Homeपुणेकात्रज परिसरातील ५ हजार नागरिकांना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप

कात्रज परिसरातील ५ हजार नागरिकांना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप

Newsworldmarathi Pune: केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कात्रज परिसरातील पाच हजार नागरिकांना आयुष्मान भारत कार्डांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका मनीषा कदम आणि सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांच्या पुढाकाराने करण्यात आले.

या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या आरोग्याच्या गरजा भागवण्यासाठी मोठा आधार मिळणार आहे. उपचारासाठी लागणारा खर्च सुसह्य होणार असल्याने स्थानिक नागरिकांनी मनीषा कदम आणि राजाभाऊ कदम यांचे आभार मानले आहेत.

आयुष्मान भारत योजना, ज्याला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना असेही म्हटले जाते, ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. ही योजना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि तृतीयक आरोग्य सेवा सुलभ करणे, तसेच प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्य सेवांचा समावेश करून नागरिकांना समग्र आरोग्य सुविधा पुरवणे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपये पर्यंतच्या उपचारांसाठी मदत मिळते. या रकमेचा उपयोग देशभरातील सहाभागी रुग्णालयांमध्ये (सरकारी तसेच खासगी) मोफत उपचारासाठी करता येतो.

हा उपक्रम आरोग्य सेवांमध्ये आर्थिक अडचणीमुळे होणाऱ्या अडथळ्यांना दूर करून गरजू नागरिकांना दिलासा देणारा ठरत असल्याचे राजाभाऊ कदम यांनी सांगितले.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments