डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाऊ : आ. अमित गोरखे
Newsworld Pune : महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील स्मारकावर मान्यवरांचा उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित केला गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात दिलेल्या महान योगदानाची आठवण ठेवत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया असे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेविका अनुराधा गोरखे, प्रसिद्ध व्याख्याते नामदेवराव जाधव, ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे, तसेच सुनील भिसे, सोपानराव चव्हाण, भीमराव पवार, विनायक मोहिते, धरम वाघमारे, संभाजी नाईकनवरे, निलेश कांबळे, विशाल कदम, शरद कोतकर, ज्ञानेश पाटील, सागर बहिरवाडे, अभिजीत देढे आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली.
या प्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा आग्रह व्यक्त करण्यात आला. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण करावे, असा संदेश देण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
Newaworld Pune : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी आमदार चंद्रकांत दादा पाटील, संदीपजी खर्डीकर, महेश सकट, अतुल साळवे, रवींद्र खैरे, छगन बुलाखे, संदीप शेळके, दुर्गेश हातागळे, संदीप शेंडगे, अनिल भिसे, विकास घोलप, बाबू येरगुंटे, माधव साळुंखे आणि भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेविका वर्षाताई भिमराव साठे, भाजपा अनु.जा मोर्चा अध्यक्ष भिमराव बबन साठे यांनी केले होते.
मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता : शरद पवार
Newsworld Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पवार यांनी पिचड यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांच्या कार्याचे आणि समर्पणाचे कौतुक केले.
यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फोन बद्दल विचारले असता ते म्हणाले “मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता,” परंतु संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे ते शपथविधीसाठी उपस्थित राहू शकलो नाही.विरोधी पक्ष नेत्याबद्दल विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की, “राज्यातील विधानसभा त्याबाबत निर्णय घेईल, आम्ही काही सांगण्याची गरज नाही.”
डॉ. श्रीकांत परदेशी यांची मुख्यमंत्री सचिवपदी निवड
Newsworld Mumbai : IAS अधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. परदेशी हे त्यांच्या पारदर्शक आणि प्रगतीशील कामकाजासाठी ओळखले जातात. त्यांनी यापूर्वी विविध पदांवर कार्य करताना लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीने उल्लेखनीय योगदान दिले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदावर त्यांची नियुक्ती प्रशासनातील सुधारणा आणि निर्णय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडून लोकहिताचे निर्णय अधिक जलदगतीने आणि प्रभावीपणे घेतले जातील, अशी अपेक्षा आहे.
ईव्हीएम विरोधातील लढाईची दिशा मारकडवाडीने देशाला दिली : अतुल लोंढे
Newsworld Mumbai : लोकशाही व संविधानाला पायदळी तुडवत देशात अराजक पद्धतीने राजकारण सुरु आहे त्याला विरोध करण्याचा मार्ग मारकडवाडीने देशाला दाखवून दिला आहे.ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी मारकडवाडीने सुरु केलेल्या आंदोलनाची देशाने दखल घेतली असून आता हे आंदोलन राष्ट्रीय पातळीवर जाईल व जोपर्यंत बॅलेट पेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम घोटाळ्याविरोधात सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीने बॅलेटपेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन सुरु केले, त्या गावाला काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रा. यशवंत भिंगे, सुर्यवंशी, पवार आदींचा समावेश होता.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तमराव जानकरही उपस्थित होते. माकरडवाडीच्या ग्रामस्थांची भेट घेल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले की, मारकडवाडीची माती ही फक्त माती नाही तर भारतमाता असून गावकऱ्यांनी भारतमातेची सेवा केली आहे. महात्मा गांधींच्या चंपारण्य आंदोलनापेक्षा मारकडवाडीच्या आंदोलनाचे महत्व जराही कमी नाही. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी मारकडवाडीने खरा मार्ग दाखवला आहे. ईव्हीएम व सर्व सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून मते चोरून लोकशाही संपवण्याचा प्रकार सुरु आहे त्याविरोधात मारकडवाडीने आंदोलन छेडले आहे. आता बॅलेटपेपरवर मतदान होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असेही अतुल लोंढे यांनी आश्वस्त केले.
भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम : केतकर
Newsworld Pune : “राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत लाडकी बहिण योजनेसह हिंदू विरुद्ध मुस्लिम असा अपप्रचार भाजपकडून केला गेला. धार्मिक द्वेष करत मतांचे ध्रुवीकरण झाल्याने निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार वाढून जातीय व धार्मिक विद्वेष वाढला आहे. अशावेळी देशाचे राजकीय आणि सामाजिक ऐक्य टिकवण्याचे आव्हान आहे. आगामी काळात समाजातील सर्व घटक एकत्रित आणण्याची जबाबदारी ही काँग्रेसची असून, भारतीयत्वाची भावना जपण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. कुमार केतकर यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांच्या पुढाकारातून आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’ या कार्यक्रमावेळी डॉ. कुमार केतकर बोलत होते. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मानवाधिकार कार्यकर्त्या ऍड. रमा सरोदे, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते विठ्ठल गायकवाड, उद्योजक व आंबेडकरी कार्यकर्ते मिलिंद अहिरे व पुरोगामी विचारांना पुढे नेणारा कार्यकर्ता प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ गांधी-आंबेडकर अभ्यासक अरुण खोरे प्रमुख पाहुणे म्हणून, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन जोशी होते. संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर, कार्यक्रमाचे संयोजक व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रथमेश आबनावे, माजी नगरसेविका लताताई राजगुरू, पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ आमराळे यांच्यासह चंद्रशेखर कपोते, अनिल सोंडकर, ऍड. शाबीर खान, सुरेश कांबळे, अयुब पठाण आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
डॉ. कुमार केतकर म्हणाले, “संविधान निर्मितीसाठी घटना समिती नेमली गेली, त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळाले नव्हते. स्वातंत्र्य मिळताना धर्माच्या आधारे देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे समितीवर दबाव होता की, देश केवळ हिंदुस्थान का होऊ शकत नाही. कारण, मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार होऊन अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. तेव्हाच घटनेने हिंदुस्तान असे जाहीर केले असते, तर आजचा देश निर्माण झाला नसता. संविधानमुळे आज देश टिकलेला आहे. ईशान्य भारतातील अनेक राज्य, काश्मीर, गोवा, पंजाब, पाँडिचेरी हे देशापासून तेव्हाच धर्माआधारे तुटले असते. ब्रिटिशांनी एकसंध भारत जिंकला नव्हता, तर आपल्या अनेक संस्थानिकांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले होते. मात्र, तत्कालीन नेत्यांच्या धोरणात्मक कार्यामुळे भारत एकसंध झाला.
“फाळणीनंतर हिंसा होऊनही देश टिकला. पण आज मोठ्या प्रमाणात धार्मिक द्वेष वाढला आहे. सेक्युलर लोकांना भाजपने लक्ष्य केले. पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांच्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करून काँग्रेसवर टीका केली जाते. फाळणी, स्वातंत्र्य आणि महात्मा गांधी हत्या घटना घडल्यावर घटना समिती बैठक झाली त्यास पंडित नेहरू यांचे मार्गदर्शन होते. महात्मा गांधी यांनीच देशाचे पंतप्रधान पदासाठी नेहरू यांचे नाव सुचवले. भारताचे न झालेले पाहिले पंतप्रधान म्हणून गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा नरेंद्र मोदी यांनी उभारला आहे. हिंदू राष्ट्र निर्मिती स्वप्नासाठी भाजपने सेक्युलर आणि सोशलिस्ट शब्द यांना विरोध केला. पण सर्वोच्च न्यायलयाने त्यांना फटकारले आहे. इंदिरा गांधी यांनी देशातील अशांततेची परिस्थिती खंबीरपणे सांभाळली,” असेही केतकर यांनी नमूद केले.
जेष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणाले, “देशाच्या घटनात्मक संस्था खिळखिळ्या होत आहे. २६ जानेवारी १९५० रोजी डॉ. आंबेडकर यांनी संविधान सादर करत देशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती यात समानता आणण्याचा प्रयत्न केला. संविधान हा लोकशाहीचा आत्मा असून, त्याचे अनुकरण प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. संविधानाच्या निर्मितीसाठी डॉ. आंबेडकर यांनी खूप तपश्चर्या केली. संविधानाप्रमाणे सरकार किंवा सत्तारूढ पक्ष आज वागत नाही, ही चिंताजनक बाब आहे. गांधी, नेहरू आणि आंबेडकर या त्रिमुर्तीमुळे देशाला संविधान मिळाले. पण त्यांच्यात भांडणे लावण्याचे काम काहीजण करत आहेत.”
प्रास्ताविक करताना मोहन जोशी म्हणाले, “सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहाचे २० वे वर्ष आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सन २००४ मध्ये देशाचे सर्वोच्च असे पंतप्रधान पद नाकारून त्यांनी त्याग करत पक्ष आणि देशसेवा केली. त्यांच्या त्यागाची प्रेरणा पुढील पिढीस मिळावी, यासाठी हा सप्ताह दरवर्षी आयोजित करण्यात येत आहे. जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात काँग्रेस पक्षाने संविधान जागृत ठेवण्याचे काम केले आहे. राहुल गांधी यांनी यासाठी भारत जोडो यात्रा देशात काढली.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले. प्रवीण करपे यांनी आभार मानले.
माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे निधन
Newsworld Pune : ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
पिचड यांना दोन महिन्यांपूर्वी ब्रेन स्ट्रोक आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावत गेल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड हे महाराष्ट्राच्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री राहिले असून त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते आणि राज्याच्या राजकारणात त्यांना एक अभ्यासू, समर्पित, आणि दूरदर्शी नेता म्हणून ओळखले जायचे. पिचड यांनी त्यांच्या दीर्घ राजकीय जीवनात अकोले विधानसभा मतदारसंघातून अनेक वेळा यशस्वी नेतृत्व केले.
मधुकर पिचड हे एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आदिवासी विकास, शिक्षण, आणि ग्रामीण प्रगतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या कार्यामुळे ते राज्यातील जनतेच्या हृदयात आपले स्थान निर्माण करू शकले.
मधुकर पिचड यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या कार्याची आठवण जनतेच्या मनात कायम राहील. राजकीय, सामाजिक, आणि आदिवासी क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य राहील.
काकूने केले देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
Newsworld Nagpur : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. यानिमित्ताने देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“देवेंद्र मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे. त्याचं महाराष्ट्राच्या विकासाबद्दलचं व्हिजन खूप मोठं आहे. त्याने मागील कार्यकाळात सुरू केलेल्या योजना आणि धोरणं पूर्ण करत तो राज्याचं नाव उंचावेल, याची मला खात्री आहे,” असं त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस याचं व्हिजन महाराष्ट्राच्या विकासासाठी ठोस योजना राबविण्यावर त्यांचा भर असेल. पुढील पाच वर्षांत राज्याच्या प्रगतीसाठी त्यांची धडपड सुरू राहील. असं ही त्या म्हणाल्या.
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला नवा गतीशील टप्पा गाठण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्रिपदाची तिसऱ्यांदा शपथ घेताना महाराष्ट्राच्या भविष्याला आकार देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असेल.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व आणि राजकीय धडाडीचं कौतुक केलं आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर असलेल्या संवादाचा आणि अनुभवाचा उल्लेख करत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.
“आम्ही दोघंही विधानसभेत एकाचवेळी होतो, त्यामुळे आमचं भेटणं, बोलणं रोजच व्हायचं. एखाद्या विषयावर चर्चा करायची असेल तर आम्ही नेहमी संवाद साधत असू. देवेंद्र हा राजकारणामध्ये लोकांच्या भावना आणि परिस्थिती अचूक ओळखतो, त्यात त्याला कोणी टक्कर देऊ शकत नाही,” असं त्यांनी सांगितलं.
राजकारणात टिकण्यासाठी धडाडी आणि आवड महत्त्वाची असते, ती गुणवैशिष्ट्यं देवेंद्रमध्ये आहेत. कोणत्याही परिस्थितीत शांत राहून निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. ते नेहमी समस्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेतात, ज्यामुळे ते जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करतात.
शोभा फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कौशल्याचा आणि नेतृत्वाच्या वैशिष्ट्यांचा गौरव करत भरभरून देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.
जुन्नरच्या हापूसला मिळाली वेगळी ओळख
Newsworld Pune : जुन्नरमधील हापूस आंब्याला अखेर “शिवनेरी हापूस मँगो” या नावाने नवी ओळख मिळाली असून, त्याला जीआय (जिऑग्राफिकल इंडिकेशन) मानांकन प्रदान करण्यात आलं आहे. या ऐतिहासिक यशासाठी गेल्या दहा वर्षांपासून नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राने अथक प्रयत्न केले.
या मानांकनासाठी ११५ वर्षांपूर्वीच्या हापूस आंब्याच्या झाडांची नोंद घेण्यात आली. शास्त्रीय पद्धतीने तपासणी करून या आंब्याच्या वैशिष्ट्यांची सिद्धता करण्यात आली.
कोकणात देखील हापूस आंब्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं. त्यामुळे जुन्नरमधील हापूसला वेगळी ओळख मिळवून देण्याचा संघर्ष सुरू होता. “हापूस” या नावावरून वाद असल्याने जुन्नरमधील हापूस आंबा विशेषत्वाने ओळखला जात नव्हता.
“शिवनेरी हापूस मँगो”ची ओळख:
– जुन्नर परिसरातील हवामान, माती आणि विशिष्ट पद्धतीने घेतलेली काळजी या आंब्याला वेगळं स्थान देतात. “शिवनेरी हापूस मँगो” नावाने जुन्नरच्या हापूस आंब्याला आता आंतरराष्ट्रीय ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या यशामुळे जुन्नरमधील शेतकरी आणि आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. यामुळे **हापूस आंब्याच्या स्थानिक बाजारपेठेला तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी संधी मिळणार आहे.
जुन्नरच्या आंब्याला “शिवनेरी हापूस मँगो” या नव्या ओळखीमुळे आता संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रतिष्ठा मिळेल.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव ‘रुखवत’ 13 डिसेंबरला होणार प्रदर्शित
Newsworld Pune : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या माध्यमातून नव्याने प्रगल्भ आणि प्रदर्शित केले जात आहे. महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिकचे महत्त्व रुखवत या चित्रपटाद्वारे लोकांसमोर मांडले असून हा चित्रपट येत्या 13 डिसेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
‘रुखवत’च्या मोशन पोस्टर मध्ये वधू-वराच्या वेशात सुंदर नटलेली बाहुला -बाहुली, मंगळसूत्र आणि हळदी-कुंकू लग्नसरायच्या धावपळीत लोकांचं लक्ष वेधून घेतेय. पोस्टर मध्ये खास आकर्षण असलेल्या संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरच्या जळत्या फोटोमुळे या चित्रपटाच्या कथेची गोडी आणि गांभीर्यता स्पष्टपणे दिसून येत आहे. रुखवत मध्ये दोन प्रेमवेड्यांची कहाणी अनोख्या पद्धतीने मांडली आहे.जी लाकांना नक्कीच पसंतीस उतरेल.
संतोष जुवेकर, प्रियदर्शिनी इंदलकर,अशोक समर्थ,अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे ‘रुखवत’ या चित्रपटात खास भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. विक्रम प्रधान हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत, ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे दर्शकांना वेगवेगळ्या अनोख्या अनुभवांची वासना दिली आहे. रुखवत मध्ये त्यांनी सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण साकारले आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवाल द्वारे केला आहे.

