Newsworldmarathi Nashik : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिकच्या सिडको परिसरात झालेल्या सभेत वादग्रस्त विधान करत दावा केला की, “सध्या हिंदू मुली म्हणजे केवळ मुले जन्माला घालण्याचे मशीन बनल्या आहेत”. या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सभेदरम्यान पडळकर म्हणाले की, “मुस्लिम समाजात अनेक जाती असून ते आपसात लग्न करत नाहीत, मात्र आमच्या मुलींना फसवून धर्मांतर घडवून आणले जात आहे”. त्यांनी ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, आणि वक्फ बोर्ड यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, राज्यातील मंदिरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली. तसेच प्रत्येक गावात ‘धर्म दल’ स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.
काश्मीर, लव्ह जिहाद, आणि ‘लँड जिहाद’चा उल्लेख
पडळकर पुढे म्हणाले की, “काश्मीरमध्ये अजूनही धर्म विचारून गोळ्या झाडल्या जात आहेत. लव्ह जिहाद, लँड जिहाद सुरू आहे आणि या सगळ्यावर आता गंभीर विचार होणे आवश्यक आहे.” त्यांनी असा आरोप केला की, “मोकळी जागा दिसली की मशिद बांधली जाते, रेल्वे आणि मिलिटरीपेक्षा वक्फ बोर्डाकडे अधिक जागा आहे”.
संभाजी महाराजांबाबत ‘जिहादी’ आरोप
सभेत पडळकरांनी छत्रपती संभाजी महाराजांविषयीही वक्तव्य केले. त्यांनी काही लोकांनी महाराजांना ‘सेक्युलर’ दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आणि “जिहादी विचारसरणीच्या लोकांकडून संभाजी महाराजांना बदनाम केले जात आहे” असे ते म्हणाले. “बीड जिल्ह्यातील एका भागाला संभाजी महाराजांचे नाव लावून अपमान करण्यात आला आहे”, असेही त्यांनी नमूद केले.
Recent Comments