‘‘पुणेकरांच्या संरक्षणाचं कर्तव्य बजावत असतानाच श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला येण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती ती आज फळाला आली. त्यातही सपत्नीक आरती करण्याची संधी मिळणं ही आमच्यासाठी खरोखर भाग्याची गोष्ट आहे. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष मा. पुनीत बालन आणि संपूर्ण विश्वस्त मंडळ या सर्वांचे मनापासून आभार!’’– अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे)
LATEST ARTICLES
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरती
Newsworldmarathi Pune: श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात सोमवारी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि पोलिस आयुक्त अमितेश गुप्ता यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी महापौरांनी दत्तगुरूंचे दर्शन घेत पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुणेकरांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
श्रीमती कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या १२९ व्या वर्धापन दिनानिमित्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते दत्त मंदिरात आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाल्या, “लहानपणापासून मी दत्त मंदिरात दर्शनासाठी येत आहे. आज दत्तगुरूंची आरती करण्याचा मान मिळाल्याने मी स्वतःला भाग्यवान समजते. महापौरपदाची मोठी जबाबदारी स्वीकारल्यानंतर माझ्या हातून पुणेकरांच्या हिताचे निर्णय घडावेत, तसेच यंदा समाधानकारक पाऊस होऊन शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे तुडुंब भरावीत, अशी प्रार्थना मी दत्तगुरूंच्या चरणी केली आहे.”
या वेळी मंदिराचे अध्यक्ष पुनीत बालन, कार्यकारी विश्वस्त राजू बलकवडे, उपाध्यक्ष ॲड. विवेक भरगुडे व वर्षा थोरवे, खजिनदार सुरज थोरात, उत्सव प्रमुख नितीन पंडित, उप-उत्सव प्रमुख मनीषाताई खेडेकर, आर. एम. धारिवाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारिवाल-बालन तसेच विश्वस्त पराग काळकर आणि महेंद्रशेठ गाडवे उपस्थित होते.
महापौरांच्या हस्ते झालेल्या महाआरतीनंतर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्तगुरूंचे दर्शन घेतले.
पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय! आज मध्यरात्रीपासून पाणी कपात रद्द; १२ जुलैपर्यंत नियमित पाणीपुरवठा
Newsworldmarathi Pune: पुणेकरांसाठी आणि पुण्यात दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे आळंदी येथे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आणि वारकरी नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन दिवस आधी पुण्यात मुक्कामासाठी दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच शहरात पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी पुणे महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महापालिकेने आज रात्री १२ वाजेपासून ते येत्या १२ जुलैपर्यंत शहरातील पाणी कपात पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे या कालावधीत पुणेकरांना नियमित आणि अखंड पाणीपुरवठा केला जाणार आहे. वारकरी संप्रदायाच्या लाखो भाविकांच्या मुक्कामादरम्यान पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या निर्णयामुळे वारकऱ्यांसोबतच पुणेकरांनाही मोठा दिलासा मिळाला असून, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी कपातीपासून नागरिकांची तात्पुरती सुटका झाली आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, नियमित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील दैनंदिन व्यवहारही सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.
फिनोलेक्सकडून वारकऱ्यांच्या सेवेसाठी ३ लाख बॅग, ५० हजार रेनकोट; सेवाभावी उपक्रमाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
Newsworldmarathi Pune: भारतातील पाईप्स आणि फिटिंग्ज क्षेत्रातील अग्रगण्य फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्ज तसेच त्यांच्या मुकुल माधव फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सेवाभावी उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “भारतात पाईप्स म्हटले की फिनोलेक्स हे नाव सर्वप्रथम समोर येते. ‘फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावानी’ ही ओळ अनेक दशकांपासून सर्वांच्या परिचयाची आहे. गेल्या ४५ वर्षांत फिनोलेक्सने महाराष्ट्रासह देशाच्या विकासात मोठे योगदान दिले असून, उद्योग क्षेत्राबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वही प्रभावीपणे पार पाडले आहे.”
महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या आषाढी वारीमध्ये मुकुल माधव फाउंडेशन गेल्या ३० वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत आहे. या उपक्रमामुळे लाखो वारकऱ्यांना थेट लाभ मिळत असून, वारी अधिक सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदा वारकऱ्यांना तीन लाखांहून अधिक बॅग, ५० हजार रेनकोट तसेच ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी आधाराच्या काठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचे उद्घाटन करण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब आहे.उद्योग आणि समाजसेवा यांचा समतोल साधत फिनोलेक्सने समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली असून, महाराष्ट्रातील अशा सेवाभावी उपक्रमांचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कर्करोग रूग्णांची सेवा करणाऱ्यांचा सन्मान -‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’
Newsworldmarathi Pune:‘कर्करोगाच्या रूग्णांना मानसिक आधार देणाऱ्या संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला हवी.’- पद्मश्री रमण गंगाखेडकर (वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट आणि डॉ. सी.जी. पंडित नॅशनल चेअर, ICMR). ‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ (RIRF) आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ (TSMH) यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (PIC) येथे ‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
डॉ. गंगाखेडकर यांच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि लेखिका श्रीमती. रेणुका शहाणे तसेच लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कॅन्सर (कर्करोग) या शब्दाचे केअर (काळजी), कम्पॅशन (करुणा) आणि करेज (धैर्य) या त्रिसूत्रीत रूपांतर करणाऱ्या पडद्यामागील खऱ्या नायकांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला हा वार्षिक सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला.
या सोहळ्यात, रुबी अहलुवालिया व आदित्य पुरोहित या दोघांचा कॅन्सरशी यशस्वी झुंज देत, आपल्या आयुष्यातून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य करण्यासाठी तर, रिबेका डीसूझा, डॉ. संजय देशमुख, गॅलक्सी केअर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि इंडियन केअर सोसायटी या कॅन्सर क्षेत्रात सेवा देणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. याच बरोबर ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको-ऑन्कोलॉजी’ (Post Graduate Diploma in Psycho-Oncology)चा ३१ विद्यार्थांचा दीक्षांत समारंभदेखील संपन्न झाला. यात देशातल्या विविध राज्यातून आलेल्या तसेच परदेशातल्या विद्यार्थांचाही समावेश होता. या जागतिक दर्जाच्या CPD-प्रमाणित सायको-ऑंकोलोजी या कोर्सच्या दुसरा पदवीदान समारंभ होता. आतापर्यंत १२५हून अधिक विद्यार्थांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे.
कार्यकमात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीमती रेणुका शहाणे यांनी आपल्या घरात कॅन्सरचा शिरकाव झाल्यांनतरचे अनुभव सांगितले तसेच कर्करोगाची वेळेवर आणि नियमित शाररीक तपासणी करणे किती गरजेची आहे याचीही जाणीव करून दिली. तर, लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांनी कर्करोगाची वाढती संख्या पाहता, रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी सज्ज झालेल्या पदवीधरांचे कौतुक केले. तिन्ही मान्यवरांनी, कर्करोग आणि रजोनिवृत्ती या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ या संस्थेचे विशेष कौतुक केले.
याच कार्क्रमात, काही घोषणाही करण्यात आल्या. त्यातली एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेनोपॉज मॅनेजमेंट’ (Post Graduate Diploma in Menopause Management) या कोर्सची घोषणा. हा कोर्स रजोनिवृत्तीतून जाणाऱ्या अथवा त्या टप्प्यावर असलेल्या महिलांना सक्षमपणे आयुष्यातील ह्या टप्प्यातील आरोग्य समस्यांना सामोरे कसे जावे यासाठी मार्गदर्शन करणारा आरोग्य क्षेत्रातील तज्ञांसाठी तयार करण्यात आलेला आहे. दुसरी घोषणा ही, रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉजच्या) टप्प्यातून जात असलेल्या आणि त्याबद्दल माहिती मिळवून, आपला हा प्रवास सुखकर करण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी ‘सेल्फ-पेस्ड मेनोपॉज कोर्स’ (स्वतःच्या गतीने शिकता येणारा कोर्स)च्या शुभारंभाची होती.
‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ संस्थांचे संस्थापक डॉ.गिरीश लाड यांनीही आपले विचार मांडले. ‘स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी सुरू झालेला उप्रकम आता विस्तारला आहे. कर्करोग रुग्णांच्या आणि महिलांच्या मानसिक आरोग्यासाठीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमच्या कोर्सची किंवा संस्थेशी माहिती हवी असल्यास texasschoolmh.com ही आमची वेबसाईट बघू शकता. किंवा आमच्याबरोबर जोडण्याची इच्छा असल्यास संस्थेशी 9545300800 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा असंही ते म्हणाले.
कर्करोग रूग्णांची सेवा करणाऱ्यांचा सन्मान -‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’
Newsworldmarathi pune: ‘कर्करोगाच्या रूग्णांना मानसिक आधार देणाऱ्या संस्थांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढायला हवी.’- पद्मश्री रमण गंगाखेडकर (वरिष्ठ एपिडेमियोलॉजिस्ट आणि डॉ. सी.जी. पंडित नॅशनल चेअर, ICMR). ‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ (RIRF) आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ (TSMH) यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ (PIC) येथे ‘सी पॉझिटिव्ह अॅवॉर्ड्स २०२६’ या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. गंगाखेडकर यांच्याबरोबर प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि लेखिका श्रीमती. रेणुका शहाणे तसेच लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांचीही विशेष उपस्थिती लाभली.
कॅन्सर (कर्करोग) या शब्दाचे केअर (काळजी), कम्पॅशन (करुणा) आणि करेज (धैर्य) या त्रिसूत्रीत रूपांतर करणाऱ्या पडद्यामागील खऱ्या नायकांचा गौरव करण्यासाठी आयोजित केलेला हा वार्षिक सोहळा अत्यंत दिमाखात पार पडला. या सोहळ्यात, रुबी अहलुवालिया व आदित्य पुरोहित या दोघांचा कॅन्सरशी यशस्वी झुंज देत, आपल्या आयुष्यातून इतरांना प्रेरणा देण्याचे कार्य करण्यासाठी तर, रिबेका डीसूझा, डॉ. संजय देशमुख, गॅलक्सी केअर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटल आणि इंडियन केअर सोसायटी या कॅन्सर क्षेत्रात सेवा देणाऱ्या संस्थांचा गौरव करण्यात आला. याच बरोबर ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन सायको-ऑन्कोलॉजी’ (Post Graduate Diploma in Psycho-Oncology)चा ३१ विद्यार्थांचा दीक्षांत समारंभदेखील संपन्न झाला. यात देशातल्या विविध राज्यातून आलेल्या तसेच परदेशातल्या विद्यार्थांचाही समावेश होता. या जागतिक दर्जाच्या CPD-प्रमाणित सायको-ऑंकोलोजी या कोर्सच्या दुसरा पदवीदान समारंभ होता. आतापर्यंत १२५हून अधिक विद्यार्थांनी या कोर्सचा लाभ घेतला आहे.
कार्यकमात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात श्रीमती रेणुका शहाणे यांनी आपल्या घरात कॅन्सरचा शिरकाव झाल्यांनतरचे अनुभव सांगितले तसेच कर्करोगाची वेळेवर आणि नियमित शाररीक तपासणी करणे किती गरजेची आहे याचीही जाणीव करून दिली. तर, लेफ्टनंट जनरल अभय परनाईक यांनी कर्करोगाची वाढती संख्या पाहता, रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी सज्ज झालेल्या पदवीधरांचे कौतुक केले. तिन्ही मान्यवरांनी, कर्करोग आणि रजोनिवृत्ती या दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ या संस्थेचे विशेष कौतुक केले.
याच कार्क्रमात, काही घोषणाही करण्यात आल्या. त्यातली एक महत्त्वाची घोषणा म्हणजे ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेनोपॉज मॅनेजमेंट’ (Post Graduate Diploma in Menopause Management) या कोर्सची घोषणा. हा कोर्स रजोनिवृत्तीतून जाणाऱ्या अथवा त्या टप्प्यावर असलेल्या महिलांना सक्षमपणे आयुष्यातील ह्या टप्प्यातील आरोग्य समस्यांना सामोरे कसे जावे यासाठी मार्गदर्शन करणारा आरोग्य क्षेत्रातील तज्ञांसाठी तयार करण्यात आलेला आहे. दुसरी घोषणा ही, रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉजच्या) टप्प्यातून जात असलेल्या आणि त्याबद्दल माहिती मिळवून, आपला हा प्रवास सुखकर करण्यासाठी उत्सुक असलेल्या महिलांसाठी ‘सेल्फ-पेस्ड मेनोपॉज कोर्स’ (स्वतःच्या गतीने शिकता येणारा कोर्स)च्या शुभारंभाची होती.
‘रायझिंग इंडिया रिसर्च फाउंडेशन’ आणि ‘टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ’ संस्थांचे संस्थापक डॉ.गिरीश लाड यांनीही आपले विचार मांडले. ‘स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यासाठी सुरू झालेला उप्रकम आता विस्तारला आहे. कर्करोग रुग्णांच्या आणि महिलांच्या मानसिक आरोग्यासाठीचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आमच्या कोर्सची किंवा संस्थेशी माहिती हवी असल्यास texasschoolmh.com ही आमची वेबसाईट बघू शकता. किंवा आमच्याबरोबर जोडण्याची इच्छा असल्यास संस्थेशी 9545300800 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा असंही ते म्हणाले.
भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १,५०० विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप
Newaworldmarathi Pune: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने क्रांतीसूर्य भाऊसाहेब रंगारी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ दापोली, भीमाशंकर, सातारा, पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील सुमारे १,५०० विद्यार्थ्यांना होणार आहे.
या कार्यक्रमात जागतिक विक्रमवीर आहान मोदी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व सायली नंदकिशोर अगावणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. अवघ्या ५ वर्षे ८ महिन्यांच्या वयात आहान मोदी याने २ मिनिटे ४९ सेकंदांत १९७ राष्ट्रध्वजांची नावे अचूक ओळखून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच तो जगातील सर्व देश, त्यांच्या राजधान्या आणि नकाशावरील त्यांचे स्थान अचूक सांगू शकतो.
सायली अगावणे या कथक आणि वेस्टर्न नृत्यांगना असून डाऊन सिंड्रोम तसेच शारीरिक व मानसिक अडचणींवर मात करत त्यांनी स्वतःच्या जिद्दीने विशेष मुलांसाठी प्रेरणादायी कार्य उभे केले आहे. त्या स्वतःसारख्या विशेष मुलांना नृत्य आणि योगाचे प्रशिक्षण देतात. ट्रस्टच्या वतीने आहान मोदी आणि सायली अगावणे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संजय घनाटे (उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा, तेलंगणा), विजयकुमार सिंग (निवृत्त निबंधक, एनआयटी, कोलकाता), श्रीमती शिखा दरबारी (निवृत्त आयकर आयुक्त, नवी दिल्ली) आणि राम सरोदे (अध्यक्ष, युवा मोर्चा, भावसार समाज) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, सचिव दिलीप आडकर, विश्वस्त मिलिंद डफळ तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कात्रज पंपिंग स्टेशन टँकर भरणा केंद्रावरून वाहतूक कोंडीचा मुद्दा ऐरणीवर; नगरसेवक व्यंकोजी खोपडेंचा महापालिकेला जाब
Newsworldmarathi Pune कात्रज पंपिंग स्टेशन चौकात प्रस्तावित नवीन टँकर भरणा केंद्रामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीचा मुद्दा पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत चांगलाच गाजला. या संदर्भात नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करत महापालिका प्रशासनाला थेट जाब विचारला.
व्यंकोजी खोपडे यांनी सांगितले की, संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत टँकर भरणा केंद्राच्या प्रस्तावित ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान स्थानिक नागरिक आणि परिसरातील रहिवाशांकडून या केंद्राला तीव्र विरोध असल्याचे निदर्शनास आले. टँकरच्या सततच्या ये-जा, वाढणारी वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या कोंडीचा नागरिकांना मोठा त्रास होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने यावर कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा सवाल त्यांनी प्रशासनाला केला.
यावर उत्तर देताना महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की, टँकर भरणा केंद्र उभारण्यापूर्वी वाहतूक पोलिस आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसमवेत संयुक्त पाहणी केली जाणार आहे. तसेच वाहतुकीवर कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही, याची काळजी घेत कमी वर्दळीच्या रस्त्यालगतच हे टँकर भरणा केंद्र उभारले जाईल. नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि वाहतूक सुरळीत राहील, यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही प्रशासनाकडून सभागृहात स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान, नागरिकांच्या भावना आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी भूमिका नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी सभागृहात मांडली. या विषयावर महापालिकेने योग्य नियोजन करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
काळेपडळमधील दूषित पाणीप्रश्नी नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल आक्रमक; महापालिका सभागृहात तातडीच्या कारवाईची मागणी
Newsworldmarathi Pune: पुणे शहरातील काळेपडळ परिसरात ड्रेनेज लाईनमधील सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याच्या गंभीर समस्येचा मुद्दा नगरसेवक निवृत्ती आण्णा बांदल यांनी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. या समस्येमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे सभागृहात निदर्शनास आणून देण्यात आले.
या संदर्भात नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत संबंधित विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी केली. दूषित पाणीपुरवठ्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असून नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काळेपडळ परिसरातील नागरिकांकडून सातत्याने दूषित पाण्याबाबत तक्रारी येत असून, ड्रेनेज आणि जलवाहिन्यांमधील बिघाडामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून दोषी यंत्रणा दुरुस्त करावी तसेच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली.
सभागृहात हा विषय मांडताना नगरसेवक निवृत्ती (आण्णा) बांदल यांनी नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांच्या भावना तीव्र होण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणाकडे आता महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि काळेपडळ परिसरातील दूषित पाण्याचा प्रश्न किती लवकर मार्गी लागतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पुणे विद्यापीठातील गैरकारभारावर वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेचा हल्लाबोल; ७ दिवसांत उत्तर न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
Newsworldmarathi Pune सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध प्रशासकीय त्रुटी, पारदर्शकतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर प्रश्नांवर वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंना निवेदन देत ७ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरणाची मागणी केली आहे. अन्यथा विद्यापीठ परिसरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेने मेसमधील अन्नाची गुणवत्ता व स्वच्छता, बी.कॉम. अंतिम वर्षाच्या निकालातील कथित त्रुटी, लेखापरीक्षणात चर्चेत आलेल्या ₹३०० ते ₹३५० कोटींच्या व्यवहारांची माहिती, तसेच पावसामुळे उत्तरपत्रिका भिजल्याच्या घटनेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित या सर्व प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, प्रत्येक मुद्द्यावर तथ्याधारित लेखी उत्तर देणे, आवश्यक ठिकाणी स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती नेमणे, चौकशी अहवाल सार्वजनिक करणे आणि मेसमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट कार्यपद्धती जाहीर करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विद्यार्थी, पालक आणि नागरिकांकडून प्रशासनातील विविध बाबींवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत असल्याने विद्यापीठाने पारदर्शक भूमिका घ्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. ७ दिवसांच्या आत समाधानकारक उत्तर आणि आवश्यक कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हितासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्यास विद्यापीठ प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा वंदे मातरम् विद्यार्थी संघटनेने दिला आहे.
प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करा; प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Newsworldmarathi Pune: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २५ मधील विविध भागांत पावसाळी जलवाहिन्यांच्या स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढावा दौरा आयोजित करण्यात आला होता. मुसळधार पावसात या प्रभागातील अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याने, तातडीने स्वच्छता व सफाईची कामे पूर्ण करण्याच्या सूचना विश्रामबाग वाडा प्रभाग समितीचे अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
या प्रभागातील विविध समस्यांच्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त मा. माधव जगताप यांच्यासह विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या पाहणी दौऱ्यादरम्यान कचऱ्याचे क्रोनिक स्पॉट पूर्णपणे बंद करणे, ड्रेनेज सुधारणा, अंतर्गत रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे, नदीपात्र सीमाभिंत बांधणे, रस्त्यांचे समपातळीकरण करणे, बंद पथदिवे दुरुस्त करणे आणि ठिकठिकाणी साचलेला राडारोडा तातडीने उचलणे, याबाबत प्रशासनाला सद्यस्थितीची माहिती प्रभागातील लोकप्रतिनिधींनी दिली. यावेळी नगरसेविका स्वरदा बापट, नगरसेवक कुणाल टिळक आणि नगरसेविका स्वप्नाली पंडित या देखील उपस्थित होत्या. ‘कसब्याचे आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या सूचनेनुसार सर्व नगरसेवकांनी नागरिकांच्या दारी जात समस्या जाणून घेतल्या. पावसाळा तोंडावर असल्याने या सर्व समस्यांवर ‘टीम वर्क’ म्हणून काम करून सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी ‘कालबद्ध’ पद्धतीने तातडीने कार्यवाही करावी’, अशा स्पष्ट सूचना यावेळी प्रशासनाला देण्यात आल्याचे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसादरम्यान या भागातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, नारायण पेठ आणि शुक्रवार पेठ येथील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला होता. तसेच दोन दिवस या भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित राहिला होता. या पार्श्वभूमीवर भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने व्हाव्यात, या उद्देशाने या विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या महत्त्वाच्या सूचना आणि मागण्याही अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.

