साने गुरुजी प्राथमिक शाळेत तिळगूळ समारंभ उत्साहात साजरा!
Newaworldmarathi Pune: राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाचे साने गुरुजी बालक मंदिर व प्राथमिक शाळेमार्फत आयोजित तिळगूळ समारंभ उत्साहात साजरा झाला.मा शिक्षणाधिकारी मा.अनिल गु़ंजाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी अनमोल विचार मांडत त्यांनी उपस्थित पालकांना जबाबदार पालकत्वाची विनोदी शैलीत जाणिव करुन दिली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव शिवाजी खांडेकर उपस्थित होते. त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातील काही उदाहरणे देत समजदार व जागरूक पालक कोणाला म्हणता येईल याबाबत विचार मांडले.
यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका मीना काटे, सेवाज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे, व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सुषमा शिंगाडे,शिक्षणप्रेमी अविनाश खंडारे उपस्थित होते. यावेळी सर्व पालकांना मुख्याध्यापिका मीना काटे यांच्या वतीने आकर्षक भेटवस्तू तसेच शिक्षणप्रेमी अविनाश खंडारे यांनी दरवर्षीप्रमाणे तिळगूळ वड्या दिल्या.यावेळी स्त्री व पुरूष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, विठ्ठल शेवते, शितल खेडकर, लक्ष्मी कांबळे , मोनिका पोटे, शितल रुपनूर, निशा नाईकनवरे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका मीना काटे यांनी केले. सूत्रसंचालन संगिता गोवळकर यांनी तर आभार सोपान बंदावणे यांनी मानले.
मंडई उजळली; नव्या विद्युत दिव्यांची सोय बाप्पु मानकर यांच्याकडून तीन दिवसात नव्या प्रकाश व्यवस्थेची सोय
Newsworldmarathi Pune: पुण्याच्या मध्यवस्तीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या महात्मा फुले मंडईत अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे झालेली अडचण अवघ्या तीन दिवसात दूर करण्यात आली आहे. नवनिर्वाचित नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी येथील पाहणी केल्यानंतर, आता नवे विद्युत दिवे बसवण्यात आले असून, पुरेसा प्रकाश उपलब्ध झाल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
१३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याची मुख्य बाजारपेठेपैकी एक आहे. तीन दिवसांपूर्वी येथे समस्या जाणून घेण्यासाठी राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी प्रकाश व्यवस्थेची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. येथील विद्युत दिव्यांची क्षमता कमी झाल्याने, तसेच अनेक दिवे नादुरुस्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना सायंकाळच्या वेळी अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून तातडीने हे दिवे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आल्यानंतर आज मंडई येथे बाप्पु मानकर यांनी भेट दिली.
‘व्यापाऱ्यांना नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने काम हाती घेतले. येथील अनेक दिव्यांची क्षमता कमी झाल्याने नवे ५० दिवे बसवण्यात आले आहेत. आता पुरेशी प्रकाश व्यवस्था झाली आहे. तातडीची गरज म्हणून हे काम करण्यात आले आहे. लवकरच संपूर्ण मंडई परिसरातील विद्युत दिव्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्थानिकांसोबतच संपूर्ण शहरातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे मंडईतील इतर समस्यांबाबतही नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे, प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर सांगितले.
यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, ‘मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. बाप्पु मानकर यांना ही बाब निदर्शनास आणून देताच, त्यांनी त्वरित हे काम सुरू केले. वेगाने हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आम्ही समाधानी आहोत.’ यावेळी उपस्थित व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी बाप्पु मानकर यांचे आभार मानले.
१३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याची मुख्य बाजारपेठेपैकी एक आहे. तीन दिवसांपूर्वी येथे समस्या जाणून घेण्यासाठी राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नुकतीच भेट दिली होती. त्यावेळी व्यापाऱ्यांनी प्रकाश व्यवस्थेची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली. येथील विद्युत दिव्यांची क्षमता कमी झाल्याने, तसेच अनेक दिवे नादुरुस्त झाल्याने व्यापारी व नागरिकांना सायंकाळच्या वेळी अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावर उपाय म्हणून तातडीने हे दिवे बदलण्याचे काम हाती घेण्यात आले. हे काम तीन दिवसांत पूर्ण करण्यात आल्यानंतर आज मंडई येथे बाप्पु मानकर यांनी भेट दिली.
‘व्यापाऱ्यांना नागरिकांना भेडसावणारी ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने काम हाती घेतले. येथील अनेक दिव्यांची क्षमता कमी झाल्याने नवे ५० दिवे बसवण्यात आले आहेत. आता पुरेशी प्रकाश व्यवस्था झाली आहे. तातडीची गरज म्हणून हे काम करण्यात आले आहे. लवकरच संपूर्ण मंडई परिसरातील विद्युत दिव्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. स्थानिकांसोबतच संपूर्ण शहरातून नागरिक येथे खरेदीसाठी येतात. त्यामुळे मंडईतील इतर समस्यांबाबतही नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे, प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर सांगितले.
यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, ‘मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता. बाप्पु मानकर यांना ही बाब निदर्शनास आणून देताच, त्यांनी त्वरित हे काम सुरू केले. वेगाने हे काम पूर्ण केल्याबद्दल त्यांचे आम्ही समाधानी आहोत.’ यावेळी उपस्थित व्यापारी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनी बाप्पु मानकर यांचे आभार मानले.
फळांचा राजा पुण्याच्या बाजारात दाखल! एका पेटीची किंमत तब्बल १५ हजार
पुणे : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) मध्ये आंब्याची यंदाची पहिली आवक दाखल झाली आहे. रत्नागिरीतील जलाल काझी जैतापूर येथून आणलेल्या हापूस आणि केशर आंब्याच्या चार पेट्यांनी बाजारात हजेरी लावली. यातील दोन पेट्या हापूस आणि दोन पेट्या केशर आंब्याच्या होत्या. मे. सुधीर बबनराव मनसुख यांच्या गाळ्यावर ही पहिली आवक झाली आणि यंदाच्या सर्वाधिक उच्चांकी भावात पहिली पेटी १५ हजार रुपयांना विकली गेली. ही पेटी युवराज काची यांनी खरेदी केली. एका पेटीत ३ डझन आंबे असून, हा भाव मार्केटमधील व्यापाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा ठरला आहे.
ऑक्टोबरच्या अखेरीस आलेला मोहर जपून ठेवल्यामुळे आंबे लवकर काढता आले. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदाचा आंबा सीझन फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सुरळीत सुरू होईल आणि १५ मार्चपासून आवक पूर्ण गतीने वाढेल. सध्या मार्केट यार्डमध्ये आंब्याची सुरुवातीची आवक दाखल होत असून, व्यापारी आणि फळविक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याच्या या पहिल्या आवकेने पुण्यातील बाजारपेठेत नववर्षाची सुरुवातच उत्साही झाली आहे. हापूस आणि केशर या दोन्ही जातींना चांगला भाव मिळाल्याने यंदाच्या हंगामाबाबत व्यापाऱ्यांमध्ये आशावाद आहे. मार्केट यार्डमधील व्यापारी आता मोठ्या प्रमाणात आवकेची प्रतीक्षा करत आहेत.
पुण्याच्या महापौरपदासाठी अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत; अनुभव, चाणक्य नीती आणि जनसेवेची भक्कम पार्श्वभूमी
Newaworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेत ११९ जागांसह निर्विवाद बहुमत मिळवलेल्या भारतीय जनता पार्टीकडून महापौरपदासाठी कोणाची निवड होणार, याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे. अनुभवी नेत्याला संधी दिली जाणार की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘धक्कातंत्र’ वापरत नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अशातच पुण्याच्या महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, यंदाचे महापौरपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहे. त्यामुळे उच्चशिक्षित, अनुभवी आणि जनतेशी थेट नाते असलेल्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे नाव महापौरपदासाठी अग्रक्रमाने चर्चेत आले आहे.
पुणे महानगरपालिका ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी महानगरपालिका असल्याने, मुंबईनंतर पुण्याचा महापौर कोण होणार याला विशेष राजकीय महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर अर्चना पाटील यांची कामगिरी आणि अनुभव लक्षवेधी ठरत आहे. एमबीए फायनान्ससारखे उच्च शिक्षण घेतलेल्या अर्चना पाटील यांनी २०१७ साली भवानी पेठेत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करत माजी मंत्री रमेश बागवे यांचे चिरंजीव अविनाश बागवे यांचा पराभव केला होता. चाणक्य नीती, अचूक रणनीती आणि लोकसंपर्काच्या बळावर मिळवलेला हा विजय भाजपसाठी ऐतिहासिक ठरला होता.
२०२६ च्या निवडणुकीतही त्यांनी सुनियोजित कामकाज, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विकासकामांची ठोस पोचपावती मिळवत दणदणीत विजयाची पुनरावृत्ती केली.
प्रभाग क्रमांक २२ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र अर्चना पाटील यांनी सातत्यपूर्ण जनसंपर्क, स्थानिक प्रश्नांची सोडवणूक आणि विकासकामांच्या जोरावर हा बालेकिल्ला भेदत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित केले. सलग दुसऱ्यांदा निवडून येत त्यांनी आपली लोकप्रियता आणि नेतृत्वगुण ठामपणे सिद्ध केले आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे भवानी पेठेतील काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळला असून, त्या परिसरातून भाजपचे दोन नवखे उमेदवार मृणाल कांबळे आणि विवेक यादव विजयी करण्यातही अर्चना पाटील यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
नगरसेविका म्हणून अर्चना पाटील यांनी झोपडपट्टी भागात विशेष लक्ष केंद्रित करत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रभावी काम केले आहे. कॅन्टोन्मेंट क्षेत्रात सत्ता असूनही कोणतेही लाभाचे पद न मिळाल्याची तक्रार न करता त्यांनी नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला.
अर्चना तुषार पाटील यांनी केवळ आपल्या प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण पुणे शहरात आपली संघटनात्मक क्षमता सिद्ध केली आहे. भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा म्हणून त्यांनी पक्षबांधणी, महिला संघटन आणि जनसंपर्क या माध्यमातून प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य म्हणून काम करताना त्यांना प्रशासकीय कार्यपद्धती, आर्थिक नियोजन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण अनुभव मिळाला आहे.
भविष्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक किंवा विलीनीकरण झाल्यास, अर्चना पाटील महापौर झाल्या तर पुण्याला सक्षम, दूरदृष्टीचे आणि विकासाभिमुख नेतृत्व मिळेल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्या अर्चना पाटील यांना महापौरपदाची संधी द्यावी, अशी जोरदार मागणी जनतेतून होत असून, याचा भाजपलाही राजकीयदृष्ट्या निश्चितच लाभ होईल, असा सूर राजकीय वर्तुळात उमटत आहे.
सस्पेन्स संपला! पुणे महापालिकेत महापौर पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी…
Newaworldmarathi Pune: पुणे महानगर पालिका ही महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी महानगर पालिका आहे. मुंबईनंतर पुण्याचा महापौर कोण होणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र आता अखेर महापौर पदाचा सस्पेन्स संपला आहे. पुण्याच्या महापौर पदाचं आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलं आहे. यंदाचं हे पद खुला महिला प्रवर्गासाठी सोडण्यात आलं आहे.
१६५ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकेत भाजपनं तब्बल १२० जागा जिंकल्या आहेत. पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे निकाल लागल्यानंतरच पुण्यात कोणत्या पक्षाचा महापौर होणार हे निश्चित झालं होतं. पण आता अखेर आरक्षण सोडत जाहीर झाली आहे.
पुणे महापालिकेत भाजपची शतकी खेळी पुणे महानगरपालिकेत भाजपने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे. एकूण १६५ जागांपैकी भाजपने स्वबळावर १२० जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या ‘पुणे व्हिजन’ला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला २७ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेस १५ जागांपर्यंत पोहोचू शकली. शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शप) यांसारख्या पक्षांचे अस्तित्व या निकालात अत्यंत नगण्य राहिले.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच गर्दी
Newsworldmarathi Pune: श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने यंदाचा गणेश जन्म सोहळा माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच आज बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. विनायक अवतार असलेला हा गणेशजन्म सोहळा यंदा देखील सुवर्णपाळण्यामध्ये दुपारी १२ वाजता होणार आहे. यंदा स्वराभिषेक, गणेशयाग, श्री गणेश जागर, नगरप्रदक्षिणा असे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत.
संपूर्ण मंदिराला आकर्षक पुष्पसजावट व विद्युतरोषणाई करण्यात येणार आहे. आज पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाले याशिवाय गणेशसुक्त अभिषेक देखील मंदिरात सुरु असणार आहे तसेच सकाळी ६ ते १० आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होणार आहे
मुख्य गणेशजन्म सोहळ्याला दुपारी १२ वाजता सुरुवात होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार आहेत. जन्माच्या वेळी पुष्पवृष्टी देखील करण्यात येणार आहे. यावेळी गणेशाची मंगल आरती होईल. नगरप्रदक्षिणा मिरवणूक सायंकाळी ६ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल.
रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. गणेशजन्माच्या दिवशी पहाटे ३ वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. तरी भाविकांनी विविध कार्यक्रमांत सहभागी होत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे ट्रस्टतर्फे कळविण्यात आले आहे.
ऐतिहासिक महात्मा फुले मंडईतील समस्यांचे निराकरण प्राधान्याने करणार : राघवेंद्र बाप्पू मानकर
Newsworldmarathi Pune: १३५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेली महात्मा फुले मंडई पुण्याचा मानबिंदू आहे. येथील व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या विद्युत दिवे आणि स्वच्छतेच्या समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील. येथील विद्युत दिव्यांच्या समस्या येत्या दोन दिवसात सोडविली जाईल, असे आश्वासन प्रभाग २५ चे नवनिर्वाचित नगरसेवक मा. राघवेंद्र बाप्पू मानकर यांनी दिले. महात्मा फुले मंडई येथील व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या आढावा दौऱ्यात ते बोलत होते.
यावेळी व्यापाऱ्यांनी सांगितले की, मंडईतील जुने झालेले विद्युत दिवे आणि अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे व्यापारी तसेच खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच स्वच्छतेच्या समस्येबाबतही व्यापाऱ्यांनी गारऱ्हाणे मांडले.
यावर बोलताना मा. राघवेंद्र बाप्पू मानकर म्हणाले की, “व्यापाऱ्यांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रकाशव्यवस्थेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे तातडीने हे दिवे बदलण्याचे काम येतोय दोन दिवसात पूर्ण केले जाईल. तसेच मंडईच्या स्वच्छतेसाठी प्रशासनासोबत यंत्रणा कार्यरत करून कचरा साठणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे बाप्पू मानकर यांनी सांगितले.
पुणे उत्तर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार; शिरुरच्या माजी आमदारांच्या कुटुंबियांचा असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश
Newsworldmarathi Pune: पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले असून, शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे, जिल्हा परिषदेच्या बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे, शिरुरच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उत्तर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद, आ. राहुल कुल, दक्षिण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे माजी आमदार संजय जगताप प्रवीण माने, जयश्रीताई पलांडे, धर्मेंद्र खांडरे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकासकामांच्या झंझावातामुळे आज संपूर्ण देश माननीय मोदीजींवर प्रचंड प्रेम करत आहेत. त्याशिवाय राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या गतिमान सरकार मुळे आज महाराष्ट्रात भाजपाला भरभरुन प्रतिसाद आणि आशीर्वाद मिळत आहे.
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचा नेहमीच योग्य सन्मान राखला जातो. आमदार राजेंद्र गावडे यांनाही पक्षात योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बालकल्याण समितीच्या सभापती सुनीताताई गावडे यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेशाबाबत भूमिका व्यक्त केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गावडे कुटुंबांनी अतिशय कठोर परिश्रम घेतले. मात्र पक्ष नेतृत्वाने नेहमीच साप्त्न वागणूक दिली. त्यामुळे भाजपाचा विकासाचा अजेंडा आणि कार्यकर्त्यांना मिळणारा सन्मान यामुळे आम्ही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
विजयाचा गुलाल उधळला, आता विकासकामांची घौडदौड सुरू! गणेश बिडकरांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
Newaworldmarathi Pune : महापालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक २४ मधून विजयी झालेले भाजप नगरसेवक व माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी कोणताही विलंब न करता कामाला सुरुवात केली आहे. विजयाचा जल्लोष बाजूला ठेवत बिडकर यांनी प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देत थेट पुणे महापालिकेचे आयुक्त कार्यालय गाठले.
प्रभाग २४ मधील प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांची सविस्तर यादी घेऊन गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. यावेळी प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत सुविधांबरोबरच महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील सुविधा अधिक सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला प्रभागातून विजयी झालेले भाजपचे नगरसेवक देवेंद्र उर्फ छोटू वडके, उज्वला यादव आणि कल्पना बहिरट हे देखील उपस्थित होते. प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्यावर भर देण्यात आला.
यावेळी बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “निवडणुकीत मिळालेला विजय हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असला तरी खरी जबाबदारी आता सुरू झाली आहे. नागरिकांचा विश्वास सार्थ ठरण्यासाठी प्रभागासह पुणेकरांच्या मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि पायाभूत विकासकामांना प्राधान्य देणार आहे. सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा संकल्प आहे.”
निवडणूक निकालानंतर थेट मैदानात; नगरसेविका रुपाली धाडवे ॲक्शन मोडमध्ये
Newaworldmarathi Pune : प्रभागातील सुखसागरनगर येथील स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ असलेल्या लाईट डीपीच्या कंपाउंडची भिंत तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या डीपीबाबत स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र निवडणूक आचारसंहिता आणि निवडणुकीची धावपळ सुरू असल्याने या तक्रारीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता.
दरम्यान, १६ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि प्रभागातून सौ. रुपालीताई धाडवे या विजयी झाल्या. निकाल लागल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रभागातील प्रलंबित प्रश्नांवर कामाला सुरुवात करण्यात आली. मयुरदादा धोंडे मित्र परिवार यांच्या पुढाकारातून आणि महावितरण विभागाच्या माध्यमातून संबंधित लाईट डीपीला नवीन सुरक्षित कंपाउंड बसवून घेण्यात आले.
या कामामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून संभाव्य अपघाताचा धोका टळला आहे. नवीन कंपाउंड बसविण्याच्या कामाची पाहणी करताना मा. नगरसेवक दिनेश (पिंटूभाऊ) धाडवे, मयुरजी धोंडे तसेच परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी नगरसेविका सौ. रुपालीताई धाडवे यांच्या तत्परतेचे आणि सेवाभावी कार्यपद्धतीचे कौतुक केले.
निवडणूक जिंकल्यानंतर केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. रस्त्यावर थांबून, प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन प्रश्न सोडवणारी ही कार्यपद्धत खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी कशी असावी, याचा आदर्श ठरत असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.

