद्ध अभ्यास यांचा मोलाचा वाटा आहे. यंदाच्या निकालात विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय गुणवत्ता सिद्ध केली. विज्ञान शाखेत कौशल पायगुडे (९३.५० टक्के) याने प्रथम क्रमांक पटकावला. समित देवरे (८८.३३ टक्के) द्वितीय, तर कार्तिकी तापकीर (८७.८३ टक्के) हिने तृतीय क्रमांक मिळविला. वाणिज्य शाखेत समृद्धी गायकवाड (८७.१७ टक्के) हिने प्रथम, तर गायत्री बजाज (८६.३३ टक्के) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. कला शाखेत अर्णव मोहोळ (८५.६७ टक्के) याने प्रथम क्रमांक मिळवत संस्थेच्या यशात भर घातली. संस्थेचे संचालक व खजिनदार प्रथमेश आबनावे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले, “उत्कृष्ट निकाल ही केवळ आकडेवारी नसून शिक्षकांचे समर्पण, विद्यार्थ्यांची जिद्द आणि संस्थेची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीची बांधिलकी यांचे हे फलित आहे. सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर ते कायम राखण्याची परंपरा अशोक विद्यालयाने यंदाही समर्थपणे जपली आहे.” संस्थेचे मानद अध्यक्ष मोहन जोशी, सचिव प्रसाद आबनावे, सहसचिव पुष्कर आबनावे, संचालक गौरव आबनावे आणि प्रजोत आबनावे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, प्राचार्य आणि शिक्षकवृंद यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उज्ज्वल निकालाची परंपरा आणि गुणवत्तेचा वारसा जपत अशोक विद्यालयाने शिक्षण क्षेत्रातील आपली विश्वासार्ह ओळख यंदाही अधिक भक्कम केली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

पीबीजी पुणे जाग्वार्सने बटरफ्लाय यूटीटी सीझन 7 च्या लिलावात दिया चितळेला सलग दुसऱ्या वर्षी विक्रमी बोली लावून केले खरेदी

Newaworldmarathi Mumbai : पुणे शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पीबीजी पुणे जाग्वार्सने यंदाच्या सातव्या हंगामासाठी झालेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावात पुन्हा एकदा आपल्या भारतीय खेळाडूवर विश्वास दाखवत भर दिला आहे. या लिलावात दिया चितळे हिने सलग दुसऱ्या वर्षी सर्वाधिक किंमत मिळवणारी भारतीय खेळाडू ठरत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तिला यावेळी ३७.४ लाख टोकन्स इतकी मोठी रक्कम देण्यात आली. पीबीजी पुणे जाग्वार्सने केवळ भारतीय खेळाडूंवरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या खेळाडूंनाही आपल्या संघात सामावून घेतले आहे. फ्रान्सची प्रितिका पावाडे आणि इजिप्तचा ओमर असार यांना संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय, देशांतर्गत फळी अधिक भक्कम करण्यासाठी स्नेहित एसएफआर, मुदित दानी आणि सायनिका माजी यांचीही निवड करण्यात आली आहे. या निवड लिलावाबाबत बोलताना स्पर्धेच्या सहप्रवर्तक विटा दानी यांनी सांगितले की, “या वर्षीची खेळाडू लिलाव प्रक्रिया स्पर्धेची गुणवत्ता दर्शवते. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबतच उदयोन्मुख भारतीय खेळाडूंमध्ये संघांनी केलेली गुंतवणूक ही सकारात्मक बाब आहे.” पीबीजी पुणे जाग्वार्सची रणनीती स्पष्ट होती मजबूत भारतीय खेळाडूंवर आधार ठेवत त्याभोवती आंतरराष्ट्रीय अनुभवाची जोड देणे. याबाबत संघाचे मालक पुनीत बालन म्हणाले, “दिया ही आधीच जगातील उत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणली जाते. ती आमच्या योजनांचा केंद्रबिंदू आहे. तिच्या भोवती आम्ही संतुलित आणि सक्षम संघ उभारण्यावर भर दिला आहे.” स्थिर आणि अनुभवी खेळाडूंचा गाभा तसेच सर्व विभागांमध्ये सखोलता असलेला पीबीजी पुणे जाग्वार्स संघ यंदाच्या हंगामात दमदार कामगिरीसाठी सज्ज आहे. यंदाच्या सातव्या हंगामात एकूण सात संघ सहभागी होणार असून, प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघाशी एकदा सामना करेल. साखळी फेरीतील अव्वल चार संघ पुढील बाद फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं अन् काही तासातच… मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी अंत

0
Newsworldmarathi Mumbai: मुंबईतील पायधुनी परिसरातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तसेच अन्नातून झालेल्या विषबाधेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री १०.३० च्या सुमारास अब्दुल्ला डोकाडिया (४०), त्यांच्या पत्नी नसरीन (३५), मुलगी आयशा (१६) आणि जैनब (१३) यांनी आपल्या नातेवाईकांसोबत रात्रीचे जेवण केले होते. या जेवणात बिर्याणीचा बेत होता. हे जेवण आटोपून त्यांचे नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले. त्यानंतर रात्री १ ते १.३० च्या सुमारास कुटुंबातील या चारही सदस्यांनी कलिंगड खाल्ले. त्यानंतर काही तासांनी या चौघांची प्रकृती बिघडण्यास सुरुवात झाली. यानंतर २६ एप्रिल रोजी पहाटे ५.३० ते ६ च्या दरम्यान कुटुंबातील सर्वांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास सुरू झाला. प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे त्यांना तातडीने जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली. यावेळी सर्वात आधी जैनब (१३) यांचा सकाळी १०.१५ वाजता मृत्यू झाला. त्यानंतर दिवसभरात पत्नी आणि मोठी मुलगी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रात्री १०.३० च्या सुमारास कुटुंबप्रमुख अब्दुल्ला यांनीही प्राण सोडले.

पूना गुजराती केळवणी मंडळाच्या शताब्दी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

0
Newaworldmarathi Pune : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले. कोंढवा येथील जयराज क्लबमध्ये रविवारी (दि. १९) आयोजित या कार्यक्रमात सुमारे ४० माजी विद्यार्थी सपत्नीक सहभागी झाले होते. शाळेतील खोड्या, एकत्रित अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, शिक्षा आणि स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी पुन्हा एकदा बालपण अनुभवले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गेल्या दशकात दिवंगत झालेल्या सहाध्यायांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर जयराज क्लबची पाहणी करण्यात आली. सर्वांनी एकत्रित समूह छायाचित्र काढून या अविस्मरणीय भेटीची नोंद केली. पुढे संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या बॅचमधील काही विद्यार्थी मुंबई, राजकोट (गुजरात), कॅनडा आणि अमेरिका येथे स्थायिक असून त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. ते संदेश कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आले. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील अनुभव आणि भावना व्यक्त करत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले. या प्रसंगी मंडळाचे चेअरमन डॉ. राजेश शहा म्हणाले, “ज्या शाळेतून मी १९७३ साली एसएससी उत्तीर्ण झालो, त्याच संस्थेच्या चेअरमनपदी २०२२ मध्ये काम करण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.” त्यांनी जयराज क्लबच्या उभारणीत माजी विद्यार्थ्यांचे योगदानही अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच भविष्यात अशाच स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित महिलांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचेही नियोजन केले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन डॉ. राजेश शहा, अतुल शहा, वीरेंद्र शहा, रश्मी गांधी, रणजीत पोरवाल, प्रकाश शहा आणि मदन शहा यांनी केले.

डिजिटल बाजारपेठेत ‘Sugra.co.in’ची झेप : आशय खाडे यांची यशोगाथा

0
Newaworldmarathi Pune : डिजिटल युगात खरेदीच्या सवयी झपाट्याने बदलत असताना ‘Sugra.co.in’ या प्लॅटफॉर्मने ग्राहकांसाठी आधुनिक आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या स्टार्टअपमागे उभे असलेले युवा उद्योजक आशय खाडे यांनी पारंपरिक बाजारपेठेच्या चौकटीबाहेर विचार करत डिजिटल क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Oplus_16908288
आशय खाडे यांनी सुरुवातीला स्थानिक विक्रेत्यांना ऑनलाइन व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘Sugra.co.in’ची संकल्पना मांडली. ग्रामीण आणि निमशहरी भागातील लहान व्यावसायिकांना मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करता यावी, यासाठी त्यांनी हा प्लॅटफॉर्म उभा केला. सुरुवातीच्या काळात मर्यादित साधने आणि तांत्रिक अडचणींचा सामना करत त्यांनी व्यवसाय हळूहळू वाढवला. ‘Sugra.co.in’चे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांसाठी सोपा वापर, सुरक्षित पेमेंट प्रणाली आणि जलद डिलिव्हरी. यामुळे घरबसल्या आवश्यक वस्तू मिळवण्याची सुविधा ग्राहकांना मिळाली. विविध श्रेणीतील उत्पादने आणि सणासुदीच्या ऑफर्समुळे या संकेतस्थळाने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. विशेष म्हणजे, ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला चालना देत स्थानिक उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या प्लॅटफॉर्मने केले आहे. त्यामुळे अनेक छोट्या विक्रेत्यांना नवसंजीवनी मिळाली असून त्यांच्या व्यवसायात वाढ झाली आहे. दरम्यान, वाढत्या स्पर्धेमध्ये गुणवत्ता टिकवणे, वेळेवर सेवा देणे आणि ग्राहकांचा विश्वास जपणे ही आव्हाने कायम आहेत. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन यामुळे ‘Sugra.co.in’ भविष्यात ई-कॉमर्स क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आशय खाडे यांची ही वाटचाल नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कल्पकता आणि चिकाटीच्या जोरावर डिजिटल क्षेत्रात यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

१०८ रुग्णवाहिका सेवेद्वारे राज्यात ५ लाखांपेक्षा अपघातग्रस्तांना जीवनदान; आदिवासी भागातही प्रभावी सेवा

0
Newaworldmarathi Pune: महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवेने राज्यातील तब्बल ५ लाख ४६ हजार १० अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करून मोठे यश संपादन केले आहे. अत्यंत तातडीच्या परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून रुग्णांना आवश्यक उपचार देत सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्याचे काम या सेवेने प्रभावीपणे पार पाडले आहे. राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) द्वारे संचालित केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही सेवा कार्यरत असून, नागरिकांना तत्काळ व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय मदत देण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्येही या सेवेचा मोठा लाभ झाला आहे. नंदुरबार, गडचिरोली, धुळे, पालघर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये एकूण १,२१,६८५ अपघातग्रस्तांना १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे. याशिवाय, राज्यातील महत्त्वाच्या समृद्धी महामार्ग (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) वरही १०८ सेवेची तत्परता दिसून आली आहे. या महामार्गावर २४ तास कार्यरत असलेल्या २१ आपत्कालीन पथकांद्वारे आतापर्यंत ५८९ अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे. बीव्हीजीने देशात सुविधा व्यवस्थापन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यामागे संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रासोबतच जम्मू-काश्मीरमध्येही यशस्वीपणे चालवली जात आहे. बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, “महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत. समाजातील प्रत्येक नागरिकाला तातडीची व गुणवत्तापूर्ण सेवा देणे हे आमचे ध्येय आहे.” ते पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान १०८ रुग्णवाहिका सेवेतील कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्यदलासोबत समन्वय साधून उल्लेखनीय कार्य केले. या शौर्यपूर्ण सेवेच्या गौरवार्थ लवकरच या ‘वीर योद्ध्यांचा’ सन्मान करण्यात येणार आहे. एकूणच, १०८ रुग्णवाहिका सेवा ही राज्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ ठरत असून, शहरी तसेच दुर्गम आणि आदिवासी भागांमध्येही जीवनरक्षक ठरत आहे.