सुखसागर येथील श्री अंबामाता मंदिरात नवरात्रौत्सवाची भक्तिमय तयारी

0
Newsworldmarathi Pune: सुखसागर येथील श्री अंबामाता मंदिर ट्रस्टतर्फे यंदाचा नवरात्रौत्सव भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. स्वर्गीय धनराजजी मालचंदजी राठी यांनी १९९३ मध्ये सुखसागर नगर परिसरात या ट्रस्टची स्थापना केली होती. गेल्या ३२ वर्षांपासून ट्रस्टतर्फे धार्मिक परंपरा जपत जन्माष्टमी, दत्तजयंती, गणेशोत्सव आणि नवरात्र महोत्सवासारखे अनेक धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित केले जात आहेत. यंदा सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेनंतर नवरात्रौत्सवाला सुरुवात होईल. दरम्यान सकाळी व संध्याकाळी होणाऱ्या पूजाअर्चा, अभिषेक व आरतीसोबतच भजन, दांडिया, भोंडले यांसारखे पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. महिलांसाठी खास सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. दररोज सकाळी ८ वाजता व सायंकाळी ७:३० वाजता आरती होणार असून दिवसभर प्रसाद वाटपाची सोय असेल. अष्टमीच्या दिवशी देवीची फुलांनी आकर्षक सजावट केली जाईल. तसेच हलवा-पुरीचा महाप्रसाद भाविकांना दिला जाईल. मान्यवरांच्या हस्ते आरती होणार असून परिसरातील विविध मंडळांतर्फे देवीला तोरण अर्पण केले जाईल. या धार्मिक वातावरणात भाविकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होईल अशी अपेक्षा आहे. भाविकांच्या सोयीसाठी मंदिर परिसरात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघणार असून सुरक्षा दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंसेवक व सिक्युरिटी गार्ड्सची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सोयही केली आहे. विश्वस्त मगराजजी एम. राठी, रविंद्र डी. राठी, राजेश डी. राठी आणि संपूर्ण राठी परिवारासह स्वयंसेवक, तसेच पोलिस यंत्रणा शिस्तबद्ध नियोजनात सक्रिय सहभागी आहेत. दररोज सुमारे पाच ते सहा हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतील असा अंदाज आहे. श्री अंबामाता मंदिर ट्रस्टतर्फे परिसरातील सर्व नागरिक, भाविक व भक्तजनांना नवरात्रोत्सवाच्या या सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा मुळशी पश्चिम मंडळाचा सेवा पंधरवडा अंतर्गत वृक्षारोपण उपक्रम

Newsworldmarathi Pune: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने भारतीय जनता युवा मोर्चा मुळशी तालुका पश्चिम मंडळाच्या वतीने “वृक्षारोपण – एक पेड माँ के नाम” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वढणे आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव सोलणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. वृक्षारोपण उपक्रम मुळशी तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळा, आयटीआय, तसेच कॉलेजेसमध्ये आयोजित करण्यात आला. या अभियानाचा उद्देश पर्यावरण संवर्धनाबरोबरच पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या “सेवा हेच परमधर्म” या संदेशाशी सुसंगत पद्धतीने समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करणे हा होता. हा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चा मुळशी पश्चिम मंडळ अध्यक्ष लखन तात्याबा गोळे यांच्या पुढाकाराने यशस्वीपणे पार पडला. या वेळी माजी अध्यक्ष राजाभाऊ वाघ, महामंत्री सुनील शिंदे, सरचिटणीस यशवंत धुमाळ, सरचिटणीस अमोल गोळे, माजी अध्यक्ष एस.सी. मोर्चा निलेश लांडगे, युवा मोर्चा सरचिटणीस संजय दूरकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष संजय पांढरे, युवा मोर्चा चिटणीस सचिन उभे, सोपान बागडे, सचिव सुयोग गोळे, सचिव सागर सुतार, सामाजिक कार्यकर्ते अजय सुतार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण करून सामाजिक जबाबदारीची जाणीव अधोरेखित केली. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल हीच खरी सेवा असल्याचे मत यावेळी व्यक्त झाले. वृक्षारोपणासोबतच “हरित मुळशी, समृद्ध भारत” हे ब्रीद घेऊन सर्वांनी अधिक जबाबदारीने पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात पर्यावरणाबद्दल सकारात्मक संदेश पोहोचला. उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून, ती पुढील पिढ्यांसाठी हिरवाई टिकवण्याची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले. “एक पाऊल समृद्धीकडे – एक पाऊल सेवेकडे!” या संदेशासह सेवा पंधरवड्यातील वृक्षारोपण उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त पोषण अभियान; नगरसेविका वर्षा साठे यांचे आयोजन

0
Newsworldmarathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध सामाजिक व जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील नगरसेविका वर्षा भिमराव साठे आणि भाजप अनुसूचित जाति मोर्चाचे अध्यक्ष भिमराव साठे यांच्या वतीने महिलांसाठी आणि बालकांसाठी पोषण अभियान २०२५ हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम नगरसेविका वर्षा साठे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला. या अभियानाचा प्रमुख उद्देश महिलांमध्ये आणि बालकांमध्ये पोषणाबाबत जागरूकता निर्माण करणे, संतुलित आहाराचे महत्त्व पटवून देणे तसेच कुपोषण निर्मूलनासाठी ठोस उपाय राबवणे हा आहे. महिलांना व बालकांना योग्य पोषण मिळाले तरच कुटुंब आणि समाज आरोग्यदायी राहील, या विश्वासातून हा उपक्रम हाती घेण्यात आला. “या उपक्रमाचा लाभ परिसरातील प्रत्येक महिलेला घ्यावा आणि पोषणयुक्त आहाराबाबत जनजागृती पुढे नेण्यात यावी,” असे आवाहन नगरसेविका वर्षा साठे यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अरुणा पवार यांनी महिलांना दैनंदिन आहारातील पोषणतत्त्वांची गरज समजावून सांगितली. प्रमुख मार्गदर्शन आरोग्य अधिकारी मृदाला होळकर यांनी केले. महिलांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांनी कुपोषण टाळण्यासाठी घरगुती पातळीवर सहज करता येणारे उपायही सांगितले. या उपक्रमात सुनिता ओव्हाळ, माधुरी रणसिंग, सुनिता करंडे, रेखा परदेशी, रेखा कांबळे, स्वाती कंक, मानसी वाडेकर, वंदना दिवटे, सरोजा जाधव, दिपाली परदेशी, भाग्यश्री कोळी, श्वेता कांबळे, मंगल वेताळ, स्वाती नागटिळक, इंदुबाई डोळसे, स्वाती पाथरे, सुधा सरकाळे, कुसुम घोग आणि अनेक स्थानिक महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. या अभियानातून महिलांना पोषणमूल्ययुक्त आहाराचे फायदे आणि मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात नवे शिखर गाठल्याचे मत भाजप अनुसूचित जाति मोर्चाचे अध्यक्ष भिमराव साठे यांनी व्यक्त केले.

अखेर सेव्हन लव्हज चौक रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात; मा. नगरसेविका अर्चना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

0
Newsworldmarathi Pune : शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित तसेच सुलभ वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सेव्हन लव्हज चौक परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली. या रस्ता रुंदीकरणाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत हा विषय प्राधान्याने पुढे नेला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून जवळपास १७ फूट रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून वाहतुकीतील अडथळे कमी होऊन सुरक्षिततेची हमी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कामाचे भूमिपूजन मा. नगरसेविका अर्चना तुषार पाटील आणि पुणे महानगरपालिकेचे उपाध्यक्ष तुषार पाटील यांच्या हस्ते पार पडले. भूमिपूजनावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाधान व्यक्त केले. नागरिकांनी सांगितले की, सेव्हन लव्हज चौक परिसरात दररोज प्रचंड वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे अपघाताचा धोका कायम निर्माण होत असे. रस्ता रुंदीकरणानंतर या भागातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटणार असून पादचारी आणि वाहनधारक दोघांसाठीही सुलभता निर्माण होणार आहे. या उपक्रमामुळे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यास मदत होणार असल्याचे मत मा. नगरसेविका अर्चना पाटील यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत साजरा; मा. नगरसेविका रूपाली धाडवे यांचे आयोजन

0
Newsworldmarathi Pune: देशाचे लोकप्रिय व यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सामाजिक उपक्रमातून विशेष साजरा करण्यात आला. पुणे शहर भाजप चिटणीस व माजी नगरसेविका रूपाली धाडवे तसेच माजी नगरसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे यांच्या पुढाकारातून इंदिरानगर येथील आधार मूकबधिर विद्यालयामध्ये हा उपक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत विद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याशी जोडलेला हा उपक्रम उपस्थित मान्यवरांनी कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी मुकबधिर विद्यार्थ्यांसोबत केक कापून मोदीजींचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी हातवारे भाषेतून मोदीजींप्रती आपला आदर व आनंद व्यक्त केला. या सोहळ्यात उपस्थितांना भावनिक वातावरणाचा अनुभव आला. कार्यक्रमाला माजी नगरसेवक दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे, सामाजिक नेते बाबुरावजी घाडगे, आधार मूकबधिर विद्यालयाचे प्रमुख अधिकारी, शिक्षक, कर्मचारी तसेच मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजातील विशेष घटकांसोबत आनंद वाटण्याचा आणि त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न झाल्याचे आयोजकांनी सांगितले. रूपाली धाडवे यांनी सांगितले की, “मोदीजींनी नेहमी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणाऱ्या योजनांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्याच प्रेरणेने आज आम्ही हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद हा खऱ्या अर्थाने आमच्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार आहे.”

‘स्वस्थ नारी-सशक्त परिवार’ अभियानाचा पुण्यातही प्रारंभ

0
Newsworldmarathi Pune: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार येथून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ केला. हा उपक्रम देशभर राबवला जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुण्यात कमला नेहरु रुग्णालयात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयुक्त नवल किशोर राम, भाजप मा. सभागृह नेते गणेश बिडकर, व भाजपचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, डॉक्टर्स आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत देशभरातील एक लाखांहून अधिक शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आरोग्य शिबिरांचे आयोजन करून व्यापक तपासण्या करण्यात येणार आहेत. आपल्या माता आणि भगिनींना समर्पित या उपक्रमाचे ध्येय म्हणजे महिलांसाठी व बालकांसाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम करणे, त्यांची उपलब्धता वाढवणे व जनजागृती करणे हे आहे. याअंतर्गत सर्व आंगणवाड्यांमध्ये ‘पोषण महिना’ साजरा करून समावेशक आरोग्य व पोषणाला चालना दिली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी ज्या जनभावनेने समाजकार्य केले आहे, त्याच भावनेतून या अभियानाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. पुण्यातील कमला नेहरू हॉस्पिटल मध्ये सुरू असलेल्या या अभियानाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केले.

महेश नागरी मल्टिस्टेटकडून ९ टक्के लाभांश जाहीर

0
पुणे, १७ : महेश नागरी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड या संस्थेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच सुखसागरनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सभेचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष राजेश धनराजजी राठी यांनी भूषवले, तर कार्यकारी संचालक व सीईओ मगराज मिश्रीमलजी राठी यांनी संस्थेचा वार्षिक ताळेबंद सादर केला. यावेळी सभासदांना चालू आर्थिक वर्षासाठी ९ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेच्या एकूण ठेवी २०३ कोटी १३ लाख रुपये असून, कर्जवाटप १२१ कोटी २८ लाख रुपयांचे झाले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात संस्थेला तब्बल १ कोटी ७७ लाख रुपयांचा नफा झाला आहे. संस्थेची एकूण उलाढाल ३२५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत संस्थेचा राखीव निधी २४.५१ कोटी रुपये आणि भाग भांडवल ३.४१ कोटी रुपये असल्याचे राठी यांनी सभेत स्पष्ट केले. या सभेला जवळपास ६०० सभासदांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी विविध क्षेत्रातील दिवंगतांना श्रदधांजली वाहण्यात आली. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष प्रविण बांगड यांनी केले. संस्थेच्या कामकाजात आगामी काळात आणखी वाढ होणार असून, संस्थेला नवीन दोन शाखा सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. लवकरच पिंपरी-चिंचवड व गुजरातमधील सुरत शहरात शाखा सुरु होणार आहेत. विद्रद्यमान सहा शाखांबरोबरच एकूण आठ शाखांचे जाळे उभे राहणार आहे. महेश नागरी मल्टिस्टेटची स्थापना ७ सप्टेंबर १९९८ रोजी झाली असून, १ ऑक्टोबर १९९८ रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर कामकाजाला सुरुवात झाली होती. गेल्या २७वर्षामध्ये संस्थेने सातत्याने प्रगती करत सभासदांचा विश्वास संपादन केला आल्याचे राठी यांनी नमूद केले.
आमची संस्था सुरुवातीपासूनच प्रगती करत असून सर्व नियमांचे काटेकोर पालन करते. संस्था कोणत्याही मोठ्या कंपन्या किंवा रिअल इस्टेट क्षेत्राला वित्तपुरवठा करत नाही. त्याऐवजी स्थानिक व मध्यमवर्गीय सभासदांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करून कर्जवाटप केले जाते. संस्थेतर्फे वाहन कर्ज, सोने तारण कर्ज, तसेच नवीन सोने खरेदीसाठी सुवर्ण संचय योजना राबविण्यात येत असून त्याचा सभासदांनी लाभ घ्यावा.
राजेश राठी, अध्यक्ष, महेश नागरी मल्टिस्टेट

विद्यापीठस्तरीय ‘ जल्लोष २०२५’ स्पर्धेत नौरोसजी वाडिया महाविद्यालयाची विजेतेपदाची हॅट्रिक!

0
Newsworldmarathi Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या विद्यापीठस्तरीय आंतर-महाविद्यालयीन ‘जल्लोष २०२५’ युवक महोस्तव स्पर्धेत यजमान नौरोसजी वाडिया महाविद्यालयाने सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविण्याचा बहुमान मिळविला. पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते महाविद्यालयाने विजेत्यापदाचा करंडक स्वीकारला. पुणे विभागीय या स्पर्धेत पुणे शहर, पुरंदर, हवेली, भोर, वेल्हे आणि मुळशी तालुक्यातील पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील १२०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी संगीत, नाट्य, नृत्य, साहित्य आणि ललित कला अशा पाच प्रमुख गटामधून २७ कला प्रकारामध्ये सहभाग घेतला होता. वाडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी एकूण ८८ गुणांसह विजेतेपद पटकवले तर उपविजेत्या मॉडर्न लॉं कॉलेजला ३९ गुण मिळाले. या स्पर्धेत महाविद्यालयाने भारतीय सुगम गायन, ताल-वाद्य वादन, लोकवाद्यवृंद, लोकनृत्य, प्रहसन, व मुकनाट्य या प्रकारात प्रथम, पाश्चिमात्य वैयक्तिक गायन, एकांकिका, नकला, वादविवाद या प्रकारामध्ये द्वितीय, तर पाश्चिमात्य वाद्य वादन मेहंदी व कोलाज मध्ये तृतीय असे एकूण १४ कला प्रकारामध्ये क्रमांक पटकाविले. सदर कार्यक्रमास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य,अधिसभा सदस्य, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक तसेच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वसंत चाबुकस्वार, सांस्कृतिक समन्वयक प्रा. डॉ. हनुमंत लोखंडे, विद्यार्थी विकास कल्याण अधिकारी डॉ. महेश पांढरपट्टे व सर्व शिक्षक-शिक्षेकतर कर्मचारी मोठ्या संख्येने होते

३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार भव्य उद्घाटन

Newaworldmarathi Pune: कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत आणि धार्मिक भक्तीभावाचा संगम असणाऱ्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदाचे ३१वे वर्ष दिमाखात साजरे होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, राज्याच्या नागरी विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. मेधा कुलकर्णी, आमदार डॉ. विश्वजित कदम, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण या सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शितल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे व वैष्णवी पाटील विशेष उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचे सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे रसिकांसाठी विनामूल्य असतील, अशी माहिती आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरवर्षीप्रमाणे घटस्थापना सोमवार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ६.४१ वाजता शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात मा. उपमहापौर, अध्यक्ष आबा बागुल व जयश्री बागुल यांच्या हस्ते होईल. यंदा मंदिर परिसरात दक्षिण भारतातील माधुराई येथील ७२ फुट उंचीचे मीनाक्षी मंदिर साकारले जात असून सुमारे ८० कलावंतांनी हा देखावा उभारला आहे. पुरस्कार वितरण उद्घाटन सोहळ्यात समाजकार्यात व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो. यंदा ‘महर्षी पुरस्कार’ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर ‘श्री लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार’ प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, समाजकार्यकर्त्या डॉ. मेघा पुरव सामंत, बुलढाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना देण्यात येईल. तसेच डॉ. मयूर कर्डिले व डॉ. अरविंद खोमणे यांचाही विशेष सत्कार होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उद्घाटन सोहळ्यात सितार, व्हायोलिन, बासरी आणि तबल्याची जुगलबंदी असलेला ‘आनंद तरंग’ हा कार्यक्रम डॉ. नीलिमा राडकर व माधवी करंदीकर यांच्या ग्रुपकडून सादर केला जाईल. नृत्यगुरु पं. शमा भाटे ‘शरण्ये रुद्र चंडिके’ हा कथ्थक कार्यक्रम सादर करतील. विनोद व स्वाती धोकटे यांचा ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ आणि मराठी सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करेल. सलग ११ दिवस संगीतमय सोहळा उद्घाटनानंतर महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम सलग ११ दिवस विजयादशमीपर्यंत दररोज सायं. ७ वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहेत. २३ सप्टेंबर : ‘नाईनटीज मेलडी’ – अभिजित सराफ, कल्याणी देशपांडे, अक्षय घाणेकर. २४ सप्टेंबर : ‘इश्क सुफियाना’ – संदीप पंचवाटकर, प्रवीण अवचर, संदीप उबाळे, विनल देशमुख. २५ सप्टेंबर : ‘स्वर साम्राज्ञीयाँ’ – राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर, चारुलता पाटणकर. २६ सप्टेंबर : ‘म्युझिकल मास्टर्स – एल.पी. & आर.डी.’ – पल्लवी पत्की ढोले, संजय हिवराळे, रफी हबीब आदी कलाकार. २७ सप्टेंबर : ‘अस्मिता महाराष्ट्राची’ – पृथ्वीराज नागवडे, अंकिता शिवतरे, सौगंध कापसे व ५० कलाकारांची साथ. २८ सप्टेंबर : महिलांसाठी खास आकर्षण ठरलेला भव्य ‘लावणी महोत्सव’ सलग १२ तास चालणार आहे. २९ सप्टेंबर : ‘टोटल म्युझिक धमाका’ – मुकेश देढीया, तेजस्विनी पाहुजा, चंद्रशेखर महामुनी, माधुरी भोसेकर व आकाश सोलंकी. ३० सप्टेंबर : ‘बेमिसाल रफी’ – आली हुसेन, आनंद म्हसवडे, कल्याणी देशपांडे. १ ऑक्टोबर : ‘हृदयात वाजे समथिंग’ – तन्वी दात्ये, ए सराफ, अवंतिका धुमणे, आर.जे. बंड्या. २ ऑक्टोबर : सांगता कार्यक्रम ‘सोलफुल किशोर कुमार’ – जितेंद्र भूरूक, रुपाली घोगरे व ग्रुप. या सोहळ्याचे आयोजन अध्यक्ष आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, उपाध्यक्ष घनशाम सावंत, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी, अमित बागुल आणि हेमंत बागुल या सर्वांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू एंजल स्कूलतर्फे वृक्षारोपण

0
Newsworldmarathi Pune: आपल्या देशाचे लोकप्रिय व दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवसानिमित्त न्यू एंजल स्कूलच्या वतीने पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात आला. या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास मा. नगरसेविका व पुणे शहर भाजप चिटणीस रूपाली दिनेश धाडवे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते तसेच शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी एकमुखाने “एक व्यक्ती – एक वृक्ष” हा संकल्प करून समाजातील सर्वांनी वृक्षलागवडीसाठी पुढे यावे, असे आवाहन केले. पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने या जबाबदारीत आपला वाटा उचलला पाहिजे, हा संदेश विद्यार्थ्यांनी घोषणांमधून दिला. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना रूपाली धाडवे म्हणाल्या, “आजच्या काळात वृक्ष लागवड ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून जीवन जगण्यासाठी आवश्यक अशी गोष्ट आहे. भावी पिढ्यांसाठी शुद्ध हवा, स्वच्छ पर्यावरण आणि हरित वातावरण ठेवायचे असेल, तर प्रत्येकाने वृक्षारोपण करणे आवश्यक आहे.” विद्यार्थ्यांनी घेतलेल्या संकल्पाचे त्यांनी कौतुक केले आणि अशा उपक्रमांमधूनच समाजात पर्यावरणाबद्दल जनजागृती होत असल्याचे सांगितले. या सोहळ्यास शाळेचे सर्व शिक्षक, पदाधिकारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राबवलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.