Homeपुणेराज्यात दहावीचा निकाल ९४.१० टक्के; मागील वर्षाच्या तुलनेत १.७१ टक्क्यांची घट

राज्यात दहावीचा निकाल ९४.१० टक्के; मागील वर्षाच्या तुलनेत १.७१ टक्क्यांची घट

Newsworldmarathi Pune : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, यंदाचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात १.७१ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षीचा निकाल ९५.८१ टक्के होता. यंदा एकूण १५ लाख 6० हजार 15४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी १४ लाख ६८ हजार 58२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात कोकण विभागाने सर्वाधिक ९९.०२ टक्के निकालाची टक्केवारी नोंदवली आहे, तर नागपूर विभाग सर्वात खालोठा म्हणजेच ९२.४९ टक्के निकालासह अंतिम स्थानी आहे.

यंदाही मुलींनी निकालात आघाडी घेतली आहे. मुलींचा निकाल ९५.५४ टक्के, तर मुलांचा निकाल ९९.७४ टक्के इतका आहे. राज्यभरातून ५८२९ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून, २८ शाळांचा निकाल शून्य टक्के आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. त्यानंतर गुणपत्रिका शाळांमार्फत वितरित केल्या जातील.

निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार असून, यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments