HomeपुणेPune News : कसब्यातील भुयारी मार्गाच्या डीपीआर निर्मितीला हिरवा कंदील; आमदार हेमंत...

Pune News : कसब्यातील भुयारी मार्गाच्या डीपीआर निर्मितीला हिरवा कंदील; आमदार हेमंत रासने यांच्या पाठपुराव्याला यश

Newsworldmarathi Pune : पुणे शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा या दोन महत्त्वाकांक्षी भुयारी मार्गांच्या प्रकल्पांचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी दिल्या.

कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकारातून या भुयारी मार्गासाठी मंत्री भोसले यांच्या विधानभवनातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, सदाशिव साळुंखे, उपसचिव प्रज्ञा वाळके, बी. एस. तेलंग, अव्वर सचिव प्रभाकर लहाने, मुख्य अभियंता अतुल चव्हाण, खासगी सचिव सुधाकर भोसले आदी उपस्थित होते. भोसले यांनी या प्रकल्पाबाबत माहिती घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्पांचा ‘डीपीआर’ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तयार

शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या कसबा मतदारसंघात प्रमुख बाजारपेठा; तसेच धार्मिक आणि ऐतिहासिक वास्तू असल्याने दररोज हजारो नागरिक येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र कायम पाहायला मिळते. या भुयारी मार्गाच्या माध्यमातून वाहतुकीला गती मिळाल्याने वेळ आणि इंधनाची बचत होईल, असा दावा रासने यांनी या वेळी केला.

रासने म्हणाले, ‘दाट लोकवस्ती आणि अरुंद रस्त्यांमुळे या भागात उड्डाणपुलाचा पर्याय शक्य नसल्याने आम्ही भुयारी मार्गांची संकल्पना पुढे आणली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून याबद्दलचे सविस्तर निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या दालनात बैठक पार पडली असून, त्यांनी या दोन्ही मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची सूचना प्रशासनास केली आहे. या निर्णयामुळे भुयारी मार्ग निर्मितीस गती मिळणार आहे.’

शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा असा भुयारी मार्ग झाल्यास अनुक्रमे छत्रपती शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्ता यांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. परिणामी टिळक रस्त्यावरील वाहतुकीसही त्याचा फायदा होणार आहे. याच परिसरातून भुयारी मेट्रो गेली असल्याने नवीन भुयारी मार्ग साकारणे शक्य आहे. त्यासाठी येणारा खर्च हा मोठ्या प्रमाणात असल्याने धोरणात्मक निर्णयाची आवश्यकता आहे. राज्य सरकारने हा खर्च करण्याची तयारी दर्शवली किंवा या मार्गांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास, मध्यवर्ती पुण्यातील कोंडी फोडण्यासाठीचे क्रांतिकारी पाऊल ठरेल, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments