Newsworldmarathi Pune: कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू देण्याऐवजी शालेय साहित्य दान करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाला मित्र परिवाराने भरभरून प्रतिसाद दिला असून, सुमारे १४,००० वह्या व इतर शालेय साहित्य जमा करण्यात आले.
या उपक्रमाअंतर्गत, आज सोरतापवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत २१० विद्यार्थ्यांना प्रत्येकी पाच वह्या वाटप करण्यात आल्या. एकूण १०५० वह्यांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या उद्योगपती तानाजीशेठ चोरघे यांनी शाळेसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी मोठ्या क्षमतेचा वॉटर फिल्टर देण्याची घोषणा केली, ज्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमासाठी गावच्या सरपंच सुप्रियाताई चौधरी, तानाजीशेठ चोरघे, डॉ. नितीन चौधरी, सनी चौधरी, अमित चौधरी, सोनाशेठ कड सुहास चौधरी, राहुल गाढवे तसेच मंडळातील अनेक तरुण सहकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुदर्शन चौधरी यांच्या या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा अनोखा आणि विधायक मार्ग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Recent Comments