नागपूरकरांना हुडहुडी
Newsworldmarathi Nagpur : नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यात थंडीचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत जाऊन, हिवाळ्याचं अस्सल रूप दिसत आहे.
कडाक्याच्या झोंबणाऱ्या थंडीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर पडू लागला आहे. सकाळी आणि संध्याकाळी शालेय विद्यार्थी आणि कामगार गरम कपडे घालून घरातून बाहेर पडत आहेत. याशिवाय, दिवसभरातही नागरिकांना गरम कपडे घालूनच बाहेर पडावं लागत आहे. यामुळे दुकानं, शाळा, ऑफिस आणि इतर ठिकाणी थंडीमुळे सामान्य जनजीवन थोडं कठीण झालं आहे.
नागपूरमध्ये थंडीचा प्रभाव आता स्पष्टपणे दिसून येत आहे. वाऱ्यांचा प्रभाव असा आहे की, शहरातील तापमान १० अंशांच्या खाली गेलं आहे. गुरुवारी, किमान तापमान ९.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेले. त्यामुळे, नागपूर सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात थंड शहर ठरलं आहे. या थंडीत सूर्य उगवल्यानंतरही लोकांना घराबाहेर पडणं कठीण होऊन गेलं आहे. लोक दिवसाही गरम कपडे घालून बाहेर पडत आहेत, हे याचे प्रमाण आहे.
देवा भाऊच्या बालेकिल्ल्यात उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार
Newsworldmarathi Nagpur महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात ( देवाभाऊ) च्या मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी चार वाजता नागपूर या ठिकाणी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला यश मिळाल्यानंतर मुंबईच्या ऐवजी आता शपथविधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर या ठिकाणी पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार निवडून आले. 132 उमेदवारांसह भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडील तीनही घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या. दरम्यान राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व शनिवारऐवजी रविवारी केला जात आहे. दुसरीकडे, महायुती-2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे. त्यात भाजपला 23, शिवसेना शिंदे गटाला 13 व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रिपदे विशेष म्हणजे यावेळी गृह व अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केला आहे. एकनाथ शिंदे सरकारकडे अर्थ खाते हे अजित पवार यांच्याकडे होते. त्यामुळे यावेळी त्यांना या खात्यावर पाणी सोडावे लागणार असल्याची चर्चा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था झाली आहे, मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यांचे ढाचे तयार आहेत, उद्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली की बंगल्यांवर नेमप्लेट लावण्यात येईल. निवास समितीची आजंच बैठक झाली, या बैठकीमध्ये मंत्र्यांसाठी बंगले तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रवि भवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी २४ बंगले सज्ज आहेत, तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी १६ बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं संजय उपाध्याय यांनी म्हटलं आहे.
अबब! पुणे ते नागपूर विमानाचे चाळीस हजारी उड्डाण
Newsworldmarathi Pune : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर या ठिकाणी होत असल्याने अनेक जण आपल्या लाडक्या नेत्याला मंत्री होताना पाहण्यासाठी विमानाने जाणे पसंत करत आहेत. पुणे नागपूर दर अचानक चाळीस हजार रुपयावर पोहोचल्याने अनेक जण आपल्या नेत्याला शुभचिंतन करण्यासाठी समृद्धीचे मार्गाने जाणे पसंत करत आहेत.
शुक्रवारी दुपारी नागपूर या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची बातमी आल्यानंतर अचानक या विमानाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात व शनिवारऐवजी रविवारी केला जात आहे.
दुसरीकडे, महायुती-2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे.
भक्तिमय वातावरणात श्री सूर्यमुखी गुरुदेव दत्त मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा संपन्न
Newsworldmarathi Pune : दत्तजयंती निमित्त भवानी पेठ टिंबर मार्केट, पुणे येथे 1999 मध्ये बांधलेले श्री सूर्यमुखी गुरुदेव दत्त मंदिराचा जीर्णोद्धार आणि नूतनीकरण करण्यात आले. याप्रसंगी भगवान गुरुदेव दत्त, श्रीराम, भगवान हनुमान आणि शनि भगवान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंडित अरुण शास्त्री यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा आणि सर्व धार्मिक विधी पार पडले.
जीर्णोद्धारासाठी उद्योगपती पुनित बालन, मा. नगरसेवक दीपक मानकर, आणि मा. पवन बन्सल यांचे सहकार्य लाभले. स्वर्गीय इंद्राणी बालन यांच्या स्मरणार्थ उद्योगपती पुनित बालन यांनी या मंदिराच्या उभारणीसाठी विशेष मदत केली.
याप्रसंगी पुणे पोलीस सहआयुक्त मा. रंजन शर्मा, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, मा. राज जैन राणावत, मा. महाराज मानकर, मा. वीरेंद्र किराड, मा. अभय छाजेड, मा. जया किराड, मा. सदानंद शेट्टी, आणि मा. सुजाता शेट्टी उपस्थित होते.
हे मंदिर श्री गुरुदेव दत्त फाउंडेशन आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशन यांच्या सौजन्याने उभारण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा : नाना पटोले
Newsworldmarathi Mumbai : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा, अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं आहे. मला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावर चार वर्ष पूर्ण झाली असून आता प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करावी, तसेच नवी कमिटी स्थापन करा, मला पदावरून मुक्त करा असे पत्रच नाना पटोलेंकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.
नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त होण्याची इच्छा ही महाराष्ट्रातील काँग्रेससाठी महत्त्वाची घटना मानली जात आहे. या घटनेमुळे काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजी आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाचे नियोजन यावर प्रकाश पडतो.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. मात्र, विधानसभेत महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळाले नाही, ज्यामुळे काँग्रेसवर टीका झाली.
नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून चार वर्षांत पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न केला. परंतु विधानसभेतील अपयशाची जबाबदारी स्वीकारत त्यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुणे पुस्तक महोत्सवात होणार विश्वविक्रम : राजेश पांडे
Newsworldmarathi Pune : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आज शनिवारपासून पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात होत आहे. या महोत्सवात एकूण पाच विश्वविक्रम करण्यात येणार आहे. यातीलच दुसरा विश्वविक्रम आज शनिवारी १४ डिसेंबर रोजी करण्यात येईल. अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले. पुणे पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध लेखक आणि परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुरीश्र्वर महाराज यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या सहाय्याने गिनेज बुक वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात येणार आहे.
‘एकाच लेखकाच्या अधिकाधिक पुस्तकांचे प्रदर्शन’ अशा विषयाला अनुसरून हा विश्वविक्रम होणार आहे. हा विश्वविक्रम दुपारी बारा वाजता करण्याला सुरुवात होईल. साधारण चार वाजताच्या सुमारास पूर्ण होईल. गिनेस बुक वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रशासनाने यंदा ही नवीन श्रेणी खास पुणे पुस्तक महोत्सवासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक पुणेकरांनी उपस्थित राहून विश्वविक्रमाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन संयोजन समितीचे सदस्य मिलिंद वेर्लेकर यांनी केले आहे.
दि पूना मर्चंट्स चेंबरचे ‘आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार’ जाहीर
Newsworldmarathi Pune : दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी दिल्या जाणाऱ्या आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कार २०२४-२५ शुक्रवार ( दि १३ डिसेंबर) जाहीर करण्यात आले. यंदा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सोलापूर येथील गौतम ट्रेडर्सचे संचालक वस्तीमलजी तखतमलजी संकलेचा, जिल्हास्तरीय पुरस्कार राजगुरुनगरचे संगम कलेक्शनचे संचालक विजयकुमारजी मोतीलालजी भन्साळी, तर पुणे शहरासाठी रामकृष्ण ऑईल मिलचे संचालक आनंदजी श्रवणकुमारजी पटेल यांची निवड करण्यात आली आहे. तसेच चेंबरच्या सभासदांमधून दिल्या जाणारे पुरस्कार पुरणचंद अॅन्ड सन्स्चे संचालक सतीश पुरणचंदजी गुप्ता , तर युवा व्यापारी पुरस्कार मे. आर. बीज ड्रायफ्रूट्सचे संचालक राजीव भिमराजजी बाठिया यांना जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दै. केसरीचे पत्रकार संजय ऐलवाड यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे तिसावे वर्ष असून मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण समारंभ २० डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जयराज स्पोर्ट्स अँड कन्वेन्शन सेंटर, “क्रोम बॅक्वेट”कोंढवा, पुणे येथे होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरत ( गुजरात) चे राज्यसभा खासदार गोविंदजी ढोलकिया भूषविणार असून त्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ललित गांधी (राज्यमंत्री दर्जा, जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष) आणि सुप्रसिद्ध उद्योजक व सामाजीक कार्याकर्तेप्रकाश धोका उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी शुक्रवारी चेंबर येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रविण चोरबेले, नवीन गोयल, दिनेश मेहता, उत्तम बाठिया, संदीप शहा तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
पुण्यात संचेती ब्रिजजवळ घराला आग
Newsworldmarathi Pune : पुण्यातील संचेती ब्रिजजवळील एका घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक पोहोचले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक तपास आणि कारण शोधण्याचे काम सुरु आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : गोयल
Newsworldmarathi Pune : राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थान (N IIT) आणि ऑटोस प्रयास फाउंडेशन च्या वतीने खडकी शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये E- बस चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.. तंत्रज्ञानाचा अभ्यास ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी उपलब्ध आहे याच ज्ञानाच्या बळावर विद्यार्थी स्पर्धेच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये आपले भवितव्य घडवू शकतो.. पर्यायी समाजाला नव्या विकासाची दिशा देऊ शकतो असेही ते म्हणाले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संचालक , प्राचार्य संजय चाकणे कार्यकारी अधिकारी डॉ. गजानन आहेर राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान संस्थांचे माधव कुलकर्णी, विल्सन फर्नांडिस, सुहास वासले, सुनिता भूतान ,अजित बनसोडे, सुशील शिंगाडे, रजनी बनसोडे आणि मुख्याध्यापक नायर , घाडगे चपटे, बोटेकर विभाग प्रमुख आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
एटोस च्या प्रमुख आपले मत व्यक्त करताना म्हणाले माहिती तंत्रज्ञान विकसनशील व्यक्तिमत्त्वाचा पाया असून खडकी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी या ई बस सेवा सुविधेचा पुरेपूर लाभ घेतीलई बस सेवा उद्घाटनानंतर संस्थेच्या शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले..
दोन्ही पवारांनी एकत्र यावे : सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य
Newsworldmarathi Pune : शरद पवार यांचा वाढदिवस आणि त्यानंतर अजित पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे महाराष्ट्रात दोन्ही पवार एकत्र येणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याच संदर्भात कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. सुनंदा पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले.
सुनंदा पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचे संबंध सुधारण्याच्या महत्त्वावर जोर दिला, तसेच त्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तमनात एक नवा वळण दिसून येत आहे, कारण पवार कुटुंबातील या दोन प्रमुख नेत्यांचे एकत्र येणे, राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडवू शकते.
सुनंदा पवार यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीवर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, ही भेट राजकीय न करता एक कौटुंबिक भेट होती. मात्र, त्याच वेळी दोन्ही पवार कुटुंबातील नेत्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सुनंदा पवार यांचे मत आहे की, जर दोन्ही गट एकत्र आले, तर त्यांची शक्ती वाढेल.
त्यांनी पुढे हे देखील सांगितले की, सत्तेसोबत कसं जावं याचा निर्णय शरद पवार घेतील. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यामुळे पक्षाच्या भविष्यात काही मोठे बदल होऊ शकतात, जे पवार कुटुंबाच्या राजकीय धोरणांवर परिणाम करु शकतात.

