Newsworldmarathi Pune: स्वदेशी वस्तू विकत घ्याव्यात अशी जेव्हा सुरुवात झाली व मॉल असा प्रकारही नव्हता तेव्हा घरगुती वस्तू योग्य दरात मिळण्यासाठी सहकारी तत्त्वावर ग्राहक पेठेची सुरुवात झाली. आजही मोठ्या मॉलच्या स्पर्धेत ग्राहक पेठ तितक्याच ताकदीने उभी आहे. हे ग्राहक पेठेचे खऱ्या अर्थाने यश आहे असे मत ग्राहक पेठ तांदूळ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी व्यक्त केले.
यावेळी ग्राहक पेठेच्या उपाध्यक्षा संध्या भिडे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक,जयराज अँड कंपनीचे डॉ.राजेश शहा आणि कोहिनूर कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर फिरोज शेख इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाल्या मागील 34 वर्षापासून उत्पादक ते थेट ग्राहक या संकल्पनेतून ग्राहक पेठ तांदूळ महोत्सव सुरू आहे. खरा बासमती कोणता बासमती मधील तिबार दुबार म्हणजे काय या सर्वाची माहिती तांदूळ महोत्सवात ग्राहकांना दिली जाते. वर्षाच्या साठवणीसाठी पुणेकरांना उत्तम दर्जाचा तांदूळ रास्त दरात देण्याची प्रथा तांदूळ महोत्सव सुरू झाली. प्रतिवर्षी पुणेकरांचा महोत्सवास वाढता प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी सूर्यकांत पाठक म्हणाले उत्पादकांपासून थेट ग्राहकांपर्यंत वर्षाच्या साठवणी करिता रास्त दरात तांदूळ मिळवण्याकरिता हा तांदूळ महोत्सव सुरू आहे. बासमती पासून आंबेमोहर पर्यंत व इंद्रायणी पासून कोलम चिनोर पर्यंत सुमारे 48 प्रकारचे तांदूळ या ठिकाणी उपलब्ध आहेत. यावर्षी आंबेमोहोर तांदुळाचे दर बासमतीपेक्षा अधिक आहेत व ते वाढतच जाणार आहेत तरीदेखील महोत्सवात बाजारातील दर वाढले तरी याच दरात 25 जानेवारी पर्यंत तांदुळाचा पुरवठा ग्राहकांना केला जाईल.
डॉ.राजेश शहा म्हणाले ग्राहक पेठ गुणवत्ता व विश्वासासाठी ओळखली जाते. तांदूळ महोत्सव ही कल्पना ग्राहक पेठेची आहे. ग्राहक पेठेच्या सहकार्यामुळेच आम्ही उत्पादक तांदूळ महोत्सवाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट तांदूळ उपलब्ध करून देत आहोत. आजच्या या विशेष कार्यक्रमात अहमदाबाद वरून ग्राहक पेठे तांदूळ खरेदी करण्यासाठी ज्योत्स्नाताई तांबे उपस्थित होत्या.


Recent Comments