LATEST ARTICLES

श्री पूना गुजराती बंधू समाजातर्फे दहावी-बारावी व उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभाचे आयोजन

0
Newaworldmarathi Pune: कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे , श्री.भरत अग्रवाल अध्यक्ष विश्वकर्मा ग्रुप व ट्रस्टी महालक्ष्मी मंदिर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी श्री पूना गुजराती बंधू समाजाचे अध्यक्ष जयंत शहा,कार्यकारी संचालक डॉ.राजेश शहा, सहकार्यकारी संचालक नैनेश नंदू ,सचिव राजेंद्र शहा,खजिनदार हरेश शहा मान्यवर उपस्थित होते. यावेळी दहावी,बारावी व उच्चशिक्षित उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भरत अग्रवाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी भरत अग्रवाल म्हणाले की समाज माध्यमे तुमची विचार प्रक्रिया कुंठीत करून टाकतात तुमच्या विचारांची दिशा भरकटवून तुमचे विचार विश्व प्रदूषित करीत असतात.आपण कसे जगायचे कोणत्या दिशेने विचार करायचा याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दिशा देण्याचे काम समाज माध्यमे करीत असतात. तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे आपण तंत्रज्ञानासाठी नाही याची जाणीव प्रत्येक तरुणाने ठेवली पाहिजे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत कधी नव्हे ती कमालीची लवचिकता आल्याने त्या लवचिकेचा फायदा घेत व्यवसाय आणि छंद याची सांगड घालता आली पाहिजे. ध्येय निश्चित करून केवळ आरंभशूरपणा न करता सातत्याने त्या दिशेने नागरिक मार्गक्रमण केल्यास संकल्पपूर्ती होते.भूतकाळात अपयश आले असल्यास ते विसरून यशावर लक्ष केंद्रित करा असे त्यांनी सांगितले. डॉ.राजेश शाह म्हणाले की,गुजरात समाज हा उद्योगाचा समाज म्हणून सुपरीचित आहे उद्योगजगतात सचोटीने काम करीत नाव कमावलेल्या अनेक जण आपल्या समाजात आहेत. भविष्यात उद्योगाला शिक्षणाची जोड देत बुद्धिजीवी क्षेत्रात देखील आपल्या समाजाचे उदाहरणे प्रस्थापित केली पाहिजेत. यशाला मर्यादा नसतात एका यशा प्राप्तीनंतर पुढचा ध्येय आपल्याला खुणावत असते आणि ही सातत्याने सुरू राहणारे प्रक्रिया आहे. या समारंभास ट्रस्टी हेमंत मेहता,जनक शाह,केतन कापडिया,विनोद देडिया,दिलीप मेहता व सौ.हंसा शाह आणि सर्व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.या वर्षीपासून विशेष स्पोर्ट्स कॅटेगिरी मध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नैनेश नंदू यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय केला,राजेंद्र शहा यांनी आभार प्रदर्शन मांडले. अनुजा सेलोट यांनी सूत्रसंचालन केले.

नसरापूर अत्याचार प्रकरण; आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा

Newsworldmarathi Pune: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील अत्याचार प्रकरणाचा निकाल अखेर समोर आला आहे. अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात अखेर आज पुण्याच्या विशेष न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने ६५ वर्षीय नराधम दोषी भीमराव प्रभाकर कांबळे याला मरेपर्यंत फाशीची ठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करून निकाल देणारा हा राज्यातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार प्रकरण कोर्टात काय घडलं? न्यायालयाने गुरुवारीच भीमराव कांबळे याला पोक्सो आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर आज शिक्षेच्या तीव्रतेवर अंतिम सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी आरोपीला केवळ आणि केवळ फाशीचीच शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. कोर्टाने मागील वेळच्या सुनावणीत आरोपीलाच विचारलं होतं, की तूच सांग तुला काय शिक्षा द्यायला हवी? यावेळी आरोपीने मौन बाळगले. यानंतर त्याने पुन्हा कोर्टात खोटी कहाणी सांगत बनाव रटला. मात्र, न्यायाधीशांनी त्याला फटकारत दोषी ठरवलं. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीसोबत केलेले कृत्य अतिशय क्रूर आहे आणि त्याच्यात सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आज त्याला ही शिक्षा सुनावली. महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे रोजी नसरापूर येथे ही काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेनंतर अख्ख्या महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने विशेष तपास पथक स्थापन केले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांच्या आत १,२०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. राज्यातील सर्वात वेगवान खटला विशेष न्यायालयाने २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी सुरू केली होती. सरकारी पक्षाने अत्यंत वेगाने पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए विश्लेषकांसह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. २० जून रोजी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला होता. अखेर आज कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावताच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी उमेश शेळके व सरचिटणीसपदी हिरा सरवदे

0
Newsworldmarathi Pune : पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी उमेश शेळके हे विजयी झाले, तर सरचिटणीसपदी ‘लोकमत’चे हिरा सरवदे यांची बिनविरोध निवड झाली, तसेच ‘सकाळ’चे सचिदानंद वाघमारे हे कार्यकारिणी सदस्यपदी विजयी झाले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या २०२६-२७ च्या वार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता. २८) मतदान झाले. उपाध्यक्षपदी ‘टीव्ही ९’चे योगेश बोरसे आणि ‘पुढारी’चे किशोर बरकाले, खजिनदारपदी ‘महाराष्ट्र टाइम्स’चे प्रसाद पानसे निवडून आले. चिटणीसपदी दैनिक भास्करचे राहुल देशमुख आणि ‘लोकसत्ता’चे संजय सपकाळे यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्यपदी सुशांत राऊत (टीव्ही ९), ज्ञानेश्वर फड (प्रभात), उद्धव धुमाळे (लोकमत), अक्षय फाटक (नवराष्ट्र), तुषार झरेकर (पुढारी न्यूज), गोपाळ गुरव (महाराष्ट्र टाईम्स), दीपक होमकर (तरुण भारत), मिलिंद शुक्ल (प्रभात), मनोज मोरे (लोकसत्ता), सचिदानंद वाघमारे (सकाळ) यांचा विजय झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड. प्रताप परदेशी आणि अॅड. स्वप्नील जोशी यांनी कामकाज पाहिले.

शिक्षण व्यवस्था ICU मध्ये; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा : कन्हैया कुमार

0
Newsworldmarathi Pune : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे देशभर सुरू करण्यात आलेल्या ‘छात्रों की गूंज’ या राष्ट्रव्यापी विद्यार्थी अभियानाचा महाराष्ट्रातील शुभारंभ आज पुण्यात काँग्रेस कार्यसमिती (CWC) सदस्य कन्हैया कुमार आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी, कॉंग्रेस गटनेते चंदूशेठ कदम यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेद्वारे करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना राष्ट्रीय व्यासपीठ देत शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी, भरतीतील विलंब आणि एनटीएच्या अपयशाविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. *पत्रकार परिषदेत बोलताना कन्हैया कुमार* यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, देशातील लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करत असताना पेपरफुटी, परीक्षा रद्द होणे, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रिया रखडल्यामुळे त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. विद्यार्थी कोणतीही विशेष सवलत मागत नाहीत; त्यांना केवळ निष्पक्ष परीक्षा आणि वेळेत नोकरी हवी आहे. ते पुढे म्हणाले की, NEET-UG 2026 पेपरफुटी हा एक अपवाद नसून संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या अपयशाचे प्रतीक आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात ८९ हून अधिक पेपरफुटी आणि परीक्षा घोटाळे उघडकीस आले असून कोट्यवधी विद्यार्थी त्याचा फटका बसले आहेत. तरीही मोठे सूत्रधार आणि त्यांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कन्हैया कुमार यांनी असा आरोप केला की, शिक्षण व्यवस्था आज विद्यार्थ्यांना संधी देणारी नसून “रिजेक्शन सिस्टीम” बनली आहे. महागडी कोचिंग व्यवस्था, रिक्त पदे, सतत पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षा आणि वाढती बेरोजगारी यामुळे तरुणांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळला आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, पेपरफुटी आणि भरतीतील अन्याय या विषयांवर केंद्र सरकार आणि पंतप्रधानांचे मौन अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी कोटा येथून सुरू केलेल्या ‘छात्रों की गूंज’ अभियानाचा उल्लेख करत, हे केवळ विद्यार्थ्यांचे आंदोलन नसून युवा भारताचे भविष्य वाचविण्याची लढाई असल्याचे सांगण्यात आले. *देशातील २८ प्रमुख शहरांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, महाविद्यालये, वाचनालये आणि कोचिंग केंद्रांमध्ये व्यापक जनसंपर्क केला जाणार आहे.* काँग्रेसच्या प्रमुख मागण्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. पेपरफुटी माफिया, संबंधित एजन्सी, अधिकारी आणि राजकीय संरक्षण यांची निष्पक्ष चौकशी करावी. एनटीएसह(NTA) संपूर्ण परीक्षा व्यवस्थेचे पुनर्गठन करून पेपर सेटिंग, प्रिंटिंग, वाहतूक, परीक्षा केंद्रे आणि डिजिटल प्रणाली सुरक्षित करावी. सर्व स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेसाठी निश्चित वार्षिक कॅलेंडर जाहीर करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी. अभियानाचा पुढील आराखडा ३० जूनपासून देशातील २८ शहरांत पत्रक वाटप, विद्यार्थी संपर्क आणि नुक्कड सभा. जुलै महिन्यात कॅम्पस संपर्क आणि ‘आंबेडकर संवाद’ कार्यक्रम. १ ऑगस्ट रोजी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे. ९ ऑगस्ट रोजी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाद्वारे पहिल्या टप्प्याचा समारोप.

‘उत्सव शिक्षणाचा’मधून जिल्हा परिषद शाळांना नवी उभारी! आर.बी.जी. फाऊंडेशनचा शैक्षणिक उपक्रम

Newsworldmarathi Nashik :ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता निर्माण व्हावी, शिक्षणाची गोडी वाढावी आणि शाळांवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने नवी मुंबईच्या आर. बी. जी. फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘उत्सव शिक्षणाचा; आनंद विद्यार्थ्यांचा’ या अभिनव उपक्रमाला मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील ६ जिल्हा परिषद शाळांतील सुमारे ५०० विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. आर.बी. जी. फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. मधुरा गेठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणा निर्माण व्हावा या उद्देशाने आणि शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी फाऊंडेशनने पहिल्या टप्प्यात जळगाव (निंबायती) परिसरातील शाळांमध्ये हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘शिक्षण हा आनंदाचा उत्सव असावा’ कार्यक्रमात बोलताना मधुरा गेठे म्हणाल्या, “ग्रामीण भागातील आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अफाट क्षमता आहे. शिक्षण हे मुलांसाठी ओझे नसून आनंदाचा उत्सव असला पाहिजे. आज विद्यार्थ्यांच्या हातात दिलेली स्कूल बॅग ही केवळ शालेय वस्तू नसून त्यांच्या स्वप्नांना दिलेली नवी दिशा आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आर.बी.जी. फाऊंडेशन सातत्याने कार्यरत राहील.” कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्याबद्दल आभार मानून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिली. या कार्यक्रमास अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेंद्र (नाना) पाटील, जळगावच्या सरपंच वाल्याबाई विठोबा पटांगरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश भिला दुकळे, येसगावचे सरपंच सुरेशजी शेलार, मेहुणेचे सरपंच आबासाहेब देवरे, निंबायतीचे सरपंच रतिलाल शेवाळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भागा कराळे, जळगावचे उपसरपंच बाळासाहेब मिसकर यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजोळच्या आठवणींनी मधुरा गेठे भावूक कार्यक्रमादरम्यान मधुरा गेठे यांनी आपल्या आजोळाच्या आठवणींना उजाळा दिला. “मुलगी कितीही दूर गेली, तरी माहेर आणि आजोळाची ओढ कधीच कमी होत नाही. या गावात येताना मला नेहमीच स्वतःच्या घरी आल्यासारखे वाटते,” असे त्या म्हणाल्या.
“शिक्षण ही केवळ पदवी मिळविण्याची प्रक्रिया नाही, तर सक्षम आणि सुसंस्कृत समाज घडविण्याचा पाया आहे. जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे हास्य फुलविण्यासाठी आर.बी.जी. फाऊंडेशन सातत्याने कार्यरत राहील.”
मधुरा गेठे, अध्यक्षा, आर.बी.जी.फाउंडेशन

वडिलांच्या दशक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जनसेवेत सक्रिय

0
Newsworldmarathi Pune: वैयक्तिक दुःखावर कर्तव्याला प्राधान्य देत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तथा पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी वडिलांच्या दशक्रिया विधीनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा जनसेवेत सक्रिय होत पर्वती विधानसभा मतदारसंघात जनता दरबाराचे आयोजन केले. या जनता दरबारात नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि विकासकामांबाबतच्या मागण्या त्यांनी थेट जाणून घेत संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्याच्या उद्देशाने खासदार मुरलीधर मोहोळ दर महिन्याला एका विधानसभा मतदारसंघात जनता दरबार आयोजित करतात. या उपक्रमाद्वारे नागरिकांना थेट लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्याची संधी मिळत असून विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून अनेक प्रश्नांवर त्वरित कार्यवाही केली जात आहे. रविवारी पर्वती विधानसभा मतदारसंघात पार पडलेला हा १७ वा जनता दरबार असून, या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, नागरी सुविधा, महसूल, वीज, आरोग्य तसेच इतर शासकीय कामकाजाशी संबंधित प्रश्न मांडले. प्रत्येक तक्रारीची सविस्तर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या. यावेळी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की, “जनतेशी सातत्याने संवाद ठेवणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभावी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे कर्तव्य आहे. नागरिकांचा विश्वास हीच माझी सर्वात मोठी ताकद असून पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध आहे.” जनता दरबाराला राज्य मंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, भाजपा नेते बाबाशेठ मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

राजकीय हस्तक्षेपामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जागतिक मानांकनात घसरण; संशोधनाऐवजी राजकारणाला प्राधान्य : प्रथमेश आबनावे

Newsworldmarathi pune:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जागतिक QS World University Rankings 2026 मध्ये पुन्हा मोठी घसरण झाली असून राज्यातील उच्च शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २०२३ मध्ये ४५४-४६० या गटात असलेले विद्यापीठ २०२४ मध्ये ७११-७२० या गटात घसरले. त्यानंतर २०२५ मध्ये ५६६ व्या स्थानावर सुधारणा झाली होती. मात्र यंदा पुन्हा विद्यापीठ ७९१-८०० या गटात घसरल्याने राज्य सरकारच्या उच्च शिक्षण धोरणावर प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे यांनी विद्यापीठाच्या जागतिक घसरणीसाठी राज्य सरकारचा वाढता राजकीय हस्तक्षेप जबाबदार असल्याचा आरोप केला. “एकेकाळी ‘दक्षिणेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची शैक्षणिक ओळख आज धोक्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखले जात होते. मात्र आज ती ओळख केवळ नावापुरती उरली आहे. गुणवत्ता, संशोधन आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध असलेले हे विद्यापीठ आता राजकीय हस्तक्षेपामुळे जागतिक स्तरावर सातत्याने मागे पडत आहे,” असे आबनावे म्हणाले. त्यांच्या मते, विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर सातत्याने आघात होत असून कुलगुरू नियुक्ती, प्राध्यापक भरती, प्रशासकीय निर्णय, धोरणनिर्मिती (Policy Making) आणि आर्थिक कारभार या सर्वच स्तरांवर राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. “शैक्षणिक गुणवत्ता आणि पात्रतेपेक्षा राजकीय हस्तक्षेपाला महत्त्व दिले जात असल्याने विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे,” असे त्यांनी नमूद केले. आबनावे यांनी सांगितले की, विद्यापीठातील अनेक शिक्षक, संशोधक आणि प्रशासकीय पदे दीर्घकाळापासून रिक्त आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षकांची भरती, संशोधनासाठी आवश्यक मनुष्यबळ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राध्यापक आणि संशोधन संस्कृती विकसित करण्याऐवजी भरती प्रक्रिया सातत्याने रखडविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, संशोधनाची गुणवत्ता आणि जागतिक क्रमवारीतील महत्त्वाचे निकष कमकुवत झाले आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या आर्थिक कारभारावरही प्रश्न उपस्थित केले. “विद्यापीठाने संशोधनासाठी नवीन निधी, उद्योग-सहकार्य, आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्प, पेटंट आणि नवोपक्रमासाठी संसाधने उभी करण्यावर भर देणे अपेक्षित आहे. मात्र त्याऐवजी विद्यापीठाच्या आर्थिक ठेवी मोडण्याची वेळ का येत आहे, हा गंभीर प्रश्न आहे. विद्यापीठाची आर्थिक संसाधने संशोधन आणि शैक्षणिक विकासासाठी वापरण्याऐवजी त्यांचे नियोजन योग्य पद्धतीने होत आहे का, याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे,” असे आबनावे म्हणाले. “विद्यापीठातील कामकाज नियमावलीनुसार आणि शैक्षणिक निकषांनुसार चालण्याऐवजी बाह्य हस्तक्षेपाच्या आधारे निर्णय घेतले जात आहेत. संशोधन, नवोपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य देण्याऐवजी राजकारणाला प्राधान्य दिले जात आहे. याचाच परिणाम म्हणून आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जागतिक मानांकन सातत्याने घसरत आहे,” असा आरोप त्यांनी केला. आबनावे यांनी पुढे म्हटले की, “जागतिक स्तरावरील विद्यापीठांचे मूल्यमापन संशोधन, गुणवत्तापूर्ण प्राध्यापक, आंतरराष्ट्रीय सहकार्य, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर, उद्योग सहभाग आणि शैक्षणिक उत्कृष्टतेच्या आधारे केले जाते. मात्र महाराष्ट्रात या निकषांकडे दुर्लक्ष करून हस्तक्षेपाच्या राजकारणाला प्राधान्य दिले जात आहे. ही परिस्थिती बदलली नाही तर राज्यातील उच्च शिक्षणाचे मोठे नुकसान होईल.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक कारभाराची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी. विद्यापीठातील सर्व रिक्त शिक्षक व प्रशासकीय पदांची गुणवत्ताधारित भरती तातडीने पूर्ण करावी, संशोधनासाठी स्वतंत्र विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, निर्णयप्रक्रियेतील राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे थांबवावा, अशी मागणी प्रथमेश आबनावे यांनी केली. “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक अस्मितेचे प्रतीक आहे. या विद्यापीठाचे भविष्य राजकारणाने नव्हे तर गुणवत्ता, संशोधन, पारदर्शकता आणि स्वायत्ततेने घडले पाहिजे. अन्यथा ‘दक्षिणेचे ऑक्सफर्ड’ ही ओळख इतिहासजमा होण्याचा धोका निर्माण झाला आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.
Oplus_16908288

Ketan Agarwal Death: ‘मी केतनला माझ्या अफेअरबद्दल सांगितलेलं…’; सियाचा दावा अन् मोबाईलमधील चॅट्स, फोटोने उघड केलं ‘ते’ खोटं बोलणं, हादरवणाऱ्या गोष्टी समोर

Newsworldmarathi pune: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या मुख्य आरोपी सिया गोयल हिने आता पोलिसांसमोर नवनव्या कहाण्या रचण्यास (Ketan Agarwal Death case) सुरुवात केली आहे. मात्र, पोलिसांनी तिच्या दाव्यांमधील (Ketan Agarwal Death case) खोटेपणा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खोडून काढला आहे. लोणावळा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असली, तरी केतन आणि तिच्या मोबाईलमधील चॅट्सने तिच्या या नव्या कल्पित कथेचे बिंग फोडले आहे. Ketan Agarwal Death: सिया गोयलचा नवा दावा काय? चौकशीदरम्यान सिया गोयलने पोलिसांना सांगितले की, तिची केतन अग्रवालशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि तिने हे केतनला स्पष्टपणे सांगितले होते. सियाने पुढे असाही दावा केला की, जेव्हा तिने लग्नाला नकार दिला, तेव्हा केतन तिला म्हणाला होता, “आता खूप उशीर झाला आहे. गोष्टी खूप पुढे निघून गेल्या आहेत आणि आता लग्न मोडणे शक्य नाही.” या कथेच्या माध्यमातून सिया स्वतःला निर्दोष दाखवण्याचा आणि संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहे. Ketan Agarwal Death: मोबाईल चॅट्सने उघड केले सत्य; पोलिसांचा अविश्वास पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन आणि सिया या दोघांचेही मोबाईल फोन सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी जेव्हा या दोन्ही मोबाईलमधील व्हॉट्सॲप आणि इतर चॅट्सची तपासणी केली, तेव्हा सियाने सांगितलेली कहाणी पूर्णपणे खोटी असल्याचे समोर आले. चॅट्समध्ये कुठेही लग्नाला नकार किंवा वाद झाल्याचे दिसत नसून, उलटपक्षी दोघांमध्ये एका सामान्य जोडप्याप्रमाणे (Couple) अत्यंत प्रेमळ आणि लग्नाआधीच्या गप्पा झाल्याचे उघड झाले आहे. दोन्ही बाजूंच्या संवादातून ते लग्नासाठी उत्सुक असल्याचेच स्पष्ट होत आहे. याच कारणामुळे पोलीस सियाच्या या नव्या दाव्यावर अजिबात विश्वास ठेवायला तयार नाहीत. Ketan Agarwal Death: प्रत्येक अँगलने तपास सुरू लोणावळा ग्रामीण पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने करत आहे. सियाने केवळ स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि गुन्ह्याचे गांभीर्य कमी करण्यासाठी ही नवीन कहाणी रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलीस आता या प्रकरणाचा केवळ तिच्या जबाबावर अवलंबून न राहता फॉरेन्सिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक डेटाच्या आधारे प्रत्येक अँगलने सखोल तपास करत आहेत.
Oplus_16908288

नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाचा निकाल, नराधम भीमराव कांबळे दोषी, काय शिक्षा होणार?

Newsworldmarathi pune: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे महाराष्ट्रदिनाच्या दिवशी साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापजनक पडसाद उमटले. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या पावणेदोन महिन्यात या खटल्याचा निकाल आज (गुरुवारी दि. २५ जून) लागला आहे. राज्यातील न्यायालयीन इतिहासात जलदगतीने सुनावणी झालेला नसरापूर अत्याचार प्रकरण हा पहिला खटला ठरणार आहे. या प्रकरणात भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५) याला अटक करण्यात आली. आज या प्रकरणाचा निकाल लागला आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस आर साळूंखे यांनी या प्रकरणाचा निकाल देत आहेत. या प्रकरणी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयात काय घडलं? नसरापूर हत्या प्रकरणातील आरोपी भिमराव कांबळेला न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवले आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले. त्यापैकी दोन गुन्ह्यांमधे फाशीच्या शिक्षेची तरतुद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात १४ वर्षा़च्या कारावासाची शिक्षेची तरतूद असल्याची कोर्टाची माहिती आहे. तर यावेळी न्यायाधीशांनी आरोपी भिमराव कांबळेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करुन विचारले की, तु तो प्रसंग आठव आणि तुच सांग की तुला कोणती शिक्षा द्यायला पाहिजे. त्यावर आरोपी भिमराव कांबळेने पुन्हा बनाव रचला आणि न्यायालयाला सांगितले की, ” मी त्या दिवशी त्या मुलीला गाठी शेव खाण्यासाठी घेऊन गेलो होतो. त्यावेळी मी पाय घसरून पडलो आणि त्याचवेळी त्या मुलीच्या डोक्यालाही मार लागला. मी तुला शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती सारखी ओरडत होती, असंही आरोपीने म्हटलं आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी गुन्हेगार ठरलेल्या भीमराव कांबळेला म्हटले की “आता तु जे सांगतो आहेस तो इतिहास झालाय, कारण तुझ्यावर गुन्हा सिद्ध झालाय. तुला कोणती शिक्षा द्यायला हवी”, न्यायाधीशांच्या या म्हणण्यावर भिमराव कांबळेने कोणतेच उत्तर दिले नाही. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला खाली बसायला सांगितले. गुन्हेगार ठरलेल्या भिमराव कांबळेला कोणती शिक्षा देण्यात यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून न्यायाधीशांसमोर युक्तीवाद सुरु आहे. सरकारी वकिल युक्तीवाद करत आहेत आणि त्यांच्याकडून भिमराव कांबळेला मृत्युदंड देण्याची न्यायाधीशांकडे मागणी करण्यात आली आहे. न्यायलयासमोर युक्तीवाद भिमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही. तो दयेच्या लायकीचा नाही. ज्या मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला त्या मुलीवर त्याने ३९ मिनिटे अतिशय घृणास्पद प्रकार केला. वैद्यकिय तपासणीत भिमराव कांबळेने या मुलीवर विविध प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याच समोर आलं असल्याचं सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं आहे. त्या लहान मुलीच्या अंगावर अठरा जखामा या आरोपीने लैंगिक अत्याचार करताना केल्या. समाजात मुली आणि महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र असे कृत्य केले तर भितीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. आरोपीने फक्त वासनेसाठी हे कृत्य केलेले आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदिपसिंह गिल हे देखील न्यायालयात आलेत. सरकारी वकिलांकडून अशाच गंभीर गुह्याच्या खटल्यांचा आणि त्यामधे सुनावण्यात आलेल्या खटल्यांचा संदर्भ देण्यात येत आहेत. आरोपीला योग्य शिक्षा न झाल्यास सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास हलण्याची भिती देखील सरकारी वकिलांनी व्यक्त केली आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्यात यावी जेणेकरुन कोणताही गुन्हेगार गुन्हा करताना चारवेळा विचार करेल, अशी मागणी देखील सरकारी वकिलांनी केली आहे.

सिया गोयलच्या बॉयफ्रेंडची भर उन्हातली एक चूक अन् पोलखोल.

पुणे: परदेशातून उच्च शिक्षण पूर्ण करून नुकताच वडिलांच्या कन्स्ट्रक्शन व्यवसायात स्थिरावलेला २४ वर्षांचा तरुण उद्योजक केतन अग्रवाल… (Ketan Agrawal Death) घरात नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या त्याच्या शाही विवाहाची जय्यत तयारी सुरू होती. राजस्थानमधील जयपूर येथे एका भव्य पॅलेसमध्ये तब्बल १७ कोटी रुपये खर्चून या विवाहसोहळ्यासाठी एक पॅलेस देखील बुक केला होता. व्हीआयपी पाहुण्यांच्या (Ketan Agrawal Death) प्रवासासाठी दोन खाजगी विमानेही बुक करण्यात आली होती. संपूर्ण अग्रवाल कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र, एका विदारक घटनेने या आनंदाचे रूपांतर कधीही न भरून निघणाऱ्या दुःखात केले. १९ जून रोजी केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिचा वाढदिवस होता. हाच वाढदिवस साजरा करण्यासाठी आदल्या दिवशी, म्हणजेच १८ जूनला हे जोडपे लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. पण त्याच दिवशी संध्याकाळी केतनचा फोटो काढताना पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी आली. सुरुवातीला हा एक दुर्दैवी अपघात वाटत होता, मात्र अवघ्या ५ दिवसांत पोलिसांनी या मृत्यूमागील जे भयंकर गुपित उघड केले, त्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. केतनचा मृत्यू अपघात नव्हता, तर त्याचा पूर्वनियोजित खून करण्यात आला होता; आणि हा कट रचणारी दुसरी तिसरी कोणी नसून त्याची होणारी नवरी ‘सिया गोयल’ हीच निघाली.(Ketan Agrawal Death) कडक उन्हात ती ‘हुडी’… आणि पोलिसांचा संशय बळावला घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस, शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पथकांनी कठीण परिस्थितीत बचावकार्य राबवून केतनचा मृतदेह ४०० फूट खोल दरीतून बाहेर काढला. सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना घटनाक्रमात काही विसंगती जाणवू लागल्या. रहस्य उलगडण्यासाठी पोलिसांनी किल्ल्याच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांची तपासणी सुरू केली. यावेळी पोलिसांना एका संशयित तरुणाच्या हालचाली दिसल्या. गेल्या आठवड्यात लोणावळ्यात प्रचंड उकाडा आणि कडक ऊन असतानाही, एक तरुण अंगात जाडजूड ‘हुडी’ (जॅकेट) घालून वावरत होता. त्याने कानात हेडफोन घातले होते आणि हुडीच्या साहाय्याने तो स्वतःचा चेहरा लपवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. भर उन्हातल्या या अजब पेहरावाने पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरली. संधी साधली अन् कड्यावरून ढकलले… त्या संशयित तरुणाचा माग काढत पोलिसांनी सखोल चौकशी केली तेव्हा सिया गोयलच्या क्रूर कटाचा पर्दाफाश झाला. सियाचे केतनशी लग्न ठरले असले तरी ती या नात्यात खूश नव्हती. तिने आपल्या एका मित्रासोबत मिळून केतनला कायमचे संपवण्याचा प्लॅन आखला होता. १८ जून रोजी ठरल्याप्रमाणे सिया केतनला घेऊन लोहगडाच्या एका निर्जन कड्यावर पोहोचली. तिथे आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री करून, सियाने तिच्या ‘हुडी’ घातलेल्या मित्राच्या मदतीने केतनला थेट दरीत ढकलून दिले. ४०० फूट खोल कोसळल्यामुळे केतन गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अपघाताचा बनाव रचून पोलिसांची दिशाभूल करण्याचा सियाचा प्रयत्न अखेर फसला आहे. पोलिसांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सिया गोयल आणि तिच्या त्या साथीदार मित्राला बेड्या ठोकल्या असून, या हाय-प्रोफाइल मर्डर केसचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तांत्रिक पुरावे आणि ‘लव्ह ट्रँगल’ उघड मिळालेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गोपनीय माहिती, साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांच्या (CDR, IPDR एनालिसिस आणि सीसीटीव्ही फुटेज) आधारे सखोल तपास सुरू केला. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली की, सिया गोयल हिचे पुणे मार्केट यार्ड परिसरात दुकान असलेल्या चेतन चौधरी नावाच्या तरुणासोबत गेल्या एका वर्षापासून प्रेमसंबंध होते. सियाला केतनसोबत लग्न करायचे नव्हते. या विवाहबंधनात केतन आडकाठी ठरत असल्याने सिया आणि चेतन या दोघांनी मिळून त्याला वाटेतून हटवण्याचा पूर्वनियोजित कट रचला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कलम १०३ (BNS) आणि ६१(२) अंतर्गत खुनाचा गुन्हा (गु.र.नं. १६८/२०२६) दाखल केला आहे. आधिक तपासात त्यांनी कबुली देखील दिली आहे. त्यांचे प्रेमसंबंध होते.