एकनाथ शिंदेनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

0
Newsworld Mumbai : महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात** शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. शपथविधी सोहळ्यास विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मान्यवर, बॉलीवूड सेलिब्रिटी आणि भाजपसह महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. हा सोहळा भव्य प्रमाणावर आयोजित करण्यात आला होता, ज्यामुळे मुंबईत राजकीय तसेच सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री म्हणून राज्याचे नेतृत्व केले होते. आता त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारून महायुती सरकारच्या धोरणांना गती देण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि निर्णयक्षमतेचा उपयोग राज्यातील प्रलंबित प्रकल्प आणि विकास कामांना दिशा देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे. **महायुतीचा हा शपथविधी सोहळा भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.**

अजित पवारांच्या नावे नवा रेकॉर्ड…

Newsworld Mumbai अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व असून त्यांनी सातत्याने आपल्या राजकीय कौशल्याने वेगळा ठसा उमटवला आहे. १९५९ साली जन्मलेले अजित पवार, ज्यांना ‘दादा’ म्हणून ओळखले जाते, हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या काकांच्या प्रेरणेतून झाली. राजकीय प्रवास: 1. सुरुवात :अजित पवार यांनी १९९१ साली पहिल्यांदा बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवून आपली लोकप्रियता आणि राजकीय कर्तृत्व सिद्ध केले आहे. 2. महत्त्वाची पदे: जलसंपदा मंत्री:जल व्यवस्थापन आणि सिंचन प्रकल्पांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. वित्त मंत्री:महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर त्यांनी प्रभाव टाकला, बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. उपमुख्यमंत्री: अजित पवार यांनी २०१० साली प्रथम उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर त्यांनी २०१२, २०१९, २०२१, २०२३ आणि आता २०२४ साली सहाव्यांदा हे पद भूषवले आहे. अजित पवार यांची कारकीर्द म्हणजे मेहनत, राजकीय कौशल्य आणि सतत बदलत्या राजकीय परिस्थितीत उभारी घेण्याचे उदाहरण आहे. सहाव्यांदा उपमुख्यमंत्री होणारे ते महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत, ज्यामुळे त्यांच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून शरद पवारांना फोन

Newsworld Mumbai : महायुती सरकारचा भव्य शपथविधी सोहळा आज मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना फोन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आज होणाऱ्या शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोनवरून दिल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचं शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवलं. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीस सरकारचा शपथविधी होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच इतर काही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

नागालँडच्या शिष्टमंडळाकडून अजित पवारांना शुभेच्छा

Newsworld Mumbai : देवगिरी बंगल्यावर नागालँडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार व शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. या भेटीत नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यप्रणाली आणि पक्षाच्या भविष्यातील योजनांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल देखील उपस्थित होते. या भेटीमुळे पक्षातील एकजूट आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या उपस्थितीवर भर देण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असून, पक्षसंघटन आणि विविध राज्यांमधील समन्वय वाढवण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरी गडाला आकर्षक विद्युत रोषणाई

Newsworld Pune : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा महाराजांचा चंपाषष्टी उत्सव जेजुरी गडावर मोठ्या जल्लोषात आणि भक्तीभावाने सुरू आहे. काल (सोमवारी) या उत्सवाला भव्य सुरुवात झाली असून, राज्यभरातून आलेले भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी होत आहेत. चंपाषष्ठी हा खंडोबा देवाचा विशेष उत्सव असून, या दिवशी खंडोबाची पारंपरिक पूजा, अभिषेक, महाप्रसाद, आणि विविध धार्मिक कार्यक्रम गडावर आयोजित केले जातात. जेजुरी गडावरची परंपरा, पिवळ्या हळदीच्या उधळणीसह साजरी होणारी हा उत्सवाची वैशिष्ट्ये भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. गडावरचा उत्सव फक्त धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो. जेजुरी गडावर सध्या भक्तांनी गर्दी केली असून, भक्तांच्या सोयीसाठी प्रशासनानेही विशेष व्यवस्था केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे काम आम्हा सर्वांसाठी आदर्श – आ. अमित गोरखे

Newsworld Mumbai : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, शाश्वत विकासाचे विकासपुरुष देवेंद्र फडणवीस यांची भाजपा महाराष्ट्र “विधिमंडळ गटनेतेपदी” निवड झाल्याबद्दल विधानपरिषद आमदार मा.उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे,आमदार शंकर जगताप यांनी सागर निवास्थानी जाऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या! देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने आणि निर्णयक्षमतेने महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यांची कार्यतत्परता, प्रामाणिकता आणि समाजातील प्रत्येक घटकांसाठी केलेले काम आम्हा सर्वांसाठी आदर्श आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समृद्धीच्या आणि विकासाच्या नव्या उंचीवर जाईल तसेच राष्ट्र उभारणीच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.

पीएमसी बँकेतील ग्राहकांना लवकर न्याय द्या: खा. वायकर

0
Newsworld Delhi : आरबीआई यंत्रणेच्या असफलतेमुळे पीएमसी बँक घोटाळ्यातील ग्राहकांचे हक्काचे कोट्यवधी रुपये गेल्या अनेक वर्षापासून अडकले असून ते त्यांना तत्काल देण्यासाठी केंद्र सरकारने निर्णय घेऊन खातेदारांना न्याय द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक २०२४ वर बोलताना केली. खातेदारांच्या न्याय, हित रक्षणासाठी तसेच सहकारी बँकेतिल ग्राहकांसाठी डिपॉजिट इन्शुरेंस योजना लागू करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली. लोकसभेत मांडण्यात आलेल्या बँकिंग कायदा (सुधारणा) विधेयक २०२४ चे समर्थन करताना खासदार रविंद्र वायकर यांनी आपले विचार व सूचना मांडल्या. पीएमसी बँकेतील घोटाळ्यामुळे ग्राहकांनी आपल्या मेहनतीचे बँकेत ठेवलेले रुपये मिळणे कठीण झाले आहे. आरबीआई यंत्रणेला हा घोटाला रोखण्यात अपयश आले. यूनिटी बँकेतील ग्राहकांची पण तीच परिस्थिति आहे. यस बँकेला केवळ २० दिवसांमध्ये १५०० कोटी रुपये देऊन वाचवण्यात आले. परंतु पीएमसी बँक ज्यांचा एनपीए ६००० हजार करोंड होता व ज्यांचे १० लाखापेक्षा जास्त ग्राहक होते, आशा ग्राहकांना बेलआउटचा लाभ देण्यात आला नाही. एचडीआयएल कंपनीची संपत्ति व कर्जाच्या एकदाच सेटेलमेन्ट मूळे हजारो कोटी रुपयांची वसूली झाली आहे. हे संकट नुसते वित्तीय नसून, नैतिक आणि सामाजिक पण असल्याचे मत, खासदार वायकर यांनी व्यक्त केले. या घोटाळ्याची बंधित ग्राहकांना त्यांची संपूर्ण जमा रक्कम तत्काळ देण्यात यावी. एनसीएलटी सारख्या संस्थेमार्फत अशी प्रकरणे निकाली काढण्यात यावी. बँकेतील एनपीए खात्यांची ओळख करण्यासाठी रिस्क मॅनेजमेंट सिस्टमला सक्षम करण्यात यावे. सायबर फसवणुकीपासून ग्राहकांचे रक्षण करण्यासाठी बँकांना एआय वर आधारित सुरक्षा प्रणाली लागू करण्यात यावी. ग्रामीण भागात बँकांचे जाळे वाढवणे तसेच एटीएमची संख्या वाढवण्यात यावी. सहकारी बँकांना आधिक मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष फंड उभारला पाहिजे, आशा सूचनाही खासदार रविंद्र वायकर यांनी या बिलावर आपले मत व्यक्त करताना दिल्या.

आमदार हेमंत रासने यांच्या पुढाकाराने ‘कचरामुक्त कसबा’

0
Newsworld Pune : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार हेमंत रासने यांनी भवानी पेठ क्षेत्रातील कचऱ्याच्या समस्येवर त्वरित कारवाई केली आहे. त्यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या ‘क्रॉनिक स्पॉट्स’बाबत प्रशासनाला जाब विचारला होता. त्यानंतर महापालिकेने आठवड्याच्या आतच या समस्येवर उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. पालिकेच्या या कृतीमुळे भवानी पेठ परिसरातील कचऱ्याच्या समस्येत लक्षणीय सुधारणा झाल्याची माहिती समोर आली आहे. ही कृती नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत असून, स्वच्छता अभियानासाठी सकारात्मक पाऊल मानले जात आहे. आमदार रासने यांच्या या प्रयत्नांमुळे स्थानिक पातळीवर प्रभावी नेतृत्वाची छाप पडल्याचे दिसत आहे. आमदार हेमंत रासने यांनी ‘कचरामुक्त कसबा’ या मोहिमेअंतर्गत भवानी पेठ भागातील कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांसमवेत उघड्यावर कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली आणि या समस्येच्या त्वरित सोडवणुकीसाठी प्रशासनाला १५ दिवसांत कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेने या सूचनेनुसार हालचाली सुरू केल्या असून भवानी पेठ क्षेत्रातील काही ‘क्रॉनिक स्पॉट्स’ आठवड्याभरातच बंद करण्यात आले आहेत. या मोहिमेमुळे परिसरातील स्वच्छता सुधारण्यास मदत होईल, तसेच भविष्यात कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन होण्यासाठी ठोस उपाययोजना आखल्या जातील. ‘कचरामुक्त कसबा’ ही कल्पना नागरिकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास महत्त्वाची ठरणार आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारितील ताडी गुत्ता, गंज पेठ, गुरुवार पेठ दवाखाना आरोग्य कोठी आणि चांदतारा चौक परिसरातील कचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या भागातील ‘क्रॉनिक स्पॉट’ बंद करून, महापालिकेने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले आहे. या मोहिमेमुळे भवानी पेठ क्षेत्रातील स्वच्छता स्थितीत सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. ‘कचरामुक्त कसबा’ या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरातील कचऱ्याच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विशेष बैठकीसाठी बोलावले होते. या पाहणीत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम, तसेच इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते. रासने यांनी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या दूधभट्टी, गणेश पेठ, गंज पेठ रोड, भिकारदास मारुती चौक आणि रमणबाग प्रशाला याठिकाणी थेट पाहणी केली. या ठिकाणी असलेल्या कचऱ्याच्या समस्यांवर त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आणि नागरिकांपर्यंत नियमित कचरा संकलनाची व्यवस्था पोहोचवण्याचे आदेश दिले. या पाहणीनंतर महापालिकेने ‘क्रॉनिक स्पॉट्स’ बंद करण्यासाठी पुढाकार घेतला असून, कचऱ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावी होण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. ‘कचरामुक्त कसबा’मोहिमेला या पाहणीमुळे अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे. कसबा ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. कसबा मतदारसंघातून देशाला दिशा देणारे असे अनेक थोर महापुरुष घडले आहेत. अनेक ऐतिहासिक वास्तू या कसबापेठेत आहेत त्याचं पावित्र्य जतन करणे हे माझं आद्य कर्तव्य मी मानतो. देश विदेशातून अनेक नागरिक कसबा पेठ पाहण्यासाठी येत असतात. माझा मतदारसंघ स्वच्छ सुंदर रहावा ही माझी इच्छा आहे. त्यामुळेच आमदार झाल्यानंतर कसबा कचरामुक्त करण्याची पहिली मोहीम हाती घेतली आणि ती यशस्वी झाली आणि इथून पुढेही अशा अनेक संकल्पना राबवून मतदार संघाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. हेमंत रासने, आमदार

पैलवान विक्रमचा व्यायाम करताना मृत्यू

Newsworld Pune : मुळशीच्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी याचे आज सकाळी जिममध्ये व्यायाम करताना आकस्मिक निधन झाले. पैलवान विक्रम याला हृदयविकाराचा झटका आला. त्यामध्ये त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण माणगावसह मुळशी तालुक्यावर आणि कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. पैलवान विक्रम पारखी याचे येत्या 12 डिसेंबरला लग्न होणार होते, मात्र काळाने त्याआधीच झडप घालून विक्रम ह्याला हिरावल्याने पारखी कुटुंबावर आनंदा ऐवजी दुःखाचा डोंगर कोसळलाय. पारखी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखामुळे मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. पैलवान विक्रम पारखीने अनेक पदकं मिळवली मुळशीतल्या माणगावचा भूमिपुत्र असलेल्या विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपलं नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. २८ नोव्हेंबर २०१४ ला वारजे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा २०१४ झाली होती. त्यात विक्रम याने अजिंक्यपद मिळवले. काळाचा घाला… 8 दिवसावर लग्न… पैलवान विक्रम चे 8 दिवसांवर लग्न असताना नियतीचा अमानुष खेळ..पैलवान विक्रम याचे जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे येत्या १२ डिसेंबरला लग्न होणार होते. या दुर्दैवी घटनेने कुस्ती क्षेत्रात आणि त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे

पवना धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू

0
Newsworld Pune : पवना धरणात दोन तरुण बुडाले आहेत. बुधवार (दि.०४) रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास दुधिवरे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. मयूर रविंद्र भारसाके (वय २५) तर तुषार रविंद्र अहिरे (वय.२६ दोघेही सध्या रा.पुणे, मुळ, रा. लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर, वरणगांव, भुसावळ) असे बुडाल्या पर्यटकांची नावे असून ते बालेवाडी येथे एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत होते.मयुरचा मृतदेह सापडला आहे मात्र तुषार चा मृतदेह अद्याप मिळून आला नाही. उद्या सकाळी 9 वाजता परत शोध मोहीम चालू होईल.