Homeपुणेदिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी धावणार विशेष रेल्वे

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनासाठी धावणार विशेष रेल्वे

Newsworldmarathi Pune : दिल्लीत होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पुण्याहून दिल्लीपर्यंत आणि परत पुण्याला येण्यासाठी खास रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

ही विशेष गाडी साहित्यप्रेमींसाठी मोठी सोय ठरणार असून, महाराष्ट्रातील मराठी साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी दिल्लीतील संमेलनाला उपस्थित राहण्याची संधी अनेकांना मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे गाडी 19 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्याहून (दुपार/संध्याकाळ) सुटेल, तर दिल्लीहून परतीचा प्रवास 23 फेब्रुवारीला असेल. या गाडीत 20 डब्यांचा समावेश असून त्यात स्लीपर क्लास व पॅन्ट्री कोचदेखील असतील.

खासदार मोहोळ यांच्या प्रयत्नांमुळे साहित्यप्रेमींसाठी ही विशेष भेट ठरली असून साहित्य संमेलनाच्या ऐतिहासिक क्षणांना उपस्थित राहण्यासाठी ही मोठी सोय ठरणार आहे. या निर्णयामुळे पुण्यातील साहित्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अश्विनी वैष्णव जी यांचे या निर्णयाबद्दल मराठी साहित्यिक, साहित्य प्रेमी आणि वाचकांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो.
– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments