प्रभाग ४० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दमदार प्रचार; चारही उमेदवारांचे भव्य शक्तिप्रदर्शन

0
Newsworldmarathi Pune : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. कोंढवा बुद्रुक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य प्रचार शुभारंभ करण्यात आला. या वेळी पक्षाच्या चारही उमेदवारांनी एकत्र येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले असून, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या शुभारंभी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यात आले. त्यानंतर पदयात्रा काढत परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. रस्त्यांच्या दुतर्फा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांचे स्वागत करत होते. महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला. या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश लक्ष्मण कडे, सतीश मारकड, सपना अमोल वाघमोडे आणि विश्वास खुराट यांनी सहभाग घेतला. तसेच पक्षाचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हावर मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी बोलताना उमेदवारांनी प्रभागातील मूलभूत प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि विकासकामांबाबत आपली भूमिका मांडली. “ज्या विश्वासाने नागरिक आमच्या पाठीशी उभे आहेत, त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे उमेदवारांनी सांगितले. एकूणच या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग ४० मधील निवडणूक वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार अधिक जोमात सुरू झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

प्रभाग २२ मध्ये अर्चना पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे भव्य उद्घाटन; कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवार अर्चना पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. माजी राज्य मंत्री दिलीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी परिसरात मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना दिलीप कांबळे यांनी अर्चना पाटील यांच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. प्रभागातील विकासकामे, नागरिकांशी असलेला थेट संवाद आणि सातत्यपूर्ण जनसेवा यामुळे त्या नागरिकांच्या विश्वासार्ह नेत्या ठरल्या असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणुकीच्या माध्यमातून भाजप अधिक मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अर्चना पाटील यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानत, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवणे हीच आपली प्राधान्यक्रमाची कामे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक कार्यालय हे केवळ प्रचाराचे केंद्र नसून नागरिकांच्या प्रश्नांसाठी खुले व्यासपीठ असेल, असेही त्यांनी नमूद केले. उद्घाटनानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. प्रभागातील भाजप कार्यकर्त्यांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. एकूणच अर्चना पाटील यांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनामुळे प्रभाग २२ मधील निवडणूक प्रचाराला अधिक वेग आला असल्याचे चित्र दिसत आहे.

छत्री निशाणावर अपक्ष उमेदवार कल्पना मुळीक यांनी फोडला प्रचाराचा नारळ

0
Newsworldmarathi Pune: प्रभाग क्रमांक ४० मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या कल्पना उदयसिंह मुळीक यांचा प्रचार सध्या जोरदार सुरू आहे. प्रभागातील विविध भागांत त्या नागरिकांशी थेट संवाद साधत असून ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. प्रभाग क्रमांक ४० मधील अपक्ष उमेदवार कल्पना मुळीक यांनी प्रचाराचा नारळ फोडून निवडणूक प्रचाराला अधिकृत सुरुवात केली. प्रचारादरम्यान नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले असून, मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. कल्पना उदयसिंह मुळीक या निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, वीज, आरोग्य आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी ऐकून त्या सोडवण्यासाठी ठोस भूमिका मांडत आहेत. अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्याची आठवण करून देत पुन्हा एकदा त्यांना संधी देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उदयसिंह मुळीक यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. गरजू नागरिकांना मदत, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन, महिलांसाठी उपक्रम तसेच युवकांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. या सामाजिक कार्यामुळेच आज त्यांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. निवडणुकीसाठी त्यांचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘छत्री’ असून, या चिन्हावर मतदान करून आपल्याला विजयी करण्याचे आवाहन कल्पना उदयसिंह मुळीक यांनी नागरिकांना केले आहे. “सामाजिक कामाचा अनुभव आणि नागरिकांचा विश्वास हाच माझा खरा आधार आहे. निवडून आल्यास प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करेन,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

विकासाची गती, प्रगतीचा विश्वास ; प्रभाग २२ मध्ये अर्चना पाटील यांच्यामध्यमातून अभूतपूर्व विकासकामे

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ ‘क’ पुर्ण (काशेवाडी-डायस प्लॉट) मध्ये गेल्या पाच वांत विकासाची न भूतो न भविष्यती अशी कामे झाली आहेत. प्रभागातील सामान्य नागरिक, मात-भगिनी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्य मूलभूत गरजाचा विचार करून आणि भविष्याच वैध र्धत, पुणे महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि प्रभाग क्र. २२ ‘क’ च्या भाजपच्य अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील यांनी कोटकरधी रुपयांची विकासकामे मार्ग लावली आहेत, केवळ निधी उपलब्ध करून न थांबत्ता, अनेक कामे स्वखर्चातून पूर्ण करत त्यांनी जनसेवेचा एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. आरोग्य क्षेत्रात महत्वपूर्ण कामगिरी प्रभागातील आरोग्य सुविधांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे रखेनवणे हॉस्पिटल येथे पुणे शहरातील पहिले अद्ययाचत ‘बर्न व स्ट्रोक वॉर्ड’ सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, ही सुविधा लवकरच सुरू होणार असून यामुळे जळीत रुग्ण आणि अर्धागवायूया झटका आलेल्या रुग्णांना तातडीने उपचार मिळणे शक्य होणार आहे हे धुण्याच्या आरोग्य सेवेतील एक मोठे पाऊल मानले जात आहे. तसेच, याशिवाय, गरजू नागरिकांसाठी २४x७ मोफत रुग्णवाहिका सेवा अखंडितपणे सुरू असून दर महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांमध्ये मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते, ज्याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला आहे. कोविड संकटात उल्लेखनीय कार्य कोरोना काळात ७२ दिवसांसाठी मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले होते प्रभागात नियमीत सॅनीटायजेशन होत राहिल याची त्यांनी काळजी घेतली. तसेच सात हजार नागरिकांचे लसीकरण वेळेत पुर्ण करून घेतले. प्रभागातील युवा पिढीला व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक तरूणांना स्वखर्चाने नशामुक्ती केंद्रात पाठवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. पायाभूत सुविधांवर भर प्रभागातील ५० वर्षापासून प्रलंबित असलेली ड्रेनेजची समस्या जुना मोटार स्टैंड ते चूडामण तालीम व लोहियानगर परिसरात २४ इंथी नवीन ट्रंक लाईन टाकून कायमस्वरूपी सोडवण्यात आली गुरुनानक नगर भागात नवीन पावसाळी व ड्रेनेज लाईन टाकून रस्त्यांचा पूर्ण कायापालट करण्यात आला आहे. शंकर शेठ रोडवर आधुनिक सायकल ट्रॅक उभारण्यात आला असून, जुना मोटार स्टैंड चौक ते अलंकार मेडिकलपर्यंत दर्जेदार कॉक्रीट रस्ता तयार करण्यात आला आहे. काशेवाडी, म्हसोबा मंदिर व बालाजी मंदिर परिसरातील पिण्याच्या पाण्याची अडचण नवीन जलवाहिन्या व नळ कोंडाळे उभारून दूर करण्यात आली आहे सेव्हन लव्हज चौकातील रस्ता १८ फूट रुंद केल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला असून, नागरिकांचा वेळ वाचत वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे.

एका कॉलवर होतो प्रॉब्लेम सॉल्व्ह, बिडकर पॅटर्नची प्रभाग 24 मध्ये चर्चा

0
Newsworldmarathi Pune: गेली तीन वर्षे पुणे महानगरपालिकेवर प्रशासकीय राजवट असल्याने लोकनियुक्त नगरसेवक नसल्याचा थेट फटका नागरिकांना बसत आहे. छोट्या-मोठ्या नागरी समस्यांसाठी महापालिकेत वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापालिकेचे माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सुरू केलेला ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम प्रभाग क्रमांक २४ मधील नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. महापालिका अस्तित्वात नसतानाही सक्षम यंत्रणा उभी करून बिडकर यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबवला आहे. पाणीपुरवठा, बांधकाम परवाने, मलनिःसारण, रस्ते, देखभाल-दुरुस्ती, पथ विभाग तसेच सांस्कृतिक विभागाशी संबंधित तक्रारी सोडवण्यासाठी नागरिकांना थेट अधिकाऱ्यांकडे जावे लागत होते. मात्र या उपक्रमामुळे नागरिकांचा एक फोन येताच तक्रारींची दखल घेऊन थेट जागेवर जाऊन समस्या सोडवण्याची कार्यक्षम यंत्रणा कार्यरत आहे. यासंदर्भात नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, प्रशासन काळात नगरसेवक नसल्याने निर्माण झालेली पोकळी ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ उपक्रमामुळे भरून निघत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली टीम सातत्याने राबत असून, समस्या प्रलंबित न ठेवता तातडीने तोडगा काढण्यावर भर दिला जात आहे. याबाबत बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “नगरसेवक हा प्रशासन आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा असतो. नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा मिळावी, या उद्देशातूनच ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ हा उपक्रम सुरू केला. महापालिका नसली तरी नागरिकांच्या समस्या थांबत नाहीत; त्यामुळे त्या सोडवणे ही आमची जबाबदारी आहे.” या उपक्रमामुळे प्रभाग २४ मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासन काळातही लोकप्रतिनिधींची भूमिका किती महत्त्वाची आहे, याचे हे ठळक उदाहरण ठरत आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडविणार: आबा बागुल यांची ग्वाही

0
Newsworldmarathi Pune: तळजाई टेकडी येथील सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम तसेच वाळवेकर लॉन येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या संवाद कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावतीमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार माजी उपमहापौर आबा बागुल आणि पॅनलच्या तीनही उमेदवारांनी तळजाई टेकडीवर सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला आणि विकासासाठी “शिवसेनेचे धोरण कणखर” यावर चर्चा केली.नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार केला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांशी झालेल्या संवादात आबा बागुल यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ समाजासाठी, कुटुंबासाठी आणि शहराच्या जडणघडणीसाठी वाहिलेल्या ज्येष्ठांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे ही आपली जबाबदारी असल्याचे आवर्जून नमूद केले. या संवादादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य सुविधा, नियमित वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, विरंगुळ्यासाठी मोकळ्या जागा, सुरक्षित चालण्याचे मार्ग, स्वच्छतागृहे, सार्वजनिक बस थांबे, तसेच प्रशासनाशी संबंधित कामांमध्ये येणाऱ्या अडचणी याबाबत आपली मते मांडली. अनेक ज्येष्ठांनी एकटेपणा, मानसिक तणाव आणि संवादाच्या अभावाकडेही लक्ष वेधले. यावर आबा बागुल म्हणाले की, ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा अनुभवसंपन्न आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या केवळ ऐकून घेऊन चालणार नाहीत, तर त्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पडेस्क, नियमित आरोग्य शिबिरे, ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.तसेच, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने राबवण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. समाजाचा विकास हा सर्व घटकांना सोबत घेऊनच होतो. ज्येष्ठ नागरिक सुखी, सुरक्षित आणि सन्मानाने जगतील, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आबा बागुल यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, त्यांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ मिळाल्याने अनेकांनी आबा बागुल यांचे आभार मानले.

ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन

0
Newsworldmarathi Pune: भाजपच्या प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ, महात्मा फुले मंडई येथील उमेदवारांच्या प्रचारासाठी सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन एका अनोख्या आणि भावनिक सोहळ्यात पार पडले. पक्षासाठी निस्वार्थपणे आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांच्या त्यागाला, निष्ठेला आणि सेवेला वंदन करत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. ‘निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसून, संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची जबाबदारी आम्हा उमेदवारांवर असते. पक्षाच्या यशामागे लाखो ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट, त्याग आणि परिश्रम आहेत. त्याच भावनेतून प्रभाग २५ मधील ज्येष्ठ नगरसेविका मीराताई पावगी, ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, रमेशजी परचुरे, किरणजी सरदेशपांडे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या हस्ते निवडणूक कचेरीच्या उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला,’ असे राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले. या हृद्य सोहळ्यास कसब्याचे आमदार हेमंतभाऊ रासने यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक, स्वप्नाली पंडित, माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ, श्रेयस लेले यांचीही उपस्थिती लाभली.

‘सेवा हाच धर्म’ या ब्रीदवाक्याने राणी भोसले पुन्हा निवडणूक रिंगणात; नागरिकांचा पाठिंबा

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजले असून, प्रभागातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रभाग क्रमांक ३८ मधून भाजपच्या अधिकृत उमेदवार व माजी नगरसेविका राणी भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘सातत्य, संघर्ष आणि सामर्थ्य’ या त्रिसूत्रीवर आधारित त्यांचे कार्य आज प्रभागातील नागरिकांसाठी विकासाचा विश्वासार्ह आधार ठरत आहे. राणी भोसले यांनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कामावर भर दिला आहे. महिला सक्षमीकरणाला त्यांनी विशेष प्राधान्य दिले असून विविध शासकीय योजनांचा लाभ गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन वाटप, रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्ग तसेच स्वयंसहायता गटांच्या माध्यमातून आर्थिक बळकटी देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देत रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि सार्वजनिक सुविधांच्या विकासासाठी त्यांनी प्रभावी पाठपुरावा केला. स्वच्छतेबाबत स्वतः पुढाकार घेऊन ‘आधी केले, मग सांगितले’ या तत्वानुसार त्यांनी काम करून दाखवले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य घटकांना सोबत घेऊन त्यांनी प्रभागात सामाजिक सलोखा निर्माण केला आहे. आमदार, खासदार व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राणी भोसले यांनी प्रभागातील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. “सेवा हाच आमचा धर्म आणि माणुसकी हाच आमचा मार्ग” या भूमिकेतून राणी भोसले आता नव्या जोमाने निवडणूक रिंगणात उतरल्या असून, त्यांच्या कार्याची दखल घेत नागरिकांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

भाजपाच्या शक्तिप्रदर्शनाचा शुभारंभ ! प्रभाग ०९ मध्ये भाजपाच्या अधिकृत उमेदवारांची भव्य पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
Newsworldmarathi Pune: पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ जशी जवळ येत आहे, तसतसा प्रभाग क्रमांक ०९ मधील राजकीय वातावरण चांगलाच तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत नगरसेवक उमेदवार सौ. रोहिणी सुधीर चिमटे, श्री. गणेश ज्ञानोबा कळमकर, सौ. मयुरी राहुल कोकाटे व श्री. लहू गजानन बालवडकर यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराचा दमदार शुभारंभ केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बाणेर येथून निघालेल्या भव्य पदयात्रेने संपूर्ण प्रभागाचे लक्ष वेधून घेतले. पक्षाचे झेंडे, घोषणांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांची गर्दी यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा जल्लोष पाहायला मिळाला. हनुमान मंदिर, राम मंदिर, भैरवनाथ मंदिर, पुणे महानगरपालिका कचरा शाळा, श्री सावतामाळा मंदिर, बालेवाडी फाटा, श्री गणेश मंदिर ते शिवम बालवडकर संपर्क कार्यालय असा हा प्रचार मार्ग होता. पदयात्रा जिथे जिथे पोहोचली, तिथे तिथे नागरिकांनी फुलांची उधळण, टाळ्यांचा कडकडाट आणि उत्स्फूर्त घोषणांनी उमेदवारांचे स्वागत केले. यावेळी लहू बालवडकर यांनी सांगितले “हा प्रचार नाही, हा विकासाचा संकल्प आहे. प्रभाग ०९ मध्ये स्वच्छता, पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, सुरक्षा आणि सुशासन यासाठी आम्ही ठोस कृती आराखड्यासह मैदानात उतरलो आहोत. आजचा जनसमुदाय आणि नागरिकांचा विश्वास पाहता विजय आमचाच आहे. “ या प्रचार यात्रेत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनेची ताकद पाहता भाजपाने या प्रभागात निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. “फक्त घोषणा नाहीत, कामाचा अनुभव दिसतो. उमेदवार रस्त्यावर उतरून आमच्याशी बोलत आहेत, हीच खरी लोकशाही आहे. यावेळी आम्ही विकासालाच मत देणार,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक नागरिकांनी दिली. दरम्यान, एकीकडे विरोधक अजून रणनीती आखण्यात गुंतलेले असताना, भाजपाने मात्र थेट जनतेत उतरून प्रचाराची आघाडी घेतली आहे. प्रभाग क्रमांक ०९ मध्ये आज झालेल्या या पदयात्रेमुळे निवडणूक लढतीला खरी रंगत आली आहे.

प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य प्रचार शुभारंभ

0
Newsworldmarathi Pune: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य प्रचार शुभारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत हा प्रचार दौरा पार पडणार असून, प्रभागातील विविध भागांतून प्रचार रॅली काढण्यात येणार आहे. या प्रचाराच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पक्षाची ध्येये, विकासाची भूमिका आणि उमेदवारांचे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रभागातून अधिकृत उमेदवार म्हणून विराज विश्वनाथ लांडे (ओबीसी पुरुष), अनुराधा सुशील लांडगे (सर्वसाधारण महिला), अश्विनी नितेश फुगे (सर्वसाधारण महिला) आणि अमोल मधुकर डोळस (सर्वसाधारण पुरुष) निवडणूक रिंगणात आहेत. उमेदवारांनी आतापर्यंत प्रभागात सामाजिक, शैक्षणिक व नागरी विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेत नागरिकांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे. प्रचार मार्गात छत्रपती शिवाजी महाराज चौक, विविध मंदिरे, चौक, वसाहती आणि प्रमुख रस्त्यांचा समावेश असून ठिकठिकाणी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर मतदान करून उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.