गाव तुमचं तुम्हालाच जमावबंदी का : शरद पवार

0
Newsworld solapur : मारकडवाडीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. या गावात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. गाव तुमचं आणि तुम्हाला जमावबंदी; हा कसला कायदा? असे म्हणत त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. शरद पवार म्हणाले, आपल्या देशामध्ये ईव्हीएम पद्धत स्वीकारली त्यात बदल केला पाहिजे. मतदान झाल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात शंका आली. मग गावाने ठरवले की, गावात पुन्हा एकदा बॅलेट वर मतदान करायचं. मग पोलीसांनी त्याला विरोध का केला? तुमच्याच गावात जमावबंदी केली, हे कसे काय? जर गावाने ठरवले एखाद्या नव्या दिशेने जायचे तर मग विरोध का? सध्या लोकसभेत मला अनेक खासदार भेटतात आणि तुमच्या गावाची चर्चा करतात सगळे खासदार आम्हाला विचारतात की हे गाव कुठे आहे त्यामुळे गावाचे अभिनंदन आहे राज्यात काही ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर ईव्हीएम च्या बाबतीत लोकांच्या मनात शंका निर्माण झाले आहे इतर देशांमध्ये ईव्हीएम वर मतदान होत नाही अमेरिकेने सुरुवातीला ईव्हीएमचा विचार केला पण नंतर तो बदलला आमच्या देशात पण ईव्हीएम वर शंका आम्हाला उपस्थित झाली आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव सध्या देशात चर्चेत आले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी या गावातून ईव्हीएम विरोधात लॉन्ग मार्च काढण्याच्या तयारीत आहेत.

पुणे पालिकेवर भाजपचा भगवा फडकविणार : धीरज घाटे

0
Newsworld Pune : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता पुणे म्हणारपालिकेवर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकविणार असल्याचे प्रतिपादन शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केले. भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुणे शहरात ८ ही मतदारसंघात सदस्य नोंदणी अभियानाचा प्रारंभ होत आहे ह्या पार्श्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी ५० हजार सदस्य तसेच प्रत्येक प्रभागात कमीतकमी १० हजार सदस्य नोंदणीचा संकल्प यावेळी करण्यात आला या अभियानाचे प्रमुख म्हणून पुणे शहर सरचिटणीस राघवेंद्र उर्फ बापु मानकर यांची निवड या वेळी करण्यात आली. या वेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले ‘ देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवत शाश्वत विकासाला प्राधान्य देत जे प्रेम भारतीय जनता पार्टीला दाखवले आहे सामान्य नागरिक भारतीय जनता पार्टी शी जोडू इच्छित आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे त्याचा एक भाग म्हणून शहरामध्ये सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे ह्या अभियानामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करतील असा विश्वास आहे. या बैठकीला सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, वर्षा तापकीर ,सुभाष जंगले राघवेंद्र मानकर, प्रमोद कोंढरे, राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे,महेश पुंडे, गणेश कळमकर,सुशील मेंगडे यांच्या सह माजी नगरसेवक शहर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचा खून

0
Newsworld Pune : हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे फुरसुंगी फाटा येथून सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, पुणे शहरापासून जवळपास ४५ किलो मीटर अंतर असलेल्या यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळला आहे. सतीश वाघ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मुलाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मोटारीतून आलेल्या चौघांनी सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळच्या सुमारास अपहरण केले होते. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हडपसर आणि गुन्हे शाखेची पथके त्यांचा शोध घेत होती. वाघ हे सोमवारी सकाळी हडपसर येथील ब्लु बेरी हॉटेलबाहेर थांबले होते. त्यावेळी अचानक गाडी त्यांच्याजवळ आली. त्यातून उतरलेल्या दोघांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत घातले. आतमध्ये अगोदरच दोघे बसले होते. यानंतर त्यांना सोलापूरच्या दिशेने नेण्यात आले. हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. हडपसर पोलिसांची आणि गुन्हे शाखेची पथके तपास करत होती. दरम्यान वाघ यांचा मृतदेह यवत गावाच्या हद्दीत सापडला.

पुणे स्टेशनचे रुपडे पालटणार

0
Newsworld Pune : पुणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी आता या स्टेशनचे रुपडे बदलण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वाढत्या प्रवासी संख्येला आणि गाड्यांच्या वाढत्या वहातुकीला सामोरे जाण्यासाठी स्टेशनच्या रचना आणि यार्डचे रिमॉडेलिंग करणे अत्यावश्यक झाले आहे. सध्याच्या 6 फलाटांव्यतिरिक्त आणखी फलाटांची निर्मिती होईल. यामुळे अधिक गाड्या सहज हाताळता येतील. 24 डब्यांच्या गाड्या थांबण्यासाठी सध्याच्या फलाटांच्या लांबीमध्ये सुधारणा केली जाणार आहे. व्यवस्थापनासाठी यार्डचे रिमॉडलिंग होईल, जेणेकरून गाड्यांची घडामोड गतीने आणि सुरळीत होईल. स्टेशन परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी हरित उपाययोजना राबवण्यावर भर दिला जाईल. स्टेशनवर अत्याधुनिक तंत्रज्ञान, उदा. QR कोड आधारित तिकीट तपासणी व जलद प्रवेशासाठी विशेष गेट्स उभारली जातील. या बदलांमुळे पुणे रेल्वे स्टेशन देशातील उच्च दर्जाच्या स्थानकांमध्ये मोजले जाईल. प्रवाशांचा वेळ आणि त्रास कमी होईल तसेच वाहतुकीची कार्यक्षमता वाढेल. यामुळे स्थानकाच्या एकूणच विकासाला चालना मिळेल आणि प्रवासी अनुभव सुधारेल. प्रवाशांसाठी सुधारित सुविधा: – स्वच्छ व आधुनिक प्रतीक्षालये. – अपग्रेडेड स्वच्छतागृह सुविधा. – अन्न व पिण्याच्या पाण्याच्या दर्जेदार सुविधा. – डिजिटल माहिती पटल व स्क्रीन. – २४ डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म – १८ ते २० डब्यांची गाडी थांबेल असे दोन नवीन फ्लॅटफॉर्म – मालधक्काच्या बाजूने मुंबईच्या दिशेने आणखी दोन नवे प्लॅटफॉर्म – एक प्लॅटफॉर्मवर पादचारी पूल – पुणे रेल्वे स्टेशन येथे दोन स्वतंत्र मुख्य लाइन

कोण आहेत राहुल नार्वेकर

Newsworld Mumbai : भाजपचे आमदार राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीकडून कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळं दुपारी 12 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. राहुल नार्वेकर हे बिनविरोध अध्यक्ष होणार आहेत. नार्वेकर हे दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्ष होणार आहेत. दरम्यान, राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडून आले आहे. नार्वेकर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नार्वेकर आधी शिवसेनेत होते, परंतु २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेमध्ये विविध पदावर काम केलेले आहे. राहुल नार्वेकरांचे वडील हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तर, त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळेस नगरसेवक आहेत. तर, त्यांची मेहुणी हर्षतादेखील महापालिकेतून नगरसेविका म्हणून निवडून आली त्यावेळी शिवसेनेचे प्रवक्तेपद सांभाळणारे आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल नार्वेकर यांनी अचानक पक्ष बदलला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश करताच जितेंद्र आव्हाड यांनी नार्वेकरांना मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं. मात्र त्यांना शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. राहुल नार्वेकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे जावई आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. भाजपने त्यांनी कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत 57 हजार 420 मते मिळाली, त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा (41 हजार 225 मते) यांचा पराभव केला. राज्यात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन होताना मोठ्या प्रमाणावर कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपने कायद्याची पार्श्वभूमी असलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला.

ढोले पाटील एज्युकेशनचे चेअरमन सागर ढोले पाटील होतायेत दिव्यांगांचा आधारवड

0
Newsworld Pune : 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभरात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या दिवसाचा उ‌द्देश दिव्यांग व्यक्तीच्या अधिकारांना प्रोत्साहन देणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना समाजात सन्मानाने स्थान मिळवून देणे हा आहे. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री सागर ढोले पाटील यांनी दिव्यांग कॅम्पच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सहकार्य करत समाजामध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे. ढोले पाटील परिवार सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सुरुवातीपासून सक्रिय असून त्यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी योगदान दिले आहे. ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीने आजवर चार मोठे दिव्यांग कॅम्प आयोजित केले असून त्यामधून हजारो दिव्यांग व्यक्तींना लाभ मिळाला आहे. या कॅम्पच्या माध्यमातून दिव्यांगांना मोफत अवयव पुरवले गेले आहेत. त्यांनी या व्यक्तींना मानसिक व शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा ध्यास घेतला आहे. “शारीरिक अडथळे मनाला खचवू शकत नाहीत, कारण जिथे मनाची शक्ती असते तिथे अशक्य काहीच नसते,” हे सागर ढोले पाटील नेहमी सांगतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वास आणि आत्मसन्मान प्राप्त झाला आहे. येणाऱ्या 16 डिसेंबर रोजी ढोले पाटील एज्युकेशन सोसायटी, भारत विकास परिषद विकलांग केंद्र आणि अन्य सहयोगी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पद्वारे 1,000 दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक सेवा देण्याचे उद‌दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दिव्यांग कॅम्पसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहन भागवत है कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. डॉ. मोहन भागवत यांच्या मार्गदर्शनामुळे या उपक्रमाला आणखी बळ मिळणार असून, दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरेल. जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने समाजातील प्रत्येकाने दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे ठरवले पाहिजे. त्यांना सहानुभूती नव्हे तर समानता आणि सन्मानाची गरज आहे. सागर ढोले पाटील यांच्या प्रेरणादायी कार्याचा आदर्श घेऊन आपण दिव्यांगांसाठी योगदान देऊ शकतो. इच्छाशक्ती आणि दया असल्यास आपण समाजातील प्रत्येक घटकाला उन्नतीसाठी हातभार लावू शकलो. या कार्याला पुढे नेण्यासाठी आणि दिव्यांग व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचा संकल्प करूया.

भाजप खेळणार मुंडे कार्ड

Newsworld Mumbai : भारतीय जनता पार्टीच्या वतीने मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा मुंडे कार्ड खेळले जाणार असल्याच्या चर्चेना उधाण आले आहे. महिला ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांची देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये निश्चितपणे वर्णी लागणार असल्याचे मानले जात आहे. मागील आठवड्यापासून पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्ये सातत्याने भेटी होत आहे आज रविवारी देखील पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या सातत्याने भेटी होत असल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.मागील निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अनेक वेळा मुंडेंना डावलण्यात आले. एवढेच नव्हे तर समाजातून अन्य नेतृत्व उभारण्याचे देखील प्रयोग करण्यात आले. मात्र हे प्रयोग सर्व अयशस्वी ठरल्याने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पंकजा मुंडे यांना डावलून केंद्रामध्ये डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली. मात्र तितकासा भाजपला फायदा होताना दिसला नाही. पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या खांद्यावरती भाजपने जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंकजा मुंडे यांना विधान परिषद देण्यात आली. त्या पाठोपाठ लगेच त्यांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे देखील सांगण्यात आले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही मताने पराभूत झाल्यानंतर संपूर्णपणे मराठवाड्यातील ओबीसी समाज पंकजा मुंडे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले. ओबीसी समाजाची असलेली वोट बँक आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी भाजप यापुढे सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे. त्याकरता पंकजा मुंडे यांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये निश्चित मानली जात आहे.

बावधान परिसरात मोठी आग

Newsworld Pune : पुण्यातील बावधन परिसरात एका खाजगी फोटो स्टुडिओला लागलेल्या आगीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्नीशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर प्रशासनाकडून परिसर सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. सुदैवाने, आगीमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिलदारपणा दाखवून विरोधी पक्षनेतेपद द्यावे : सुळे

0
Newsworld Pune : राज्यातील सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून विरोधी पक्षनेता पद द्यायला हवे, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. १९८० साली काँग्रेस पक्षाने विरोधकांच्या कमी जागा असल्या, तरी दिलदारपणा दाखवून ‘लीड ऑफ अपोझिशन’ दाखविला होता. त्यामुळे आताच्या सरकारनेही मनाचा मोठेपणा दाखवून राज्यात विरोधी पक्षनेता पद द्यायला हवे. मात्र, यावर ते काय निर्णय घेतात हा त्यांचा प्रश्न असल्याचेही त्या म्हणाल्या मार्केटयार्ड येथील पक्ष कार्यालयात खासदार सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप उपस्थित होते. खासदार सुळे म्हणाल्या. नागरिकांकडून आमच्याकडे तक्रारी येत असतात. लोकांचा मतपत्रिकेवर विश्वास असेल, तशी त्यांची मागणी असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे. लोकशाही आहे ती लोकांसाठीच आहे. त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असेल, तर त्याला अर्थ नाही. ‘ईव्हीएम’ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यासाठी न्यायालयात जाण्याचा निर्णय घ्यायचा की नाही, यावर दोन दिवसांत निर्णय घेऊन पुढील पाऊल उचलले जाईल. की कोणत्याही परीक्षेचा पेपर फुटला, तर परीक्षा रद्द केली जाते. मग जनतेमध्ये ‘ईव्हीएम’बद्दल आक्षेप असतील, तर ते दूर करणे हे निवडणूक आयोगाचे कामच आहे. विधानसभा निवडणूक निकालाबाबत मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलटसुलट चर्चा आहे. नागरिकांकडून आमच्याकडे तक्रारी येत असतात. लोकांचा मतपत्रिकेवर विश्वास असेल, तशी त्यांची मागणी असेल, तर त्याचा विचार झाला पाहिजे.

महावीरची ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयर्नमॅन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी

0
Newsworld Solapur : बार्शीचे महावीर कदम यांनी ऑस्ट्रेलियामध्ये फुल आयर्न मॅन स्पर्धेत केलेल्या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्यांनी बार्शी आणि भारताचा अभिमान वाढवला आहे. 226 किमीच्या या कठीण आव्हानाला यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास त्यांनी दाखवला आहे. 4 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावणे या आव्हानांचा सामना करत त्यांनी 13 तास 41 मिनिटांत ही कामगिरी पूर्ण केली. 3400 स्पर्धकांच्या उपस्थितीत कठीण हवामान आणि मार्गावर मात करून त्यांनी मिळवलेला हा विजय उल्लेखनीय आहे. महावीर कदम यांची ही कामगिरी केवळ बार्शीसाठी नव्हे तर भारतासाठीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशाबद्दल बार्शीत जल्लोषाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.त्यांच्या जिद्दीमुळे आणि मेहनतीमुळे भविष्यात अधिक उंच शिखरे गाठण्याची प्रेरणा अनेकांना प्रेरणा मिळेल.