HomeपुणेAjit Pawar : “‘चुकीचं वागाल तर कारवाई होणार’; अजित पवारांचा पुण्यातून थेट...

Ajit Pawar : “‘चुकीचं वागाल तर कारवाई होणार’; अजित पवारांचा पुण्यातून थेट इशारा

Newsworldmarathi Pune: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आणि त्याच वेळी प्रशासकीय पारदर्शकतेसाठी महत्त्वाचे निर्णय घेतल्याची माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अनियमितता लक्षात घेता एकच डॅशबोर्ड तयार करून नवी वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. यामुळे बिले थांबणार नाहीत, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. ते पुण्यात बोलत होते.

अफवांना फाटा, स्पष्ट इशारा
“मुख्यमंत्र्यांचं विधान अंतिम असतं. कोणीही चुकीचं वागलं तर कारवाई होणार, मग तो कोणताही जिल्हा असो,” असा स्पष्ट इशारा अजित पवारांनी दिला आहे. तसेच संजय शिरसाट मंत्री नसून आमदार आहेत, असं स्पष्ट करून त्यांनी गैरसमज दूर केला.

महिलांवरील अत्याचार, राजकीय संवादावर भाष्य
महिलांवरील अत्याचाराच्या बातम्यांवर पत्रकारांनी अधिकार पाळावा, असे त्यांनी नम्रतेने सांगितले. तसेच लक्ष्मण हाके आणि अमोल मिटकरी यांच्यातील संभाषणावर नाराजी व्यक्त करत, ‘सुसंस्कृत राजकारण’ हवे असल्याचे मत मांडले.

निवृत्ती लाभ त्वरित देण्यासाठी स्वतंत्र डॅशबोर्ड
अजित पवारांनी जाहीर केलं की, सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच सर्व लाभ मिळावेत यासाठी सेवानिवृत्ती विभागात नवीन डॅशबोर्ड सुरू करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सेवा व्हॉट्सॲपवर
जिल्हा परिषदेच्या विविध सेवा आता WhatsApp चॅटबॉटवर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच, अंगणवाडीसाठी खास ॲप तयार करण्यात आलं असून लाडक्या बहिणींना त्याचा फायदा होईल, असेही त्यांनी नमूद केले. तसेच ग्रामपंचायतीचा कर आता QR कोडच्या माध्यमातून घरबसल्या भरता येणार आहे. पुणे-मुंबईत बसूनही गावाकडील घराचा कर भरता येईल.

शिक्षण प्रवेश प्रक्रियेबाबत लक्ष
दहावीच्या निकालानंतर सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून उपाययोजना सुरू असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

शस्त्र परवाने, मिठी नदी घोटाळा, वादग्रस्त परवाने रद्द
अमिताभ गुप्ता प्रकरणात बीडमधील शस्त्र परवाने रद्द करण्यात आले असून पुणे आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. मिठी नदी घोटाळ्यावर तपास सुरु असून दोषींवर कारवाई होईल.

जागावाटप आणि नुकसानभरपाई बाबत निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांतील जागावाटप महायुती एकत्र बसून ठरवणार असून, रामदास आठवले यांसारख्या मित्रपक्षांनाही सोबत घेण्याचा इशारा दिला. नुकसानीबाबत तात्काळ पंचनामे करून निधी मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments