Newsworldmarathi pune : विद्याथ्यांनी आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टीने परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. कारण, परीक्षेच्या काळात विद्यार्थी जेवढा शांततेने आणि सकारात्मक विचाराने अभ्यास करेल तेवढा त्या विद्यार्थ्यांना फायदा होईल, असे प्रा. फुलचंद चाटे यांनी सांगितले. पुढील आठवड्यात इयत्ता बारावी आणि दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने प्रा. चाटे यांनी विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला.
प्रत्येक विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो. परंतु, विद्यार्थी परीक्षेची विनाकारण भीती बाळगत असतात बरेचसे विद्यार्थी परीक्षा जवळ येईल तसे विद्यार्थी जागरण करीत रात्री उशिरापर्यंत अभ्यास करीत बसतात, जास्त वेळ जागत बसतात त्यामुळे विद्याथ्यर्थ्यांची पुरेशी झोप होत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचा मेंदू थकून जातो आणि जो अभ्यास केलेला असतो तो लक्षात राहत नाही, त्यामुळे परिक्षेचा ताण न घेता नियोजनपूर्वक अभ्यास करावा.असेही त्यांनी सांगितले


Recent Comments