तुमचा न्यूयरचा ट्रिप प्लॅन आहे?

0
Newsworld Team : नवीन वर्षे आलेकी थंडीची (winter season) चाहूल लागते. पावसाळ्यानंतर येणारा थंडीचा ऋतू बहुतेकांना आवडतो. गुलाबी थंडीमध्ये विविध ठिकाणी भटकंती करण्याची मजा काही औरच असते नाही? साधारण डिसेंबरच्या शेवटी किंवा या काळात अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. नवीन वर्षाची नियोजित ट्रीप असते. सोनमर्ग (काश्मीर) – साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हलकी थंडी जाणवते. अशा परिस्थितीत, तुम्ही काश्मीरच्या निसर्गरम्य पर्वतरांगांना भेट देण्याचा विचार करू शकता. सोनमर्ग (Sonamarg) हे नवविवाहित जोडप्यांसाठी एक उत्तम हनिमून डेस्टिनेशन (Honeymoon Destination) आहे. काश्मीरमधील पर्वतरांगा, बागा आणि विविध लहान-मोठी सरोवरं त्याच्या सौंदर्यात भर घालतात. काश्मीरमधला दल सरोवर (Dal Lake) जगप्रसिद्ध आहे. जर, तुम्ही जास्तचं नशीबवान असाल तर तुम्हाला या ठिकाणी हिमवर्षाव देखील अनुभवता येऊ शकतो. बीर बिलिंग (हिमाचल प्रदेश) – दिल्ली-एनसीआरमध्ये राहणारे लोक 4 ते 5 दिवसांत बीर बिलिंगला (Bir Billing) भेट देण्याचा प्लॅन करू शकतात. हिमाचल प्रदेशमध्ये असलेलं हे सुंदर ठिकाण पॅराग्लायडिंग, ट्रेक सारख्या साहसी क्रीडा प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय याठिकाणी मेडिटेशन (Meditation) देखील करता येते. येथील ठिकाणांमध्ये तुम्हाला तिबेटी संस्कृतीची झलक पहायला मिळेल. 10 हजार रुपयांच्या खर्चामध्ये ही मिनी ट्रिप करू शकता. मुक्तेश्वर (Mukteshwar) (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील मुक्तेश्वर (Mukteshwar) हे ठिकाण निसर्गसौंदर्यासाठी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे जाऊन तुम्ही स्वच्छ आणि थंड हवेचा आनंद घेऊ शकता. याशिवाय ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, बाइकिंग, राफ्टिंगची देखील या ठिकाणी सुविधा आहे. तीर्थन व्हॅली (हिमाचल प्रदेश) – निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी हिमाचल प्रदेशातील तीर्थन व्हॅली (Tirthan Valley) एक सर्वोत्तम पर्याय आहे. या ठिकाणी स्वर्गीय वातावरणाचा अनुभव घेता येतो. तीर्थन व्हॅली हिमालय राष्ट्रीय उद्यानापासून ३ किलोमीटर अंतरावर आहे. हे ठिकाण ट्राउट माशांसाठी (Trout Fish) लोकप्रिय आहे. जवळपास 10 हजार रुपये खर्च करून तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता हृषीकेश (हरिद्वार) – धार्मिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हृषीकेश (Rishikesh) हे एक उत्तम ठिकाण आहे. गंगा घाट (Ganga Ghat) आणि कलात्मक मंदिरं हे याठिकाणचं प्रमुख आकर्षण आहेत. येथील मंदिरांमध्ये रात्री होणारी आरती पर्यटकांना आकर्षित करते. हृषीकेशपासून जवळ असलेल्या शिवपुरीलाही तुम्ही भेट देऊ शकता. तिथे राफ्टिंग, कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि बंजी जंपिंगचा आनंद घेता येतो. वाचा :  औली (उत्तराखंड) – औली (Auli) हे भारतातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे. सूर्यकिरणांच्या प्रकाशात चमकणारी सोनेरी हिरवळ आपलं मन प्रसन्न करून टाकते. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. हनिमूनसाठी देखील हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या ठिकाणाचा मुक्तपणे आनंद घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ आणि खर्च दोन्ही वाढवावे लागतील. रानीखेत (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये वसलेलं रानीखेत (Ranikhet) हे एक सुंदर हिल-स्टेशन आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायला आवडत असेल तर तुम्ही या नोव्हेंबरच्या सुट्ट्यांमध्ये रानीखेतला भेट देऊ शकता. याठिकाणी तुम्ही पॅराग्लायडिंग, बाईक रायडिंग, राफ्टिंगचा देखील आनंद घेऊ शकता. रानीखेतमधील झुला देवी मंदिर (Jhula Devi Temple) देखील प्रसिद्ध आहे. तुम्ही त्याला देखील भेट देऊ शकता.

उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नये : बावनकुळे

0
Newsworld Mumbai : शरद पवार साहेब मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी कायम वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली. तुमच्या माहितीसाठी २०१४, २०१९ आणि २०२४ ची मतांची आकडेवारी देत आहे जरा डोळेउघडून नीट वाचा असा टोला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लागवला. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मतं मिळाली तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ६६४ मतं मिळाली होती. त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या हनुमंत डोळस यांना २९४ मते मिळाली तर अपक्ष अनंत खंडागळे यांना ९७९ मते मिळाली.ही माहिती ही बावनकुळे यांनी दिली. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मतं मिळाली तर राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना ३९५ मतं मिळाली. मात्र त्याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीकडून लढलेल्या उत्तमराव जानकर यांना १३४६ मतं मिळाली तर भाजपाकडून लढलेल्या राम सातपुते यांना ३०० मतं मिळाली. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटील यांना १०२१ मतं तर भाजपाच्या रणजितसिंह निंबाळकर यांना ४६६ मतं मिळाली विधानसभा निवडणुकीत मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तमराव जानकर यांना ८४३ मतं तर भाजपच्या राम सातपुते यांना १००३ मतं मिळाली. या आकडेवारीवरून स्पष्ट होत की, मारकडवाडी ग्रामस्थांनी कधी राष्ट्रवादीला साथ दिली, कधी अपक्ष तर कधी भाजपाला साथ दिली. त्यामुळे हे गाव कुणा एकाची मक्तेदारी नाही. यावेळी लोकांनी आणि लाडक्या बहिणींनी तुम्हाला नाकारलं. त्यामुळे उगाच भ्रम पसरवून ईव्हीएमवर खापर फोडू नका. जरा मारकवाडी येथे झालेल्या मतांची आकडेवारी डोळे उघडून वाचा म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर येईल.

पुण्याचे दादा कोण ?

0
Newsworld Pune : पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी अजित दादा पवार आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे नेमकी ही माळ कोणाच्या गळ्यामध्ये पडणार याकडे सर्व पुणेकरांचे लक्ष लागले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली असताना, पुण्याचे पालकमंत्री नक्की कोण? असा संदिग्ध प्रश्न उभा राहिला आहे. चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री असले, तरी सत्तांतरानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांबरोबरच जिल्ह्याचा कारभार हाती घेत या पदावर कब्जा केला आहे. त्यामुळे अल्पावधीतच पाटील हे नाममात्र पालकमंत्री असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला असल्याने, पुण्यात प्रशासकीय आणि राजकीय वर्चस्व पुन्हा त्यांनी काबीज केले. त्यांच्याकडून आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना कामे व टेंडर देण्यात आली असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. याबाबत अनेकदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खटके उडाले. त्यामुळे मंत्रीपदाचा विस्तार होण्यापूर्वीच भाजप कार्यकर्ते सतर्क झाले आहेत आणि पुण्याचा पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी करत आहेत. परंतु अजित पवार पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा दावा सोडतील का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि महायुतीपुढे मोठे आव्हान उभे आहे. त्यामुळे आता पुण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहणं पुन्हा एकदा ‘इंटरेस्टींग’ होणार आहे.

फडणवीस यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही- खडसे

0
Newsworld Pune : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ खडसेंचे ( Eknath Khadse ) सूर बदलले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझं व्यक्तिगत वैर नाही असं आता एकनाथ खडसेंनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपलं राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न केला. आपला प्रचंड छळ केला असं म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंनी ( Eknath Khadse ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांनी छळ केला म्हणून मी पक्ष सोडला असाही आरोप केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. बहुमत, जनमत त्यांच्या बाजूला आहे. फडणवीस हे निवडून आले हे मान्यच करावं लागणार आहे. व्यक्तिगत मतभेद, टीका वगैरे असू शकते. त्याला फार महत्त्व न देता लोक ज्यांना निवडून देतात त्यांच्या बाजूला बहुमत असतं हे तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे. आमचा पराभव झाला आहे, त्याची कारणं असू शकतात. पुढे काय घडेल? ते काळ ठरवेल. पण विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे पार पाडणं ही माझ्यावरची जबाबदारी आहे.

आरपीआयला एक मंत्रीपद मिळेल अशी आशा

Newsworld Mumbai : कॉंग्रेसने संविधान बदलणार असा खोटा नेरेटीव्ह सेट केला त्यामुळे लोकसभेत फटका बसला. परंतू विधानसभेत मतदाराचे गैरसमज दूर केले म्हणून महायुतीला इतके मोठे यश मिळाल्याचे आठवले यांनी सांगितले. आरपीआयला एक मंत्री मिळावे अशी मागणीही यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे. भाजपाला एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद द्यायचे नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद द्यायचे असल्याने आपण शिंदे यांना केंद्रात यावे अशी विनंती केली होती. परंतू त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांना महाराष्ट्रातच राजकारण करायचे आहे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. देवेंद्र फडणवीस जरी मुख्यमंत्री झाले असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या  एकनाथ शिंदे यांचा योग्य आदर महायुतीत राखला जाणार आहे असेही रामदास आठवले यांनी सांगितले.

थंडीचे शहरात पुन्हा आगमन

0
Newsworld Pune : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे गायब झालेल्या थंडीचे शहरात पुन्हा आगमन झाले आहे. रविवारी सकाळी 19 अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा नऊ अंशांपर्यंत घसरला असून, पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये शहरात किमान तापमान १०.८ अंशांपर्यंत घसरले होते. त्यानंतर झालेल्या पावसामुळे विचित्र वातावरण तयार होऊन थंडी गायब झाली होती. गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना थंडीची प्रतीक्षा होती. गेल्या काही दिवसांत किमान तापमानात घट सुरू होती. रविवारी तापमान 19 अंशांपर्यंत कमी झाले. रात्री उशिरा आणि पहाटेच्या गारठ्यात वाढ झाली आहे

प्रयेजा पुरम सोसायटीचे रहिवासी बिल्डर विरोधात रस्त्यावर

0
Newsworld Pune : सिंहगड रस्त्यावरील प्रयेजा पुरम सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रमोटर्स आणि डेव्हलपर्स यांनी सोसायटी स्थापन होऊनही प्रत्येक फ्लॅट धारकाकडून देखभालीसाठी घेतलेली रक्कम सोसायटीला अनेक वेळा पाठपुरावा करूनही दिली नाही तसेच सहकारी संस्थेच्या हस्तांतरण केले नाही, सदनिकांची पूर्ण रकमा घेऊन देखील प्रकल्पातील कामे पूर्ण न करून विश्वासघात केला याच्या निषेधार्थ प्रयेजा पुरम येथील रहिवाशांनी शनिवारी सिंहगड रोड वरील प्रयेजा सिटी येथील बिल्डरच्या सेल्स ऑफिस समोर दिवसभर धरणे आंदोलन केले. तसेच सर्व रहिवाशांनी बिल्डरच्या सेल्स ऑफिसमध्ये रात्रभर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून सर्व रहिवासी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलेले आहेत. या संदर्भात सोसायटीच्या वतीने पोलिसांकडे तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे.मेसर्स भंडारी गेलडा असोसिएट यांच्यावतीने विजय बंडुलाल भंडारी व प्रयेजा डेव्हलपर्स तर्फे संदीप नारायण जानी यांनी हा प्रकल्प बांधलेला आहे. या प्रकल्पामध्ये 108 सदनिका व चार दुकाने आहेत.बिल्डरने प्रकल्पाच्या देखभालीसाठी काही सदनिका धारकांकडून दोन वर्षाचा तर काही सदनिका धारकांकडून तीन वर्षांच्या रकमा घेतलेल्या आहेत. सोसायटीची स्थापना होऊनही बिल्डर सहकारी संस्थेचे हस्तांतरण आणि महत्त्वाचे म्हणजे बिल्डरकडे देखभाल शुल्कापोटी सुमारे 28 लाखांची रक्कम अनेक वेळा पाठपुरावा करूनही सोसायटीला हस्तांतरित करत नाही याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे. बिल्डर कडून ही रक्कम न मिळाल्यामुळे अनेक वेळा सोसायटीतील रहिवाशांना विजेचे बिल भरता न आल्याने मीटर काढून नेण्यात आले आहे तर लिफ्ट बंद पडल्यामुळे जेष्ठ नागरिकांना त्रास झाला आहे. त्यामुळे काही झाले तरी बिल्डर त्यांच्याकडे असलेली सोसायटीची रक्कम देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही अशी भूमिका प्रयेजा पुरम येथील रहिवाशांनी घेतली आहे.

इंटरॅक्ट क्लब अपटाऊनची मॉडर्न हायस्कूल मध्ये स्थापना.

0
Newsworld Pune : रोटरी क्लब अपटाऊनच्या वतीने प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल शिवाजीनगर येथील इयत्ता आठवी अ च्या वर्गात रोटरी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी डायरेक्टर युथ राजेंद्रकुमार सराफ, रोटरी क्लब अपटाऊनचे अध्यक्ष अरविंद मिठसागर, सचिव डॉ.राजेंद्र भारद्वाज, मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पर्यवेक्षक निवृत्ती गोपाळे, वर्गशिक्षिका ईशानी ढेरे आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष म्हणून कु.आदित्य धुळधुळे याची निवड करण्यात आली. सचिवपदी कु.वेदांत बारगजे याची निवड करण्यात आली. या प्रसंगी बोलतांना राजेंद्रकुमार सराफ यांनी मुलांमध्ये समाजकार्य करण्याची प्रेरणा व सामुहीक नेतृत्वविकास यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले. अरविंद मिठसागर यांनी या इंटरॅक्ट क्लबमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत मिळेल असे सांगितले.

महानगर पालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

Newsworld Pune : सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांमुळे देशभरातील, विशेषतः महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका बराच काळ प्रलंबित होत्या. विविध कारणांमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, पण आता या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत, त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू शकते. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे निवडणुका लवकरच पार पडतील. या निवडणुकांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन प्रशासन मिळेल, ज्यामुळे स्थानिक पातळीवरील विकास योजनांना गती मिळेल.

अजित पवार यांना कोर्टाचा मोठा दिलासा

0
Newsworld Delhi : दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाच्या निर्णयाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स विभागाने जप्त केलेली मालमत्ता मोकळी करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. या निर्णयाचा लाभ अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनाही झाला असून, त्यांच्या मालमत्तेसुद्धा मुक्त करण्यात आली आहे. हा निर्णय पवार कुटुंबासाठी मोठा न्यायालयीन दिलासा मानला जात आहे, कारण या प्रकरणामुळे गेल्या काही काळापासून त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या निर्णयामुळे पवार कुटुंबाची मालमत्ता वापरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, राजकीय व सामाजिक वर्तुळात याची चर्चा होत आहे.