Newaworldmarathi Pune : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र...
Newaworldmarathi Pune : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र...
Newaworldmarathi Pune : डिजिटल युगात खरेदीच्या सवयी झपाट्याने बदलत असताना ‘Sugra.co.in’ या प्लॅटफॉर्मने ग्राहकांसाठी आधुनिक आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या स्टार्टअपमागे...
Newaworldmarathi Pune : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र...
Newaworldmarathi Pune : डिजिटल युगात खरेदीच्या सवयी झपाट्याने बदलत असताना ‘Sugra.co.in’ या प्लॅटफॉर्मने ग्राहकांसाठी आधुनिक आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या स्टार्टअपमागे...
Newaworldmarathi Pune : पूना गुजराती केळवणी मंडळाच्या आर.सी.एम. दारूवाला स्कूलच्या शताब्दी वर्षानिमित्त १९७३ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. तब्बल ५३ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत भावनिक क्षण अनुभवले.
कोंढवा येथील जयराज क्लबमध्ये रविवारी (दि. १९) आयोजित या कार्यक्रमात सुमारे ४० माजी विद्यार्थी सपत्नीक सहभागी झाले होते. शाळेतील खोड्या, एकत्रित अभ्यास, शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा, शिक्षा आणि स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी पुन्हा एकदा बालपण अनुभवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गेल्या दशकात दिवंगत झालेल्या सहाध्यायांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर जयराज क्लबची पाहणी करण्यात आली. सर्वांनी एकत्रित समूह छायाचित्र काढून या अविस्मरणीय भेटीची नोंद केली. पुढे संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या बॅचमधील काही विद्यार्थी मुंबई, राजकोट (गुजरात), कॅनडा आणि अमेरिका येथे स्थायिक असून त्यांनी शुभेच्छा संदेश पाठवले. ते संदेश कार्यक्रमात वाचून दाखवण्यात आले. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील अनुभव आणि भावना व्यक्त करत मैत्रीचे बंध अधिक दृढ केले.
या प्रसंगी मंडळाचे चेअरमन डॉ. राजेश शहा म्हणाले, “ज्या शाळेतून मी १९७३ साली एसएससी उत्तीर्ण झालो, त्याच संस्थेच्या चेअरमनपदी २०२२ मध्ये काम करण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.” त्यांनी जयराज क्लबच्या उभारणीत माजी विद्यार्थ्यांचे योगदानही अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच भविष्यात अशाच स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उपस्थित महिलांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचेही नियोजन केले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन डॉ. राजेश शहा, अतुल शहा, वीरेंद्र शहा, रश्मी गांधी, रणजीत पोरवाल, प्रकाश शहा आणि मदन शहा यांनी केले.
Newaworldmarathi Pune : डिजिटल युगात खरेदीच्या सवयी झपाट्याने बदलत असताना ‘Sugra.co.in’ या प्लॅटफॉर्मने ग्राहकांसाठी आधुनिक आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या स्टार्टअपमागे उभे असलेले युवा उद्योजक आशय खाडे यांनी पारंपरिक बाजारपेठेच्या चौकटीबाहेर विचार करत डिजिटल क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Oplus_16908288
आशय खाडे यांनी सुरुवातीला स्थानिक विक्रेत्यांना ऑनलाइन व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘Sugra.co.in’ची संकल्पना मांडली. ग्रामीण आणि निमशहरी भागातील लहान व्यावसायिकांना मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांशी स्पर्धा करता यावी, यासाठी त्यांनी हा प्लॅटफॉर्म उभा केला. सुरुवातीच्या काळात मर्यादित साधने आणि तांत्रिक अडचणींचा सामना करत त्यांनी व्यवसाय हळूहळू वाढवला.
‘Sugra.co.in’चे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांसाठी सोपा वापर, सुरक्षित पेमेंट प्रणाली आणि जलद डिलिव्हरी. यामुळे घरबसल्या आवश्यक वस्तू मिळवण्याची सुविधा ग्राहकांना मिळाली. विविध श्रेणीतील उत्पादने आणि सणासुदीच्या ऑफर्समुळे या संकेतस्थळाने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
विशेष म्हणजे, ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेला चालना देत स्थानिक उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे काम या प्लॅटफॉर्मने केले आहे. त्यामुळे अनेक छोट्या विक्रेत्यांना नवसंजीवनी मिळाली असून त्यांच्या व्यवसायात वाढ झाली आहे.
दरम्यान, वाढत्या स्पर्धेमध्ये गुणवत्ता टिकवणे, वेळेवर सेवा देणे आणि ग्राहकांचा विश्वास जपणे ही आव्हाने कायम आहेत. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन यामुळे ‘Sugra.co.in’ भविष्यात ई-कॉमर्स क्षेत्रात भक्कम स्थान निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
आशय खाडे यांची ही वाटचाल नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, कल्पकता आणि चिकाटीच्या जोरावर डिजिटल क्षेत्रात यश मिळवता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.
Newaworldmarathi Pune: महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या १०८ रुग्णवाहिका सेवेने राज्यातील तब्बल ५ लाख ४६ हजार १० अपघातग्रस्तांना वेळेवर मदत करून मोठे यश संपादन केले आहे. अत्यंत तातडीच्या परिस्थितीत घटनास्थळी पोहोचून रुग्णांना आवश्यक उपचार देत सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्याचे काम या सेवेने प्रभावीपणे पार पाडले आहे.
राज्यात १०८ रुग्णवाहिका सेवा भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) द्वारे संचालित केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने ही सेवा कार्यरत असून, नागरिकांना तत्काळ व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय मदत देण्यावर भर दिला जात आहे.
विशेष म्हणजे राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्येही या सेवेचा मोठा लाभ झाला आहे. नंदुरबार, गडचिरोली, धुळे, पालघर, नाशिक, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये एकूण १,२१,६८५ अपघातग्रस्तांना १०८ रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.
याशिवाय, राज्यातील महत्त्वाच्या समृद्धी महामार्ग (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग) वरही १०८ सेवेची तत्परता दिसून आली आहे. या महामार्गावर २४ तास कार्यरत असलेल्या २१ आपत्कालीन पथकांद्वारे आतापर्यंत ५८९ अपघातग्रस्तांना तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्यात आली आहे.
बीव्हीजीने देशात सुविधा व्यवस्थापन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले असून, त्यामागे संस्थेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले आहे. १०८ रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रासोबतच जम्मू-काश्मीरमध्येही यशस्वीपणे चालवली जात आहे.
बीव्हीजीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले की, “महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने आमच्यावर सोपवलेली जबाबदारी आम्ही यशस्वीपणे पार पाडत आहोत. समाजातील प्रत्येक नागरिकाला तातडीची व गुणवत्तापूर्ण सेवा देणे हे आमचे ध्येय आहे.”
ते पुढे म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान १०८ रुग्णवाहिका सेवेतील कर्मचाऱ्यांनी भारतीय सैन्यदलासोबत समन्वय साधून उल्लेखनीय कार्य केले. या शौर्यपूर्ण सेवेच्या गौरवार्थ लवकरच या ‘वीर योद्ध्यांचा’ सन्मान करण्यात येणार आहे.
एकूणच, १०८ रुग्णवाहिका सेवा ही राज्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा मजबूत आधारस्तंभ ठरत असून, शहरी तसेच दुर्गम आणि आदिवासी भागांमध्येही जीवनरक्षक ठरत आहे.
Newaworldmarathi Pune: आपण सुरक्षित आहोत ते केवळ भारतीय जवानांमुळे. ते तिथे आहेत म्हणून आपण आनंदी जीवन जगू शकतो. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून थांबणे पुरेसे नाही. तर आपापसातील मन आणि मतभिन्नता थांबवली पाहिजे. एकमेकांना समजून घेतलं पाहिजे यासाठी माणसं जोडा,देश आपोआप जोडला जाईल असे प्रतिपादन प्रसिद्ध बालसाहित्यिक मा एकनाथ आव्हाड यांनी विविध उदाहरणं व कथेच्या माध्यमातून केले.
आधार सोशल ट्रस्ट पुणे आयोजित मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रिटींग कार्ड स्पर्धा बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.
गेली आकरा वर्षे आधार सोशल ट्रस्ट प्रत्यक्ष सीमेवर जाऊन जवानांसोबत दिवाळी साजरी करते.फराळासोबत महाराष्ट्रातील विविध शाळांनी पाठवलेली आकर्षक ग्रिटींग कार्ड सैनिकांना दिले जातात. ते वाचताना त्यांच्या डोळ्यातील आसवं सर्व काही सांगून जातात.
देशाच्या दहा सीमांवर हा उपक्रम आधार सोशल ट्रस्ट राबवत आहे अशी माहिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संतोष चाकणकर यांनी दिली. अतीशय प्रतिकूल परिस्थितीत सैनिक सीमेवर तैनात असतात. आम्ही तुमच्या सोबत आहोत ही भावना त्यांच्या पर्यत पोहचवणे गरजेचे असल्याचे विचार चाकणकर यांनी मांडले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बि एस एफ असिस्टंट कमांडंट प्रतिक वशिष्ठ, राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर, नगरसेविका जयश्रीताई भूमकर, नगरसेवक सचिन मोरे, स्विकृत नगरसेवक निलेश कोंढाळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर चांदगुडे साहेब,नारायण पाटील,शीतल चाकणकर, स्पर्धाप्रमुख सोपान बंदावणे उपस्थित होते.
यावर्षी महाराष्ट्र, बेळगाव व गोवा मिळून सतरा हजार ग्रिटींग प्राप्त झाले.ते सर्व ग्रिटींग सीमेवर प्रत्यक्ष देण्यात आल्याची माहिती स्पर्धा प्रमुख सोपान बंदावणे यांनी दिली.
यावेळी साईराज वाल्मिकी,दुर्गा पवार, संपदा दुधाट यांनी भावस्पर्शी भाषणे केली. यावेळी महाराष्ट्रातील १६५ शाळांतील मुख्याध्यापक शिक्षकांना तसेच १७५ विद्यार्थ्यांना आधार सोशल ट्रस्ट मार्फत सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष चाकणकर यांनी, आभार दत्तात्रय पाटील तर सूत्रसंचालन संदीप काकडे यांनी केले.
Newaworldmarathi Pune : भारतीय जनता पार्टीचे प्रभाग २५ मधील नगरसेवक मा. राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांची आज विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर पदभार स्वीकारतानाच बाप्पू मानकर यांनी अध्यक्षपदासाठी मिळणारी शासकीय गाडी नाकारून, त्यातून वाचणारा खर्च गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
आज पुणे महानगरपालिकेच्या १५ प्रभाग समित्यांच्या अध्यक्ष पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी विश्रामबाग वाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडलेल्या निवडणुकीत, प्रभाग २५ शनिवार पेठ महात्मा फुले मंडई येथील नगरसेवक राघवेंद्र बाप्पू मानकर यांची बिनविरोध झाली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळातील काम हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून करणार असल्याचे सांगितले.
गाडीचा मोह टाळला; सेवेला प्राधान्य!
अध्यक्षपदी निवड होताच बाप्पू मानकर यांनी एक नवा आदर्श पायंडा घालून दिला. महापालिकेकडून प्रभाग समिती अध्यक्षांना मिळणारी शासकीय चारचाकी गाडी त्यांनी नम्रपणे नाकारली. या वाहनावर होणारा वार्षिक खर्च हा पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत ‘गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी’ वर्ग करावा, अशी लेखी विनंती त्यांनी प्रशासनाला केली. “नागरिकांच्या कररूपी पैशातून मिळणाऱ्या अवास्तव सुविधा न घेता, केवळ ‘सेवक’ म्हणून काम करणे हेच माझे ध्येय आहे,” अशी भावना बाप्पू मानकर यांनी यावेळी व्यक्त केली.
Newaworldmarathi Pune: पुण्यातील सुखसागरनगर परिसरात धार्मिक वातावरण निर्माण करणारा संत आशीर्वचन व भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ब्रह्मकालीन परम पूज्य संत महंत श्री अभयरामजी महाराज यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम होणार असून, रामस्नेही संप्रदायाचे खेडापा पीठाचार्य श्री 1008 श्री पुरुषोत्तमदासजी महाराज तसेच परम पूज्य संत महंत डॉ. श्री रामप्रसादजी महाराज (श्री बडा रामद्वारा, सुरसागर, जोधपूर) यांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा पार पडणार आहे.
श्रीमती मेनाबाई धनराजजी राठी यांच्या पुढाकारातून आणि चुन्नीलाल राठी, मगराज राठी, राजेश राठी, रविंद्र राठी, जितेंद्र राठी, महेश राठी, जुगल राठी व राठी परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नामस्मरण, सत्संग, संत महापुरुषांचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा कार्यक्रम गुरुवार, दि. 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत “धनराज निवास”, हेमा मंगल कार्यालय, सुखसागरनगर, पुणे येथे होणार आहे.
Newaworldmarathi Pune : शहरात फॅशन आणि ग्लॅमरचा जल्लोष अनुभवण्यासाठी “Shining Star” हा भव्य फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स अशा विविध गटांसाठी हा स्पर्धात्मक कार्यक्रम खुला असून सहभागींसाठी मोठ्या संधींचे दार उघडणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना सोन्याची नथ, रोख बक्षिसे, क्राउन तसेच टॉप १० विजेत्यांना सिल्व्हर कॉइन देण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागींसाठी सेलिब्रिटी, रील स्टार्स, व्यावसायिक व्यक्तिमत्त्वे आणि दिग्दर्शकांशी भेटण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच जाहिराती, चित्रपट, फोटोशूट, गाणी आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची संधीही मिळू शकते.
हा भव्य कार्यक्रम अण्णाभाऊ साठे ऑडिटोरियम येथे २४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत होणार आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांकडून संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आला आहे.
“Shining Star” फॅशन शोचे आयोजन नेक्स्टस प्रॉडक्शन आणि चंदुकाका सराफ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या भव्य कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर “Newsworld मराठी” असून, फॅशन आणि ग्लॅमर क्षेत्रात संधी शोधणाऱ्यांसाठी हा एक मोठा मंच ठरणार आहे.
Newsworldmarathi Pune: खरसुंडी (ता. आटपाडी) येथे सिद्धनाथ देवाच्या चैत्री यात्रेला यंदा प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. तब्बल ४० अंशांपर्यंत पोहोचलेल्या तापमानातही भाविकांनी कडाक्याच्या उन्हाची तमा न बाळगता “सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं”चा जयघोष करत सासनकाठी व पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
चैत्र शुद्ध अष्टमीपासून यात्रेची सुरुवात झाली. अष्टमीच्या सायंकाळी श्री जोगेश्वरी मंदिर परिसरात सिद्धनाथ व जोगेश्वरी देवीचा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त पारंपरिक मंगलकार्य व धार्मिक विधी मोठ्या भक्तिभावात पार पडले. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी यात्रेत हजेरी लावली.
सोमवारपासूनच भाविकांचे आगमन सुरू झाले होते. मंगळवारी पहाटेपासून मंदिर परिसरात मोठी गर्दी उसळली. विविध गावांतील मानाच्या सासनकाठ्या मध्यरात्रीपासूनच मंदिरात दाखल झाल्या. २५ ते १०० फूट उंच सासनकाठ्या रंगीबेरंगी पताकांनी सजवून वाजत-गाजत आणण्यात आल्या. गुलाल व खोबऱ्यांची उधळण करत भाविकांनी भक्तीचा जल्लोष केला.
दुपारी सिद्धनाथाची पालखी जोगेश्वरी देवीच्या भेटीसाठी निघाली. पालखी मार्गावर सासनकाठ्यांची मोठी झुंबड उडाली. लाखो भाविकांनी पालखी दर्शनासाठी गर्दी केली. पालखी मंदिरातून बाहेर पडताच जयघोष व गुलाल उधळणीने परिसर दुमदुमला.
जोगेश्वरी मंदिरात पालखी पोहोचताच सासनकाठ्यांनी पालखीस टेकून मानवंदना दिली. तीव्र उष्णतेमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागला, मात्र भक्तीरसात तल्लीन झालेल्या भाविकांनी सर्व कष्ट विसरून यात्रेचा आनंद लुटला.
Newaworldmarathi Pune: शहरातील चर्चेत असलेल्या बुधवार पेठेतील लॉज प्रकरणात आतापर्यंतच्या तपासात एकच आरोपी असल्याचे स्पष्ट झाले असून इतर कोणाचाही सहभाग आढळलेला नाही, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. संबंधित आरोपीने लॉजमध्ये जाऊन आपत्तीजनक कृत्य केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपीला लॉजमधील कर्मचाऱ्यांनी पकडले असता त्याने “स्टिंग ऑपरेशनसाठी आलो होतो आणि सोबत इतर पत्रकार होते” असा दावा केला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या सीसीटीव्ही तपासणी आणि तांत्रिक विश्लेषणात तो व्यक्ती एकटाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनेपूर्वी दोन तासांचा परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला असून त्यात अन्य कोणीही सहभागी असल्याचे आढळले नाही.
दरम्यान, या प्रकरणात कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी फोन आले नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर फिरणाऱ्या “अनेक लोक उपस्थित होते, काहींना मारहाण झाली, काही जण पळून गेले” अशा चर्चांनाही त्यांनी फेटाळले. आरोपीला पकडताना काहींनी त्याला मारहाण केल्याचे मात्र त्यांनी मान्य केले.
रूपाली पाटील यांनी दिलेल्या अर्जात काही पत्रकारांवर सहभाग असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र त्या आरोपांना पुष्टी देणारे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तरीही या सर्व मुद्द्यांची चौकशी सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
सदर लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालतो का, याबाबतही पोलीस पडताळणी करत असून आतापर्यंत असे कोणतेही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तपास पुढे सुरू असून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Newsworldmarathi pune: मार्च अखेर आणि एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका राज्यातील तब्बल २९ जिल्ह्यांना बसला असून सुमारे २ लाख ४ हजार ८३५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. अंदाजे ५ लाख १२ हजार एकर शेतीवर परिणाम झाला असून जवळपास ४ लाख शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी निवेदन सादर करून पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि मदत वितरणाची प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आणि त्वरीत मदत जमा करण्यावर भर देण्यात आला आहे.
दरम्यान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून पंचनामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली. बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.
या अवकाळी पावसामुळे काढणीस आलेल्या गहू, मका, हरभरा आणि ज्वारी यांसारख्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय आंबा, द्राक्षे, केळी, संत्रा, डाळिंब, टरबूज आणि उन्हाळी कांदा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक असल्याचे समोर आले आहे.
“या आपत्तीत काढणीस आलेल्या गहू, मका, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासोबतच आंबा, द्राक्षे, केळी, संत्रा, डाळिंब, टरबूज आणि उन्हाळी कांदा या बागायती पिकांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहमदनगर आणि धुळे जिल्ह्यांमध्ये नुकसानीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देणे आवश्यक आहे.”