Newsworld marathi : Nana Patekar on Prajkta Mali : प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं कौतुक केलं आहे. तसेच गश्मीर महाजनी याने फुलवंती सिनेमात केलेल्या कामाचंही नाना पाटेकर यांनी कौतुक केलंय.शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ ही कादंबरी आता चित्रपटरूपात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सिनेमात ‘फुलवंती’ या मध्यवर्ती भूमिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे. तर व्यंकट शास्त्री यांची अतिशय सशक्त व्यक्तिरेखा अभिनेता गश्मीर महाजनी याने साकारली आहे. या सिनेमाचं वरिष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी कौतुक केलं आहे.एका मुलाखतीदरम्यान नाना पाटेकर यांनी मराठी सिनेमे हिंदी भाषेत डब करण्याबाबत प्रतिक्रिया दिली. सगळे दाक्षिणात्य सिनेमे हिंदीमध्ये डब होत असतात. ते तुम्ही पाहता की नाही. मग मराठी सिनेमे का डब होत नाही? सगळेच नाही पण काही अतिशय टुकार दाक्षिणात्या सिनेमे हिंदीमध्ये डब केले जातात. मग प्रश्न पडतो की हे सिनेमे कसे काय चालले आणि हे सिनेमे का पाहावेत? असे टुकार सिनेमे देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहिले जातात. मराठीमध्ये इतकं सकस सगळं निर्माण होतं. ते का डब केलं जात नाही?, असं नाना पाटेकर म्हणाले आता परवा एक ‘फुलवंती’ हा सिनेमा आला. तो सिनेमा पाहताना मला तो इतका छान आणि गोड वाटत होता. आमच्या रविंद्र महाजनींचा मुलगा गश्मीरने आणि प्राजक्ताने काय काम केलंय… व्हिज्युअली काय गोड दिसत होतं. अतिशय छान आणि श्रीमंत वाटावं अशी ही कलाकृती… मग का नाही हिंदीत डब केली जात?, असं म्हणत नाना पाटेकर यांनी मनातील खंत बोलून दाखवली.
माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांचा खून
Newsworld Marathi Pune : Crime Pune शिक्रापूरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (दि. १) दुपारी सव्वा बाराच्या सुमारास घडली. गिलबिले यांची मालमत्ता अथवा अनैतिक संबंधाच्या कारणांमधून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत. दत्तात्रय गिलबिले हे दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.
ईव्हीएमची आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करा – चव्हाण
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने ईव्हीएम मशीनवरून टीकास्त्र सोडत असून, मोठ्या प्रमाणावर उमेदवार फेरमतमोजणीसाठी अर्ज करताना दिसत आहेत. यातच महाविकास आघाडी ईव्हीएमविरोधातील मोहीम तीव्र करताना पाहायला मिळत आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएमची आंतरराष्ट्रीय स्तरावर तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.
भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा 2 डिसेंबरला ठरणार
Newsworld Marathi Mumbai : महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
Eknath Shinde Daregaon: देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना फोन?
Newsworld marathi Mumbai : Eknath Shinde Daregaon: देवेंद्र फडणवीस यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Devendra Fadnavis phone called Eknath Shinde) यांना आज फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात गेल्यानंतर ते आजारी पडले. दरम्यान, एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून दरेगावी मुक्कामी असून आज ते ठाण्यासाठी रवाना होणार आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.
एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार
-एकनाथ शिंदे आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली आणि त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला परतण्याची शक्यता आहे.
LPG Cylinder Price Hike: कमर्शिअल गॅस सिलेंडर च्या किमती वाढणार ?
Newsworld Marathi Mumbai:आजपासून नव्या महिन्याला सुरुवात झाली आहे. पण आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात आणि त्याअंतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. ही वाढ 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. घरगुती एलपीजीच्या किमतींत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
कमर्शिअल (व्यावसायिक) सिलेंडरचे नवे दर आज 1 डिसेंबर 2024 पासून देशभरात लागू झाले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरात गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला किती रुपये माजावे लागतील?
कोणत्या महानगरात सिलेंडर च्या किती किमती ?
दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 16.50 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 1818.50 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरांत 16.50 रुपयांनी वाढ झाली असून त्याची किंमत 1771 रुपये प्रति सिलेंडरवर पोहोचली आहे.
चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 16 रुपयांनी वाढली असून ती 1980.50 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.
कोलकातामध्ये 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 15.50 रुपयांनी वाढली असून ती 1927 रुपये प्रति सिलेंडरवर आली आहे.
विशेष बाब म्हणजे, देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांपैकी फक्त कोलकाता इथेच गॅस सिलेंडर सर्वाधिक दरांत उपलब्ध आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर सलग पाच महिन्यांपासून वाढत आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती ऑगस्टपासून सातत्यानं वाढत आहेत आणि डिसेंबरसह सलग पाच महिने 19 किलो गॅसच्या किमतींत वाढ झाली आहे.
नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्ये कितीनं वाढले एलपीजीचे दर
एक नोव्हेंबरपासून इंडियन ऑईलनं कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये 62 रुपयांची वाढ केली आहे. तर दिल्लीमध्ये 1802 रुपये प्रति सिलेंडर किंमत झाली आहे. ऑक्टोबरमध्ये कमर्शियल गॅसच्या किमतींमध्ये 48.50 रुपये प्रति सिलेंडरची वाढ करण्यात आली होती.
केमिकलद्वारे पिकलेली केळी खाणे आरोग्यास घातक
Newsworld marathi : केळी हे वर्षाचे 12 महिने सहज उपलब्ध होणारे फळ आहे. सर्वात स्वस्त फळांमध्ये त्याची गणना होते. ज्याला प्रत्येकजण खाऊ शकतो. केळीमध्ये प्रथिने, कार्ब्स, फायबर, मॅग्नेशियम, तांबे यासारखे आवश्यक पोषक घटक आढळतात.केळी हे जगातील सर्वाधिक सेवन केले जाणारे फळ असल्याचे म्हटले जाते. हे केवळ एनर्जीचे पावर हाऊसच नाही तर शरीराला अनेक रोगांपासूनही वाचवते. केळी हे चवदार तसेच सहज पचणारे फळ आहे, जे सर्व वयोगटातील लोक खाऊ शकतात. हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. तथापि, हे सर्व फायदे तेव्हाच मिळतात जेव्हा केळी नैसर्गिकरित्या पिकवली जाते. आजकाल केमिकलद्वारे पिकवलेली केळीही बाजारात विकली जात आहेत. ही केळी खाणे शरीरासाठी फायद्यापेक्षा जास्त हानिकारक आहे.केळी कशी पिकावली जातात कॅल्शियम कार्बाइड: हे एक रासायनिक संयुग आहे, जे केळी लवकर पिकवण्यासाठी सर्वात जास्त वापरले जाते. त्यामुळे केळीचा रंग आणि चव बदलते.इथिलीन राईपनर: हा एक वायू आहे जो केळी लवकर पिकवण्यासाठी वापरला जातो.सोडियम हायड्रॉक्साइड: हे एक मजबूत अल्कधर्मी आहे, जे केळी पिकवण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे केळीचा रंग आणि चव बदलते.
@banana @helth
Maharashtra winter Session 2024: सत्ता स्थापनेनंतर 10 दिवसात हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ?
Newsworld marathi mumbai : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर येत्या तीन दिवसात म्हणजेच गुरुवारी नवं सरकार स्थापन होणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर महायुती सरकारच्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. महायुती सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला १६ ते २१ डिसेंबर दरम्यान पार पडणार असून प्रश्न उत्तरांचा कालावधी नसल्याने यंदा अधिवेशन कमी दिवसांचे राहणार आहे . विधानसभेच्या निकालानंतर लगेचच नागपुरात हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात झाली होती . या अधिवेशनाकडे राज्यातील सर्वांच्या नजरा लागल्या असून लाडक्या बहिणीच्या वाढीवर रकमेवर अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे . सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आला आहे . पहिल्याच अधिवेशनामध्ये यावेळी विरोधीपक्ष नेता नसणार आहे .
Maharashtra New CM Government Formation LIVE : एकनाथ शिंदे दरेगावातून मुंबईत परतणार
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण असणार? याबाबतची उत्सुकता लोकांच्या मनात आहे. अशातच महायुतीच्या नेत्यांची बैठक आज रात्री होणार असल्याची चर्चा आहे. या बैठिकासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावावरून मुंबईत परत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली
भारताने 50 ओव्हरच्या मॅचमध्ये टॉस जिंकला
Newsworld marathi : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेतील दुसरा सामना 6 डिसेंबरपासून एडलेड ओव्हल येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असून पिंक बॉलने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दोन्ही संघांचा सराव व्हावा यासाठी इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्राईम मिनिस्टर इलेव्हन यांच्यात 30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या 2 दिवसीय सराव सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे पहिल्या दिवसाचा संपूर्ण खेळ वाया गेला. त्यामुळे आता 1 डिसेंबरला उभयसंघात 50-50 ओव्हरची मॅच होत आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजून 40 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीला कौल लागला. कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

