हाती धनुष्यबाण घेऊन प्रभाग 36 ड मधून आबा बागुल उतरले निवडणुकीच्या रिंगणात

0
Newsworldmrarathi pune: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असून, उद्या अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. पुण्यात भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यात युती होण्याची चर्चा सुरू असली तरी, भाजपकडून निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत लांबल्याने शिंदे गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शिवसेना (शिंदे गट) कडून अनेक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले असून, पुण्यात ही शिवसेना स्वतंत्र ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेत अनेक अनुभवी व वजनदार नेत्यांनी प्रवेश केला. त्यामध्ये माजी उपमहापौर आणि सहा वेळा नगरसेवक राहिलेले उल्हास उर्फ आबा बागुल यांचा समावेश आहे. गेल्या तीन ते चार दशकांपासून प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती परिसरात विकासाचा सातत्यपूर्ण चेहरा म्हणून आबा बागुल शहरभर परिचित आहेत. सुमारे ३० ते ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आबा बागुल यांनी पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, उद्याने, सामाजिक सभागृहे, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सेवा तसेच इतर मूलभूत नागरी सोयी-सुविधांवर भरीव काम केले आहे. ‘काम बोलते’ या भूमिकेतून त्यांनी कायम राजकारण केल्यामुळे नागरिकांचा विश्वास त्यांनी मिळवला असून, आजही तो कायम आहे. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावतीमध्ये आता आबा बागुल यांची थेट लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांशी होणार आहे. मात्र, प्रत्यक्ष विकासकामांचा अनुभव, जाती-धर्मापलीकडे सर्व समाजघटकांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि सहजस्वभावी व्यक्तिमत्त्व यामुळे ही लढत चांगलीच रंगणार असून, प्रभाग ३६ ची निवडणूक ‘हाय व्होल्टेज’ ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुण्यात ‘राजस्थान भवनाच्या उभारणीसाठी जागा देण्याची मागणी : मगराज राठी

Newsworldmarathi Pune: शहरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या राजस्थानी समाजासाठी स्वतंत्र ‘राजस्थान भवन’ उभारण्यासाठी ४ ते ५ एकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी समस्त राजस्थानी समाज संघाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भात संघाचे संस्थापक मगराज राठी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. यासोबतच केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे पुणे ते जोधपूर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली असून तसे पत्रही देण्यात आले आहे. त्याचबरोबर, केंद्रिय उड्डाणमंत्री केआरएमजी नायडू केंद्रिय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे पुणे ते उदयपूर थेट विमानसेवाही सुरु करण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. राजस्थानी समाज संघाकडून देण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजस्थानची कला, संस्कृती व परंपरा देश-विदेशात प्रसिद्ध असून पुणे शहरात शिक्षण, वैद्यकीय उपचार व व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर राजस्थानी समाज वास्तव्यास आहे. पुण्यात सध्या अंदाजे १७ ते १८ लाख राजस्थानी समाजाची लोकसंख्या असूनही येथे अद्याप कोणतेही अधिकृत ‘राजस्थान भवन’ किंवा विश्रामगृह उपलब्ध नाही. राजस्थानी समाजातील विद्यार्थी तसेच उपचारासाठी पुण्यात येणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना निवासाच्या गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पुण्यातील योग्य ठिकाणी ४ ते ५ एकर जागा उपलब्ध करून दिल्यास, राजस्थान भवनाचे बांधकाम जनसहयोगातून करण्यास संघ पूर्णतः तयार आहे. तसेच, रेल्वेच्या फेऱ्या वाढविल्यास आणि थेट विमानसेवा सुरु केल्यास दळणवळणासाठी फायदा होईल, असेही या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. या निवेदनाच्या प्रती राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनाही देण्यात आल्या आहेत.

वृद्धाश्रमातील आजीबाईंचेही दणक्यात ‘थर्टी फर्स्ट’; मधुरा गेठेंनी भरविलेला ‘माहेरवाशीण’ सोहळा आजीबाईंनी फुलवला

0
Newsworldmarathi Pune: वृद्धाश्रमातील सगळ्या आजींच्या डोळ्यांत उत्सुकता होती आणि प्रतीक्षाही होती. ती, ‘माहेरची साडी’ कशी असेल, कोण आणेल ? याची ! सगळीकडे ‘थर्टी फर्स्ट’चा गरमागरम माहोल असताना, एका वृद्धाश्रमातील साऱ्या आजीबाई ‘माहेरवाशीण’ झाल्या अन् चक्क दोन-चार तास आपल्या हक्काच्या माहेरच्या जुन्या आठवणींत रमल्या. तेव्हा काही जणींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, पण ‘आरबीजी फाउंडेशन’च्या मधुरा गेठेंचा आपलेपणा पाहून आनंदाने हसल्याही… हा योग जुळून आला होता, नवी मुंबईमध्ये कार्यरत आरबीजी फाउंडेशनच्या अध्यक्ष मधुरा गेठे यांच्यामुळे. विशेष म्हणजे, या आजीबाईंना खरोखरीच माहेरची ऊब देण्यासाठी मधुरा गेठेंनी साऱ्या जणींना ‘माहेरची साडी’ दिली. तेही प्रत्येक आजीबाईला हव्या त्या रंगाच्या, डिझाइनच्या दोन-दोन साड्या निवडता आल्या. याक्षणी आजीबाईंच्या डोळ्यांमध्ये कौतुकाचे हसूही लपून राहिले नाही. वृद्धाश्रमातल्या सगळ्या आज्जीबाई बुधवारी सकाळी छान तयार होऊन आल्या होत्या. वृद्धाश्रमात येण्यामागची प्रत्येकीची कहाणी निराळी, दुःखही वेगळे. पण नव्या वर्षाला सामोरे जाताना, या आपुलकी, मायेने भरलेला हा कार्यक्रम सगळ्याच आजीबाईनी चांगला फुलवला. आरबीजी फाउंडेशन आणि मधुराताई गेठे यांच्याप्रती सगळ्या आजीबाईंनाी कृतज्ञता तर व्यक्त केलीच; पण लाख मोलाचे आशीर्वादाचे धनही दिले. या सोहळ्याबाबत बोलताना मधुरा गेठे यांनी आपल्या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, ‘’आयुष्याच्या प्रत्येक वळणावर महिलेला माहेरची ओढ असते. ती ओढ उतारवयातही आठवणींत ओढते आणि व्याकूळ करते. माहेरचा आनंद आजीबाईंच्या चेहरा यावा, तो टिकून राहावा, या कौटुंबिक भावनेतूनच आम्ही एकमेकांशी बोलत होतो. त्यातून प्रत्येकजणी आज काही तास का होईना पण माहेरी आले, असे वाटले. यानिमित्ताने केक कापून सरत्या वर्षाला निरोप दिला आणि नववर्षाचे स्वागत झाले. याचेही समाधान आम्ही आज वाटून घेतलं. ‘’ आजींसोबत चिमुरडयांचीही धमाल… वृध्दाश्रम रंगलेल्या या सोहळ्यात आजीबाईंसोबत चिममुरडेही उत्साहाने सहभागी झाले आणि एकाच वेळी आजी, आजोबा आणि नातवंडांचा गोतावळाच पाहायला मिळाला. चॉकलेट आणि केक कापून या बालगोपाळांनी नाताळचे सेलिब्रेशन केले. या सगळयांच्या आनंदाने कार्यक्रमाला कौटुंबिक साज चढला.

गोखलेनगर–जनवाडी प्रभाग ७ मधील भाजप उमेदवार रेश्मा भोसले यांची उमेदवारी अडचणीत

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर–जनवाडी येथील भाजपच्या अधिकृत उमेदवार रेश्मा भोसले यांची उमेदवारी सध्या अडचणीत सापडली आहे. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराने रेश्मा भोसले यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला असून, त्यांच्यावर मालमत्तेची थकबाकी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आक्षेपामुळे प्रभागातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करण्यात आलेल्या या आक्षेपावर आज दुपारी चार वाजता सुनावणी होणार असून, त्यानंतर रेश्मा भोसले यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सुनावणीच्या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी कायम राहणार की रद्द होणार, याबाबतची उत्सुकता कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे. रेश्मा भोसले या माजी आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी असून, त्यांच्या उमेदवारीला भाजपकडून महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे या आक्षेपाचा राजकीय परिणामही मोठा ठरू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारी योग्य असून, आक्षेप निराधार असल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे, आपकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. आता चार वाजता होणाऱ्या सुनावणीनंतरच या प्रकरणावर शिक्कामोर्तब होणार असून, प्रभाग क्रमांक ७ मधील निवडणूक लढतीची दिशा त्यावर अवलंबून राहणार आहे.

प्रभाग २२ मधून अर्चना तुषार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
Newsworldmartahi Pune: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक २२ (क), काशेवाडी डायस प्लॉटमधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रभागातील नागरिकांसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण दिसून आले. अर्चना पाटील यांच्या सामाजिक बांधिलकीची, प्रशासकीय अनुभवाची आणि प्रभागातील सातत्यपूर्ण विकासकामांची दखल घेत भाजपकडून त्यांना सलग दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रसंगी तुषार पाटील, उत्तमराव जाधव, रजनी जाधव, अमर जाधव यांच्यासह संपूर्ण पाटील परिवार उपस्थित होता. तसेच विक्रम खेनट, राहुल मोहिते, मनीषा गायकवाड, रेहान भाभी, मीरा बीघे, परवीन कोटालीया यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शवला. नगरसेविका म्हणून कार्यरत असताना अर्चना पाटील यांनी प्रभागातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण या मूलभूत सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणल्या आहेत. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी तत्काळ सोडविणे आणि प्रशासनाशी समन्वय साधून प्रश्न मार्गी लावणे, हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते. कोरोना काळातही त्यांनी गरजू नागरिकांसाठी अन्नधान्य वाटप, औषधोपचार मदत, आरोग्यविषयक उपक्रम राबवून सामाजिक जबाबदारीची जाणीव दाखवली. आगामी निवडणुकीत प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन अर्चना पाटील पुन्हा एकदा जनतेसमोर उभ्या राहिल्या असून, नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

विकासाचा संकल्प करून राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील मध्यवस्तीचा परिसर असलेल्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने व भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांनी विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात अर्ज दाखल केला. यावेळी मा. नगरसेवक दिलीप काळोखे, मा. नगरसेविका गायत्री खडके, भाजपा कसबा मतदार संघाचे अध्यक्ष अमित कंक, प्रभाग २५ चे भाजपा अध्यक्ष सुनील रसाळ आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे उपस्थित होते. गेल्या दहा वर्षात पक्ष संघटनेच्या विविध पदांवर केलेले काम आणि प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या समस्यांचे केलेले निराकरण या मुळे पक्षाने संधी दिली असून या संधीचे सोने करीन, असा विश्वास बाप्पु मानकर यांनी या वेळी व्यक्त केला. पुणे महापालिका निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) मधील ब गटातून बाप्पु मानकर यांना उमेदवारी जाहीर झाली. बाप्पु यांच्याबरोबरच या प्रभागात स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेली नऊ वर्षे बाप्पु मानकर यांनी पक्षाच्या विविध पदांवर काम केले असून या कामांच्या जोरावर पक्षाने आपल्याला संधी दिली असल्याच्या भावना बाप्पु मानकर यांनी व्यक्त केल्या. पुण्यातील पहिल्या २४ तास जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या असंख्य तक्रारींचे निवारण केल्याने बाप्पु मानकर हे प्रभागात सर्वश्रुत होते. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला त्यांचा जनसंपर्कही या उमेदवारीसाठी महत्वाचा ठरला आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील जनता जाणती असून भारतीय जनता पक्षाने देशात, राज्यात आणि पुणे शहरात केलेल्या सर्वांगीण विकासाच्या पाठीशी नागरिक ठामपणे उभे राहतील आणि प्रभाग क्रमांक २५ मधील भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करतील असा विश्वासही बाप्पु मानकर यांनी या वेळी व्यक्त केला.

मुंबई मनपा वॉर्ड १३५ मधून नवनाथ बन यांचा शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल

0
Newsworldmarathi Pune: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपचे महाराष्ट्र राज्य माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी मुंबई महानगरपालिका वॉर्ड क्रमांक १३५ मधून शेकडो समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. अर्ज दाखल करताना परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना नवनाथ बन म्हणाले की, या परिसरातील मूलभूत समस्या, विकासाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा मला पूर्णपणे माहीत आहेत. जनतेच्या विश्वासावर ही निवडणूक लढवत असून, विजयाचा पूर्ण विश्वास मला आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, दर्जेदार नागरी सुविधा, पारदर्शक कारभार आणि वॉर्ड क्रमांक १३५ च्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे विकासाचे धोरण आणि भाजपची कार्यसंस्कृती घेऊन आपण मतदारांपर्यंत जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वॉर्ड क्रमांक १३५ मध्ये भाजपचा विजय निश्चित असून, ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकू, असा ठाम आत्मविश्वास नवनाथ बन यांनी यावेळी व्यक्त केला.

भाजपला सोडचिठ्ठी; अमोल बालवडकरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी

0
Newsworldmarathi Pune: भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अमोल बालवडकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अमोल बालवडकर यांनी आपल्या भूमिकेवर ठाम विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना अमोल बालवडकर म्हणाले की, माझ्या आयुष्यातील कठीण काळात अजित पवार यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. हा विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेन. कोणताही पक्ष मोठा व्हावा, मात्र त्या पक्षाने पाय जमिनीवर ठेवले पाहिजेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपामध्ये कार्यरत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे सांगत त्यांनी थेट भाजपवर टीका केली. पुढे बोलताना अमोल बालवडकर म्हणाले की, आता अमोल बालवडकर भाजपाला दाखवून देईल की खरा कार्यकर्ता म्हणजे काय असतो. या निवडणुकीत भाजपाला ‘धोबीपछाड’ देणार असून, ही कृती वचपा काढण्यासाठी नाही तर धोका देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमोल बालवडकर यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे आणि उमेदवारीमुळे पुण्यातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.

नगरसेवक नसतानाही ९ वर्षांपासून २४ तास खुले ‘जनसंपर्क’ कार्यालय; बाप्पु मानकर यांना भाजपची उमेदवारी

0
Newaworldmarathi Pune: पुणे शहरातील पहिले २४ तास खुले जनसंपर्क कार्यालय सुरु करत, नगरसेवकपद नसतानाही गेल्या ९ वर्षांपासून २४x७ उपलब्ध राहणाऱ्या राघवेंद्र बाप्पु मानकर यांना भारतीय जनता पक्षाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २५ (शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई) येथून पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. २०१६ साली बाप्पु मानकर यांनी प्रभागात २४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय सुरू केले. त्यावेळी याची जोरदार चर्चा झाली होती. गेल्या ९ वर्षांपासून हे कार्यालय आजपर्यंत अव्याह्तपणे सुरु आहे. भाजपचे शहरपातळीवरील पदाधिकारी म्हणून काम करत असतानाही हे कार्यालय सातत्याने सुरू ठेवत, त्यामाध्यमातून सुमारे ६ हजारांहून अधिक नागरिकांची कामे करण्यात आल्याचा दावा त्यांच्या कार्यालयाने केला आहे. तक्रारी, अर्जांचा पाठपुरावा आणि प्रशासनाशी समन्वय या माध्यमातून हे कार्यालय नागरिकांसाठी व विशेषतः येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार ठरल्याचे येथील नागरिक सांगतात. बाप्पु मानकर यांनी पक्षसंघटनेत पूर्णवेळ ‘कार्यकर्ता’ म्हणून काम करताना, त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरभर युवकांचे संघटन केले. एकीकडे शहरपातळीवरील काम सुरू असताना, दुसरीकडे प्रभागातील नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. शहरभर उभे केलेले संघटन, पक्षासाठी केलेले काम, आणि प्रभागातील दांडगा जनसंपर्क यामुळे भाजपच्या सर्वच वरिष्ठांनी त्यांना उमेदवारीची संधी देण्यासाठी अनुकूलता दाखवली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनांपासून ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपर्यंत, पक्षाने दिलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडत, पक्षाने सोपवलेले काम प्रामाणिकपणे करण्यावर मी भर दिला. त्याचबरोबर प्रभागातील नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. यामुळे पक्षाने मला संधी दिल्याचे, राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’चे आयोजन.. कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी राबविलेल्या स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मोहिमेअंतर्गत बाप्पु मानकर यांनी मिशन स्वच्छ प्रभाग २५ अभियानाचे आयोजन केले होते. प्रभागातील गल्लीबोळात या अभियानाची टीम पोहोचली होती. कायमस्वरूपा अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचे आश्वासन या मोहिमेच्या माध्यमातून देण्यात आले आहे.

संघटन, संपर्क आणि सातत्यपूर्ण कामाने बाप्पु मानकर यांच्या उमेदवारीचा मार्ग केला सुकर..

0
Newaworldmarathi Pune : भारतीय जनता पक्षाने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी बहुचर्चित प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथून भाजपचे शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पु मानकर यांना उमेदवारी दिली आहे. पक्षसंघटनेतील विविध कार्यक्रमांचे नियोजन, शहरपातळीवरील संघटनात्मक जबाबदाऱ्या आणि प्रभागातील नागरिकांशी टिकवून ठेवलेला सातत्यपूर्ण संपर्क या ‘मेरिट’वर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या सुमारे ९ वर्षांपासून बाप्पु मानकर पक्षसंघटनेत पदाधिकारी व पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहेत. एकीकडे शहरभर संघटनेच्या कामासाठी कार्यरत असतानाच, त्यांनी प्रभागातील स्थानिक प्रश्नांकडेही सातत्याने लक्ष दिले. ‘भाजयुमो’च्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सोबतीने शहरभर युवकांची मोठी फळी उभारण्यात ते सक्रिय राहिले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप विरोधी पक्षात असताना, संघटनेने घेतलेल्या आंदोलनांमध्ये बाप्पु मानकर यांनी ‘भाजयुमो’च्या कार्यकर्त्यांच्या मदतीने तत्कालीन सरकारविरोधात रान पेटवले होते. त्यांच्या भाजयुमो शहराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात कोरोना दरम्यान केलेले रेमडीसीव्हीर इंजेक्शन साठीचे आंदोलन, कोविड काळात शालेय फी माफीसाठीचे आंदोलन, विद्यापीठ कायदाविरोधी आंदोलन अशी अनेक आंदोलने गाजली होती. ‘भाजयुमो’तील त्यांच्या संघटनात्मक कामाचा विचार करून पुढे पक्षाने त्यांच्यावर पुणे शहर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवत, शहर कार्यकारणीत काम करण्याची संधी दिली. पक्षाच्या विविध कार्यक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांचा समन्वय आणि शहरपातळीवरील उपक्रमांमध्ये संघटनेच्या विविध पदाधिकाऱ्यांसोबत महत्वाची भूमिका महत्त्वाची राहिली. लोकसभा निवडणुकी दरम्यान झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेसकोर्स येथील सभेचे नियोजन, पक्षाच्या राज्याव्यापी बैठका, व अनेक कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांनी महत्वाची जबाबदारी सांभाळली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात पक्षाने दिलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करत त्यांनी काम केले. २४ तास जनसंपर्क कार्यालय पक्ष संघटनेत काम करत असताना बाप्पु मानकर यांनी स्थानिक पातळीवर जनसंपर्क तुटू दिला नाही. २०१६ साली बाप्पु मानकर यांनी प्रभागात २४ तास सुरू असलेले जनसंपर्क कार्यालय सुरू केले. ज्येष्ठ नागरिक व प्रभागातील नागरिकांना कोणत्याही वेळी मदतीसाठी उपलब्धता राहावी यासाठी हे कार्यालय सुरु केल्याचे मानकर यांनी सांगितले. शहरपातळीवरील संघटनात्मक कामाच्या व्यापातही नागरिकांशी संपर्क तुटू दिला नाही. या कार्यालयाच्या माध्यमातून सहा हजारांहून नागरिकांची कामे मार्गी लागल्याची चर्चा या प्रभागात होत असते. शहरभर युवकांचे संघटन आणि प्रभागातील नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी काम केल्याची दखल घेत भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.