Homeपुणेपुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचे हित जपले जाईल : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची...

पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचे हित जपले जाईल : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही

Newsworldmarathi Pune: पुरंदर विमानतळासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असला, तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी योग्य प्रकारे कार्यरत आहे. देशात नवीन विमानतळ उभारणीसाठी राज्य सरकारच भूसंपादनाची जबाबदारी पार पाडते. पुरंदर विमानतळासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र भूसंपादन अधिकारी नेमले गेले असून, कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांनी दिली.

लोहगाव विमानतळासमोरील एरो मॉल येथे ‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’ या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्लोबल फ्लाईट हँडलिंग सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय सारिकाकुमारी उपस्थित होत्या.

‘ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन’ सुरू झाल्यामुळे विमानसेवा क्षेत्रात स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. भविष्यात विमान कंपन्यांना प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची मोठी गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर, देशात विविध विमान कंपन्यांनी नवीन १,३०० विमानांची नोंदणी केली असून, लवकरच ती प्रत्यक्ष सेवेत दाखल होणार आहेत.

या प्रशिक्षण केंद्रामुळे पुणे विमानसेवा क्षेत्राचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनणार असून, तरुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments