Homeपुणेजातीनिहाय जनगणन म्हणजे सामाजिक न्यायासाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय : केंद्रीय मंत्री...

जातीनिहाय जनगणन म्हणजे सामाजिक न्यायासाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया…

Newsworldmarathi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखालील झालेल्या CCPA बैठकीत आगामी जनगणनेत जाती आधारित माहितीचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशात सामाजिक न्यायाची प्रक्रिया बळकट करणारा आणि प्रत्येक घटकाच्या विकासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

दशकानुदशके काँग्रेसने सत्तेत असताना या मुद्द्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं, तर विरोधात असताना केवळ मतांच्या राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर केला. मात्र आता, मोदी सरकारने टाकलेल्या निर्णायक पावलामुळे समाजातील सर्व स्तरांतील मागास, दुर्लक्षित घटकांना न्याय मिळेल, त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग मोकळा होईल आणि सर्वसमावेशक भारत घडवण्याच्या दिशेने मोठं पाऊल टाकलं जाईल.

जातनिहाय जनगणना का महत्वाची ?
• सर्व समाजघटकांचा खरा सामाजिक व आर्थिक डेटा उपलब्ध होईल
• योजनांचा लाभ उपयुक्त ठिकाणी व योग्य प्रमाणात पोहोचेल
• वंचित, मागास व उपेक्षित घटकांपर्यंत विकास पोहोचवणे शक्य होईल
• सामाजिक समतेसाठीची पावले अधिक गंभीर आणि प्रभावी ठरतील
• डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया सक्षम होईल

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments