देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळाची यादी इथे पाहा

भाजपचे मंत्रिमंडळातील नवे मंत्री महाराष्ट्रात भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद आलं असून, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. तसंच, 16 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रिपदंही भाजपच्या वाट्याला आले आहेत. भाजपनं तीन महिला नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. कॅबिनेट मंत्री : 1) चंद्रशेखर बावनकुळे 2) राधाकृष्ण विखे पाटील 3) चंद्रकांत पाटील 4) गिरीश महाजन 5) अतुल सावे 6) गणेश नाईक 7) मंगलप्रभात लोढा 8) शिवेंद्रराजे भोसले 9) जयकुमार रावल 10) पंकजा मुंडे 11) आशिष शेलार 12) अशोक उईके 13) जयकुमार गोरे 14) संजय सावकारे 15) नितेश राणे 16) आकाश फुंडकर राज्यमंत्री : 17) माधुरी मिसाळ 18) मेघना बोर्डीकर 19) पंकज भोईर शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्रिमंडळातील नवे मंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री झाले असून, त्यांच्या पक्षाला 9 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं मिळाली आहेत. तानाजी सावंत, दीपक केसरकर अशा नेत्यांना एकनाथ शिंदेंनी डच्चू दिलाय. कॅबिनेट मंत्री : 1) शंभुराज देसाई 2) उदय सामंत 3) दादा भुसे 4) गुलाबराव पाटील 5) संजय राठोड 6) संजय शिरसाट 7) प्रताप सरनाईक 8) भरत गोगावले 9) प्रकाश आबिटकर राज्यमंत्री : 10) आशिष जयस्वाल 11) योगेश कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्रिमंडळातील नवे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 8 कॅबिनेट, तर एक राज्यमंत्रिपद मिळालं आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील अशा दिग्गजांना अजित पवारांनी डच्चू दिल्याचं दिसून येत आहे. कॅबिनेट मंत्री : 1) हसन मुश्रीफ 2) आदिती तटकरे 3) बाबासाहेब पाटील 4) दत्तात्रय भरणे 5) नरहरी झिरवळ 6) माणिकराव कोकाटे 7) मकरंद जाधव-पाटील 8) धनंजय मुंडे राज्यमंत्री : 9) इंद्रनील नाईक

भाजपकडून ‘हे’ होणार मंत्री…

भाजपकडून महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी काही प्रमुख नेत्यांची नावे निश्चित झाली असून, त्यामध्ये राज्यातील विविध भागांतील आणि समाजातील प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न दिसत आहे.खालील नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे: भाजपकडून ‘हे’ होणार मंत्री नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार पंकज भोयर मेघना बोर्डिकर पंकजा मुंडे जयकुमार रावल मंगलप्रभात लोढा चंद्रकांत पाटील अतुल सावे माधुरी मिसाळ विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, आणि मुंबई या सर्व भागांना प्रतिनिधित्व भाजप कडून देण्यात आले आहे. ओबीसी, मराठा, महिला, आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व देऊन समतोल राखण्याचा प्रयत्न भाजप ने केला आहे. हे मंत्री त्यांच्या क्षेत्रातील विकास, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करतील, अशी अपेक्षा आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मंत्रिमंडळ विस्तार भाजपसाठी महत्त्वाचा असणार आहे.

दोघी मैत्रिणी होणार मंत्री….

0
Newaworldmarathi Mumbai : भाजपकडून पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ या दोन सख्या मैत्रिणींना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. त्यांची मंत्रीपदावर वर्णी लागल्याने राज्यात चर्चेला उधाण आले आहे. या दोघींची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे, आणि आता त्या एकत्र मंत्रिमंडळात काम करताना दिसतील. पंकजा मुंडे या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजपमधील ओबीसी चेहरा आहेत तर माधुरी मिसळ या शहर आणि ग्रामीण दोन्ही भागांशी समन्वय साधून काम करणाऱ्या नेत्यांपैकी आहेत. दोघीही महिला सक्षमीकरण या विषयावर अनेक वर्ष काम करत आहेत. पंकजा मुंडे आणि माधुरी मिसाळ यांची मैत्री ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. दोघीही एकमेकींच्या कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, आणि सार्वजनिक जीवनात एकमेकींना पाठिंबा देत असतात. या दोघींना भाजपने मंत्री मंडळात स्थान देऊन महिला नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे यावरून दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महिला सक्षमीकरणावर भर देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या प्रश्नांवर एकत्रित काम करण्याची अपेक्षा या दोघींवर आहे. या दोघी मैत्रिणी एकत्र काम करत महिला, ओबीसी, आणि सामाजिक विकासाच्या मुद्द्यांवर ठोस योगदान देतील, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे.

भाजपकडून नितेश राणे, पंकज भोईर, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रीपदावर वर्णी

भाजपकडून अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी आमदारांना फोन जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपच्या ईच्छूक आमदारांमध्ये असलेल्या प्रतिक्षेला पूर्णविरामbमिळत आहे, आणि संभाव्य मंत्र्यांची नावे हळूहळू स्पष्ट होऊ लागली आहेत. भाजपकडून नितेश राणे, पंकज भोईर, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले यांची मंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. भाजपकडून विविध प्रादेशिक, सामाजिक, आणि जातीय गटांचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न आहे. ओबीसी, मराठा, आणि शहरी मतदारांना आकर्षित करण्यासाठी योग्य प्रतिनिधींची निवड केली जात असल्याचे दिसून येत आहे. मंत्रिमंडळात विदर्भ, मराठवाडा, कोकण, आणि पश्चिम महाराष्ट्राचा समतोल राखण्यावर भर दिसून येत आहे. पाच वाजता होणाऱ्या या सोहळ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात? महाराष्ट्राचे लक्ष नागपूरकडे!

Newsworldmarathi Nagapur : राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी तयारी पूर्ण झाली आहे, आणि हा सोहळा रविवारी राजभवन, नागपूर येथे संपन्न होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि अजित पवार यांनी त्यांच्या पक्षातील संभाव्य मंत्र्यांची यादी अंतिम केली असून, आता यावर मुख्यमंत्री फडणवीस शिक्कामोर्तब करतील. आज होणारा हा सोहळा भव्य स्वरूपात आयोजित केला जाणार आहे. राज्यपाल रमेश बैस नव्या मंत्र्यांना शपथ देतील. तिन्ही गटांतून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. शिंदे गट, भाजप, आणि अजित पवार गटात संतुलन राखण्याचा प्रयत्न होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भ, मराठवाडा, आणि कोकणातील नेतृत्वाला प्राधान्य दिले जाऊ शकते. महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्यात सत्ता स्थापन झाली असून, सत्तेचे गणित पूर्णतः महायुतीच्या बाजूने झुकले आहे. 288 पैकी 232 जागांवर विजय मिळवल्याने महायुतीचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे, तर महाविकास आघाडी अवघ्या 46 जागांवर आक्रसली आहे. 5 डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे सरकार महायुतीच्या घवघवीत यशाचे प्रतीक मानले जात आहे. सरकार स्थापनेनंतर मंत्रीपदांच्या वाटपावरून सातत्याने चर्चा सुरू होती. खातेवाटपाचा पेच सोडवण्यासाठी 12 डिसेंबर रोजी दिल्ली येथे गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत कोणते मंत्री होणार आणि कोणते खाते दिले जाणार यावर अंतिम निर्णय झाला. आज होणाऱ्या सोहळ्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डान्सचा महा-मुकाबला: निर्णय देताना रेमो डिसूझाची पंचाईत

Newsworldmarathi Mumbai : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांनीच डिझाईन केलेल्या नवीन फॉरमॅटमध्ये दर आठवड्याला डान्सचा थरारक सामना बघायला मिळतो. या शोमध्ये हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात रेमो डिसूझा परीक्षकांच्या पॅनलवर सर्वोच्च पदी आहे. तर, मलाइका अरोरा टीम IBD ला समर्थन देते आणि गीता कपूर टीम SD ला समर्थन देते. उत्कृष्ट कोरिओग्राफर्सच्या मार्गदर्शनाखाली 12 अद्भुत डान्सर्स दोन टीममधून एकमेकांशी आमनासामना करताना दिसतात. या आठवड्यात, ऊर्फी जावेद आणि मनीषा रानी अनुक्रमे सुपर डान्सर आणि इंडियाज बेस्ट डान्सर या टीम्सचे मनोबल वाढवण्यासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील. अंतिम सामन्यासाठी मंच सज्ज झाला. दोन्ही प्रतिस्पर्धी संघांनी आपला श्रेष्ठ डान्सर पाठवला, ज्यांच्यात अंतिम द्वन्द्व रंगले. 50 गुण मिळवून अंतिम फेरीतला पाचवा स्पर्धक निवडण्याची पात्रता मिळवण्यासाठी टीम्सची ही झुंज होती. IBD चे प्रतिनिधित्व करण्यासाठी मलाइका अरोराने अनिकेतला पाठवले, तर गीता कपूरने गोड, छोट्याश्या फ्लोरिनाला सुपर डान्सर टीमच्या वतीने पाठवले. फ्लोरिनाची जबरदस्त एनर्जी आणि अनिकेतच्या अद्भुत मूव्ह्ज यांनी सगळ्यांना थक्क करून सोडले. लॉर्ड रेमोने दोघांच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले. त्याची खास ‘सर्वगुण संपन्न’ची दादही दिली. फ्लोरिनाच्या धमाकेदार ऊर्जेने तो विशेष प्रभावित झाला होता. गीता आणि मलाइका यांनीही त्या चिमुरडीचे खूप खूप कौतुक केले. विजेता जाहीर करण्यापूर्वी लॉर्ड रेमोने आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण दिले. तो म्हणाला, “या लढतीत वय हा मोठा घटक होता. पण ही दोन टीम्समधली स्पर्धा असल्यामुळे आपण वयावर फोकस करू शकत नाही, आपण डान्सकडेच लक्ष दिले पाहिजे. जर त्यांच्या डान्सचे विश्लेषण केले, तर असे म्हणावे लागेल की, कुणी एक कमी अजिबात नव्हते, पण स्पर्धेतला दुसरा स्पर्धक अधिक उजवा होता, ज्याने पहिल्यावर कुरघोडी केली. माझ्यासाठी तुम्ही दोघेही विजेता आहात पण ही फेरी ड्रॉ होऊ शकत नाही, त्यामुळे मला कुणा एकाची निवड करावीच लागणार.” आणि आता प्रत्येकाच्या डोक्यात असलेला प्रश्न हा आहे की, अनिकेत IBD साठी विजयश्री घेऊन येऊ शकेल की फ्लोरिना सुपर डान्सर्सना विजयाची भेट देणार? 50 गुण कोण जिंकणार आणि अंतिम फेरीतला पाचवा स्पर्धक निवडण्याची संधी कोण मिळवणार? असे अविस्मरणीय क्षण अनुभवण्यासाठी आणि सर्वोच्च किताब कोण जिंकणार हे जाणून घेण्यासाठी बघत रहा ही लढत, दर वीकएंडला रात्री 7.30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’तून ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चा जागर

0
Newsworldmarathi Pune : भारत मातेसह छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, ढोल-ताशाचा गजर व टाळ-मृदुंगाच्या तालावर ‘वाचाल तर वाचाल’सारखे संदेश देणारे फलक व लोकप्रिय पुस्तकांची मुखपृष्ठे हाती घेत अन् मायमराठीची विपुल ग्रंथसंपदा विराजमान असलेली पालखी खांद्यावर मिरवित पारंपरिक वेषभूषा केलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी शनिवारी दुपारी पुण्यात ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ काढली. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या शुभारंभाच्या निमित्ताने टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूल ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’ काढण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने काढलेल्या या ग्रंथ दिंडीमध्ये पुणे परिसरातील शंभरहून अधिक महाविद्यालयातील पाच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत पुस्तक वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर भव्य अशा ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी काढलेल्या या ग्रंथदिंडीत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले, तसेच विविध साहित्यिक, समाजसुधारकांची माहिती देण्यात आली. विविध अभंग, कविता, साहित्यिकांची माहिती देणारे फलक, ‘श्यामची आई’, ‘कऱ्हेचे पाणी’ अशा लोकप्रिय पुस्तकांची मुखपृष्ठे विद्यार्थ्यांनी हाती धरली होती. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र – कुलगुरू डॉ. पराग काळकर, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, अभिनेते प्रवीण तरडे, डॉ. नितीन घोरपडे, संयोजन समिती सदस्य डॉ. संजय चाकणे, बागेश्री मंठाळकर, प्रसेनजित फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर या ग्रंथ दिंडीत सहभागी झाले होते. या प्रसंगी प्रवीण तरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

0
Newsworldmarathi Pune : मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मराठीला राज्यमान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. आता मराठी बोलणाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे. आपली वाचनसंस्कृती जपण्याचे काम करायचे आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. ‘शांतता… पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम राज्यभर राबवता येईल, महोत्सवाला शासनाकडून सर्वोतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक कर्नल युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे आचार्य पवन त्रिपाठी, ज्येष्ठ लेखिका डॉ. अरूणा ढेरे, लोकमान्य मल्टिपर्पज कॉ ऑप सोसायटीचे अध्यक्ष डॉ. किरण ठाकूर, डॉ. सोमनाथ पाटील, विशाल चोरडिया, कृष्णकमार गोयल, संयोजन समिती सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात एकाच लेखकाच्या सर्वाधिक पुस्तकांच्या प्रदर्शन याचा गिनेस विश्वविक्रम परमपूज्य जैन आचार्य विजयरत्न सुंदर सुरिश्वर महाराज यांच्या नावे नोंदवला गेला. या विक्रमाचे प्रमाणपत्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. एनबीटीला पुढील तीस वर्षांसाठी पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे पत्र पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी दिले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पुणे पुस्तक महोत्सव इतका चांगला आहे म्हणूनच मी पुन्हा येईन, दरवर्षी येईन असे वाटते. पुस्तक महोत्सवासाठी पुण्यापेक्षा उपयुक्त दुसरे शहर नाही. पुणेकरांचा ज्ञानासाठी उत्साह आहे. शांतता पुणेकर वाचत आहे हा उपक्रम येत्या काळात महाराष्ट्रात करता येईल. असा महोत्सव महाराष्ट्रातील प्रमुख शहरांत आयोजित केला जाईल. इतिहासात ग्रंथांचे महत्त्व मोठे आहे. आपले ज्ञान किती खोल होते याचे उदाहरण नालंदा विद्यापीठ आहे. कलेपासून शल्यचिकित्सेपर्यंतचे ज्ञान तिथे दिले जायचे. या विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळल्यावर ती तीन महिने जळत होती. भारतीय सभ्यता सर्वांत प्राचीन आहे आणि ती चिरंतन सुरू राहिली आहे. चहुदिशांनी येणारे ज्ञान घेतले पाहिजे हे आपली संस्कृती सांगते. या देशाने नेहमी ज्ञानाची, ग्रंथांची पूजा केली. डिजिटल काळात ग्रंथ, पुस्तकांचे काय होईल याचे उत्तर तरुण पिढी देईल. एआय संकलन करू शकते, सृजन करू शकत नाही. तंत्रज्ञान ज्ञानाचे नवे दालन उघडून देते. तंत्रज्ञानामुळे कोणत्याही भाषांतील पुस्तके सहजपणे अनुवाद होऊन वाचता येतात. समाजातील मूल्ये टिकण्यासाठी वाचन संस्कृती टिकणे महत्त्वाचे आहे. येत्या काळात सर्वाधिक विश्वविक्रम करणारे शहर असा एक विक्रम नोंदवला जाईल. या महोत्सवासाठी आवश्यक ती सर्व मदत शासनाकडून केली जाईल. डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या, पुणे जिल्ह्यातून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महोत्सव इतका मोठा झाला आहे. पुणे पुस्तक महोत्सवाला जावे, असे राज्यभरातील साहित्यप्रेमींना वाटावे असा हा महोत्सव होत जाईल. महाराष्ट्राची वाङ्मयीन परंपरा पुढे जाणारा, सांस्कृतिक जाणिवा समृद्ध करणारा हा महोत्सव आहे. मिलिंद मराठे म्हणाले, की लेखकांबरोबर काम करणे हे राष्ट्रीय पुस्तक न्यासचे उद्दिष्ट आहे. संपन्न साहित्य निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्रातील लेखक, प्रकाशक, अनुवादकांबरोबर एनबीटी काम करणार आहे. त्यासाठी समन्वय बैठक आयोजित केली जाणार आहे. गणेशोत्सव, सवाई गंधर्व महोत्सवाप्रमाणे आता पुणे पुस्तक महोत्सव ही ओळख निर्माण होत आहे. एनबीटीकडून दिल्लीत चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची पुण्यात सुरुवात करण्याचे नियोजन आहे. शांतता पुणेकर वाचत आहेत या धर्तीवर शांतता महाराष्ट्र वाचत आहेत असा उपक्रम राबवून वाचन संस्कृतीला देता येईल. राजेश पांडे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे पुस्तकांवर प्रेम आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. पुस्तकांवर मराठी माणसांचे प्रेम आहे. शांतता… पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात साडेचार लोक सहभागी झाले. चळवळीला जनतेचा आशीर्वाद मिळाला की सकारात्मक परिणाम कसा होतो याचे हा उपक्रम उदाहरण ठरला. १०१ महाविद्यालयांच्या सहभागातून ग्रंथदिंडी झाली. गेल्यावर्षीपेक्षा तिप्पट मोठे प्रदर्शन होणार आहेत. यंदा २५ लाख पुस्तके विकली जातील. हा महोत्सव पुण्याची गरज होती. संविधान शब्दाचा विश्वविक्रम, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे दालन, लिट फेस्टमध्ये मान्यवर ४५ व्यक्ती सहभागी होणार आहेत. मुलांसाठी चित्रपट महोत्सव, सांस्कृतिक महोत्सवासह खाद्य महोत्सवाची मेजवानी मिळणार आहे.

उत्कट भावकाव्यातून पुणेकर रसिकांना उमगले संवेदनशील कवी नरेंद्र मोदी

0
Newsworldmarathi Pune : ‘सम्बन्ध आएँ, आ-आ के बह जाएँ, छोड जाएँ आँखों में एकाध आँसू‌’, ‌‘मेरे आसपास खिची एक..‌’, ‌‘मनुष्य की टोली हो या मेला‌’, ‌‘जगत्‌‍ जननी‌’, ‌‘उत्सव‌’, ‌‘कारगिल‌’, ‌‘जिंदा दिल‌’, ‌‘भावमुद्रा बोले बसंत‌’, ‌‘अचानक‌’, ‌‘विस्मयकी सुबह‌’, ‌‘एकाध आँसू‌’ अशा विविध काव्यरचनांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कविमनाची ओळख आज पुणेकर रसिकांना झाली. निमित्त होते संस्कृती प्रतिष्ठान आणि संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‌‘आँख ये धन्य है‌’ आणि ‌‘साक्षी भाव‌’ या पुस्तकांमधील कवितांवर ‌‘मन का गीत‌’ या विशेष कार्यक्रमाचे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. 14) बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आला होता. गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून सादर झालेला कार्यक्रम पुणेकरांना विशेष भावला. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी मंत्री, आमदार चंद्रकांत पाटील, मोनिका मुरलीधर मोहोळ, सुनील महाजन, निकिता मोघे, योगेश सोमण, डॉ. सलील कुलकर्णी, माधुरी सहस्रबुद्धे, हरिदास चरवड, आदित्य माळवे, प्रकाशक सु. वा. जोशी मंचावर होते. या कार्यक्रमादरम्यान मा. नरेंद्र मोदी यांच्या जयश्री जोशी यांनी अनुवादित केलेल्या आणि उत्कर्ष प्रकाशनने प्रकाशित केलेल्या मराठी कवितांच्या ‌‘नयन हे धन्य हे‌’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.प्रास्ताविकात सुनील महाजन यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. ‌‘मन का गीत‌’ या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती सुनील महाजन यांची होती तर संहिता लेखन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य यांचे होते. दिग्दर्शनाची बाजू प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीत संयोजन केले आहे. प्रभावी अभिवाचन सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्वरी जमेनिस आणि अक्षय वाटवे यांनी केले. विविध गीते, कवितांवर शिल्पा दातार, शर्वरी ओतरी, श्रुतिका अत्रे, अदिती देवधर, ईश्वरी बापट, प्राजक्ता सांभू, अंतरा बोरगावकर यांनी नृत्यविष्कार सादर केला. महेश लिमये (दृकश्राव्य), अक्षर वडके (प्रकाश योजना), अमन वरखेडकर (की बोर्ड) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. कार्यक्रमाचे निवेदन मिलिंद कुलकर्णी यांनी तर संयोजन केतकी महाजन-बोरकर यांनी केले. मोदीजी यांच्या शब्दांना संगीतबद्ध करण्याचा योग आला हे मी माझे भाग्य समजतो. मोदीजींच्या कविता ध्यासातून, देशात केलेल्या भ्रमंतीतून प्रकट झालेल्या आहेत, हे प्रकर्षाने जाणवते, अशा भावना डॉ. सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या.

एकता सेवा प्रतिष्ठानचा वतीने निराधारांना ब्लॅंकेट वाटप

0
Newsworldmarathi Pune : श्री दत्त जयंतीच्या अवचित साधत गोरगरिबांना कडाक्याच्या थंडीत संरक्षण म्हणून उबदार रग (ब्लॅंकेट) वाटप करण्यात आले. गुलटेकडी एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे गणेश शेरला यांच्या माध्यमातून निराधारांसाठी मायेची ऊब उपक्रम राबविण्यात आला. एकता सेवा प्रतिष्ठानच्या वतीने श्री दत्त जयंतीनिमित्त प्रतिमा पुजन व होम हवन करत श्री दत्त महाराज पुजन करण्यात आले. समाजातील निराधार बांधवांना माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने थंडीपासून बचाव व्हावा म्हणून हा उपक्रम करत असल्याचे एकता सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश शेलार यांनी सांगितले. यावेळी आयोजक गणेश शेरला, रविंद्र मोरे, संजय गावडे,अनिल पवार, नाना क्षिरसागर,सलिम सय्यद, बाळासाहेब शेलार, तानाजी चव्हाण,दिपक शिपकुले, गणेश थिटे, मारूती कांबळे, मनोज कांबळे व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.