स्वराज्य सप्ताह अंतर्गत तोरणा गडावर स्वच्छता मोहिम

0
Newsworldmarathi Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘स्वराज्य सप्ताह’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेल तर्फे आयोजित गडकिल्ले स्वच्छता अभियानात तोरणा गडावरील मंदीरांसह, शिवकालीन व ऐतिहासिक महत्व असलेल्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. माननिय अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे साहेब तसेच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित ‘स्वराज्य सप्ताह’ राज्यभरात उत्साहात साजरा होतोय. महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांच्या संकल्पनेतून ‘स्वराज्य सप्ताह’ गडकिल्ल्यांवर स्वच्छता अभियान राबवून साजरा करण्यात आले. या अभियानाचाच भाग म्हणून तोरणा गडावरील तोरणेश्वर मंदिर, मेंगाई देवीचे मंदिर व महादेव मंदीरात व आवाराची स्वच्छता करून पूजा करण्यात आली. पर्यटकांकडून गडावर ठिकठिकाणी टाकण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्या व प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्याप्रमाणात गोळा करण्यात आल्या गडावरील पाण्याच्या टाक्यांच्या भोवतालच्या परिसरातील कचरा गोळा करण्यात आला. गड किल्ले संवर्धन सेलच्या कार्यकर्त्यांसोबत राजगड तालुका व आर एम डी कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सेल चे प्रदेश उपाध्यक्ष समीर धुमाळ, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव राजगड तालुका अध्यक्ष वल्लभ कोकाटे, हवेली तालुका उपाध्यक्ष, अमित नागपुरे, मयुरेश पासलकर, राकेश तांबे यांनी संयोजन केले होते.

स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक

0
पुणे : पुणे पोलिसांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दत्तात्रय गाडेला पुण्यात आणण्यात आलं आहे. दत्तात्रय गाडे यानं मंगळवारी पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला होता. ही धक्कादायक घटना स्वारगेट बसस्थानकात घडली होती. दत्तात्राय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी 100 पोलिसांचा ताफा, डॉग स्कॉड गुनाट गावात दाखल झालं होतं. दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांनी 13 पथकं तयार केली होती. पुणे पोलिसांनी गाडे याला शिरुर तालुक्यातील गुनाट गावातून पकडण्यात आलं आहे. पोलिसांना आरोपी सापडला आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला आहे.

वृक्ष लागवड आणि रक्तदानमुळे वाचवी मनुष्य जातीचे प्राण : शोभाताई आर धारिवाल

0
Newsworldmarathi Pune : दरवर्षी 1 मार्च रोजी श्री रसिकलाल मा. धारीवाल यांच्या जन्मदिनानिमित्त “रक्तदान सोहळा” आयोजित केला जातो या आधीही त्यांच्या जन्मदिनानिमित्त पुण्यामध्ये विविध रक्तदान केंद्रांवर एकाच दिवशी २४,000 ब्लड बॅग्स संकलन करण्याचा विक्रम आर एम डी फाउंडेशनने केलेला आहे, हि परंपरा आजही नियमितपणे पाळल्या जाते. तसेच आर एम डी फाउंडेशन द्वारा मागील 30 वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन कार्यक्रम निरंतर चालू आहे श्री रसिकलाल धारीवाल साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त “एक लाख झाडं लावण्याची योजना” असेल किंवा “पुलकछाया योजने” अंतर्गत भारतभर वृक्ष लागवड असेल किंवा “एक झाड आईच्या नावाने” योजना असेल तेव्हा आर एम डी फाउंडेशन द्वारा शेकडो वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम राबविण्यात आलेले आहे आज काळाच्या बदलत्या गरजेनुसार फाउंडेशनने “ट्री ट्रान्सप्लांटेशन योजना” राबविण्यात सुरुवात केलेली असून पुणे रिंग रोड प्रकल्पात शेकडो वृक्षांना कापण्यापासून वाचवून उपलब्ध जागेत स्थानांतर करून अनेक वृक्षांचे प्राण वाचविण्याचे काम सुरु झालेले आहे. आजच्या प्रसंगी ” वृक्ष लागवड आणि रक्तदान वाचवी मानवाचे प्राण” अशी भावना शोभाताई रसिकलाल धारिवाल यांनी व्यक्त केली. आज दिनांक १ मार्च २०२५ शनिवार रोजी श्री रसिकलाल साहेबांच्या जन्मदिनानिमित्त जास्तीत जास्त पुणेकरांनी आर एम डी बंगला नंबर ६४, लेन नंबर ३ कोरेगाव पार्क-पुणे येथे उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अधिक माहितीसाठी ७३५३३५४४४४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

छत्रपती शिवाजी महाराज एका युगप्रवर्तक सेनानी पुस्तकाचे शनिवारी प्रकाशन

0
Newsworldmarathi Pune : प्राचार्य रमणलाल शहा लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज एका युगप्रवर्तक सेनानी’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवार, दिनांक १ मार्च रोजी होणार आहे. टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात सकाळी १०.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीचे चेअरमन डॉ. पी.डी.पाटील, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ, अर्थतज्ञ अभय टिळक, उद्योगपती संजय इनामदार, उत्कर्ष प्रकाशन चे सुधाकर जोशी, मसाप च्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आदी उपस्थित राहणार आहेत. या ग्रंथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वातंत्र्यप्रेम, स्वाभिमान, मनाची विशुद्धता, पराक्रम, शौर्य, निर्भयता, युद्धकौशल्य, आरमार निमिर्ती तसेच सर्व मावळ्यांचे त्यांनी केलेले संघटन आणि चतुरंग सैन्य या गोष्टी मराठी समाजाला आणि देश व जगाला स्वातंत्र्याचा संदेश देणारे ठरले. समाजाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत त्यांनी निर्माण केली. समाजाला जागे केले, देशात देशांतर्गत व परदेशी आक्रमक असताना त्यांच्यावर विजय प्राप्त करून मराठयांची सत्ता स्थापन केली. हे त्यांचे क्रांतिकारक कार्य असून याचे विस्तृत वर्णन या ग्रंथामध्ये करण्यात आले आहे. दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरीष चिटणीस, सनी मेडिकल सातारा चे रोहित शहा, सनी फार्मा सातारा चे नितीन शहा, नेहा शहा – दावडा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ शनिवारपासून

0
Newsworldmarathi Pune : व्यावसायिकांमध्ये उद्योजकता व कल्पकता यांचा विकास व्हावा, याउद्देशाने मराठा आंत्रप्रिन्युअर्स असोसिएशन तर्फे ‘एमईए एक्झिबिशन २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ व २ मार्च २०२५ रोजी महालक्ष्मी लॉन्स, डीपी रस्ता, कर्वेनगर येथे हे प्रदर्शन होत असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला सचिव राजेश कुराडे, उपाध्यक्ष नितीन भोसले, कमिटी मेंबर सायली काळे, महेश घोरपडे, अभिजित जाधव आदी उपस्थित होते. बांधकाम, वित्त, कंपनी सेक्रेटरी, डॉक्टर्स, हॉस्पिटॅलिटी, इंडस्ट्रियल, आॅटोमोबाईल, एफएमसीजी, अ‍ॅर्व्हटायझिंग, ऊर्जा, सौंदर्य, फॅशन, आयटी, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर, फायनान्स यांसह गृहसजावटीपासून प्रवासापर्यंत आणि सौंदयार्पासून वित्तव्यवस्थेपर्यंत सर्व क्षेत्रातील सेवा व उत्पादने एकाच छताखाली पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उद्योजक यामध्ये सहभागी होत आहेत. नवीन व्यवसायाच्या संधी, उत्पादने व सेवांचे स्टार्टअप्स, व्यवसायवृद्धीचे नवे पर्याय, दर्जेदार उत्पादनांची खरेदी व माहिती अशी अनेक उद्दिष्टे येथे साध्य होणार आहेत. दिनांक १ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उदघाटन कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम , पुणे महानगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले, सारथी चे व्यवस्थापकीय संचालक अजित निंबाळकर तसेच प्रसिद्ध उद्योगपती पुनीत बालन उपस्थित राहणार आहेत. व त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता फ्लूट अँड फिडल हा श्रुती भावे आणि अमर ओक यांचा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हॉटेल संदीप चे संदीप कोतकर यांनी या सांगीतिक कार्यक्रमाला सहकार्य केले आहे. दोन्ही दिवस खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल्स तसेच लहान मुलांसाठी प्ले एरिया देखील उपलब्ध असणार आहे. रविवार दिनांक २ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजता भीमथडी च्या संस्थापक सुनंदा पवार यांना एमईए चे आयकॉन म्हणून गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एमईए प्राईड हा पुरस्कार तेजराज पाटील यांना देण्यात येणार आहे. तसेच विविध पुरस्कारांचे वितरण केपीआयटीचे अध्यक्ष रवी पंडित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दोन्ही कार्यक्रम आणि एमईए एक्झिबिशन २०२५ सर्वांसाठी विनामूल्य खुले असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.

मावळ तालुक्यात रस्ते, पाणी योजनांच्या कामांना गती देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

0
Newsworldmarathi Mumbai : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसगाव, पाटण, कार्ला व परिसरातील पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण कराव्यात. मौजे कार्ला येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासह श्रीएकवीरा मंदिर परिसराच्या विकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटन पोलिस ठाणी स्थापन करण्यात येतील. महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव, चाकण, शिक्रापूर परिसरातल्या महामार्गाचे रुंदीकरण, महामार्गावर उड्डाणपूल उभारण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल, यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठकीत स्पष्ट केले. पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील विकासप्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडचणी दूर करुन या प्रकल्पांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (व्हीसीद्वारे), स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्यासह नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, वित्त व नियोजन, पाणीपुरवठा- स्वच्छता, आरोग्य, एमएसआरडीसी, एमएसआयडीसी, गृह, क्रीडा आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी, पुण्याचे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच पुणे ग्रामीण पोलीसचे वरिष्ठ अधिकारी (व्हीसीद्वारे) उपस्थित होते. बैठकीत मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. मंदिर परिसरात भाविकांना चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाची कामे करण्यात येत आहेत. वेहेरगाव येथील श्रीएकवीरा देवी मंदिर येथे फनिक्युलर रोपवे उभारण्यासंदर्भातील कामांना मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे भाविकांना अल्पावधीत मंदिरात पोहोचता येणार आहे. प्रकल्पाची गतीने उभारणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रूग्णालयाचे सुरुवातीच्या टप्प्यांचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. उर्वरित कामांचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तालुका क्रीडासंकुल बांधण्यासाठी मावळ तालुक्यातील मौजे जांभुळ येथे 2 हेक्टर 60 आर क्षेत्र मंजूर करण्यात आले आहे. यात कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, फूटबॉल, टेनिस, धावपट्टी, प्रेक्षागार आदी सोयीसुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. ही कामे मंजूर निधीतून तातडीने सुरु करावीत, ज्या कामांना अतिरिक्त निधी लागेल तो तातडीने उपलब्ध केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती द्यावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत मंजूर डोणे आढळे, वाढीव डोंगरगाव कुसगाव, पाटण व ८ गावे, कार्ला व ७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, खडकाळे, वराळे, देहू नगरपंचायत पाणीयोजनांच्या कामांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेतला. या सर्व पाणीयोजनांच्या कामांना गती द्यावी, असे निर्देश दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करु : हर्षवर्धन सपकाळ

Newsworldmarathi Mumbai : हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, त्यांच्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विचारांची मंडळी आज केंद्र आणि राज्यात सत्तेत आहेत. शिवाजी महाराजांना छळले तो विचार आजही जिवंत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मंडळींच्या मागे राजाश्रय आहे म्हणूनच महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण व पुरस्कार दिले जात आहेत ही अत्यंत खेदाची बाब असून शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विचारांचा टकमक टोकावरून कडेलोट करु, असा संकल्प असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्क्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आणि त्यानंतर महाडच्या चवदार तळ्याला भेट देऊन महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ अदिलशाही, निजामशाहीच नाहीतर भेदाभेद, अस्पृषता व असमाजवादी विचार घेऊन काम करणाऱ्यांच्या विरोधातही लढले. अदिलशाही, निजामशाही, औरंगजेब गेला पण जातीयवादाचा विचार मात्र गेला नाही तो आजही कायम आहे. एका अभिनेत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला पण त्याच्यावर कारवाई न करता त्याच्या घरासमोर पोलीस पहारा देत बसले आहेत. इतिहास तज्ज्ञ इंद्रजीत सावंत यांनी फोनवरून धमकी दिली जाते व त्याचवेळी महाराजांच्याबद्दल अपशब्द वापरले जातात. शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सावरकरांना सरकार पुरस्कार देऊन सन्मानित करते हे दुर्दैवी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. स्वातंत्र्य चळवळीतही केवळ सत्तेचे हस्तांतर नव्हे तर व्यवस्था परिवर्तनाचे स्वप्नही होते आणि स्वातंत्र्यानंतर देशाला दिलेल्या संविधानातही हिंदवी स्वराज्याची संकल्पना आहे.काँग्रेसची ध्येय धोरणही हिंदवी स्वराज्यावर आधारीत आहेत. महाराजांना अपेक्षित असणारे रयतेचे राज्य स्वराज्य स्थापन करण्याकरता काँग्रेस पक्ष बांधिल असल्याचे सांगताना ही प्रतिज्ञा करण्यासाठी रायगडावर आलो आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. पुण्यातील बलात्कार प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ म्हणाले की, महिलांवरील बलात्कार हे सरकारचे अपयश आहे. घाशीराम कोतवालाच्या हातात गृह विभागाचा कारभार आहे याचे हे द्योतक आहे. छत्रपतींनी पेशव्यांना गादीवर बसवले आणि पेशव्यांनी स्वराज्याची वाट लावली, आज तसेच होत आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाड येथे विंचू दंशावर संशोधन करून औषध शोधणारे प्रख्यात डॉक्टर पद्मश्री हिंमतराव बावस्कर यांच्या निवासस्थानी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी सदिच्छा भेट दिली व बावस्कर कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बर्गे महिला काँग्रेसच्या ॲड. श्रद्धा ठाकूर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे,ज्येष्ठ नेते आर. सी. घरत, दिलीप पाडगावकर, यांच्यासह तालुका काँग्रेसचे अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आरोपीची माहिती देणाऱ्याला मिळणार एक लाख रुपये…

Newsworldmarathi Pune : पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. हा प्रकार पहाटेच्या वेळी घडला आहे. अधिक माहिती अशी की, स्वारगेट डेपोत आपल्या गावी चाललेल्या २६ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करून आरोपी दत्तात्रय रामदास गाडे ( वय. ३७ वर्षे) रा. गुनाट, ता. शिरूर, जि. पुणे) हा फरार झाला होता. पोलिसांनी गुन्हेगारास शोधण्यासाठी आठ पोलिस पथकं रवाना केली आहेत. मात्र या घटनेला होऊन तीन दिवस होत आहेत तरी अजून आरोपी सापडत नसल्याने अखेर स्वारगेट पोलिसांनी आरोपीची माहिती देणारास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे घोषित केले आहे. दरम्यान, आरोपीची माहिती देणाराचे नाव गुपित ठेवण्यात येणार आहे. या संबंधित स्वारगेट पोलिसांनी माहिती पत्रक जारी केले आहे.

कोंढवा-येवलेवाडी कार्यालय जनजागृती व स्वच्छता अभियान!

0
Newsworldmarathi Pune : उप आयुक्त, परिमंडळ क्र. ४ व उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका यांचे मार्गदर्शनाखाली गुरु हरदेव सिंह यांच्या स्मृतीदिनानिमित्त संत निरंकारी सेवादल – इंदिरानगर यांच्या माध्यमातून रविवारी (ता.२३) सकाळी ७ ते १२ या वेळेत ऐतिहासिक पेशवे तलाव व परिसरात स्वच्छ जल स्वच्छ मून या संकल्पनेच्या अंतर्गत २२५ साधक तसेच क्षेत्रिय कार्यालय कडील ४० अधिकारी / कर्मचारी यांचे मार्फत परिसर स्वच्छ करणेत आला. १ कॉम्पॅक्टर , १ छोटा हत्ती व १ कंटेनर या वाहनामार्फत अंदाजे ४ टन १५० किलो कचरा गोळा करण्यात आला. स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांमध्ये उघड्यावर्ती कचरा न टाकने, एकदा वापरलेले प्लास्टिक वापर न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इत्यादी बाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. सदर स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वच्छतेबाबत महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी मार्गदर्शन करुन स्वच्छतेविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर अभियाना दरम्यान कोंढवा येवलेवाडी कार्यालय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. दुल्लम, आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक श्रीमती कदम, श्री. सोनवणे व अधिकारी, कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

स्वारगेट स्थानाकातील धक्कादायक प्रकाराबाबत रुपाली चाकणकर म्हणाल्या….

0
Newsworldmarathi Pune : पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये २६ वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. स्वारगेट बसस्थानकावरील शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला आहे. हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला आहे. या अमानुष घटनेतील आरोपीची ओळख पटली असून तो सध्या फरार आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्यानंतर तो तातडीने पसार झाला. स्वारगेटसारख्या गजबजलेल्या भागातही महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित केला. त्यांनी सांगितले की, पुणे शहर महिलांसाठी सुरक्षित मानले जात असले तरी अशा घटनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. सकाळी सहा-साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली, त्यानंतर पीडित तरुणीने नऊच्या सुमारास पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासासाठी आठ पोलिस पथके कार्यरत असून पुण्यासह परिसरातील ग्रामीण भागातही शोधमोहीम राबवली जात आहे. आरोपीच्या कॉल डिटेल्सचा मागोवा घेतला जात असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला आहे.