LATEST ARTICLES
मोठी बातमी! पुण्यात इमारत कोसळली, 14 लोक अडकल्याची भीती; मोशी परिसरात खळबळ
Newsworldmarathi Pune: मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागातही पावसाने कहर केला आहे. अशातच आता पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मोशी कचरा डेपो जवळ एक मोठी इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव कार्य करण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळाकडे रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
खडकवासला धरण शंभर टक्के भरले; पुणे महापालिकेकडून जलपूजन
Newsworldmarathi Pune: पुणे शहरासाठी दिलासादायक ठरलेली आनंदाची बातमी म्हणजे खडकवासला धरण शंभर टक्के भरले असून, यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक जलपूजन करून जलदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या जलपूजन सोहळ्यात पुणेकरांना वर्षभर मुबलक व नियमित पाणीपुरवठा व्हावा आणि शहरावर पाणीटंचाईचे संकट येऊ नये, अशी प्रार्थना करण्यात आली.
या कार्यक्रमाला पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार भीमराव तापकीर, स्थानिक नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटनेते सोपान उर्फ काका चव्हाण, श्री. सुभाष नाणेकर, नगरसेविका अनिता इंगळे, धनश्री कोल्हे, पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा प्रमुख नंदकिशोर जगताप, पाटबंधारे विभागाचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाणी ही निसर्गाची अमूल्य देणगी असल्याचे सांगण्यात आले. धरणे भरली असली तरी पाण्याचा वापर जपून आणि जबाबदारीने करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले. प्रत्येक नागरिकाने पाणी बचत आणि जलसंधारणाला प्राधान्य देत पाण्याचा अपव्यय टाळावा, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
पुणे शहर भविष्यातही जलसमृद्ध राहावे आणि नागरिकांना वर्षभर कोणत्याही अडचणीशिवाय पाणीपुरवठा व्हावा, हीच अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुणेकरांमध्ये समाधानाचे वातावरण असून, जलपूजनाच्या माध्यमातून जलस्रोतांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा यंदाही उत्साहात पार पडली.
माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला अनोखी मानवंदना
Newsworldmarathi Pune: माऊली माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि जय गणेश… गणपती बाप्पा मोरया अशा गणेशभक्तांनी केलेल्या जयघोषाने झालेल्या भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करीत अनोखी मानवंदना दिली. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. कर्नाटक बेळगावमधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचे आगमन पुण्यामध्ये झाले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, कार्यकतें यांसह श्रीमंत उर्जितसिंह शितोळे (सरकार), श्रीमंत महादजी राजे शितोळे (सरकार) तसेच पुणेकर मोठया संख्येने उपस्थित होते.
शितोळे सरकार म्हणाले, माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे. यंदा देखील गणेशाचे दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदी कडे प्रस्थान करतील. दरवर्षी सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करुन हे अश्व वारीला जातात. दरवर्षी अश्व गणरायासमोर सभामंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. आषाढी वारी ही विठ्ठल भक्तांची वारी आहे. त्यामुळे ज्यांना या वारीला येता येत नाही, ते या अश्वांचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षांपासून हे अश्व मंदिराच्या सभामंडपात येऊन गणरायाला मानवंदना देत आहेत. यंदा देखील या अश्वांनी मंदिरात येत गणरायाचे दर्शन घेतले.
कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ट्रस्टतर्फे वारी अंतर्गत मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी, भोजन सेवा हरित वारी, स्वच्छता अभियान, अनेक उपक्रम राबविले जातात. त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमाने होत असून ट्रस्ट नेहमीच वारक-यांच्या सेवेत नानाविध उपक्रम राबवित राहिल.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरती
Newsworldmarathi Pune: श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सोमवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलिस आयुक्त अमितेश गुप्ता यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी महापौरांनी दत्तगुरूंचे दर्शन घेत पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुणेकरांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या १२९ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते दत्त मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, “लहानपणापासून मी दत्त मंदिरात दर्शनासाठी येत आहे. आज दत्तगुरूंची आरती करण्याचा मान मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. महापौरपदाची मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझ्या हातून पुणेकरांच्या हिताचे निर्णय घडावेत, तसेच यंदा समाधानकारक पाऊस होऊन शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे तुडुंब भरावीत, अशी प्रार्थना मी दत्तगुरूंच्या चरणी केली आहे.”
या वेळी मंदिराचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, आर. एम. धारिवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन तसेच विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.
महापौरांच्या हस्ते झालेल्या महाआरतीनंतर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्तगुरूंचे दर्शन घेतले.
‘‘पुणेकरांच्या संरक्षणाचं कर्तव्य बजावत असतानाच श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला येण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती ती आज फळाला आली. त्यातही सपत्नीक आरती करण्याची संधी मिळणं ही आमच्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष मा. पुनीत बालन आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ या सर्वांचे मनापासून आभार!’’– अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे)
पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय! आज मध्यरात्रीपासून पाणी कपात रद्द; १२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा
Newsworldmarathi Pune: पुणेकरांसाठी आणि पुण्यात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे आळंदी येथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आणि वारकरी नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन दिवस आधी पुण्यात मुक्कामासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच शहरात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महापालिकेने आज रात्री १२ वाजेपासून ते येत्या १२ जुलैपर्यंत शहरातील पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या कालावधीत पुणेकरांना नियमित आणि अखंड पाणीपुरवठा केला जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या लाखो भाविकांच्या मुक्कामादरम्यान पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या निर्णयामुळे वारकऱ्यांसोबतच पुणेकरांनाही मोठा दिलासा मिळाला असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी कपातीपासून नागरिकांची तात्पुरती सुटका झाली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, नियमित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारही सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
फिनोलेक्सकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी ३ लाख बॅग, ५० हजार रेनकोट; सेवाभावी उपक्रमाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
Newsworldmarathi Pune: भारतातील पाईप्स आणि फिटिंग्ज क्षेत्रातील अग्रगण्य फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज तसेच त्यांच्या मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “भारतात पाईप्स म्हटले की फिनोलेक्स हे नाव सर्वप्रथम समोर येते. ‘फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावानी’ ही ओळ अनेक दशकांपासून सर्वांच्या परिचयाची आहे. गेल्या ४५ वर्षांत फिनोलेक्सने महाराष्ट्रासह देशाच्या विकासात मोठे योगदान दिले असून, उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वही प्रभावीपणे पार पाडले आहे.”
महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या आषाढी वारीमध्ये मुकुल माधव फाउंडेशन गेल्या ३० वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमामुळे लाखो वारकऱ्यांना थेट लाभ मिळत असून, वारी अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा वारकऱ्यांना तीन लाखांहून अधिक बॅग, ५० हजार रेनकोट तसेच ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आधाराच्या काठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन करण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब आहे.उद्योग आणि समाजसेवा यांचा समतोल साधत फिनोलेक्सने समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली असून, महाराष्ट्रातील अशा सेवाभावी उपक्रमांचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कर्करोग रूग्णांची सेवा करणाऱ्यांचा सन्मान -‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’
Newsworldmarathi Pune:‘कर्करोगाच्या रूग्णांना मानसिक आधार देणाऱ्या संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला हवी.’- पद्मश्री रमण गंगाखेडकर (वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट आणि डॉ. सी.जी. पंडित नॅशनल चेअर, ICMR). ‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ (RIRF) आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ (TSMH) यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (PIC) येथे ‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. गंगाखेडकर यांच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि लेखिका श्रीमती. रेणुका शहाणे तसेच लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कॅन्सर (कर्करोग) या शब्दाचे केअर (काळजी), कम्पॅशन (करुणा) आणि करेज (धैर्य) या त्रिसूत्रीत रूपांतर करणाऱ्या पडद्यामागील खऱ्या नायकांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला हा वार्षिक सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
या सोहळ्यात, रुबी अहलुवालिया व आदित्य पुरोहित या दोघांचा कॅन्सरशी यशस्वी झुंज देत, आपल्या आयुष्यातून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य करण्यासाठी तर, रिबेका डीसूझा, डॉ. संजय देशमुख, गॅलक्सी केअर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि इंडियन केअर सोसायटी या कॅन्सर क्षेत्रात सेवा देणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. याच बरोबर ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको-ऑन्कोलॉजी’ (Post Graduate Diploma in Psycho-Oncology)चा ३१ विद्यार्थांचा दीक्षांत समारंभदेखील संपन्न झाला. यात देशातल्या विविध राज्यातून आलेल्या तसेच परदेशातल्या विद्यार्थांचाही समावेश होता. या जागतिक दर्जाच्या CPD-प्रमाणित सायको-ऑंकोलोजी या कोर्सच्या दुसरा पदवीदान समारंभ होता. आतापर्यंत १२५हून अधिक विद्यार्थांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे.
कार्यकमात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीमती रेणुका शहाणे यांनी आपल्या घरात कॅन्सरचा शिरकाव झाल्यांनतरचे अनुभव सांगितले तसेच कर्करोगाची वेळेवर आणि नियमित शाररीक तपासणी करणे किती गरजेची आहे याचीही जाणीव करून दिली. तर, लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांनी कर्करोगाची वाढती संख्या पाहता, रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी सज्ज झालेल्या पदवीधरांचे कौतुक केले. तिन्ही मान्यवरांनी, कर्करोग आणि रजोनिवृत्ती या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ या संस्थेचे विशेष कौतुक केले.
याच कार्क्रमात, काही घोषणाही करण्यात आल्या. त्यातली एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेनोपॉज मॅनेजमेंट’ (Post Graduate Diploma in Menopause Management) या कोर्सची घोषणा. हा कोर्स रजोनिवृत्तीतून जाणाऱ्या अथवा त्या टप्प्यावर असलेल्या महिलांना सक्षमपणे आयुष्यातील ह्या टप्प्यातील आरोग्य समस्यांना सामोरे कसे जावे यासाठी मार्गदर्शन करणारा आरोग्य क्षेत्रातील तज्ञांसाठी तयार करण्यात आलेला आहे. दुसरी घोषणा ही, रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉजच्या) टप्प्यातून जात असलेल्या आणि त्याबद्दल माहिती मिळवून, आपला हा प्रवास सुखकर करण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी ‘सेल्फ-पेस्ड मेनोपॉज कोर्स’ (स्वतःच्या गतीने शिकता येणारा कोर्स)च्या शुभारंभाची होती.
‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ संस्थांचे संस्थापक डॉ.गिरीश लाड यांनीही आपले विचार मांडले. ‘स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी सुरू झालेला उप्रकम आता विस्तारला आहे. कर्करोग रुग्णांच्या आणि महिलांच्या मानसिक आरोग्यासाठीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमच्या कोर्सची किंवा संस्थेशी माहिती हवी असल्यास texasschoolmh.com ही आमची वेबसाईट बघू शकता. किंवा आमच्याबरोबर जोडण्याची इच्छा असल्यास संस्थेशी 9545300800 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा असंही ते म्हणाले.
कर्करोग रूग्णांची सेवा करणाऱ्यांचा सन्मान -‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’
Newsworldmarathi pune: ‘कर्करोगाच्या रूग्णांना मानसिक आधार देणाऱ्या संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला हवी.’- पद्मश्री रमण गंगाखेडकर (वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट आणि डॉ. सी.जी. पंडित नॅशनल चेअर, ICMR). ‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ (RIRF) आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ (TSMH) यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (PIC) येथे ‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. गंगाखेडकर यांच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि लेखिका श्रीमती. रेणुका शहाणे तसेच लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कॅन्सर (कर्करोग) या शब्दाचे केअर (काळजी), कम्पॅशन (करुणा) आणि करेज (धैर्य) या त्रिसूत्रीत रूपांतर करणाऱ्या पडद्यामागील खऱ्या नायकांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला हा वार्षिक सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. या सोहळ्यात, रुबी अहलुवालिया व आदित्य पुरोहित या दोघांचा कॅन्सरशी यशस्वी झुंज देत, आपल्या आयुष्यातून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य करण्यासाठी तर, रिबेका डीसूझा, डॉ. संजय देशमुख, गॅलक्सी केअर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि इंडियन केअर सोसायटी या कॅन्सर क्षेत्रात सेवा देणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. याच बरोबर ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको-ऑन्कोलॉजी’ (Post Graduate Diploma in Psycho-Oncology)चा ३१ विद्यार्थांचा दीक्षांत समारंभदेखील संपन्न झाला. यात देशातल्या विविध राज्यातून आलेल्या तसेच परदेशातल्या विद्यार्थांचाही समावेश होता. या जागतिक दर्जाच्या CPD-प्रमाणित सायको-ऑंकोलोजी या कोर्सच्या दुसरा पदवीदान समारंभ होता. आतापर्यंत १२५हून अधिक विद्यार्थांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे.
कार्यकमात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीमती रेणुका शहाणे यांनी आपल्या घरात कॅन्सरचा शिरकाव झाल्यांनतरचे अनुभव सांगितले तसेच कर्करोगाची वेळेवर आणि नियमित शाररीक तपासणी करणे किती गरजेची आहे याचीही जाणीव करून दिली. तर, लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांनी कर्करोगाची वाढती संख्या पाहता, रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी सज्ज झालेल्या पदवीधरांचे कौतुक केले. तिन्ही मान्यवरांनी, कर्करोग आणि रजोनिवृत्ती या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ या संस्थेचे विशेष कौतुक केले.
याच कार्क्रमात, काही घोषणाही करण्यात आल्या. त्यातली एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेनोपॉज मॅनेजमेंट’ (Post Graduate Diploma in Menopause Management) या कोर्सची घोषणा. हा कोर्स रजोनिवृत्तीतून जाणाऱ्या अथवा त्या टप्प्यावर असलेल्या महिलांना सक्षमपणे आयुष्यातील ह्या टप्प्यातील आरोग्य समस्यांना सामोरे कसे जावे यासाठी मार्गदर्शन करणारा आरोग्य क्षेत्रातील तज्ञांसाठी तयार करण्यात आलेला आहे. दुसरी घोषणा ही, रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉजच्या) टप्प्यातून जात असलेल्या आणि त्याबद्दल माहिती मिळवून, आपला हा प्रवास सुखकर करण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी ‘सेल्फ-पेस्ड मेनोपॉज कोर्स’ (स्वतःच्या गतीने शिकता येणारा कोर्स)च्या शुभारंभाची होती.
‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ संस्थांचे संस्थापक डॉ.गिरीश लाड यांनीही आपले विचार मांडले. ‘स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी सुरू झालेला उप्रकम आता विस्तारला आहे. कर्करोग रुग्णांच्या आणि महिलांच्या मानसिक आरोग्यासाठीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमच्या कोर्सची किंवा संस्थेशी माहिती हवी असल्यास texasschoolmh.com ही आमची वेबसाईट बघू शकता. किंवा आमच्याबरोबर जोडण्याची इच्छा असल्यास संस्थेशी 9545300800 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा असंही ते म्हणाले.
भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १,५०० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप
Newaworldmarathi Pune: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने क्रांतीसूर्य भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ दापोली, भीमाशंकर, सातारा, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना होणार आहे.
या कार्यक्रमात जागतिक विक्रमवीर आहान मोदी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सायली नंदकिशोर अगावणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. अवघ्या ५ वर्षे ८ महिन्यांच्या वयात आहान मोदी याने २ मिनिटे ४९ सेकंदांत १९७ राष्ट्रध्वजांची नावे अचूक ओळखून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच तो जगातील सर्व देश, त्यांच्या राजधान्या आणि नकाशावरील त्यांचे स्थान अचूक सांगू शकतो.
सायली अगावणे या कथक आणि वेस्टर्न नृत्यांगना असून डाऊन सिंड्रोम तसेच शारीरिक व मानसिक अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःच्या जिद्दीने विशेष मुलांसाठी प्रेरणादायी कार्य उभे केले आहे. त्या स्वतःसारख्या विशेष मुलांना नृत्य आणि योगाचे प्रशिक्षण देतात. ट्रस्टच्या वतीने आहान मोदी आणि सायली अगावणे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संजय घनाटे (उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, तेलंगणा), विजयकुमार सिंग (निवृत्त निबंधक, एनआयटी, कोलकाता), श्रीमती शिखा दरबारी (निवृत्त आयकर आयुक्त, नवी दिल्ली) आणि राम सरोदे (अध्यक्ष, युवा मोर्चा, भावसार समाज) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप आडकर, विश्वस्त मिलिंद डफळ तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कात्रज पंपिंग स्टेशन टँकर भरणा केंद्रावरून वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर; नगरसेवक व्यंकोजी खोपडेंचा महापालिकेला जाब
Newsworldmarathi Pune कात्रज पंपिंग स्टेशन चौकात प्रस्तावित नवीन टँकर भरणा केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीचा मुद्दा पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत चांगलाच गाजला. या संदर्भात नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत महापालिका प्रशासनाला थेट जाब विचारला.
व्यंकोजी खोपडे यांनी सांगितले की, संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत टँकर भरणा केंद्राच्या प्रस्तावित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक आणि परिसरातील रहिवाशांकडून या केंद्राला तीव्र विरोध असल्याचे निदर्शनास आले. टँकरच्या सततच्या ये-जा, वाढणारी वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने यावर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
यावर उत्तर देताना महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, टँकर भरणा केंद्र उभारण्यापूर्वी वाहतूक पोलिस आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली जाणार आहे. तसेच वाहतुकीवर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही, याची काळजी घेत कमी वर्दळीच्या रस्त्यालगतच हे टँकर भरणा केंद्र उभारले जाईल. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि वाहतूक सुरळीत राहील, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाकडून सभागृहात स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, नागरिकांच्या भावना आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी भूमिका नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी सभागृहात मांडली. या विषयावर महापालिकेने योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

