झुकेगा नही साला… पुष्पा 2 वादाच्या भोंवऱ्यात
Newsworld Mumbai मुंबईतील एका चित्रपटगृहात पुष्पा 2 च्या स्क्रिनिंगदरम्यान मोठा गोंधळ उडाला. इंटर्वलनंतर अचानक गोंधळ सुरू झाला. यामुळे प्रेक्षकांमध्ये खळबळ उडाली आणि अनेकांना खोकला, घशाचा त्रास आणि उलट्या होण्यास सुरुवात झाली. हा प्रकार घडल्यानंतर थिएटरमध्ये गोंधळ उडाला, आणि लोक थिएटरच्या बाहेर धावू लागले.
पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे प्रेक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित मदतकार्य सुरू करण्यात आले.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बहुचर्चित “पुष्पा 2” चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार यश मिळवत एकच धुमाकूळ घातला आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असल्याने अडव्हान्स बुकिंगने थिएटर हाऊसफुल्ल होत आहे. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर वाद आणि अप्रिय घटना घडत असल्याने वातावरण तणावपूर्ण आहे.
चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान हैदराबादमधील एका थिएटरमध्ये चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक लहान मुलगा जखमी झाला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.
या घटनेनंतरही वाद थांबत नसून, मुंबईतील एका थिएटरमध्येही पुष्पा 2″च्या प्रदर्शनादरम्यान गोंधळ उडाला. शो सुरू असताना, इंटर्वलनंतर सुमारे 20 मिनिटांसाठी चित्रपट थांबवावा लागला.प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, थिएटरमध्ये एक अज्ञात व्यक्तीने पेपर किंवा केमिकल फवारलं ज्यामुळे अनेक प्रेक्षकांना खोकला, घशाचा त्रास, आणि उलट्यांचा त्रासहोऊ लागला.
त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रकृती बिघडल्याने **शो तत्काळ थांबवावा लागला. सुमारे 20 मिनिटांसाठी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यात आले. या घटनेनंतर थिएटर प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली आणि प्रेक्षकांना सुरक्षितरीत्या बाहेर नेण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. थिएटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून, फवारणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू आहे.
या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये थिएटरमधील प्रेक्षक गोंधळलेल्या आणि त्रस्त अवस्थेत दिसत आहेत. काही प्रेक्षकांनी थिएटरमधील आतल्या दृश्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे या घटनेची व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
या घटनेमुळे थिएटरमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजनांची आवश्यकता आहे. “पुष्पा 2” च्या लोकप्रियतेमुळे थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे.
“पुष्पा 2” च्या प्रचंड लोकप्रियतेसह अशा अप्रिय घटनांमुळे वाद वाढत असून प्रेक्षकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा घटना वारंवार घडत असल्याने चित्रपटगृहांमध्ये विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट
Newsworld Mumbai : राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी (दि. 5) शपथ घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. दरम्यान, नुकतेच भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. आज देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या हातून राज्यातील जनतेची सेवा घडेल, आपले राज्य बलशाली बनेल, ही सदिच्छा व्यक्त करतो. शेतकरी, कष्टकरी, तरुणांच्या हिताचे निर्णय होतील, ही अपेक्षा. उज्ज्वल महाराष्ट्र घडवण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा.
हर्षवर्धन पाटील यांची ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे, विशेषतः त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर. त्यांच्या या भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने पाटील यांना पक्षात मानाचं स्थान दिले.
अशा पार्श्वभूमीवर, आता राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या भेटीमुळे आगामी राजकीय समीकरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पाटील यांच्या निर्णयावर राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतुकीत बदल
Newsworld Pune : पुणे-सोलापूर रोडवर पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. शुक्रवार पासून रोजी रात्री 8 वाजता काम सुरु करण्यात येणार आहे. हे काम दोन टप्प्यांत पूर्ण होणार असून पहिला टप्पाbपुणेकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर खोदकाम होणार आहे तर दुसरा टप्पा सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या रोडवर खोदकाम करण्यात येणार आहे. तरी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा उपयोग करून सहकार्य करावे आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे
हा बदल पुढीलप्रमाणे असेल:
वाहतूक बदलाचे तपशील:
1. सोलापूरहून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक:
– अर्जुन रोड, मम्मादेवी चौक मार्गे स्वारगेटकडे जाणार. यामध्ये कोणताही बदल नाही.
2. स्वारगेटहून सोलापूरकडे जाणारी वाहतूक:
– मम्मादेवी चौक सरळ जाण्यास बंदी.
– वाहने डावीकडे वळून बिशप सर्कलमार्गे उजवीकडे वळून सोलापूर रोडला जातील.
– सदर मार्ग वन वे करण्यात येणार आहे.
3. सोलापूरवरून मम्मादेवी चौकात येणारी वाहने:
– सरळ मम्मादेवी गोळीबार चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.
4. डॉ. कोयाजी रोडमार्गे येणारी वाहने:
– हरप्रीत मंदिर चौकात उजवीकडे वळून खाणे मारुती चौक, पुलगेट बस डेपोमार्गे कोंढव्याला जातील.
5. सोलापूरहून येणारी वाहने (मम्मादेवी चौकात):
– उजवीकडे वळण्यास बंदी.
– ही वाहने गोळीबार चौकमार्गे सरळ जाऊन, उजवीकडे वळून कॅम्प मार्गे इच्छितस्थळी जातील.
‘या’ दिवशी लक्ष्मी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार
Newsworld Pune : वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचाऱ्याला महत्त्व मिळवून देण्यासाठी पुणे महापालिकेने गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबर हा दिवस पादचारी दिन म्हणून साजरा करण्यास सुरूवात केली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक हा भाग या दिवशी वाहनांसाठी बंद असणार आहे.
महापालिकेकडून आता यंदाही पादचारी दिन साजरा केला जाणार आहे. त्यामुळे ११ डिसेंबरला लक्ष्मी रस्ता सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद राहणार आहे. याठिकाणी नागरिकांसाठी करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच हॅप्पी स्रीटचे खेळ आणि रस्ता सुरक्षाबाबत कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत.
त्यासाठी हा रस्ता आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. वाहनविरहित करून तो आकर्षक पद्धतीने सजवण्याचे काम पथ विभागातर्फे होणार आहे. दि. ११ डिसेंबर रोजी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापर्यंत खास सायकलीचे आयोजन करण्यात येत आहे.
पीएमपीएल कडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे. युनायटेड वे मुंबईतर्फे लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेबाबत कार्यशाळा आयोजित केली आहे. एकांश ट्रस्टतर्फे अंध, अपंग नागरिक यांच्याबाबत संवेदनशीलता आणि सार्वत्रिक प्रवेश योग्यताविषयक कार्यशाळा आयोजित केली आहे.
सेव्ह पुणे ट्रॅफिक मुव्हमेंटतर्फे पादचारी दिनानिमित्त पालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षेबाबत काढलेले चित्रकला प्रदर्शन आयोजित केले आहे. परिसर संस्थेमार्फत सार्वजनिक वाहतूक आणि जुन्या पुण्याच्या विकासाबाबत पॅनल प्रदर्शन आयोजित केले आहे. आयईडीटीपी संस्थेमार्फत संख्यांच्या योग्य रचनेबाबत पुणे मनपाने केलेल्या कामांचे पॅनल प्रदर्शन भरवले जाणार आहे.
रंग कला अकादमीतर्फे पादचारी दिनानिमित्त भव्य रांगोळी काढण्यात येणार आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत हवेच्या गुणवत्तेची चाचणी व स्वच्छ संस्थेमार्फत प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
काँग्रेस खासदारांचे दिल्लीत आंदोलन
Newsworld Delhi : काँग्रेसच्या खासदारांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या उद्देशाने दिल्लीतील संसद परिसरात आंदोलन केले आहे. या आंदोलनाद्वारे सरकारकडे शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
पीकविमा योजनेत सुधारणा: शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ त्वरित आणि न्याय्य स्वरूपात मिळावा.
कर्जमाफी:शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने कर्जमाफीची अंमलबजावणी करावी.
किंमतींवर हमी:शेतीमालाला हमीभाव लागू करून शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यावा.
इंधन व खतांचे दर कमी करणे:इंधन आणि खते यांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्यांवर होणारा आर्थिक बोजा कमी करण्याची मागणी.
काँग्रेस खासदारांनी संसद परिसरात निदर्शने करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले आहे. पक्षाने सरकारवर टीका करत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने स्पष्ट केले आहे की, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील.
शेतकऱ्यांच्या समस्या देशभरातील महत्त्वाचा विषय असल्याने या आंदोलनाला व्यापक राजकीय आणि सामाजिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
https://x.com/ANI/status/1864918581475184711?t=PaHr6iQEVuaqYrPNByqPKw&s=19
अजितदादांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल पर्वती मतदार संघात पेढे वाटप
Newsworld Pune : मा. अजित पवार यांची महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या वतीने मोठा उत्साह व्यक्त करण्यात आला. मतदारसंघाचे अध्यक्ष संतोष नांगरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पेढे वाटप करून आनंद साजरा केला.
या कार्यक्रमाचे आयोजन युवक उपाध्यक्ष करण गायकवाड आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केले होते. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दादांच्या यशाचा आनंद व्यक्त केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे भविष्य अधिक उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला.
पर्वती मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय यशाबद्दल गौरवोद्गार काढले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा विकास गतीमान होईल आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा विश्वास संतोष नांगरे यांनी व्यक्त करण्यात आला.
7 डिसेंबरला विधिमंडळाचं अधिवेशन
Newsworld Mumbai :महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. महायुतीच्या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर 7 डिसेंबरला विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 12 दिवसांनी अखेर राज्यात नव्या सरकारची स्थापना झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीनंतर मंत्रालयात घडामोडींना वेग आला आहे. सरकार स्थापनेनंतर आता पुढच्या दोन दिवसांनी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कांद्याचे उत्पादन वाढले, शेतकऱ्यांना काय मिळाले?
Newsworld Team : भारतात कांद्याची शेती जवळपास सर्व राज्यांमध्ये होते. २०२३ – २४ मध्ये देशात एकूण २४२ लाख टन कांद्याचं उत्पादन झालं. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पादन २० टक्के कमी आहे. महाराष्ट्र देशातील सर्वात मोठं कांदा उत्पादक राज्य आहे. राज्यातील नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आशियातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ आहे. महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील ४३ टक्के कांद्याचं उत्पादन होतं, तर दुसऱ्या स्थानी कर्नाटक आणि तिसऱ्या स्थानी गुजरात आहे.
कांद्याचे प्रकार
1 गोड कांदा
2 पिवळा कांदा
3 लाल कांदा
4 पांढरा कांदा
5 शॅलोट्स
6 हिरवा कांदा
7 मोती कांदा
8 टॉरपीडो कांदा
9 बरमुडा कांदा
10 सिपोलिनी कांदा
11 स्पॅनिश कांदा
12 इजिप्त कांदा
13 रेडविंग कांदा
14 माउ कांदा
15 विडालिया कांदा
कांद्याचा राखीव साठा कुठे
राखीव साठ्यातील कांदा बाजारात का आणला जात नाही, हा प्रश्नच आहे. मुळात राखीव साठ्यासाठी केलेल्या खरेदीत मोठा गैरव्यवहार आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांकडून जास्तीत -जास्त ५० ते ५५ रुपये दराने व्यापारी कांदा खरेदी करतात, तो कांदा मुंबईत येईपर्यंत शंभर रुपये किलो कसा होतो. सरकारचे कांदा खरेदीवर नियंत्रण असते, मग कांदा विक्रीवर का नियंत्रण ठेवले जात नाही. सरकारच्या आशीर्वादाने दरवर्षी शेतकरी आणि ग्राहकांची लूट करून व्यापाऱ्यांचे उखळ पांढरे केले जात आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे, असे मत कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी व्यक्त केले आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्यासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून पाच लाख टन कांदा खरेदी केल्याचे सांगितले जात आहे.
प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण:
गेल्या आठवड्यात लाल कांद्याला प्रति क्विंटल 4 हजार 300 रुपये भाव मिळाला होता. आज त्याचं कांद्याला सरासरी 3 हजार 500 रुपये भाव मिळाला आहे. कांदा दरात मोठी घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हवालदिल झाले असून लाल कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. एकीकडे ढगाळ हवामानामुळे लागवड केलेल्या कांद्यावर करपा आणि बुरशीजन्य रोग लागत असतांना त्यावर महागडी औषधे मारावी लागत आहे. तर दुसरीकडे कांद्याच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी दोन्ही बाजूने होरपळला जात आहे.
मागील आठवड्यात लाल कांदा भाव(प्रति क्विंटल)
कमीत कमी – 1500 रू
जास्तीत जास्त – 5500 रू
सरासरी – 4300 रू
आजचे लाल कांदा भाव..
कमीत कमी – 1000 रू
जास्तीत जास्त – 5101रू
सरासरी – 3500 रू
फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने कांद्याची आवक वाढली:
चक्रीवादळामुळे पावसाची भिती असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कच्चा कांदा बाजारात आणला आहे. दरम्यान, कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. सर्वसाधारण कांद्याला प्रतिक्विंटल दोन हजार ते तीन हजार रुपये भाव मिळतो आहे. तर उच्च प्रतीच्या कांद्याला प्रतिक्विंटल चार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. दुसरीकडे, तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाच्या भीतीने सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास 850 ट्रक कांद्याची आवक झाली आहे.
काय भाव मिळाला?
सोमवारी लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2600 रुपये, बारामती बाजारात 5000 रुपये, येवला बाजारात 2900 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 3800 रुपये तर देवळा बाजारात 3500 रुपये दर मिळाला. कांदा दरात सुधारणा होण्या ऐवजी घसरण सुरु झाल्याचे पाहायला मिळाले आहे. परिणामी, लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल 800 ते 1000 रुपयांची घसरण झाली आहे. सोमवारी ५८७ गाड्यांतून आला मार्केट यार्डात कांदा आला. ३०० गाडया भरून कांदा आवक सरासरी गेल्या आठवडपात होती. शेतकऱ्यांना १००० हजार ते ५००० हजार रुपये मिळाले. जुन्या कांद्याला साधारण ५००० हजार रुपये भाव मिळाला होता. सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणात सोलापुरात आला आहे. आगामी काही दिवसात अजून कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे.
यामुळे कांदा दरवाढ
१) दिवाळीनिमित्त नाशिकमध्ये कांदा – विक्री आठवडाभर बंद होती
२) गेल्या उन्हाळी कांद्याचा हंगाम संपल्यामुळे आवक घटली
३) काढणीला आलेला खरीप कांदा परतीच्या, बिगरमोसमी पावसामुळे सडला
४) खरीप कांद्याच्या उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट
नाशिक येथील शेतकरी रोहित पाटील यांनी दीड एकरमध्ये कांद्याची लागवड केली होती. नोव्हेंबरमध्ये ते काढणीवर आले असते. तत्पुर्वीच पावसात रोपे वाकडेतिकडे होऊन गेले. साधारण परिस्थितीत ५० ते ६० क्विंटलचे उत्पादन झाले असते. आता १० ते २० क्विंटल कांदे निघाले आणि दर असेच राहिले तरच लागवडीसाठी केलेला ४० हजार रुपयांचा खर्च भरून निघू शकेल, असे ते सांगतात. पावसाने केवळ पिकाचे नुकसान झाले नाही तर, उन्हाळ कांद्याची रोपे खराब केली. ६४२ हेक्टरवरील कांदा रोपवाटीकेचे नुकसान झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. यामुळे पुन्हा बियाणे खरेदी करून रोपे तयारी करावी लागतील. पुढील उन्हाळ कांद्याच्या लागवडीला उशीर होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
दादा तू यशस्वी हो….
Newsworld Mumbai : राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा शपथ घेण्यापूर्वी अजित पवार यांच्या आई आशाबाई पवार यांनी त्यांचे औक्षण करून शुभाशीर्वाद दिले. ही भावनिक आणि कुटुंबीयांसाठी विशेष क्षणांची घटना त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
अजित पवार हे आपल्या कुटुंबासाठी विशेष जिव्हाळा बाळगणारे नेते म्हणून ओळखले जातात. शपथविधीच्या आधी त्यांच्या आईने औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी अजित पवार भावुक झाले होते.
अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, ज्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत आणखी एक विक्रम नोंदला गेला. त्यांच्या आईच्या आशीर्वादामुळेच त्यांनी इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असल्याचे मत त्यांच्या निकटवर्तीय व्यक्त करत आहेत.
अजित पवार यांच्या शपथविधीला त्यांच्या आईचे औक्षण हे केवळ एक पारंपरिक सोहळा नव्हे, तर त्यांच्या आयुष्यातील कुटुंबाच्या महत्त्वाचा प्रत्यय देणारा क्षण ठरला आहे.

