आई तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे नवरात्र उत्सवात रास दांडियाला उत्साहपूर्ण सुरुवात
Newsworldmarathi Pune: आई तुळजाभवानी प्रतिष्ठान आयोजित नवरात्र उत्सव २०२५ निमित्त देवी आईचा भव्य आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात पार पडल्यानंतर काल मंगळवार दिनांक २३ सप्टेंबर २०२५ पासून रास दांडियाच्या कार्यक्रमांना उत्साहपूर्ण सुरुवात झाली. परिसरातील नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे या दांडिया महोत्सवाला सुरुवातीपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
रास दांडियामध्ये सहभागी होणाऱ्यांसाठी आकर्षक बक्षिसांची विशेष सोय करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकासाठी एलईडी टीव्ही, दुसऱ्या क्रमांकासाठी मोबाईल फोन, तिसऱ्या क्रमांकासाठी सोन्याची नथ, चौथ्या क्रमांकासाठी स्मार्ट वॉच, पाचव्या क्रमांकासाठी टेबल फॅन तर सहाव्या क्रमांकासाठी इस्त्री अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच संपूर्ण रास दांडिया सोहळ्यात पैठणीही विशेष बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेली आहे. या बक्षिसांमुळे कार्यक्रमात सहभागी होण्याची नागरिकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
रास दांडियाच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच नव्हे तर एकोपा, मैत्री आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडते. यंदाच्या दांडिया महोत्सवाला युवक, युवतींसह कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत असून, वातावरण रंगतदार आणि आनंदमय झाले आहे.
या प्रसंगी तुळजाभवानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वर्षा साठे यांनी प्रभागातील सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “हा दांडिया महोत्सव म्हणजे नागरिकांना एकत्र येऊन परंपरेतून आनंद घेण्याची संधी आहे. आकर्षक बक्षिसे ही नागरिकांसाठी एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे सर्वांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे.”
तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष भीमराव साठे यांनीही नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “नवरात्र उत्सव हा केवळ धार्मिक सण नसून तो सामाजिक सलोखा आणि एकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे दांडिया महोत्सवात सहभागी होऊन या उत्सवाला अधिकच उजाळा द्यावा.”
सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीची आरती
Newsworldmarathi Pune: नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात भक्तिमय वातावरणात आरती सोहळा पार पडला. या विशेष प्रसंगी बिबवेवाडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांच्या हस्ते तसेच महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत देवीची आरती करण्यात आली.
नवरात्र म्हणजे देवीची उपासना, शक्तीचे प्रतीक आणि समाजातील स्त्रीशक्तीचा गौरव. याच पार्श्वभूमीवर देवीची आरती करण्यासाठी पोलिस महिला अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व लाभले.
या वेळी पोलिस महिला अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सन्मान अंबा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने संगीता राठी आणि मंजू राठी यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मान स्वीकारताना महिला पोलिस अधिकाऱ्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि समाजातील प्रत्येक घटकासोबत सलोखा आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्याचे आश्वासन दिले.
अंबा माता मंदिर ट्रस्टचे मगराज राठी, पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अखिल अप्परच्या दुर्गामातेचे जल्लोषात आगमन
Newsworldmarathi Pune: नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अखिल अप्पर दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्टतर्फे देवीचे आगमन सोहळा मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडला. परिसरातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गामातेचे आगमन होताच वातावरणात भक्ती, आनंद आणि उत्साह यांचा मिलाफ दिसून आला.
ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक मर्दानी खेळांच्या दमदार सादरीकरणाने मिरवणुकीला विशेष रंगत आली. देवीच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. देवीच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्यावर रांगोळ्या काढल्या, फुलांचा वर्षाव केला आणि अबालवृद्धांसह माता-भगिनींनी मोठ्या भक्तिभावाने देवीचे आशीर्वाद घेतले. हा सोहळा एकता, परंपरा आणि भक्तीचे दर्शन घडवणारा ठरला.
देवीची भव्य आरती दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्टच्या महिला अध्यक्षा मा. नगरसेविका रूपाली धाडवे यांच्या हस्ते तसेच मंडळाचे आधारस्तंभ मा. नगरसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे यांच्या हस्ते करण्यात आली. आरतीच्या वेळी उपस्थित भाविकांनी ‘दुर्गामातेचा जयघोष’ करत वातावरण अधिक भक्तिमय केले.
या वेळी उद्योजक सागरशेठ सोलंकी, ट्रस्टमधील सर्व पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच मोठ्या संख्येने उत्साही देवीभक्त उपस्थित होते. आगमन सोहळा शांततेत आणि शिस्तबद्ध पार पडल्यानं नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
अखिल अप्पर दुर्गामाता नवरात्र उत्सव ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. यंदाही ट्रस्टतर्फे नवरात्र महोत्सवात विविध भक्तिमय उपक्रम, सामाजिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले असून, हा उत्सव परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे बावनकुळे यांच्याकडून कौतुक
Newsworldmarathi Pune: भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आणि समाजसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटलं की, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिजनला पुढे नेण्याचं काम श्रीनाथ भिमाले निष्ठेने आणि ताकदीनं करीत आहेत.”
बावनकुळे यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र २०२९, २०३५ आणि २०४७’ हे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन आहे, आणि त्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वामध्ये श्रीनाथ भिमाले यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हृदयात विशेष स्थान असलेले श्रीनाथ भिमाले हे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणारे एक असामान्य कार्यकर्ते आहेत.”
श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याचे बावनकुळे यांच्याकडून कौतुक
Newsworldmarathi Pune: भाजप प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे पुण्यातील ज्येष्ठ नगरसेवक आणि समाजसेवक श्रीनाथ भिमाले यांच्या कार्याची प्रशंसा करताना म्हटलं की, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या व्हिजनला पुढे नेण्याचं काम श्रीनाथ भिमाले निष्ठेने आणि ताकदीनं करीत आहेत.”
बावनकुळे यांनी सांगितले की, “देवेंद्र फडणवीस यांचे ‘विकसित महाराष्ट्र २०२९, २०३५ आणि २०४७’ हे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन आहे, आणि त्या दिशेने काम करणाऱ्या नेतृत्वामध्ये श्रीनाथ भिमाले यांचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
त्यांनी पुढे म्हटलं, “मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हृदयात विशेष स्थान असलेले श्रीनाथ भिमाले हे सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी कार्य करणारे एक असामान्य कार्यकर्ते आहेत.”
सर्व कलांना सन्मान आणि व्यासपीठ देणारा महोत्सव : विदुषी भाटे यांचे गौरवोद्गार ; पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचा शानदार प्रारंभ
Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्र महिला महोत्सवात सर्व शास्त्रीय कलांचा सन्मान केला जातो आणि या कलेच्या उपासकांना सातत्याने व्यासपीठ दिले जाते. याचे श्रेय महोत्सवाचे प्रवर्तन, आयोजक जयश्री बागुल आणि आबा बागुल यांचे आहे, असे उद्गार ज्येष्ठ नृत्यांगना, गुरू, संरचनाकार विदुषी शमा भाटे यांनी मंगळवारी येथे काढले.
पुणे नवरात्रौ महोत्सवात दरवर्षी संपन्न होणारा आणि हजारो महिलांचा सहभाग असणारा ‘पुणे नवरात्रौ महिला महोत्सव’ यंदा वैभवशाली २७वे वर्ष साजरे करीत आहे. या महिला महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी शमा भाटे बोलत होत्या. त्यांच्याच हस्ते यावेळी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेत्री गायिका दीप्ती भोगले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनाथ मुला-मुलींचे शिक्षण व संगोपन करणाऱ्या आळंदी येथील ‘स्नेहवन’ संस्थेच्या अर्चना देशमाने यांना तेजस्विनी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ५ हजार रुपये, गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच याप्रसंगी पुणे महानगरपालिकेच्या २५०हून अधिक महिला सफाई कामगारांचा गौरवचिन्ह व भेटवस्तू देऊन विशेष गौरव करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, मुक्तांगण शाळेजवळ, शिवदर्शन, पुणे येथे हा कार्यक्रम महिलांच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, प्रवर्तक आबा बागुल, तसेच निर्मला जगताप, छाया कातुरे, प्रांजली गांधी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विदुषी शमा भाटे पुढे म्हणाल्या, ‘पुणे नवरात्र महिला महोत्सवाशी मी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेली आहे. या व्यासपीठावरून दरवर्षी नृत्याच्या माध्यमातून देवीच्या विविध रूपांचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आलो आहोत. जयश्रीताई आणि आबा बागुल यांना नाही म्हणता येत नाही, इतक्या आत्मीयतेने ते हे कार्य करतात. या महोत्सवात सर्व कलांना सन्मानाचे स्थान असते. मान्यवर कलाकारांचा सहभाग असतो. एक कलाकार म्हणून मला हे फार महत्त्वाचे वाटते’.
मनोगत व्यक्त करताना दीप्ती भोगले म्हणाल्या, ‘मी एक भाग्यवान कलाकार आहे. नवरात्र महोत्सवात मी सातत्याने येत आहे. बागुल कुटुंब हे घरची माणसे असावीत, इतके जवळचे आहे कारण कोणत्याही अडचणीत ते धावून येतात. या महोत्सवाच्या माध्यमातून आबा आणि जयश्रीताई, विविध कलांना एका व्यासपीठावर आणून रसिकांना आनंद देतात’.
अर्चना देशमाने म्हणाल्या, ‘स्नेहवनच्या कार्याविषयी शब्दांतून सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष भेट देऊन कार्य पाहणे अधिक आनंदाचे आहे’.
जयश्री बागुल यांनी प्रास्ताविक करताना नवरात्र महिला महोत्सवाची माहिती दिली. शक्तीचे जागरण आणि शक्तीला अभिवादन, ही भावना असून, या निमित्ताने समाजातील विविध महिलांना एकत्र आणणे, संवाद साधणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा हेतू असतो, असे त्या म्हणाल्या.
स्वच्छता कर्मचार्यांच्या वतीने आशा भोसले यांनी प्रातिनिधिक मनोगत मांडले. ‘आबा आणि जयश्रीताईंनी आमची आठवण ठेवली आणि सत्कार केला, याचा फार आनंद झाला’, असे त्या म्हणाल्या. सुरवातीला नृत्याविष्काराच्या माध्यमातून देवीवंदना सादर करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. नम्रता जगताप यांनी आभार मानले तर गौरी स्वकुळ यांनी सूत्रसंचालन केले.
आबा बागुल यांच्या पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते
Newsworldmarathi Pune: शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून आदिमायेच्या जागराने पुणे शहर भक्तिभावाने गजबजले आहे. या काळात पुणेकरांना सांस्कृतिक मेजवानी देणाऱ्या *पुणे नवरात्र महोत्सवाचे* उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. माजी उपमहापौर आणि ज्येष्ठ नेते आबा बागुल यांच्या पुढाकारातून दरवर्षी हा महोत्सव मोठ्या दिमाखात आयोजित केला जातो.
यंदा मात्र महोत्सवाच्या उद्घाटनाला वेगळेच राजकीय रंग मिळाला. विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसपासून दुरावलेले आबा बागुल यांनी आपल्या मंचावर भाजपमधील वजनदार मंत्री आणून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले लक्ष्य साधल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे बावनकुळे यांनी गेली ३५ वर्षे पाळलेला वैयक्तिक नियमही यावेळी मोडला.
उद्घाटनावेळी बावनकुळे म्हणाले, “गेल्या ३५ वर्षांपासून मी घरी घटस्थापना केल्यानंतर दिवसभर महालक्ष्मीची पूजा-अर्चना करतो आणि घराबाहेर जात नाही. पण आबा बागुल यांनी लक्ष्मीमातेचे दर्शन घेण्यासाठी आग्रह केला आणि तो मोडता आला नाही. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच हा नियम मोडला आहे.”
दरवर्षी महोत्सवाच्या मंचावर काँग्रेस नेत्यांची उपस्थिती असते. मात्र यंदा भाजप नेत्यांचा मोठा जमाव दिसून आला. महसूल मंत्री बावनकुळे यांच्यासह पर्वती मतदारसंघाच्या आमदार व राज्यमंत्री माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे हे भाजप नेते एकाच मंचावर आले. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचीही उपस्थिती होती.
यामुळे काँग्रेसपासून दुरावलेले आणि नव्या राजकीय समीकरणांच्या शोधात असलेले आबा बागुल यांनी आपला प्रभाव दाखवत भाजपच्या मंत्र्याला मंचावर आणल्याचे बोलले जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बागुल यांच्या या पावलाकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागले आहे.
सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात घटस्थापना
Newsworldmarathi Pune: शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून सुखसागरनगर येथील अंबा माता मंदिरात भक्तिमय वातावरणात देवीची घटस्थापना करण्यात आली. यावर्षी मंजू राजेश राठी व राजेश धनराज राठी यांच्या हस्ते विधिवत स्थापना झाली.
या मंदिराची स्थापना १९९३ मध्ये स्व. धनराज मालचंद राठी यांनी केली. त्यानंतर दरवर्षी नवरात्र महोत्सवासह महाशिवरात्री, दत्तजयंती, हनुमान जयंती, जन्माष्टमी, श्रावण मास, दहीहंडी यांसारखे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
नवरात्र महोत्सवात दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती होते. देवीचे नवीन रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. मंदिर परिसरात भोंडला, भजन, प्रवचन, श्रीसुक्त पठण यांचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या महोत्सवात १५१ कन्यांचे कन्यापूजन तसेच हलवा पुरी प्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गेल्या २९ वर्षांत देवीच्या आशिर्वादाने अनेक सकारात्मक बदल परिसरात झाले आहेत. मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी मैनाबाई धनराज राठी यांच्या मार्गदर्शनाखाली राठी कुटुंब मनोभावे पार पाडत आहे. महिला व मुलांसाठी खाऊ वाटपही करण्यात आले आहे.
मंदिराचे पदाधिकारी मगराज राठी म्हणाले, “अंबा माता मंदिर हे सुखसागर कात्रज परिसरातील श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे. नवरात्र महोत्सवाने परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते.”
या मंदिराची स्थापना १९९३ मध्ये स्व. धनराज मालचंद राठी यांनी केली. त्यानंतर दरवर्षी नवरात्र महोत्सवासह महाशिवरात्री, दत्तजयंती, हनुमान जयंती, जन्माष्टमी, श्रावण मास, दहीहंडी यांसारखे धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
नवरात्र महोत्सवात दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते देवीची आरती होते. देवीचे नवीन रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. मंदिर परिसरात भोंडला, भजन, प्रवचन, श्रीसुक्त पठण यांचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या महोत्सवात १५१ कन्यांचे कन्यापूजन तसेच हलवा पुरी प्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गेल्या २९ वर्षांत देवीच्या आशिर्वादाने अनेक सकारात्मक बदल परिसरात झाले आहेत. मंदिर व्यवस्थापनाची जबाबदारी मैनाबाई धनराज राठी यांच्या मार्गदर्शनाखाली राठी कुटुंब मनोभावे पार पाडत आहे. महिला व मुलांसाठी खाऊ वाटपही करण्यात आले आहे.
मंदिराचे पदाधिकारी मगराज राठी म्हणाले, “अंबा माता मंदिर हे सुखसागर कात्रज परिसरातील श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र आहे. नवरात्र महोत्सवाने परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते.”
वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’
Newsworldmarathi Mumbai:आयुर्वेद क्षेत्रातील अद्वितीय कार्याबद्दल वैद्यरत्न डॉ. चंद्रकुमार देशमुख यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार २०२५’ने सन्मानित करण्यात आले. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन व विस्तार केंद्र–राजकोट (टीडीसी पीपीडीसी) आग्रा, MSME मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील एका तारांकित हॉटेलमध्ये हा भव्य सोहळा पार पडला.
समारंभास देशभरातील शेकडो आयुष चिकित्सक व थेरपिस्ट उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय सिनेस्टार श्रेया बुगडे, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, डॉ. मंगला कोहली (सल्लागार – UN Child Women व माजी सहायक महानिदेशक, आरोग्य सेवा निदेशालय, भारत सरकार) तसेच डॉ. प्रवीण जोशी (राष्ट्रीय सल्लागार – AIMA व माजी उपनिदेशक, TDC आग्रा) उपस्थित होते.
विशेष अतिथी म्हणून गणेश एम. (सहाय्यक संचालक, विस्तार केंद्र–राजकोट व उदयपूर, MSME TDC, आग्रा) आणि प्रणव पंड्या (प्रशिक्षण अधिकारी, MSME राजकोट) यांनी हजेरी लावली. या मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. देशमुख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आयुर्वेद क्षेत्रातील योगदानामुळे डॉ. देशमुख यांना यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना ‘वैद्यरत्न २०२५’, ‘आंतरराष्ट्रीय आयुर्वेद प्रसारक’ (नेपाळ सरकारतर्फे) तसेच ‘वारी वैद्य पुरस्कार’ (माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते) हे सन्मान मिळाले आहेत.
या सर्व पुरस्कारांनी डॉ. चंद्रकुमार देशमुख यांचे कार्य अधिक उज्ज्वल झाले असून, आयुर्वेद चिकित्सा व संशोधन क्षेत्रासाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रसार होत असून, नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ते आदर्शवत ठरले आहेत.
आयुर्वेद क्षेत्रातील योगदानामुळे डॉ. देशमुख यांना यापूर्वीही अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. यावर्षी त्यांना ‘वैद्यरत्न २०२५’, ‘आंतरराष्ट्रीय आयुर्वेद प्रसारक’ (नेपाळ सरकारतर्फे) तसेच ‘वारी वैद्य पुरस्कार’ (माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते) हे सन्मान मिळाले आहेत.
या सर्व पुरस्कारांनी डॉ. चंद्रकुमार देशमुख यांचे कार्य अधिक उज्ज्वल झाले असून, आयुर्वेद चिकित्सा व संशोधन क्षेत्रासाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत. त्यांच्या कार्यामुळे आयुर्वेदाचा जागतिक स्तरावर प्रसार होत असून, नव्या पिढीतील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी ते आदर्शवत ठरले आहेत.
आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा प्रस्ताव मंजूर
Newsworldmarathi Pune: पुण्याच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून शैक्षणिक नगरी पुण्यात नवे शैक्षणिक द्वार खुले होत आहे. देशातील नामांकित व्यवस्थापन शिक्षणसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात सुरु होत आहे. केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडलेल्या प्रस्तावाला संस्थेच्या डीन कमिटी आणि त्यानंतर Academic Council ने मान्यता दिल्यानंतर हा निर्णय अधिकृत झाला आहे.
आयआयएम मुंबईचे केंद्र पुण्यात व्हावे, यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रस्ताव दिला होता. त्यावर निर्णय होत पुणे केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे केंद्राची स्थापना ही केवळ पुण्याच्या नव्हे, तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि औद्योगिक परंपरेतील एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. पुणे हे देशातील अग्रगण्य तंत्रज्ञान व औद्योगिक केंद्र म्हणून जलद गतीने विकसित होत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे, अत्याधुनिक संशोधन-विकास केंद्रे, वाढती स्टार्टअप संस्कृती आणि Oxford of the East अशी मिळालेली शैक्षणिक ओळख या सर्व पार्श्वभूमीवर आयआयएम मुंबईचा कॅम्पस शहरासाठी केवळ नैसर्गिक पूरकच ठरणार नाही, तर जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाला इथल्या विद्यार्थ्यांना थेट दाराशी आणून देणार आहे.
या कॅम्पसच्या माध्यमातून उद्योजकतेला नवा उन्मेष मिळेल, व्यवस्थापन कौशल्यांचा वापर करून नाविन्यपूर्ण कल्पनांचे यशस्वी व्यवसायांत रूपांतर साधता येईल. हा उपक्रम स्वावलंबी भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असून विकसित भारत २०४७ या राष्ट्रीय दृष्टिकोनाला बळकटी देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
याबाबत माहिती देताना आयआयएम मुंबईचे संचालक प्रा. मनोज कुमार तिवारी म्हणाले, ‘आमचा प्रयत्न राहील की शैक्षणिक वर्ष २०२६ पासून प्रस्तावित पुणे केंद्रात क्षमता विकास कार्यक्रम तसेच अल्पावधी कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करता यावेत. ही महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे मनःपूर्वक आभारी आहोत. यामुळे आयआयएम मुंबईला विकसित भारत २०४७ या ध्येयाच्या दिशेने मोलाचे योगदान देता येईल.’
कोट
मुंबई-पुण्यामध्ये ‘नॉलेज कॉरिडॉर’ तयार होईल : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
‘पुण्यात आयआयएम मुंबईचे केंद्र स्थापन होणे ही अभिमानाची बाब आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आणि पुणे हे तंत्रज्ञान व शिक्षणाचे केंद्र आहे. या दोन्ही शहरांमध्ये निर्माण होणारा ‘Knowledge Corridor’ ही देशाच्या औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रासाठी नवी पर्वणी ठरेल. या निर्णयामुळे महाराष्ट्राला जागतिक दर्जाच्या व्यवस्थापन शिक्षणाची नवी ऊर्जा मिळेल आणि नव्या पिढीसमोर संधींचे विस्तीर्ण क्षितिज खुले होईल. पुणे अनेक दशकांपासून देशाचे प्रमुख शैक्षणिक केंद्र राहिले आहे आणि आता ते तंत्रज्ञान, उत्पादन तसेच आयटीचे बळकट हब म्हणूनही उदयास आले आहे. याच वैशिष्ट्यांचा विचार करून आयआयएम मुंबई आपला नवा कॅम्पस पुण्यात स्थापन करीत आहे.

