रविंद्र धंगेकर घेणार एकनाथ शिंदेचं धनुष्यबाण हाती?

Newsworldmarathi Pune : गेल्या काही दिवसापासून माजी आमदार रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चाना उधाण आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर उद्या रवींद्र धंगेकर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण रवींद्र धंगेकर यांनी उद्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. या बैठकीत धंगेकर काय निर्णय घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. उद्याच्या बैठकीत धंगेकर करणार कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची सुद्धा भेट घेतली होती. गेल्या २ दिवसांपासून धंगेकर यांच्या सोशल मिडिया पोस्ट सुद्धा चर्चेत आहेत. हू इज धंगेकर कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात चंद्रकांत पाटलांनी विचारलेला हा प्रश्न चांगलाच गाजला होता. पण आता ‘व्हेअर इज धंगेकर’ असं विचारण्याची वेळ आलीय. कारण रविंद्र धंगेकरांचं चाललंय तरी काय असा प्रश्न पडत आहे. उद्याच्या बैठकीत धंगेकर काय निर्णय घेतायेत याकडे सर्वांचे लक्ष आहे.

वर्गमित्राच्या जाचाला कंटाळून विद्यार्थीनीने संपवले जीवन

पुणे : आकुर्डी येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सहिती कलुगोटाला रेड्डी या तरुणीने वाकडमधील एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला तिच्या मृत्यूची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासात तिचा वर्गमित्र प्रणव राजेंद्र डोंगरे हाच तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे उघडकीस आले आहे. सहिती आणि प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. प्रणवने सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला आणि तिला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होता. या सततच्या छळामुळे सहिती तणावाखाली होती आणि शेवटी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आत्महत्येनंतर कलुगोटाला रेड्डी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी प्रणव डोंगरे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर प्रकरणाचा वाकड पोलीस तपास करत असून, या दुर्दैवी घटनेमुळे कॉलेज व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संवेदनशील समाजाची आज गरज : ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

0
Newsworldmarathi Pune : अन्न हे पूर्णब्रह्म असून अन्न तयार करणाऱ्याच्या कामाचा व ते सामाजिक दृष्टीकोनाची जोड देऊन विक्री व्यवसायाच्या कष्टाचा सन्मान होतोय ही आनंदाची बाब आहे. संविधानाला जात धर्म नसतो, तसा अन्नालाही जात धर्म नसतो. अन्नदानाची सात्विक भावना ही मानवतेची आहे. समाजीक बेबनाव, क्रुरता व असुरक्षा रोखण्या करीता सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून ‘नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे. असे मत अ भा साहीत्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. बल्लवाचार्य कै. म. वा. जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा (२०२४-२५) चा चौथा “अन्नब्रम्ह” पुरस्कार, पुणे शहरातील नामांकित ‘श्री मुरलीधर व्हेज’ अर्थात पूर्वाश्रमीचे मुरलीधर भोजनालयाचे संचालक श्री व सौ शारदा गोपाळदादा तिवारी कुटुंबीय यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस हे बोलत होते.  सौ. विमलाबाई गरवारे हायस्कूल येथे सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांचे हस्ते या पुरस्कारचे वितरण करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार उल्हासदादा पवार,  पुरस्काराचे संयोजक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी, प्रसाद जोशी उपस्थित होते. डॉ. पराग काळकर म्हणाले, अलीकडच्या तरुण पिढीला अन्न किंवा अन्नदान ही संकल्पनाच कळलेली नाही. ‘टू मिनिट नूडल्स’च्या जमान्यात त्यांना अन्न तयार करण्यामागचे कष्ट कळत नाही. पुण्याच्या विकासात जसे उद्योग क्षेत्राचे महत्त्व आहे तसे शिक्षण क्षेत्राचे पण आहे. पुण्यात दरवर्षी 4 लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. त्यातील बहुतांशी विद्यार्थी नोकरी निमित्त पुण्यातच राहतात. या काळात भोजनालयाचा खूप मोठा आधार त्यांना असतो. उल्हासदादा पवार म्हणाले, पिझा – बर्गर सारख्या पाश्चात्य फास्ट फूड खाद्य संस्कृतीच्या वावटळीत, भारतीय खाद्य संस्कृती जपण्याचे काम मुरलीधर भोजनालय व तिवारी कुचुंबिय करत आले आहे जे निरोगी प्रकृती करीता आवश्यक आहे त्यामुळे परदेशी लोकांना पण या खाद्य संस्कृतीने भुरळ घातली आहे. मात्र ज्या प्रमाणे उडपी आपल्या देशाच्या प्रत्येक भागात व्यवसाय करताना दिसतात, तसा मराठी माणूस खाद्य व्यवसाय करताना दिसत नाही अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली. पुरस्काराला उत्तर देताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, पुर्वाश्रमीच्या मुरलीघर भोजनालयाची ओळख जपण्यासाठी ‘विद्यार्थी मेस’ची संकल्पना मर्यादित संख्येत आज ही राबवीत आहोत. सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेने व्यवसायात नैतिक मुल्यांचे अधिष्ठान ठेवणे गरजेचे असून, ‘नफ्या बरोबर ग्राहकांचा संतोष व समाघान’ कमावणे हे मुरलीघर’ चे प्रथम पासुन वडीलोपार्जित ऊद्दीष्ट ठरले आहे. राज्याच्या विविघ भागातुन अनेक महत्वाचे कलाकार, राजकीय व्यक्ती, उद्येग व्यवसाईक, उच्च पदस्थ यांनी मुरलीघर भोजनालयातील जेवणाचा आस्वाद घेतला आहे. हा पुरस्कार तीन पिढ्यांच्या तपस्येचा, ऊत्तरदायीत्वाच्या सातत्याचा सन्मान आहे. ते म्हणाले, या पुरस्काराचे दुसरे वैशीष्ठ्ये म्हणजे डॉ जोशी सरांनी वडीलांच्या कष्टप्रद आयुष्याचे स्मरण जपत इतर ‘अन्न – व्यवसाईकांना’ सामाजिक जाणीवेची प्रेरणा देण्याचा हेतू साधला आहे. कामगार वर्गा’ प्रती आजवर जपलेला कौटुंबिक व मानवी दृष्टीकोन व त्याची कृतीशील दखल इ मुळे हे शक्य झाल्याचे ही गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी सांगीतले. तसेच ‘परगांवच्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांच्या मुलांना, दुष्काळजन्य परिस्थितीत व कोरोना काळात सेवा देण्याऱ्या घटकांना’ मुरलीघर भोजनालयातुन, व्यवसाईक दृष्टीकोना पेक्षा सामाजिक दृष्टीकोनातुन’ सेवा दिली गेली याचा अभिमान वाटतो..! डॉ. न. म. जोशी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, माझे वडील हे आचारी काम करायचे म्हणून त्यांच्या स्मृतीदिनी श्राद्ध घालण्यापेक्षा अन्न क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान करण्याचं आम्ही ठरवलं. हीच खरी त्यांना आदरांजली आहे असे मला वाटते. मुरलीधर भोजनालायाची कीर्ती पूर्वी पासून आम्ही ऐकत आलोय.  मुरलीधर च्या भोजनाची वाजवी किंमतीतील सुग्रास चव चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीची आहे.गोपाळदादा तिवारी हे सामाजिक जाणीव असलेले राजकारणी असल्याचे डॅा न म जोशी सरांनी सांगितले. अन्नब्रम्ह पुरस्कार मानपत्र, सन्मान चिन्ह व रु ५०००/- असे स्वरुप होते.. मात्र रु ५०००/- हे तिवारी कुटुंबीयांनी गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्या करीता डॅा न म जोशी सरां कडे सुपुर्त केले..  मानपत्राचे वाचन दीप्ती डोळे यांनी केले. प्रसाद जोशी यांनी सुत्र संचालन व आभार प्रदर्शन केले. अमर काळे यांच्या ‘गायन कार्यक्रमा’सह मुरलीधर च्या ‘स्नेह भोजना’ने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी सभागृहात घटनातज्ज्ञ प्रा ऊल्हास बापट, मा विठ्ठल मणीयार, रवि चौधरी, सुर्यकांत मारणे, डॉ मोहन ऊचगांवकर, माजी उपप्राचार्य प्रा संजय कंदलगावकर, विष्णु कुलकर्णी, गणेश नलावडे, खाद्यविक्रेता संघाचे मा अध्यक्ष किशोर सरपोतदार, शेखर बर्वे, दत्ता ऊभे, जयंत पवार, दत्त मंदीर ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, टिळक गणपती ट्रस्ट अध्यक्ष रविंद्र पठारे, राम विलास तापडीया, राधेश्याम कासट, डॅा तांदळे, राजेद्र खराडे, मेघराज निंबाळकर, अमोल सावंत, किशोर सरदेसाई, प्रा सुरज कुलकर्णी, उमेश चाचर, सुरेश पारखी, मंगेश झोरे, अँड फैयाज शेख, सुभाष जेधे, शेखर बनसोड, सुरेश नांगरे, गोरख पळसकर, बंडू शेडगे, विकास घोले, अण्णा गोसावी, अविनाश गोडबोले, शंकर थोरवे, नितीन पायगुडे, महेश अंबिके, योगेश भोकरे, आशीश गुंजाळ, धनंजय भिलारे, शंकर शिर्के, गणेश शिंदे, ॲड स्वप्नील जगताप, सुनील मारणे, महेश हराळे, संजय अभंग, गणेश मोरे, नरेश आवटे, श्रीकांत सांखला बंधू, राजेश सुतार, इ सह  सह विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अर्थसंकल्प सर्वांनी समजून घेतला पाहिजे : मेहेर

0
Newsworldmarathi Narayangao : फेब्रुवारी २०२५ मध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे महागाई, घटलेले उत्पन्न आणि छोट्या मोठ्या वस्तूंवर आकारला जाणारा वस्तू व सेवा कर यामुळे खरेदी शक्ती कमी झालेला शहरी व निम शहरी मध्यम वर्गाला यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. लघु आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्र, महिला सक्षमीकरण, कृषी क्षेत्र, निर्यात क्षेत्र या संदर्भात अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी सकारात्मक परिणाम करणार आहेत. असे असले तरी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होईल, तसेच सर्वसामान्यांच्या राहणीमान,रोजगार, खरेदी क्षमता इत्यादीवर देखील होणाऱ्या परिणामांची चर्चा घडवून आणण्यासाठी अर्थसंकल्प सर्वांनी समजून घेतला पाहिजे असे मत ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीरत्न अनिलतात्या मेहेर यांनी अध्यक्षीय मनोगतातून मांडले. ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नारायणगाव (पुणे) येथील अर्थशास्त्र व संशोधन केंद्राच्या वतीने एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पुणे जिल्ह्याचे विविध महाविद्यालयातील अर्थशास्त्र व बँकिंग विषयाचे अध्ययन व अध्यापन करणारे दोनशे पन्नास (२५०) विद्यार्थी व प्राध्यापक प्रत्यक्ष सहभागी झाले होते. तसेच केंद्रीय अर्थसंकल्प या विषयावरील ही कार्यशाळा ऑनलाईन स्वरूपात देखील व्यापारी वर्ग व नागरिकांना सहभागी होता यावे म्हणून तशी सुविधा करण्यात आली होती, अशी माहिती प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी यांनी दिली. अर्थसंकल्पावरील कार्यशाळेचे उद्घाटन कार्यशाळेच्या प्रमुख पाहुण्या अर्थशास्त्राच्या अभ्यासिका व लेखिका डॉ. रिता शेटीया यांच्या हस्ते झाले. “केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६ अंतर्गत डॉ. शेटीया यांनी “अर्थसंकल्पाचे अंतरंग” विशद करून महसुली व भांडवली अर्थसंकल्पाच्या बाजू उपस्थितांना उलगडून दाखविल्या. अर्थसंकल्पात कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात हे विकसित भारताच्या प्रवासातील इंजिन म्हणून भर देण्यात आला आहे, ज्यात समावेशकतेच्या भावनेने करण्यात येणाऱ्या सुधारणांचा इंधन म्हणून वापर केला जातो. या अनुषंगाने अर्थसंकल्पमध्ये अधिक तरतुदी आवश्यक आहेत. तसेच अर्थसंकल्पमध्ये कौशल्य विकास यावर भर दिला असून, याचा तरुणांना नक्कीच फायदा होणार आहे. एकूण जीडीपीच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च झाला पाहिजे. ग्रामीण महिला, तरुण शेतकरी, ग्रामीण युवा, सीमांत आणि छोटे शेतकरी आणि भूमिहीन कुटुंबांवर लक्ष केंद्रित करून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे सरकारचे महत्वाचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि याचबरोबर योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या होणे महत्वाचे आहे. तळागाळापर्यंत योजना पोहचवण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. तरच आपली “विकसित भारत – 2047” कडे खऱ्या अर्थाने वाटचाल होईल, असे डॉ.रिता शेटीया म्हणाल्या. यावेळी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद भुजबळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगावचे विभाग प्रमुख श्री प्रशांत शेटे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिवाजी टाकळकर, कला शाखा समन्वयक डॉ. शरद कापले व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. एक दिवसीय कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी “केंद्रीय अर्थसंकल्प” या विषयावर आधारित वक्तृत्व स्पर्धा व भित्तिपत्रक सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे आयोजन नारायणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख आकाश कांबळे, अर्थशास्त्र संशोधन केंद्रप्रमुख डॉ. श्रीकांत फुलसुंदर, प्रा.सोनाली काळे व प्रा. सद्गुरु जाधव यांनी केले.

पुणे पोलिस आणि पुनीत बालन ग्रुपच्यावतीने आयोजित ‘तरंग’ कार्यक्रम जल्लोषात

0
Newsworldmarathi Pune : संगीतकार अजय- अतुल यांच्या जोडीने एकापेक्षा एक बहादार मराठी- हिंदी गाणी सादर करत पोलिस आणि त्यांच्या कुटुंबियांना अक्षरश मंत्रमुग्ध करून टाकले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह हिंदी- मराठी सिने क्षेत्रातील दिग्गज कलाकारांची उपस्थिती, 70 हून अधिक संगीत गायक आणि वाद्यक, फटाक्याची मोहक अतिषबाजी, उपस्थितांनी गाण्यांवर दरलेला ठेका यामुळे पहिल्याच ‘तरंग’ कार्यक्रमाने पोलिसांची मने जिंकली. पोलिस अधिकारी-कर्मचारी यांना कुटुंबियासोबत उत्सव साजरा करता यावा यासाठी पुणे पोलिस आणि पुनीत बालन ग्रुप यांच्यावतीने पोलिस कुंटुंबियासांठी गायक व संगीतकार अजय- अतुल यांच्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांच्यासह अनेक राजकिय नेते मं़डळी, कलाकार उपस्थित होते. शिवाजीनगर येथील पोलिस ग्राऊंड झालेल्या या ‘तरंग’ कार्यक्रमाची सुरवात शर्वरी जेमनीस यांच्या गणेश वंदननेनी झाली. अभिनेत्री मेघना एरंडे यांनी लहान मुलांच्या कार्यक्रमातील आवाज काढून उपस्थित बाल-चमुंची मने जिंकली. त्यानंतर अजय- अतुल यांच्या प्रत्यक्ष संगीत कार्यक्रमाला सुरवात झाली. नटरंग, मल्हारवारी, वाट देसु देघा देवा, मलहिसमा चॉद हे तु.., आई गोंधळाला ये.. सैराटमधील याड लागल ग याड लागल.., भलतच झालय आज.., चंद्रा.., फॅन्ड्रीमधील जीव झाला वेडा पिसा, डॉल्बी वाल्या बोलवाओ माझ्या डिजेला अशी मराठी- हिंदी एकापेक्षा एक सरस गाणी अजय-अतुल यांनी आणि त्यांच्यासह कलाकारांनी सादर करून उपस्थितांना अक्षरश वेड लावले.. सैराटमधील झिंग झिंग झिंग़ांट या गाण्याने तर उपस्थितांनी तर अक्षरश मैदान डोक्यावर घेतले. देवा श्री गणेशा या गाण्याने संगीत मोहत्सवाची सांगता झाली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून कलाकारांना दाद दिली. यावेळी फटाक्यांच्या अतिशबाजी आणि विदयुत रोषणाईने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
Oplus_131072
उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या पोलिसांना सन्मान ‘तरंग’ कार्यक्रमात शहर पोलिस दलातील उत्कृष्ट कामगिरी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांचाही फडणवीस आणि पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. एक सराफ पेढीतून चोरलेले तब्बल 17 तोळे सोने पुणे पोलिसांनी परत मिळवून न्यायालयीन प्रक्रिया करून अवघ्या तीन महिन्याच्या आत परत मिळविले. या कार्यक्रमातच ते सराफाला परत करण्यात आले.
Oplus_131072
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘तरंग’ कार्यक्रमाचे कौतुक करताना पोलिसांना चांगल्या वातावरणात जगता आले तर ते चांगले काम करू शकतील. पोलिसांच्या कुंटुंब कल्याणाच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाय योजना राबविण्यात येत असून त्यांच्या आरोग्य सुविधा व घरांचा प्रश्न निकाली काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी तरंग 2025 कार्यक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. पुणे पोलिसांच्या कुटुंबियांसाठी पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन पुनीत बालन ग्रुपच्या माध्यमातून ‘तरंग’ या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व घेतल्याने पुणे पोलिसांच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुनीत बालन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. हिंदी-मराठी सिने कलाकार, खेळांडुची हजेरी अभिनेता बोमन इराणी, नागराज मंजुळे, अजिक्य देव,सिध्दार्थ जाधव, अमृता खानविलकर, पुजा चोप्रा, स्मिता गोंदकर, दिप्ती देवी, पुष्कर जोग, मेघा धाडे, तन्मय जका, केदार जाधव, राहुल त्रिपाटी, ऋतुजा भोसले, प्रीत झांगीयाणी, माध्यव अभ्यंकर असे दिंग्गज मान्यवर यावेळी उपस्थित होते. मागील वर्षभरात लोकसभा – विधान सभा निवडणूक असो की अन्य कायदा व्यवस्था अथवा गुन्हेगारीला आळा घालणे असो ही परिस्थिती अत्यंत मेहनतीने आणि यशस्वीरित्या हाताळले आहे. पुणे शहर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. त्यांच्या मनोरंजनसाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी अजय- अतुल यांचा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. – अमितेश कुमार, पुणे पोलीस आयुक्त. समाजातील विविध घटकांसाठी नेहमची काम करत असतो. मात्र आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी जे नेहमची तत्पर असतात त्यांना कुटुंबियासमवेत ना उत्सव साजरा करत येत ना कुठे निवांत वेळ घालविता येत नाही. त्यामुळे पोलिस कुटुंबियासाठी आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम करावा हा विचार मांडला. मा. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यास तत्काळ होकार दिला. हा तरंग कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी त्यांनी स्वतः खुप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व मला दिले याबद्दल मी पुणे पोलिसांचा आभारी आहे. – पुनीत बालन, अध्यक्ष, पुनीत बालन.

उरळी देवाची कचरा डेपोला पुन्हा आग

0
Newsworldmarathi Pune : फुरसुंगी  सायंकाळी पाचच्या दरम्यान उरळी देवाची फुरसुंगी येथील कचरा डेपोला आग लागली आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.  गेल्या २५ वर्षातील येथील इतिहास पाहता दरवर्षी उन्हाळ्यात येथील कचरा डेपोला आग लागते. मग यावर्षी  आज सायंकाळी पाचच्या सुमारास येथील  वेस्टेज पडलेल्या कचऱ्याला आग लागली. पुणे महानगरपालिकेतून फुरसुंगी व उरुळी देवाची दोन गावे वगळण्यात आले असून येथे नगरपरिषद करण्यात आली आहे मात्र कचरा डेपोचा परिसर हा पुण्यात पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गतही ठेवण्यात आला आहे तरीही येथील कचरा डेपोवर महापालिकेचे लक्ष नाही.  अग्निशामक दलाचे 6 बंबच्या  साहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. वेस्टेज कचरा येथील प्रकल्पाच्या शेजारी पडला असून तापमान वाढल्याने या कचऱ्याला आग लागली. असे सांगितले जाते आहे. तसे दरवर्षी तापमान वाढल्याने येथील कचरा डेपोला आग लागते. यावर्षीही ही अशीच आग लागली. सायंकाळपर्यंत येथील टँकरने पाणी आणून तेथून फायर गाड्यांनी या कचऱ्याच्या भल्या मोठ्या ढिगाऱ्यावर पाणी फवारून व जेसीबी व पोकलेन च्या साह्याने आग लागलेल्या कचऱ्या हलवून जिथपर्यंत आग पोहोचली आहे तिथपर्यंत पाणी मारण्याचे काम सुरू आहे. तापमान वाढल्यामुळे ही आग लागली असून युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम सुरू आहे.

मुळशी धरणात दोन जण बुडाले

Newsworldmarathi Pune : मुळशी धरण भागात ढोकळवाडी-चाचिवली येथे फिरण्यासाठी आलेल्या आठ मित्रांमधील दोन जण बुडाल्याची घटना रविवारी (दि. १६) दुपारी घडली. अनिश राऊत (वय १८, डॉ. पाटील काॅलेज, पिंपरी) आणि विशाल राठोड (वय १७, फत्तेचंद जैन विद्यामंदिर चिंचवड) अशी या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पडवळनगर-थेरगाव पिंपरी (पुणे) येथील अविश राऊत (वय १८), विशाल राठोड (वय १७), गोविंदा चाकली (वय १६), जीत लोंढे (वय १७),अथर्व राऊत (वय १६), राज यादव (वय १७), सोहम जाधव (वय १६),आदित्य बाबर (वय २०) हे आठ मित्र मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आहे होते. हे आठ जण चाचिवली ढोकळवाडी येथेध रणाच्या पाण्यात पोहत होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने याठिकाणी यातील अनिश राऊत आणि विशाल राठोड हे दोन जण बुडाले. पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, पौड पोलहस व आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे व पथक, हिंजवडी येथील स्क्युबा डायव्हींगचे पथक त्यांचा शोध घेत आहेत. रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत दोघेही सापडून न आल्याने शोध मोहिम थांबविण्यात आली. या दोघांचा शोध पुन्हा सोमवारी (दि. १७) सकाळपासून घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

५० शाळेतील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

0
Newsworldmarathi Pune : पर्यावरण विषयक गाणी, कविता, चित्रकलेतून पर्यावरण रक्षणाचा संदेश आणि प्रभावी नाट्य सादरीकरणातून पर्यावरण संवर्धनाचा जागर यातून आज पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी त्यांची पर्यावरण रक्षणाप्रती असलेली जागरूकता दाखवून दिली. निमित्त होते, वनराई संस्थेचे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री, पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या पार्श्वभूमीवर आयोजित वनराई इको क्लब पर्यावरण शिक्षण उपक्रमाचे. या उपक्रमात 50 शाळांमधील 400 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लिट्ल चॅम्प फेम गायिका अंजली गायकवाड, वनराई चे विश्वस्त डॉ. रोहिदास मोरे. सागर धारिया, वनराईचे सचिव अमित वाडेकर, बबनराव कानकिरड आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सागर धारिया म्हणाले, वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले आहे. आपण हे बदलेल चक्र ठीक करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत. किमान आपल्या घरात येणाऱ्या पाण्याची बचत जरी केली तरी खूप मदत होईल. कारण छोट्या छोट्या गोष्टीच मोठे बदल घडवू शकतात. डॉ. रोहिदास मोरे म्हणाले, पर्यावरणाचा जो ऱ्हास होत चाललेला आहे तो कमी करायचा असेल तर पर्यावरण सजग तरुण पिढी निर्माण होण्याची गरज आहे. डॉ. मोहन धारिया यांनी पर्यावरण जनजागृतीचे जे काम चाळीस वर्षापूर्वी सुरू केले ते आता देशभर सुरू आहे. यामध्ये आपल्या सर्वांना सहभागी व्हायचं आहे. प्रास्ताविकपर भाषणात अमित वाडेकर म्हणाले, वनराई चे संस्थापक डॉ. मोहन धारिया यांनी 40 वर्षा पूर्वी जे रोप लावले त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. शेकडो दुष्काळी गावांना त्याने दुष्काळ मुक्त केलं आहे. इको क्लबच्या माध्यमातून गेले 30 वर्ष पर्यावरण जनजागृती करत असून पर्यावरण शिक्षणाकडे आम्ही आता एक पाऊल पुढे टाकलेले आहे. पुढील काळात याची व्याप्ती वाढणार आहे. लिट्ल चॅम्प फेम अंजली गायकवाड म्हणाली, पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणाऱ्या वनराई संस्थेच्या कार्यातून प्रेरणा मिळाली. पर्यावरण बद्दल आपण किती जागरूक राहील पाहिजे, किती काळजी घेतली गेली पाहिजे याची जाणीव होते. पर्यावरणा प्रमाणेच आरोग्याची काळजी देखील घेणे गरजेचे आहे. कारण आरोग्य हीच संपत्ती आहे. अलीकडे दुषित पाण्यामुळे जीबीएस नावाचा आजार होत आहे. त्यामुळे आपल्याला पर्यावरण संवर्धनासाठी किती काम करण्याची गरज आहे यांची जाणीव होते. बबनराव कानकीराड यांच्यासह परीक्षक राहुल देवकाते, किशोर नलावडे, आणि डॉ. अश्विनी पटवर्धन मनोगत व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन वनराई इको क्लबचे प्रकल्प संचालक बसवंत विठाबाई बाबाराव यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली वाघे यांनी केले. आभार सुजाता मुळे यांनी मानले.