पुणे- काल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करीत गोळीबार केला, या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे, यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा यात मृत्यू झालाय. पुण्यातील कोंढवा साईनगर येथे कौस्तुभ गणबोटे राहत होते, तर कर्वेनगर येथे संतोष जगदाळे राहायला होते. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगरा कोसळलाय.

आमचा आधारच गेला आहे :पहलगाममध्ये झालेल्या घटनेत कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय. त्यानंतर त्यांच्या काकी ज्योती गणबोटे म्हणाल्या की, कौस्तुभ जाण्याच्या आधी मला येऊन भेटला होता आणि त्याने सांगितलं होतं की, मी माझ्या मित्राच्या बरोबर फिरायला चाललोय, तेव्हा मी बोलली होती की, जा पण काळजी घे, परंतु काल फक्त गोळीबाराची बातमी समजली होती आणि आज अशी बातमी आल्याने आमचा आधारच गेला आहे. तो आमच्या घरातील सर्वात मोठा होता, असं म्हणत काकी ज्योती गणबोटे या भावूक झाल्यात.


Recent Comments