पुणे शहरात चाललंय काय! स्वारगेट बसस्थानाकात 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार

Newsworldmarathi Pune : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात 26 वर्षीय तरुणीवर बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी बसस्थानकावर आली होती. यावेळी एका व्यक्तीने तिला बस तिकडे लागली आहे असं सांगून बसमध्ये नेले. आणि जबरदस्ती करत तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला. स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची ओळखही पटली असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची आठ पथके रवाना करण्यात आली आहेत

युवकांनी नवकल्पना आणि तंत्रकौशल्य घेऊन अवकाश उद्योजक व्हावे : डॉ. के. सिवन

0
Newsworldmarathi Pune : “विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट तंत्रकौशल्य, विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखांचे ज्ञान आणि नवकल्पना यांच्या आधारावर अवकाश संशोधन क्षेत्रातील असंख्य संधी हेराव्यात. अवकाश तंत्रज्ञानाचे विस्तीर्ण क्षेत्र आपलेसे करावे आणि अवकाश उद्योजक होण्याच्या दिशेने वाटचाल करावी,” असे आवाहन भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी विद्यार्थ्यांना केले. दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या (एआयटी) ३१ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘एआयटी’तर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार डॉ. के. सिवन यांना भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट, सहसंचालक एम. के. प्रसाद, प्राचार्य डॉ. बी. पी. पाटील, लष्करी अधिकारी, ‘एआयटी’चे अनेक माजी विद्यार्थी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘द सक्सेसफुल यंग आंत्रप्रेन्युअर पुरस्कार’ २००२ च्या तुकडीचे माजी विद्यार्थी प्रीतपालसिंग यांना देण्यात आला. ईशान कपूर यांना अष्टपैलू विद्यार्थी सन्मान देण्यात आला. सर्वोत्कृष्ट क्रीडापटू साठीचा जी. राजशेखर स्मृती करंडक वंशिका या विद्यार्थिनीने पटकावला. सर्वोत्कृष्ट संशोधन व सल्लासेवा हा पुरस्कार डॉ. एल. डी. जठार यांना, तर सर्वोत्कृष्ट अध्यापक हा पुरस्कार डॉ. सीता यादव यांना देण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. डॉ. के. सिवन यांनी इस्रोच्या वाटचालीचा आढावा घेत ‘विद्यार्थ्यांनी अवकाश संशोधनाकडेही करिअर म्हणून बघावे’, असा सल्ला दिला. “अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभर युवकांना अनेक संधी आहेत. संशोधनाला मोठा वाव आहे. या क्षेत्रात खासगीकरणाचे युग सुरू झाले आहे. केंद्र सरकारचा त्याला पाठिंबा आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या करिअरसोबत आपल्या देशाप्रती आणि आपल्या समाजाप्रती असलेली बांधीलकी ओळखून, या क्षेत्रात योगदान दिले पाहिजे. ‘एआयटी’सारख्या संस्थेतील विद्यार्थ्यांकडून ही अपेक्षा अधिक आहे,” असे ते म्हणाले. ब्रिगेडियर अभय भट यांनी स्वागत प्रास्ताविकात ‘एआयटी’च्या गेल्या वर्सभरातील कामगिरीचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीविषयी माहिती दिली. ‘एआयटी’चे संचालक मेजर जनरल के. के. चक्रवर्ती यांनी आभार मानले. रोशनी गौडा आणि रजत सिंग यांनी सूत्रसंचालन केले.

पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे प्रवासादरम्यान मराठी साहित्य, कला, संस्कृतीचा जागर

0
Newsworldmarathi Pune : मराठी भाषेचा जागर करीत साहित्यिक आणि साहित्य रसिकांनी अनोख्या साहित्ययात्री संमेलनाची अनुभूती घेतली. पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे या रेल्वे प्रवासात मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत झालेले हे मराठीतील पहिलेच आणि दीर्घकालीन साहित्य संमेलन ठरले. सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथील 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशा रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष रेल्वेला शूर सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले होते तर प्रत्येक बोगीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली होती. दि. 19 रोजी दुपारी या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या दिवशी उदय सामंत यांनी साहित्यिक कलाकार यांच्याशी संवाद साधत पुणे ते अहमदनगर रेल्वे प्रवास केला. ही विशेष रेल्वे दि. 21 रोजी पहाटे दिल्ली येथे पोहोचल्यानंतर संमेलनाच्या पहिल्या टप्प्याचा समारोप झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, साहित्य रसिक आणि कलाकार महादजी शिंदे एक्स्प्रेसमधून दिल्लीत आल्यानंतर 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्साहाने सहभागी झाले. साहित्य यात्री संमेलाच्या दुसऱ्या टप्प्याला रविवारी रात्री परतीच्या प्रवासात सुरुवात झाली आणि समारोप आज (दि. 25) सकाळी 8 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर झाला. या संमेलनाचे अध्यक्ष लेखक शरद तांदळे तर वैभव वाघ कार्यकारी अध्यक्ष होते. सोमवारची (दि. 24) सकाळ अभंग, भजन, कीर्तनासह, पोवाड्याच्या सादरीकरणाने भक्ती आणि वीररसात चिंब झाली. ‌‘वाटेवरचा देवनाम‌’, ‌‘एका जनार्दनी शिव‌’, ‌‘ॐ नमो ज्ञानेश्वरा, करूणाकरा दयाळा‌’ आदी भक्तीगीते सादर करण्यात आली. विविध बोग्यांमध्ये सुरू असलेले कविता, कथा वाचन तसेच विविध कलांच्या सादरीकरणातून रसिकांना विविध साहित्य, कलाकृतींची आनंद मिळाला. ढोल-ताशा पथकातील वादक तसेच अनेक हौशी कलाकारांनी मोठ्या उत्साहाने कलागुणांचे सादरीकरण केले. सायंकाळी वारकऱ्यांनी हरी नामाचा घोष करत, टाळ-मृदुंगाच्या साथीने दिंडी काढली. यात अनेक साहित्यप्रेमी सहभागी झाले होते. नाशिक येथील वारकऱ्यांनी अभंग, हरिपाठ आणि भजन सादर केले. यात राजेंद्र सपकाळ, बाळासाहेब फराटे, सुखदेव सांगळे, लक्ष्मी घुले यांचा सहभाग होता. सिंहगर्जना ढोल-ताशा पथकाच्या वादकांनीही कला सादर केली. सोलापूरचे कवी सुरेशकुमार लोंढे, बेळगावचे कवी महादेव खोत, कोल्हापूरचे कवी मकरंद वागणेकर यांनी कवितांचे वाचन केले. रेल्वेत प्रवाशांची काळजी घेणाऱ्या स्वयंसेवकांनी सामुहिक नृत्य-वादन करून सर्वांचे मनोरंजन केले. आटपाडीचे ढोलकी वादक सिद्धनाथ जावीर व माळशीरसचे संवदिनीवादक राजवर्धन वाघमारे यांच्या साथीने प्रवाशांनी भक्तीरचना सादर केल्या. युट्युब वरील सुप्रसिद्ध खास रे टीव्हीच्या रॅपर्सने अनेक दर्जेदार मराठी रॅप गाणी सादर करत मैफल रंगतदार केली. पुणे ते दिल्ली या 34 तासांच्या आणि दिल्ली ते पुणे 31 तासांच्या प्रवासादरम्यान सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे, अभिजीत पोखर्णीकर, ऋषिकेश कायत, दिग्विजय पाटील, अथर्व पिसाळ, केदार काटे या सरहद, पुणेच्या युवा कार्यकर्त्यांनी प्रवाशांना तत्पर आणि विनम्रपणे सेवा पुरविल्या. कर्तव्य मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचे पथक दिमतीला होते. या पथकात आठ जणांचा समावेश होता. रेल्वे प्रवासादरम्यान हे पथक प्रवाशांची सतत विचारपूस करत कोणाला आरोग्याची समस्या जाणवल्यास त्यांना वैद्यकीय मदत करत होते. डॉ. फैज सय्यद, डॉ. ऋषिकेश पाटील, डॉ. यश थोरात, डॉ. क्षितिज कुचेकर यांच्यासह गौरव गायकवाड, अनिकेत मोगरे, गणेश जानकर, यशवंत पवार यांचा वैद्यकीय पथकात समावेश होता. या वर्षीचा उस्फूर्त प्रतिसाद, प्रवासा दरम्यान जोडली जाणारी मने, प्रत्येकाला मिळणारी सादरीकरणाची संधी आणि होणारी वैचारिक देवाण घेवाण पाहता दरवर्षी हे चाकावरचे मराठी साहित्ययात्री संमेलन सुरू ठेवावे असा आयोजकांचा विचार चालू असल्याचे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ यांनी सांगितले.

मेट्रोच्या पाच नव्या स्टेशनमुळे पुणे-सातारा रस्त्यावरील नागरिकांचा प्रवास होणार सुखकर

0
Newsworldmarathi Pune : स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावरील भूमिगत स्थानकांच्या जागांमध्ये करण्यात आलेले बदल तसेच स्टेशनची संख्या वाढविण्यात आल्यामुळे सातारा रस्ता परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महामेट्रोने या मार्गावर केवळ तीन मेट्रो स्टेशन प्रस्तावित केले होते. मात्र, महापालिकेच्या भूमिकेमुळे आता या मार्गावर पाच भूमिगत मेट्रो स्टेशन होणार असून त्यासंबंधीच्या सुधारित आराखड्याला व वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला नुकतीच मुख्यसभेत मंजुरी देण्यात आली. पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्यातील वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर स्वारगेट ते कात्रज विस्तारीत मार्गाचे कामाचे भूमिपूजन झाले आहे. मात्र, या मार्गाच्या आराखड्यात मार्गावर तीनच भूमिगत मेट्रो स्टेशन प्रस्तावित केले होते. मात्र, या स्टेशनची संख्या वाढवावी, अशी मागणी विविध लोकप्रतिनिधींनी महामेट्रोकडे केली होती. त्यानुसार या भागातील लोकसंख्या आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन नव्याने आराखडा तयार करण्यात आला. जुन्या आराखड्यात मार्केट यार्ड, पद्मावती व राजीव गांधी प्राणिसंग्रहालय या स्टेशनचा समावेश होता. नव्या आराखड्यात तीनच्या ऐवजी पाच स्टेशन प्रस्तावित करण्यात आली आहेत. यामध्ये बालाजीनगर व बिबवेवाडी-सहकारनगर स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांच्या जागांमध्ये बदल केल्यानंतर नव्या आराखड्याला महापालिकेच्या मुख्य सभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव राज्य सरकारकडे पुढील मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. नवीन स्थानकांची नावे व प्रत्यक्ष ठिकाण • मार्केट यार्ड – उत्सव हॉटेल चौक • बिबवेवाडी / सहकारनगर – नातूबाग • पद्मावती – सद्गुरू शंकर महाराज मठाजवळ • बालाजीनगर – भारती विद्यापीठ • कात्रज – कात्रज बसस्टँड, किनारा हॉटेलजवळ

मार्चमध्ये होणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची सुनावणी

Newsworldmarathi Delhi : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या सुनावणीला आजही स्थगिती देण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात आज (25 फेब्रुवारी 2025) होणार होती, परंतु ती पुढे ढकलली गेली आहे. या प्रकरणात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे, ज्यामुळे राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे भवितव्य अधांतरी आहे. निवडणुकीच्या वेळापत्रकावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी चार मार्चला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. निवडणुका लवकरच घेण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना पितृशोक

0
Newsworldmarathi Mumbai : राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. भगवानराव गोरे यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील रुग्णालयात (Pune Hospital) उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माण तालुक्यात शोककळा पसरली आहे. भगवानराव गोरे यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव आज दि. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बोराटवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर बोराटवाडी (ता. माण, जि. सातारा) येथे दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

मुरली अण्णांशी पंगा महागात, गजा मारणेला जमिनीवर बसवलं, टोळीची शहरातून काढली धिंड

Newsworldmarathi Pune :कोथरुड येथील आय टी इंजिनिअरला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अतिशय कडक भूमिका घेतल्यानंतर गजा मारणे व रुपेश मारणे यांना त्या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी केले. त्यानंतर गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक करण्याची कारवाई सुरु केली आहे. गजा मारणे व त्याच्या टोळीतील २७ जणांवर कारवाई करणार, त्यांची मालमत्ता जप्तीसाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज वार्तालाप कार्यक्रमात दिली होती. त्यानंतर काही तासात गजा मारणे हा स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. त्याच्याविरुद्ध १९८८ पासून एकूण २७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर दोनदा तडीपाराची कारवाई करण्यात आली असून एकदा स्थानबद्ध केले आहे. अशा प्रकारे त्याच्यावर १२ वेळा वेगवेगळी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ थेट नागरिकांच्या भेटीला !

0
Newsworldmarathi pune : पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाच्या पाचव्या टप्प्याला पर्वती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वैयक्तिक कामे, नागरी समस्या, सार्वजनिक आणि नव्या कल्पनांसह सहाशेहून अधिक नागरिक थेट केंद्रीय मंत्री मोहोळ यांना भेटले. राज्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचीही या उपक्रमास पूर्णवेळ उपस्थिती होती. नागरिकांचे प्रश्न समजून घेता यावेत आणि ते वेळेत सुटावेत यासाठी खासदार मोहोळ यांनी खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार कोथरुड विधानसभा मतदारसंघातून सुरु केला. त्यानंतर कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातही हा उपक्रम राबविण्यात आला. पर्वती विधानसभा मतदारसंघात झालेला हा पाचवी टप्पा होता. नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासह शासनाच्या विविध योजनांचे स्टॅाल्स, आधार कार्ड संदर्भातील स्टॅाल्सही यावेळी उपलब्ध करुन देण्यात आले. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा उपक्रम राबविला जातो. या संदर्भात अधिक माहिती देताना केंद्रीय मोहोळ म्हणाले, ‘पर्वतीच्या अभियानात ६०० पेक्षा अधिक नागरिकांनी टोकन घेत भेट घेतली. थेट नागरिकांना भेटताना नागरिकांसह मलाही मिळणारे समाधान मोठे आहे. भेंडीमध्ये विशेषतः वैयक्तिक कामे आणि नागरी प्रश्न सांगण्यावर नागरिकांचा कल दिसला. जे विषय लगेचच सुटू शकतील अशा कामांसंदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. तसेच दीर्घकालीन कामांसंदर्भातही अधिकाऱ्यांना कालबद्ध कार्यक्रम आखण्यासंदर्भात सूचित केले. टोकन व्यवस्थेमुळे प्रत्येकाला मिळते भेटण्याची संधी ! खासदार जनसंपर्क सेवा अभियानांतर्गत खा. मोहोळ यांची भेट घेण्यासाठी सुरुवातीला टोकन द्वारे नोंदणी करुन घेतली जाते. त्या टोकनच्या क्रमांकद्वारे नागरिकांना थेट भेटण्याची संधी मिळते. शिवाय भेटासाठी किती कालावधी लागू शकतो याचा अंदाजही नागरिकांना येतो. या टोकन प्रक्रियेमुळे अभियानात सहभाग घेण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे.

रसिकांची दाद हाच कलाकारासाठी आशीर्वाद : पंडित विनायक तोरवी

0
Newsworldmarathi Pune : कलाकार हा कधीच पैशांसाठी, पुरस्कारासाठी किंवा प्रतिष्ठेसाठी कलेचे सादरीकरण करत नसतो. स्वत:ला आनंद मिळावा, तो आनंद इतरांनाही देता यावा यासाठी त्याचा प्रयत्न असतो. रसिकांची दाद म्हणजेच आशीर्वाद, अशा भावना कलाकारांच्या असतात. पुरस्काराने कलाकारांची जबाबदारी वाढते, असे भावोद्गार प्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी काढले. गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे गुरू गौरव, संगीत गौरव आणि संगतकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित कार्यक्रमात पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर गुरू गौरव पुरस्काराने सुप्रसिद्ध गायक पंडित विनायक तोरवी (बंगळुरू), पंडित विनायक बुवा पटवर्धन संगीत गौरव पुरस्काराने ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते (पुणे), पंडित चंद्रकांत कामत संगतकार पुरस्काराने तबला वादक पंडित रवींद्र यावगल (बंगळुरू) तर पंडित तुळशीदास बोरकर संगतकार पुरस्कराने संवादिनी वादक पंडित अजय जोगळेकर (मुंबई) आणि पंडित विनय मिश्रा (दिल्ली) यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी सत्काराला उत्तर देताना पंडित तोरवी बोलत होते. पुरस्काराचे वितरण एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे, उपप्राचार्या परिणिता मराठे उपस्थित होते. संगीत गौरव व गुरू गौरव पुरस्काराने सन्मानित कलाकारांना 21 हजार रुपये तर संगतकार पुरस्कारप्राप्त कलाकारांना 10 हजार रुपये पुरस्काराच्या रूपाने देण्यात आले. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागील संकल्पना विशद केली. ज्येष्ठ संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते म्हणाले, कलेच्या क्षेत्रात माझ्याकडून जे कार्य झाले आहे त्याचे श्रेय माझे आई-वडील, गुरुजन, माझे शिष्य आणि रसिक या सगळ्यांचे आहे. पंडित विनायकबुवा पटवर्धन यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही दडपण येणारी गोष्ट आहे. हा पुरस्कार माझ्या गुरू मालिनीताई राजुरकर आणि गुरुस्थानी असलेल्या कलाकारांना समर्पित करतो. भूषण गोखले म्हणाले, गांधर्व महाविद्यालयाला मोठा इतिहास असून ते स्वरमंदिरच आहे. महाविद्यालयातील गुरूकुल पद्धत ही एक उत्तम शिक्षणपद्धती आहे. ते पुढे म्हणाले, ज्याचे पाय कायम जमिनीवर असतात त्या व्यक्ती आयुष्यात कायम मोठ्या उंचीवर पोहोचतात. पुरस्कार मिळालेले सर्व कलाकार आपआपल्या क्षेत्रात इतक्या उंचीवर असूनही अतिशय नम्र आहेत. त्यामुळे ते त्यांच्या शिष्यांसमोर आदर्श आहेत. यावेळी पंडित विनय मिश्रा यांच्या सुरेल एकल संवादिनी वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आशय कुलकर्णी यांनी तबला साथ केली. पंडित रवींद्र यावगल याचे एकल तबला वादन झाले. त्यांना अभिषेक शिनकर यांनी संवादिनीची साथ केली. दिली. पंडित विनायक तोरवी यांच्या दमदार अशा गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांना पंडित रवींद्र यावगल (तबला), पंडित विनय मिश्रा (संवादिनी) समर्पक साथसंगत केली. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचालन केले.

नीलम गोऱ्हे निर्लज, नमकहराम बाई : संजय राऊत यांची टीका

0
Newsworldmarathi Mumbai : ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं’, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केल्याने राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. गोऱ्हेंचं वक्तव्य ठाकरे सेनेच्या चांगलच जिव्हारी लागलं आहे. निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाई नव्हे असं अनेक शब्द राऊत यांनी गोऱ्हेंसंदर्भात उच्चारलं आहेत. त्यामुळं राजकीय वर्तुळात राऊत यांन एका महिलेसंदर्भा अपशब्द वापरल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. संजय राऊत यांनी गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नीलम गोऱ्हे यांचं विधान म्हणजे त्यांची विकृती…बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कोणती बाई तुम्ही पक्षात आणली?, जाताना ही बाई ताटात घाण करून गेली, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली. तसेच, नीलम गोऱ्हे ही निर्लज्ज बाई आहे, नमक हराम बाई असं म्हणत हा शब्द कापू नका, बीप साउंड देऊ नका…हा असंवैधानिक शब्द नाही, असं सांगत राऊतांनी संताप व्यक्त केला. यासोबतच, नीलम गोऱ्हे बाई नसून बाईमाणून आहे, भ्रष्ट आहे, अशी टीका करत काल नीलम गोऱ्हे म्हणाल्या 50 लाख रुपये दिले महामंडळाला… लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात?माझ्याकडे माहिती आहे पुरावे आहेत, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.