पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रूपयांची देणगी सुपूर्त
Newsworldmarathi Pune: पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र उत्सव मंडळ आणि ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने सगल दुसर्या वर्षी पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.
पुनित बालन ग्रुपचे संचालक आणि ‘फ्रेंडशिप करंडक’ स्पर्धेचे आयोजक श्री. पुनितदादा बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन आणि धारीवाल फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती शोभाताई धारीवाल यांच्या हस्ते ५ लाख रूपयांचा धनादेश पुणे शहर पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांना देण्यात आला. यावेळी पुणे शहर पोलिस दलाचे डीसीपी मिलिंद मोहीते, डीसीपी हिम्मत जाधव, सिनेचित्रपट अभिनेता आकार ठोसर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलिस दलाकडे असते. याबरोबरच पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरोत्सव निर्विघनपेण पार पडावेत, यासाठीहीसुद्धा पोलिस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस चोवीस तास आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व सार्वजनिक उत्सवाचा आनंद घेता येत असतो. समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलिसांच्या कुटूंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्त केला आहे.
पुनित बालन ग्रुप तर्फे नुकतेच पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक यांंच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे शहर पोलिस आणि पुनित बालन ग्रुप यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुनित बालन ग्रुप संघाने पुने शहर पोलिस संघाचा ५५ धावांनी सहज पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १० षटकामध्ये १२३ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये पुनित बालन यांनी नाबाद २६ धावांची खेळी केली. याशिवाय राहूल साठे (३२ धावा), ऋतुराज वीरकर (२७ धावा) आणि आतिश कुंभार (नाबाद २१ धावा) यांनी संघाच्या डावाला आकार दिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना पुणे शहर पोलिस संघाचा डाव ६८ धावांवर मर्यादित राहीला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः
पुनित बालन ग्रुपः १० षटकात ४ गडी बाद १२३ धावा (पुनित बालन नाबाद २६, राहूल साठे ३२, ऋतुराज वीरकर २७, आतिश कुंभार नाबाद २१, प्रशांत गायकवाड २-१५) वि.वि. पुणे शहर पोलिसः १० षटकात ८ गडी बाद ६८ धावा (विपुल गायकवाड नाबाद १७, अभिजीत ढेरे ११, उल्हास कदम १०, कुणाल भिलारे २-८, आदित्य कर्जतकर २-८, अनिकेत कुंभार २-११); सामनावीरः राहूल साठे;
Maharashtra Budget 2025 : अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक
Newsworldmarathi Mumbai : अर्थव्यवस्थेच्या विकासचक्राला चालना देण्यासाठी खाजगी तसेच शासकीय गुंतवणूक, नागरिकांचा उपभोग खर्च आणि निर्यात या चार प्रमुख घटकांमध्ये वृध्दी होणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसेच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनांमुळे मोठ्या प्रमाणावर थेट देशी व परदेशी गुंतवणूक आकर्षित होत आहे.
खाजगी गुंतवणुकीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे, रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृध्दी होते आहे. याव्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्याने क्रयशक्ती वाढली आहे.
त्याचा परिणाम बाजारात वस्तू व सेवांच्या मागणीत वाढ होण्यात झाला आहे. परिणामी गुंतवणूक-रोजगार निर्मिती- वाढीव उत्पन्न- मागणी-गुंतवणूक असे विकासचक्र फिरते राहणार आहे.
नवी मुंबईत 7 आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारणार
मुंबई – नवी मुंबईत 7 आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र उभारणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली. राज्याचे लॉजिस्टिक्स धोरण जाहीर करण्यात आले आहे. ५ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण करण्यात येणार आहेत. मुंबई आणि नवी मुंबईत वडाळा, खारघर यासह इतर ठिकाणी बीकेसीप्रमाणं व्यापारी केंद्र उभारणार असल्याची माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
Maharashtra Budget 2025 : जिल्ह्यांचा निर्यातकेंद्र म्हणून विकास करणार
Newsworldmarathi Mumbai : Maharashtra Budget 2025 : निर्यातीमध्ये भरीव वाढ होण्याकरीता राज्याने महाराष्ट्र राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण-2023 जाहीर केले असून राज्यात 37 विशेष आर्थिक क्षेत्रे, 8 कृषि निर्यात क्षेत्रे, निर्यातकेंद्रित 27 औद्योगिक पार्क उभारण्यात आले आहेत. त्यामुळे, देशाच्या एकूण निर्यातीत राज्याचे योगदान 15.4 टक्के झाले आहे.
यासोबतच ‘एक जिल्हा-एक उत्पादन’, जिल्ह्यांना निर्यातकेंद्र म्हणून विकसित करणे, राज्य-जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद असे काही महत्वाचे उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहेत. असही अजित पवार यावेळी म्हणाले.
Breaking! रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम; शिंदेच्या शिवसेनेत करणार प्रवेश…
Ravindra Dhangekar Pune Press Conference : काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर हे काँगेस सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. धंगेकर यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की त्यांनी काँग्रेसला आता रामराम केला आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पत्रकार परिषदेत रवींद्र धंगेकर म्हणाले, “अशा प्रकारचा (पक्ष सोडण्याचा) कोणताही निर्णय हा प्रचंड कठीण असतो.”
माजी आमदार धंगेकर म्हणाले, “मी गेल्या १०-१२ वर्षांपासून या पक्षाबरोबर काम करत आहे. पक्षाबरोबर एक कौटुंबिक नातं तयार झालं आहे. पक्षातील सहकारी हे कुटुंबातील सदस्य बनले आहेत. सर्वांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवली, विधानसभा निवडणूक लढवली, या काळात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी माझ्यामागे मोठी ताकद उभी केली. त्यांच्या जोरावरच मी त्या निवडणुका लढवू शकलो. मी निवडणुकीत पराभूत झालो ती वेगळी गोष्ट आहे.
माजी आमदार धंगेकर म्हणाले, “मी शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर असल्याच्या बातम्या मधल्या काळात वर्तमानपत्रांनी दिल्या होत्या. त्यानंतर डोक्यावरून बरंच पाणी गेलं. दरम्यान, माझ्या मतदारसंघातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले, ‘तुम्हाला जनतेची कामं करावी लागतील’. मात्र, सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत. याच काळात मी एकनाथ शिंदे यांना भेटलो होतो. तसेच मी आमदार असताना आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लावण्यासाठी सहकार्य केलं होतं. त्यांचा चेहरा जनतेत लोकप्रिय आहे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या या चोहऱ्याबरोबर जाण्यास काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आज संध्याकाळी मी त्यांना भेटणार आहे. त्यानंतर आमचा जो निर्यय होईल तो जाहीर करू.”
सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडणारे अजितदादा दुसरे अर्थमंत्री…
Newsworldmarathi Mumbai : Maharashtra Budget 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या (सोमवारी) सादर होईल. अर्थमंत्री अजित पवार तो सादर करतील. याआधी अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून १० वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी ते अकराव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन अनोखा विक्रम करतील.
अजित पवारांचा हा अकरावा अर्थसंकल्प ठरणार आहे. पण त्यांच्या पेक्षा जास्त अर्थसंकल्प हे शेषराव वानखेडे यांनी अर्थमंत्री म्हणून मांडले आहेत. त्यांना आतापर्यंत 13 वेळा अर्थसंकल्प मांडले आहे. त्यांच्यानंतर अजित पवारांचा नंबर लागतो. अजित पवारांचा हा 11 वा अर्थसंकल्प असेल. त्यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान जयंत पाटील यांना मिळाला आहे. त्यांनी आतापर्यंत 10 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांनी तब्बल 9 वेळा अर्थ संकल्प मांडला आहे. वानखेडे यांचे रेकॉर्ड मोडण्याची संधी अजित पवारांकडे आहे.
गेल्यावर्षीही अजित पवार यांनीच अर्थसंकल्प सादर केला होता. अजित पवार हे त्यांच्या आर्थिक शिस्त आणि कडक प्रशासकासाठी ओळखले जातात. गेल्या वर्षीचा निवडणूकपूर्व अर्थसंकल्प हा एक व्यापक, क्रांतिकारी अर्थसंकल्प होता. त्या अर्थसंकल्पातील लोकाभिमुख, लोकप्रिय निर्णयांनी महाआघाडी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
Maharashtra Budget 2025 : राज्याचा अर्थसंकल्प आज होणार सादर, अजितदादाच्या पेठीत काय असणार घोषणा?
Newsworldmarathi Mumbai : राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार दुपारी दोन वाजता विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करतील. अजित पवार हे 11 व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याचे दिसून आले. राज्याच्या तिजोरीची गंभीर स्थिती असल्याची चर्चा सुरू आहे. एका बाजूला आर्थिक शिस्त आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रिय घोषणा यामध्ये अर्थमंत्री अजित पवार कसा समतोल राखणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आले.त्यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य जनतेला काही दिलासा मिळणाऱ्या घोषणा होतात का हे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील अर्थ संकल्प हा विधानसभा निवडणुकीपूर्वीचा असल्याने त्यावेळी अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडण्यात आला होता. मात्र, त्याचा भार सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर पडला.
IND vs NZ Final न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 252 धावांचं आव्हान
Newsworldmarathi Team : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ट्रॉफी जिंकण्यासाठी महाअंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चुरस आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे. न्यूझीलंडचं भारतासमोर विजयासाठी 252 धावांचं आव्हान आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 252 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा ऐतिहासिक सामना खेळवला जात आहे. गट टप्प्यातील सामन्यांनंतर हे दोन्ही आता दुसऱ्यांदा अंतिम फेरीत भिडणार आहे. याआधी भारतीय संघाने विजय मिळवला होता. त्याचबरोबर हे दोन संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहेत.
स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पुण्यात संपन्न
Newsworldmarathi Pune : मराठी चित्रपटसृष्टीत एका नवीन आणि बहुचर्चित स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मोठ्या दिमाखात पुण्यातील कॅम्प भागातील विला मारिया बंगल्यात पार पडला. रेडबेल मीडिया निर्मित आणि अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित स्वप्नसुंदरी या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
चित्रपटाचे निर्माता सतीश महादेव गेजगे असून, या चित्रपटात काही नामांकित कलाकार झळकणार आहेत. भूषण प्रधान, सायली पाटील, अशोक शिंदे आणि शिल्पा नवलकर हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत.मुहूर्त सोहळ्याला मराठी सिनेसृष्टीतील मान्यवरांची उपस्थिती होती.
चित्रपटाच्या कथानकाबाबत अधिक माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली असली, तरी हा एक दमदार आणि उत्कंठावर्धक स्वप्नसुंदरी चित्रपट ठरणार असल्याची निर्मात्यांनी ग्वाही दिली आहे. स्वप्नसुंदरी चित्रपटाचा मुहूर्त महिलादनिानिमित्त 8 मार्च 2025 रोजी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली. प्रेक्षकांना एक वेगळी कथा अनुभवायला मिळणार आहे.
अखेर कात्रज ते वेल्हे बससेवा सुरु; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश
अखेर कात्रज ते वेल्हे कायम स्वरुपी बस सेवा सुरू झाली असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
पीएमपीएल कडून सुरुवातीला विंझर बस सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस वेल्हे पर्यंत सेवा सुरू झाली. पण एस टी कडून त्यास आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे वेल्हेपर्यंतची सेवा बंद करण्यात आली. पीएमआरडीची हद्द पाबे गावापर्यंत बस सेवा सुरू होती. वेल्हे गावातील मेंगाई देवी यात्रा निमित्त प्रायोगिक तत्त्वावर पुन्हा आठ दिवस सुरू करण्यात आली.
त्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कायम स्वरुपी बस सेवा सुरू करण्यासाठी पत्राद्वारे मागणी केली. या मागणीला प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला.अखेर कात्रज ते वेल्हे कायम स्वरुपी बस सेवा सुरू झाली त्याबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ग्रामस्थ, पर्यटक, विद्यार्थी, कामगार, व महिला कडून आभार मानण्यात आले.
पिंक रिक्षा चालक कष्टकरी महिलांना मिळाले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ
Newsworldmarathi Pimpri : महिलांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी पिंक रिक्षा योजनेमध्ये एक हजार महिलांच्या सहभागासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार पिंपरी चिंचवड महापालिका फेरीवाला समिती सदस्य व पिंक रिक्षा संघटनेच्या अध्यक्ष सौ आशा बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिक वेहिकल ऑटो एक्जीबिशन 2025 सुरू करण्यात आले आहे. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आशा कांबळे बोलत होत्या. या वेळी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महिलांनी सुरुवातीला पिंक रिक्षाचे रॅली आयोजित केली, पिंपरी ते ऑटो कस्टर पर्यन्त हि पिंक रिक्षा रैली काढण्यात आली.
या कार्यक्रमासाठी जगभरातील प्रतिनिधी उपस्थित होते. अमेरिका येथून जिम बँनसोन, जर्मनी येथुन क्रिस्तोफ स्प्रिंग,तसेच इंग्लंड, दुबई, जपान, व्हिएतनाम सह, दिल्ली राजस्थान, पंजाब, गुजरात, चेन्नई हैदराबादसह देशभरातील व प्रदेशातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रॅक, टेम्पो, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय कष्टकऱ्यांचे नेते अध्यक्ष बाबा कांबळे, इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल के चेअरमन डॉ. एस. के. सरोज, अध्यक्ष डॉ.राजीव मिश्रा, डॉ दीपक वाधवा, श्रीनिवास कुमार, MSME केंद्र सरकार लघुउद्यो विभागाचे के.के.गोयल, डॉ कल्याण हट्टी, पुणे रिक्षा फेडरेशनचे अध्यक्ष आनंद तांबे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत युवक अध्यक्ष शुभम तांदळे, चंद्रकांत बराटे, संजय चव्हाण,आदी यावेळी उपस्थित होते.
इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशन ऑफ इलेक्ट्रिक वेहिकल या संघटनेचे चेअरमन डॉ. एस. के. सरोज म्हणाले की, ऑटोचा इलेक्ट्रिक वेहिकल मध्ये परिवर्तित होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांच्या पुढाकाराने पुढे कार्य सुरू ठेवणार आहे. केंद्र शासनाने महिलांना इलेक्ट्रिक व्हेहिकलसाठी अनुदान द्यावे यासाठी केंद्र पातळीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन याबाबत पाठपुरवठा करू असे डॉ सरोज म्हणाले,
आशा कांबळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील काबाडकष्ट करणाऱ्या तसेच अत्यंत दुर्बल घटकातील 100 महिलांना रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांचा परवाना काढून त्यांना शंभर रिक्षा देण्याचा उपक्रम घरकाम महिला सभा आणि बाबा सामाजिक फाउंडेशन या संयुक्त संस्थेच्या वतीने करण्यात आला होता. याला चार वर्षापेक्षा अधिक काळ होत आहे. कोविड काळामुळे ही योजना मध्यंतरी बंद होती. परंतु आता नव्याने पुन्हा ही योजना सुरू करून पिंपरी चिंचवड पुणे शहरातील एक हजार महिलांना पिंक रिक्षा योजनेमध्ये सहभागी करून त्यांना पिंक रिक्षा योजनेमध्ये स्वावलंबित करणार असल्याचे आशा कांबळे म्हणाल्या. ही योजना टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र भरून नंतर देशभर वाढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
मधुरा डांगे-( कष्टकरी कामगार पंचायत सरचिटणीस),ममता मनुरकर -( पिंपरी चिंचवड महापालिका नगरसदस्य,) सरोजा कुचेकर – (टपरी पथारी हातगाडी पंचायत महीला शहर अध्यक्ष,) कल्पना घाडगे-( टपरी पथारी हातगाडी पंचायत महिला उपाध्यक्ष,) एडवोकेट काजल कांबळे, यमुना काटकर, संगीता कांबळे, रेखा भालेराव, मनीषा माने, सारिका गलपलू,योगिता शिंदे, राणी तांगडे, वैशाली सोनवणे, आधी पिंक रिक्षा चालक महिला सहभागी झाल्या होत्या
EV TECH INDIE EXPO वतिने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कंपनीचे डायरेक्टर मुकेश यादव, गणेश महाले, सतीश मांडोले, यांनी हा आंतरराष्ट्रीय उपक्रम राबवला. या कार्यक्रमात चाकण हिंजवडी सह महाराष्ट्रातील उद्योजक, लघुउद्योग संघटनेचे प्रतिनिधी तसेच कंपनीचे डायरेक्टर व सी ओ आदी मान्यवर उपस्थित होते.

