शिवदर्शन–सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

Newsworldmarathi Pune: पुण्यातील शिवदर्शन–सहकारनगर परिसरातील श्री लक्ष्मीमाता मंदिर नवरात्रौनिमित्त सजले असून, लक्षावधी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघणारा ‘मीनाक्षीपुरम मंदिर’ देखावा विशेष आकर्षण बनला आहे. हजारो भक्तांची येथे गर्दी उसळत असून, श्री लक्ष्मीमाता मनोकामना पूर्ण करते अशी भाविकांची श्रद्धा आहे. संपूर्ण मंदिराला नव्या रंगाने झळाळी आली आहे. मंदिराभोवती आकर्षक भव्य कमानी उभारण्यात आल्या असून, प्रशस्त मंडपही उभारण्यात आला आहे. मंदिरावर एलईडी लाइट्ससह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून, साकारण्यात आलेला ‘मीनाक्षीपुरम मंदिर’ देखावा १००हून अधिक कारागिरांनी सुमारे १ महिना कष्टपूर्वक तयार केला आहे. विविध नैसर्गिक सुवासिक लाखो फुलांची आरास मंदिरावर दररोज केली जाते. मंदिराचे प्रांगण आकर्षक रांगोळीने रोज सजविले जाते. मंदिरातील श्री लक्ष्मीमातेची संगमरवरी मूर्ती अधिक तेजोमय दिसत आहे. येथे पूजा व आरती रोज होत असून, धूप व उदबत्त्यांच्या मधुर वासामुळे साऱ्या मंदिर परिसरात मांगल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. घटस्थापनेच्या दिवशी येथे घटस्थापना पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाली. तसेच मीनाक्षीपुरम मंदिराच्या प्रतिकृतीचेही उद्घाटन करण्यात आले. श्री लक्ष्मीमातेला सोन्याचा मुकुट, विविध सोन्याचे दागिने व सोन्याची आभूषणे यांसह चांदीची साडी यांनी सजविण्यात आले आहे. येथे रोज सकाळी व संध्याकाळी श्री लक्ष्मीमातेची आरती, तसेच प्रसादवाटप होत असून, नवरात्रौच्या कालावधीत रोज अनेक महिला मंडळांची भजने संपन्न होत आहेत. अष्टमीला होमही करण्यात येणार आहे. हे मंदिर भाविकांसाठी रोज सकाळी ६.०० ते रात्री १०.००पर्यंत खुले असणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कॅमेरे बसविण्यात आले असून, पोलीस बंदोबस्तही चोख आहे. याच मंदिराच्या प्रांगणात पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे कार्यक्रम व स्पर्धा होत आहेत, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.

भंडारी समाजसेवा ट्रस्टतर्फे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

Newsworldmarathi Pune: भंडारी समाजसेवा ट्रस्ट, श्री रेणुका माता मंदिर, केशवनगर यंदा आपल्या शारदीय नवरात्र उत्सवाचे २५ वे रौप्य महोत्सवी वर्ष भक्तिभावात आणि उत्साहात साजरे करत आहे. या विशेष पर्वाचे औचित्य साधून, गुरुवार दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी ट्रस्टच्या वतीने एक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान हे महादान असल्याचे सांगून अनेकांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. या उपक्रमाची माहिती सभागृह नेते तसेच भंडारी समाजसेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनाथ यशवंत भिमाले यांनी दिली. भिमाले यांनी सांगितले की, दरवर्षी भंडारी समाजसेवा ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधिलकी जपत समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबविणे, हीच ट्रस्टची ध्येयधोरणे आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात रक्तदान शिबिरासह इतर उपक्रमांद्वारे समाजातील बांधवांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या रक्तदान शिबिरामुळे अनेकांना जीवनदान मिळेल, याबाबत ट्रस्ट सदस्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हेच या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. श्री रेणुका माता मंदिरात सुरू असलेला शारदीय नवरात्र उत्सव भक्तिरसात आणि उत्साहात साजरा होत असून, रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा सामाजिक कार्याशी जोडल्याने या उत्सवाला अधिकच अर्थपूर्ण परिमाण मिळाले आहे.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

0
Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराच्या प्रांगणात आयोजित क्रांती मळेगावकर प्रस्तुत ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत २० ते ७९ वयोगटातील २५० महिलांनी सहभाग घेऊन विविध खेळांचा आनंद लुटला. यामध्ये संगीत खुर्ची, तळ्यात-मळ्यात, उखाणे, चेंडूने ग्लास पाडणे, रस्सीखेच यांसह महिलांना विविध प्रश्न विचारून अतिशय विनोदी व खेळीमेळीच्या वातावरणात रंगतदार अशा स्पर्धांचा महिलांनी आनंद घेतला. होम मिनिस्टर स्पर्धेत : अॅड मयुरी देवकर – प्रथम क्रमांक – वॉशिंग मशीन राणी चौधरी – द्वितीय क्रमांक – मोबाईल अश्विनी निकम – तृतीय क्रमांक – मिक्सर योगिता पिंपळगावकर – चौथे क्रमांक – हॅण्ड मिक्सर सुरेखा तापडिया – पाचवा क्रमांक – कुकर सोनाली जांभुळकर – उत्तेजनार्थ अशा बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्याशिवाय सर्व महिलांना प्रत्येकी भेटवस्तू व अल्पोपहार देण्यात आला. प्रारंभी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांनी सर्वांचे स्वागत केले व महिला महोत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी अनुजा वाघोलीकर, प्राजक्ता ढवळे, वृषाली बागुल, प्रियांका मैत्राणी उपस्थित होत्या

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा सहप्रभारीपदी मुरलीधर मोहोळ

0
Newsworldmarathi Pune: भारतीय जनता पार्टीच्या वतीने आगामी तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीसाठी प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली असून यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची तामिळनाडू भाजपच्या निवडणूक सह-प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील घोषणा नवी दिल्ली येथील मुख्यालयातून पार्टीचे सचिव खासदार अरुण सिंह यांनी केली. केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यानंतर लगेचच मोठी संघटनात्मक जबाबदारी मोहोळ यांच्यावर पक्षाने सोपवली आहे. पुढील वर्षीच्या एप्रिलमध्ये तामिळनाडू विधानसभाची मुदत संपत असून त्याच आसपास तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील मोठे राज्य असलेल्या तामिळनाडूकडे भारतीय जनता पार्टीने विशेष लक्ष केंद्रित केले असून निवडणुकीच्या सात महिने आधीच प्रभारी आणि सह-प्रभारी यांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टीत बूथ स्तरावर कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर युवा मोर्चा, शिक्षण मंडळ, नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, पुणे महापौर, प्रदेश महामंत्री, केंद्रीय मंत्री आणि आता तामिळनाडू विधानसभा निवडणूक भाजपा सहप्रमुख असा संघटनात्मक प्रवास केला आहे. सलग तीस वर्ष संघटनेसाठी समर्पित भावनेने केलेल्या कार्याची दखल पक्षाकडून घेतल्याचे चित्र आहे. शिवाय निवडीच्या निमित्ताने केंद्रीय नेतृत्वाचा मोहोळ यांच्यावर असलेला विश्वास पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. या नियुक्तीनंतर मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मी भारतीय जनता पार्टीचा समर्पित आणि पूर्ण क्षमतेने कार्यरत असणारा कार्यकर्ता आहे. आजवर पार्टीने दिलेली प्रत्येक जबाबदारी ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नवी जबाबदारीही या भूमिकेतून निभावणार आहे. ‘माझ्यासारख्या बूथ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एका राज्याच्या निवडणुकीसाठी सह-प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळते, हे फक्त भारतीय जनता पार्टीतच होऊ शकते. नव्या जबाबदारीच्या रूपाने पार्टीने दाखवलेला विश्वास आगामी काळात सार्थ करण्यासाठी निश्चितच कार्यरत असेल. नव्या जबाबदारीबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा जी यांचे मनःपूर्वक धन्यवाद ! पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शाह जी यांच्या नेतृत्वात नवी जबाबदारी पार पाडेल, हा विश्वास व्यक्त करतो’, असेही मोहोळ म्हणाले.

संगीतक्षेत्रात सलील चौधरींचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे : आबा बागुल

0
Newsworldmarathi Pune: बंगाली, हिंदी आणि मल्याळयम चित्रपटांना दर्जेदार संगीत देणारे दिवंगत संगीतकार सलील चाैधरी यांची कारकीर्द दिशादर्शक होती. बहुभाषात चित्रपटांना संगीत देणाऱ्या चौधरी यांनी विविध १३ भाषेत संगीत निर्मिती केल्याने त्यांचे चाहते देशभरात दिसून येतात. संगीता साेबतच ते बासरी, पियानो या संगीत वादनात देखील पारंगत होते. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज संगीतकार यांना करिअरच्या सुरवातीच्या काळात संगीताचे प्रशिक्षण देण्यात त्यांचा पुढाकार होता. १५० पेक्षा अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे संगीत अजरामर झाले असून त्यांच्या कारकीर्दीला जन्मशताब्दी निमित्ताने उजाळा देणे महत्वपूर्ण असल्याचे मत पुणे नवरात्रौ महोत्सवाचे प्रमुख आबा बागुल यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संगीत क्षेत्रात “सलीलदा..” नावाने प्रसिद्ध असलेल्या सलील चौधरी यांचे “सुहाना सफर और ये मौसम हसीन..” हे गाणे गात आदरांजली वाहण्यात आली. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंदिर याठिकाणी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निवेदक संदीप पंचवाटकर निर्मित ‘इश्क सुफियाना’ या सुफी संगीताची आराधना करणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयाेजन पुणे नवरात्रौ महोत्सवाचे वतीने करण्यात आले. नामांकित गायक संदीप उबाळे, प्रवीण अवचार, विनल देशमुख यांच्यासह गायिका राधिका अत्रे यांनी दर्जेदार सुफी गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. ईश्वराच्या एका नावाचा सातत्याने उच्चार करुन त्याच्याशी एकरुप होण्याचा प्रयत्न सुफी गाण्यांचे माध्यमातून केला जातो. ईश्वराच्या प्रेमासाठी सुफी संगीत लिखाण केले जाते. मात्र, चित्रपट मध्ये त्यांच्या गोष्टीनुसार ते गरजेप्रमाणे कलाकार यांच्यासाठी वापरले जाते. पवित्र प्रेमाची व्याख्या सुफी गाण्यातून करण्यात येते. स्वत:ला विसरुन स्वत:चे सर्वस्व त्यागून ईश्वाराला प्राप्त करण्याचा प्रयत्न सुफी गायनातून केला जात असल्याची भावना निर्माते संदीप पंचवाटकर यांनी व्यक्त केली. गायिका राधिका आणि गायक विनल यांनी “साजदा तेरा साजदा..” या गाण्याने या कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर “सैय्या” .. “मितवा” ..”दगाबाज रे”..” इश्क सुफियाना”…”पिया रे पिया रे”..या गाण्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढत नेली. गायक संदीप, प्रवीण आणि विनल यांनी एकत्रित गायन केलेल्या “लगी तुमसे..तेरे मस्त…तेरा दीदार” गाण्यानी कार्यक्रम आणखी सजत गेला. “ख्वाजा मेरे”.. या गाण्यास तर रसिकांनी टाळ्यांची साथ देत, वन्स मोअर..म्हणत कार्यक्रमात उत्साह वाढवला. “वंदेमातरम” गायनाने कार्यक्रमाची जल्लोषात सांगता करण्यात आली. यावेळी गायकांना विविध गाण्यांना सिंथेसायझर वादनास सईद खान, बासरी- सचिन वाघमारे,बेस गिटार – विजय मूर्ती, ऑक्टोपॅड- असीफ इनामदार, ढोलकी- हर्षद गनबोटे तर तबला वर गोविंद कुडाळकर यांनी सर्मपक साथ दिली. याप्रसंगी जयश्री बागुल, घनश्याम सावंत ,विलास रत्नपारखी, ॲड.चंद्रशेखर पिंगळे, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, नंदकुमार कोंढाळकर, अमित बागुल, सागर बागुल उपस्थित होते.

पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये जेष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या आठवणींना उजाळा

0
Newsworldmarathi Pune: मराठी चित्रपटसृष्टी मध्ये तब्बल ६० वर्ष सुरेल संगीत गायन करणारे पद्मभूषण ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रंगभूमीवरील त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये श्रीनिवास खळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून गायन कार्यक्रमास सुरवात झाली. पुणे नवरात्रौ महोत्सवात २००० साली श्री लक्ष्मीमाता कलासंस्कृती पुरस्कार देऊन श्रीनिवास खळे यांना सन्मानित करण्यात आले होते तसेच त्यांनी त्यावेळी कार्यक्रम देखील सादर केला होता या आठवणींना याप्रसंगी उजाळा देण्यात आला. तसेच त्यांच्याशी संबंधित गाणी देखील गाण्यात आली. ३१वा पुणे नवरात्रौ महोत्सव मध्ये स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच याठिकाणी १९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमाचे देखील आयोजन यावेळी करण्यात आले होते. पुणे नवरात्रौ मोहत्सवचे आयोजक अध्यक्ष आणि माजी उपमहापौर आबा बागुल आणि जयश्री बागुल यांनी या सुरेख सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अँकर आर. जे. बंड्या याने आपल्या ओघवत्या शैलीने करत प्रेक्षकांना संपूर्ण कार्यक्रमात खिळवून ठेवले. १९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक अभिषेक सराफ, अक्षय घाणेकर कल्याणी घाणेकर, तन्वी दाते यांनी वेगवगेळया सुरेल गाण्यांचे गायन करत प्रेक्षकांची मने जिंकली. नामांकित गायक ए. आर. रहमान , कुमार सानू, उदित नारायण, सोनू निगम, अल्का याज्ञिक, श्रेया घोषाल यांच्या विविध गाण्यांचा समावेश यामध्ये होता. प्रेक्षकांनी १९९० च्या दशकातील सुरेल गाणी पुन्हा एकदा ऐकण्यास मिळाल्याने आनंद व्यक्त करत टाळ्या वाजवून तसेच आवडती गाणी गुणगुणत जल्लोषपूर्ण प्रतिसाद दिला. ए. आर. रहमान यांचे “दिल से रे…” हे गाणे गायक अभिषेक घाणेकर यांनी उत्साहपूर्ण वातावरणात गातच प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद देत “वन्स मोअर” म्हणत गाणे पुन्हा गाण्यास लावले. श्रेया घोषल यांनी गायलेल्या ” जादू है नशा है” गाणे गायिका कल्याणी देशपांडे यांनी सुमधुर आवाजात गात उपस्थितांची मने जिंकली. गायक अक्षय घाणेकर आणि गायिका कल्याणी देशपांडे यांनी एकत्रित गायलेल्या सुप्रसिद्ध आशिकी चित्रपटातील गाण्याला तर प्रेक्षकांनी शिट्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला. बॉम्बे चित्रपटातील ए.आर.रहमान यांचे अजरामर गाणे “तू ही रे..तेरे बिना में कैसे जिऊ” गाण्यात तर प्रेक्षक ताल्लिन झाल्याचे पाहावयास मिळाले, गायका सोबत एकत्रित गाणे गात त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. प्रथमच नवरात्रौ उत्सव मध्ये गायन करत असलेल्या तन्वी दाते हिच्या सुरेल गाण्यांनी देखील सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी नामांकित गायकांना संगीत वाद्य कलाकारांनी देखील उत्कृष्ट साथ दिली. ड्रम वादन_अभिजित भदे, रिदम मशीन_ओंकार इंगवले, सॅक्सोफोन_पीयुष तिवारी, पियानो_शंतनु जहागिरदार आणि भारत ढोरे, गिटार वादन अजय थोरात तर तबला वादन मंगेश जोशी यांनी केले. यावेळी आबा बागुल, नंदकुमार कोंढालकर, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, सुनील महाजन, निकिता मोघे, विलास रत्नपारखी, ॲड. चंद्रशेखर पिंगळे, द.स.पोळेकर उपस्थित होते.

“अभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा” तोक्यो इथे साजरा

Newsworldmarathi Team: अंतरराष्ट्रीय मराठी मंच जपानने आयोजित केलेला “आभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा” हा कार्यक्रम २३ सप्टेंबर २०२५ रोजी तोक्यो मधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडला. या कार्यक्रमा प्रमुख पाहुणे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय डॉ. उदय सामंत होते. या शिवाय महाराष्ट्र सरकारचे मराठी भाषा विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र सरकारचे उद्योग सचिव श्री. अनबलगन, श्री योगेंद्र पुराणिक आणि इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे आयोजन एदॊगावा इंडिया कल्चर सेंटरचे प्रमुख जपानचे लोकप्रिय माजी आमदार आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. योगेंद्र पुराणिक आणि जपान आंतरराष्ट्रीय मराठी मंच समन्वयक निरंजन गाडगीळ यांच्या नेतृत्वा खाली केले गेले होते. कार्यक्रमाला तोक्यो आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे ५०० मराठी लोकांची उत्साही गर्दी उपस्थित होती. कार्यक्रमात ढोल, ताशा आणि लेझीमसह पारंपारिक मराठी शैलीत मिरवणूक काढण्यात आली. ह्या व्यतिरिक्त मान्यवरांची भाषणे आणि स्थानिक मराठी कलाकारांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर केले गेले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे म्हणजे मराठी भाषा विभाग आणि तोक्यो मराठी मंडळ यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या अभिव्यक्त मासिकाच्या “अभिजात मराठी अभिमन मराठी विशेषांक” चे प्रकाशन. विशेषांकात स्थानिक लोकांनी केलेल्या लिखाणाचा दर्जा तसेच छापील विशेषांकाचा दर्जा बघून आपण स्थिमित झालो आहोत. या कार्यक्रमांमध्ये टोकियो लेझीम पथक आणि योकोहामा ढोल पथक यांनी एक सुंदर पालखीचे दृश्य सगळ्यांना दाखवले त्याचबरोबर स्वरमंडल यांचे भारुड आणि मनाचे श्लोक सादर केले. त्याच बरोबर गणेशवंदना आणि समूहगीत सादर करण्यात आले. अशी प्रतिक्रिया डॉ. किरण कुलकर्णी आणि डॉ देवरे ह्यांनी व्यक्त केली. डॉ. उदय सामंत यांनी येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांच्या विभागांकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, ज्यामध्ये नियमित ऑनलाइन मराठी भाषेचे वर्ग, जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुस्तकांचे वाचनालय आणि बिगर-मराठी भाषिकांसाठी इतर प्रचारात्मक कार्यक्रमांचा समावेश आहे. जगभरात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या मालिकेतील हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे अशाच प्रकारच्या कार्यक्रमांसाठी खूप उच्च दर्जाचा मानदंड निर्माण झाला आहे असे मंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांना सोहोळ्या निमित्त विशेष तयार केलेली कापडी पिशवी तसेच विशेषांकाची परत आणि मिठाईचा बॉक्स भेट करण्यात आला. हा कार्यक्रम आता दर वर्षी सादर केला जाईल. या ठिकाणी हॉलची सजावट मीरा बागुल आणि अश्विनी बापट यांनी खूप सुंदररित्या केली होती. उदय सामंत यांच्याकडून कलाकारांचे विशेष कौतुक टोकियो लेझीम पथक आणि योकोहामा ढोल पथक यांनी एक सुंदर पालखीचे दृश्य सगळ्यांना दाखवले त्याचबरोबर स्वरमंडल यांचे भारुड आणि मनाचे श्लोक सादर केले. त्याच बरोबर गणेशवंदना आणि समूहगीत सादर करण्यात आले. या ठिकाणी सादर करण्यात आलेले कार्यक्रम पाहून राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कलाकारांचे अभिनंदन केले

“अभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा” तोक्यो इथे साजरा

Newsworldmarathi Team: अंतरराष्ट्रीय मराठी मंच जपानने आयोजित केलेला “आभिजात मराठी, अभिमान मराठी सोहळा” हा कार्यक्रम २३ सप्टेंबर २०२५ रोजी तोक्यो मधील इंडिया इंटरनॅशनल स्कूल मध्ये पार पडला. या कार्यक्रमा प्रमुख पाहुणे, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री माननीय डॉ. उदय सामंत होते. या शिवाय महाराष्ट्र सरकारचे मराठी भाषा विभाग सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र सरकारचे उद्योग सचिव श्री. अनबलगन, श्री योगेंद्र पुराणिक आणि इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती . या कार्यक्रमाचे आयोजन एदॊगावा इंडिया कल्चर सेंटरचे प्रमुख जपानचे लोकप्रिय माजी आमदार आणि शिक्षण विभागाचे सचिव डॉ. योगेंद्र पुराणिक आणि जपान आंतरराष्ट्रीय मराठी मंच समन्वयक निरंजन गाडगीळ यांच्या नेतृत्वा खाली केले गेले होते. कार्यक्रमाला तोक्यो आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या सुमारे ५०० मराठी लोकांची उत्साही गर्दी उपस्थित होती. कार्यक्रमात ढोल, ताशा आणि लेझीमसह पारंपारिक मराठी शैलीत मिरवणूक काढण्यात आली. ह्या व्यतिरिक्त मान्यवरांची भाषणे आणि स्थानिक मराठी कलाकारांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम ही सादर केले गेले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे म्हणजे मराठी भाषा विभाग आणि तोक्यो मराठी मंडळ यांनी संयुक्तपणे प्रकाशित केलेल्या अभिव्यक्त मासिकाच्या “अभिजात मराठी अभिमन मराठी विशेषांक” चे प्रकाशन. विशेषांकात स्थानिक लोकांनी केलेल्या लिखाणाचा दर्जा तसेच छापील विशेषांकाचा दर्जा बघून आपण स्थिमित झालो आहोत. या कार्यक्रमांमध्ये टोकियो लेझीम पथक आणि योकोहामा ढोल पथक यांनी एक सुंदर पालखीचे दृश्य सगळ्यांना दाखवले त्याचबरोबर स्वरमंडल यांचे भारुड आणि मनाचे श्लोक सादर केले. त्याच बरोबर गणेशवंदना आणि समूहगीत सादर करण्यात आले. अशी प्रतिक्रिया डॉ. किरण कुलकर्णी आणि डॉ देवरे ह्यांनी व्यक्त केली. डॉ. उदय सामंत यांनी येत्या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना त्यांच्या विभागांकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले, ज्यामध्ये नियमित ऑनलाइन मराठी भाषेचे वर्ग, जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुस्तकांचे वाचनालय आणि बिगर-मराठी भाषिकांसाठी इतर प्रचारात्मक कार्यक्रमांचा समावेश आहे. जगभरात आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या मालिकेतील हा पहिलाच कार्यक्रम आहे, त्यामुळे अशाच प्रकारच्या कार्यक्रमांसाठी खूप उच्च दर्जाचा मानदंड निर्माण झाला आहे असे मंत्र्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व उपस्थितांना सोहोळ्या निमित्त विशेष तयार केलेली कापडी पिशवी तसेच विशेषांकाची परत आणि मिठाईचा बॉक्स भेट करण्यात आला. हा कार्यक्रम आता दर वर्षी सादर केला जाईल. या ठिकाणी हॉलची सजावट मीरा बागुल आणि अश्विनी बापट यांनी खूप सुंदररित्या केली होती. उदय सामंत यांच्याकडून कलाकारांचे विशेष कौतुक टोकियो लेझीम पथक आणि योकोहामा ढोल पथक यांनी एक सुंदर पालखीचे दृश्य सगळ्यांना दाखवले त्याचबरोबर स्वरमंडल यांचे भारुड आणि मनाचे श्लोक सादर केले. त्याच बरोबर गणेशवंदना आणि समूहगीत सादर करण्यात आले. या ठिकाणी सादर करण्यात आलेले कार्यक्रम पाहून राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कलाकारांचे अभिनंदन केले.

पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात पाककला स्पर्धा संपन्न

Newsworldmarathi Pune: पुणे नवरात्रौ महिला महोत्सवातील पाककला स्पर्धा शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात संपन्न झाली. यात तिखट पदार्थ भागात कोथिंबीर वडी ,सुरळी वडी ,पाट वडी आणि आळू वडी व गोड भागात रबडी मालपुवा ,उपवास मोदक , लाल भोपळा बासुंदी ,मकाणा लाडू ,शिंगाडा नानकटाई ,उपवास धोंडस हे पदार्थ होते. २५० हून अधिक महिलांनी यात सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धक महिलांनी सुंदर सजावट करीत तयार करून आणलेले पदार्थ मांडले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरितास् किचनच्या सरिता पद्मन होत्या. परीक्षक म्हणून किशोर सरपोतदार आणि कोमल पारखे यांनी काम पाहिले. पाककला स्पर्धेत गोड पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – स्वाती पंडित द्वितीय क्रमांक – सीमा नलावडे तृतीय क्रमांक – विद्या ताम्हणकर उत्तेजनार्थ – १. दिपाली धस २. राजश्री सिद्धेश्वर ३. मनीषा जाळीन्द्रे. यांनी पटकावला. तिखट पदार्थांमध्ये प्रथम क्रमांक – पूनम परमार द्वितीय क्रमांक -शीतल भळकर तृतीय क्रमांक – पुण्या सोनी उत्तेजनार्थ – १.मंगला हंकारे ,२. वर्षा तन्ना . यांनी पटकावला. पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष व पुण्याचे माजी उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक विभागात रु. ५०००, रु. ३०००, रु. २००० असे बक्षिसाचे स्वरूप होते. या प्रसंगी छाया कातुरे , संगीता बागुल , प्राजक्ता ढवळे यांची विशेष उपस्थिती होती.

जनता वसाहत परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत मा नगरसेविका प्रिया गदादे यांचे निवेदन

0
Newsworldmarathi Pune: जनता वसाहत परिसरातील प्रमुख मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या प्रचंड गैरसोयीबाबत नगरसेविका प्रिया गदादे यांनी पुणे महानगरपालिकेच्या पथविभाग प्रमुख मा. अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन दिले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जनता वसाहत परिसरात फक्त एकच मुख्य रस्ता असून तोच नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीचा आधार आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालये, कार्यालये तसेच दैनंदिन व्यवहारासाठी जाणाऱ्या नागरिकांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. निवेदनात तात्काळ या रस्त्यांची दुरुस्ती व नियमित देखरेख करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या कामाची तातडीने दखल न घेतल्यास जनता वसाहत कुटुंबातील नागरिकांच्या वतीने आंदोलन उभारण्याचा इशारा नगरसेविका गदादे यांनी दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, माजी लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या प्रश्नांसाठी लढणे ही आपली जबाबदारी आहे आणि नागरिकांना योग्य सोयीसुविधा मिळेपर्यंत आपण पाठपुरावा सुरू ठेवणार आहोत. निवेदनानंतर पथविभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी तत्काळ प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना जागेची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आवश्यक ती रस्त्यांची दुरुस्ती जलदगतीने करण्यात यावी, असे निर्देश दिले. लवकरच या कामाला प्रारंभ होईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे. यामुळे जनता वसाहत परिसरातील नागरिकांमध्ये आता दिलासा आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगरसेविका प्रिया गदादे यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रश्नावर सकारात्मक कार्यवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.