Newsworldmarathi Mumbai: मुंबई महानगरपालिका निवडणुका एकत्र लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली. मुंबई वगळता इतर ठिकाणी त्या ठिकाणची परिस्थिती बघून निर्णय घेतला जाणार असल्याचे ही त्यांनी सांगितलं.
येत्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे आणि अजित पवार गट यांचं सरकार आहे. यामुळे आता हे सरकार पुन्हा एकत्रित येत महानगरपालिका निवडणूक लढणार का असा प्रश्न केला तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मुंबई महानगरपालिका आम्ही एकत्रच लढणार इतर ठिकाणची परिस्थिती बघून तिथले निर्णय घेतले जातील.
महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागले आहेत. मात्र कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता की निवडणुका एकत्रच लढल्या तर काय होणार. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की फक्त मुंबई महानगरपालिका एकत्रित लढली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर ठिकाणची परिस्थिती बघून तिथले निर्णय तिथल्या स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते यांना विचारात घेऊन घेतले जाणार असल्यास देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Recent Comments