Newsworldmarathi Mumbai: भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी हिंदुत्ववादी मोर्चादरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यात सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला होता. या मोर्चात भाषण करताना पडळकरांनी पवार कुटुंबावर नाव न घेता टीका केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
पडळकरांनी आपल्या भाषणात “एका गटाचे लोक एका मोर्चामध्ये पुढे पुढे करत आहेत. ते घर पण तसंच आहे. संकष्टीच्या दिवशी उपवास असतो, पण त्या दिवशी मटण आणायचं. एकादशीच्या दिवशी चिकन आणायचं. त्या घरातील लोक एकादशीच्या दिवशी दगडूशेठ गणपतीला मटण खाऊन जातात,” असे म्हटले. याचवेळी त्यांनी “तिची सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच आहे. असं ते कॉकटेल कुटुंब आहे,” असे विधान करून अप्रत्यक्षपणे पवार कुटुंबावर निशाणा साधला.
या वक्तव्यामुळे पडळकरांना टीकेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह ठरू शकते, अशी प्रतिक्रिया अनेक राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. आता या विधानावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Recent Comments