गृहकर्जदारांसाठी गुड न्यूज, आरबीआय 0.50 टक्क्यांनी रेपो रेटमध्ये घट

Newsworldmarathi Mumbai : देशातील महागाईचा स्थिर कल पाहता, रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीनंतर रेपो दरात 0.50 टक्के कपात केली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी झालेल्या MPC च्या या बैठकीत सलग तिसऱ्यांदा रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो आता 5.5 टक्क्यांवर आला आहे. आरबीआच्या या निर्णयामुळं सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाल आहे.

स्कॉटलंड संसदेकडून जेष्ठ पत्रकार डॉ. राजेंद्र वाघमारे यांना विकसित भारत परिषदेसाठी आमंत्रण

0
Newsworldmarathi Pune: स्कॉटलंड संसदेकडून आयोजित विकसित भारत परिषदेसाठी पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांची निवड करण्यात आली आह. येत्या 25 जून रोजी होणाऱ्या स्कॉटलंड येथे भारतीय डायसपोरा साजरा करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी जगातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्कॉटलंड संसदेने डॉ.राजेंद्र वाघमारे यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले आहे. यापूर्वी त्यांना लंडन येथील युनायटेड किंगडम ट्रायडेंट इव्हेंट्स अँड मीडिया या संस्थेच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माध्यम क्षेत्रातील ग्लोबल इन्स्पिरेशनल अवॉर्ड्स देऊन गौरविण्यात आले होते .सदर सोहळा युनायटेड किंग्डमचे खासदार वीरेंद्र शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला होता. या परिषदेत गजेंद्र सिंह शेखावत केंद्रीय मंत्री – संस्कृती आणि पर्यटन, भारत सरकार,श्रीपाद वाय नाईक, केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार,राज्यवर्धन एस राठोड कॅबिनेट मंत्री सरकार राजस्थान,लॉर्ड रामी रेंजर, सदस्य हाऊस ऑफ लॉर्ड्स, यूके, खासदार बॉब ब्लॅकमन हाऊस ऑफ कॉमन, यूके,बॅरोनेस संदीप वर्मा सदस्य हाऊस ऑफ लॉर्ड्स, यूके बॅरी गार्डिनर खासदार-हाऊस ऑफ कॉमन्स यूके,गॉर्डन मॅकडोनाल्ड, स्कॉटिश संसद सदस्य, स्कॉटलंड ,मार्टिन डे, माजी खासदार-हाऊस ऑफ कॉमन्स यूके,रॉबर्ट मसीह नहर माजी- स्पेनच्या सिनेटचे सदस्य ,कुलदीप सिंह शेखावत, भाजप अध्यक्ष – युके आणि युरोप डॉ. संदीप मारवाह ,मधुर भांडारकर प्रख्यात भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता,डॉ. मुकेश त्यागी, बॉलिवूड अभिनेते आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते,डॉ. कुमार राकेश संपादकीय अध्यक्ष ग्लोबल, गव्हर्नन्स न्यूज ग्रुप, समग्र भारत मीडिया ग्रुप नवी दिल्ली, भारत सुधीर चौधरी, प्रसिद्ध वरिष्ठ पत्रकार, डीडी न्यूज, भारत,मनोग्या लोईवाल वरिष्ठ संपादक आणि निवेदक एनडीटीव्ही इंडिया,डॉ. टी. अनिल कुमार सीनियर प्रख्यात कलाकार, चित्रकार. छायाचित्रकार, नवी दिल्ली, भारत,डॉ.राजेंद्र वाघमारे, मुकेश के मीणा संस्थापक-मुकेशवर आयुर्वेद जिनिव्हा, स्वित्झर्लंड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

राजगडावर पर्यटनाचा शोकांत…! बालेकिल्ल्यावरून घसरून तरुणीचा मृत्यू, सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

0
Newsworldmarathi Raigad: ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या राजगड किल्ल्यावर एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. पुण्यातील २० वर्षीय तरुणी बालेकिल्ल्यावरून १५० फूट दरीत कोसळून ठार झाली. कोमल सतीश शिंदे (वय २०, रा. आळंदी) ही आपल्या पतीसोबत पर्यटनासाठी आली होती. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उतरताना तिचा पाय घसरून ती दरीत कोसळली. तात्काळ मदत, पण जीव वाचला नाही अपघातानंतर कोमलला तातडीने वेल्हे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू होण्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस जवान युवराज सोमवंशी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकातील तानाजी भोसले, गणेश सपकाळ यांनी मृतदेह गडावरून खाली आणण्यासाठी महत्त्वाची मदत केली. राजगड ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध, पण सुरक्षिततेचा अभाव? राजगड किल्ला पुण्यापासून सुमारे ४० किमी अंतरावर असून, ट्रेकिंगप्रेमींसाठी लोकप्रिय ठिकाण आहे. बालेकिल्ला हा गडाचा सर्वोच्च आणि देखणं भाग मानला जातो. परंतु, या ठिकाणी सुरक्षेच्या पुरेशा सुविधा नाहीत, अशी तक्रार स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर राजगडवरील पर्यटक सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. पोलिस तपास सुरू या घटनेनंतर वेल्हे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि पर्यटन विभागाने गडावरील सुरक्षा उपाय पुन्हा एकदा विचारात घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

सॉरी, मला माफ करा, हिंजवडीत 25 वर्षीय आयटी अभियंता तरुणीनं संपवलं जीवन

0
Newsworldmarathi Pune : हिंजवडीतील ‘द क्राऊन ग्रीन’ सोसायटीच्या २१ व्या मजल्यावरून उडी घेत एका २५ वर्षीय आयटी अभियंता तरुणीने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ३१ मेच्या पहाटे घडली. मृत तरुणीचे नाव अभिलाषा भाऊसाहेब कोथिंबिरे असून, तिने जीवन संपवण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्या चिठ्ठीत तिने लिहिले आहे “सॉरी, मला माफ करा. मी हे स्वच्छेने करत आहे. माझी आता जगायची इच्छा संपली आहे…” पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिलाषा पहाटे ४.३० वाजता दुचाकीवरून सोसायटीमध्ये आली आणि लिफ्टने थेट २१ व्या मजल्यावर गेली. ४.४२ वाजता तिने इमारतीवरून उडी घेत आपले जीवन संपवले. शवविच्छेदन अहवालात तिच्या महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, कोणताही घातपात अथवा संशयास्पद बाब आढळली नसल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस तपासात नैराश्यामुळे जीवन संपवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

शिवभक्तांची लाट रायगडावर…! शिवराज्याभिषेकासाठी प्रशासन सज्ज

Newsworldmarathi Raigad: : किल्ले रायगडावर यंदाही ६ जून रोजी तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य पद्धतीने साजरा होणार आहे. या ऐतिहासिक दिवशी राज्यभरातून सुमारे दीड लाख शिवभक्त गडावर दाखल होणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर तयारीत व्यस्त असून, ५ हजार किलो तांदूळ, १ लाख पाण्याच्या बाटल्या, आणि १५ खाटांचे रुग्णालय अशा सुविधांची तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे ६ जून आणि तिथीनुसार ९ जून रोजी साजरा होणार आहे. ६ जून रोजी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यात दीड लाखांहून अधिक शिवभक्तांच्या उपस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ९ जूनला होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असून, त्या दिवशी ५० हजार शिवभक्त गडावर दाखल होणार आहेत. प्रशासनाची तयारी ठोस १५ खाटांचे रुग्णालय गडावर कार्यान्वित ५ बेडचा ICU विभाग पाचाड येथे १५ तात्पुरते दवाखाने पायरी मार्गावर, गडावर आणखी ४ दवाखाने ५ हजार किलो तांदूळ आणि अन्न शिजवण्यासाठी आवश्यक साहित्य १ लाख पाण्याच्या बाटल्या, तसेच ५० पाण्याच्या टाक्या (५०० लिटरच्या) ५ जलशुद्धीकरण यंत्र १५० पोर्टेबल स्वच्छतागृहे गडावर आणि पाचाड येथे प्रत्येकी १७ उद्घोषणा केंद्रे, २२ मंडप, ७ एलईडी स्क्रीन गर्दी नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था प्रशासनाने १७०० पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल, आणि दंगल नियंत्रण पथक तैनात केले आहेत. शिवभक्तांची वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी १२ वाहनतळ, आणि १०० एसटी बसेस पाचाड ते पायरी मार्गापर्यंत चालवण्यात येणार आहेत. गर्दी नियंत्रण प्रशासनासाठी मोठे आव्हान गेल्या काही महिन्यांत देशात घडलेल्या गर्दीतील दुर्घटनांचा अनुभव लक्षात घेता, रायगडवरील लाखो शिवभक्तांची व्यवस्था ही प्रशासनासाठी मोठं आव्हान ठरणार आहे. मात्र, रायगड प्रशासन आणि पोलीस यंत्रणेकडून सुरक्षितता आणि सुविधा यांचा मेळ साधण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

Pune News : पुण्यात रात्री पब सुरू राहिल्यास थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई ; आयुक्तांचा इशारा

0
Newsworldmarathi Pune: पुणे शहरात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पब्सवर आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. यापुढे कोणताही पब ठरलेल्या वेळेनंतर सुरू आढळल्यास त्याची जबाबदारी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर टाकण्यात येणार आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे. पोर्शे अपघात प्रकरणानंतर पुण्यातील नाइटलाइफ आणि पब संस्कृतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, यावर नियंत्रण आणण्यासाठी कडक पावले उचलण्यात आली आहेत. त्यानंतरही अनेक पब ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरापर्यंत सुरू असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त कार्यालयात पोहोचत होत्या. ही परिस्थिती पाहता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता थेट कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “पब नियमबाह्य सुरू राहिल्यास केवळ त्यांच्यावर नव्हे, तर त्या भागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकालाही जबाबदार धरले जाईल.” आयुक्तांनी पोलिसांना सूचना देताना, “केवळ पब मालकांवर कारवाई न करता, संबंधित पोलीस अधिकाऱ्यालाही उत्तरदायी धरलं जाईल. कायदा आणि शिस्त पाळण्यासाठी कडक पावलं उचलली जातील,” असा इशारा दिला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील पोलीस विभागात हालचाल सुरू झाली असून, स्थानिक पोलीस निरीक्षक आता अधिक सतर्क झाले आहेत. तसेच पब चालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे, कारण यापुढे कोणतीही दिरंगाई त्यांच्या व्यवसायावर आणि परवान्यांवर गंभीर परिणाम करू शकते.

पुण्यात कोरोनाचा गुपित स्फोट! सांडपाण्यात आढळले COVID व्हायरस, NCLचा गंभीर इशारा

0
Newsworldmarathi Pune: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका गडद होताना दिसत आहे. पुण्यातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये (Sewage Treatment Plants) कोरोनाचे विषाणू आढळल्याने खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने (NCL) दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सर्व १० सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमधील नमुन्यांमध्ये COVID-19 विषाणूचे अंश आढळले आहेत. या घटनेने शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधोरेखित केला आहे. एनसीएलचे मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. महेश एस. धर्ने यांनी सांगितले की, सांडपाण्यातील विषाणूंची पातळी कोरोना काळातील स्तराशी मिळतीजुळती आहे. याचा अर्थ असा की पुण्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढत आहे. नागरिकांनी अलर्ट राहणे अत्यंत गरजेचे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. कोविड ट्रॅकिंगसाठी ‘सांडपाणी निरीक्षण’ महत्त्वाचं माध्यम बनलं आहे. संक्रमित व्यक्तींच्या मलमूत्रातून SARS-CoV-2 चं जेनेटिक मटेरियल सांडपाण्यात मिसळतं आणि त्याच्या आधारे संपूर्ण समुदायातील संसर्गाचा अंदाज लावता येतो. विशेष म्हणजे, लक्षणं दिसण्यापूर्वीच संसर्ग पसरतो आहे की नाही हे समजते, ज्यामुळे वेळीच खबरदारी घेता येणं शक्य होतं. पहिला सैंपल २२ एप्रिल रोजी घेण्यात आला होता, जो पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर ६ मे रोजी घेतलेल्या सर्व नमुन्यांमध्येही कोरोनाचे अंश आढळले. हे पाहता सध्या क्लिनिकल चाचण्या न करता देखील शहरातील कोरोना संक्रमणाचे ‘रेअल टाइम’ संकेत मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य विभागासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरते कारण यातून लक्षण नसलेले आणि निदान न झालेले रुग्ण सुद्धा ओळखता येतात. त्यामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी सावधगिरीचा इशारा म्हणून ही माहिती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा ‘कमबॅक’! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत वादळी पावसाचा अलर्ट जारी

Newsworldmarathi Mumbai: महाराष्ट्रात काही दिवस पावसाचा जोर कमी झाला असला, तरी आता हवामान खात्याने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या २-३ दिवसांत राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले भरून वाहत असून, धरणांतही जलसाठा वाढताना दिसतोय. या जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह कोकणातही वाऱ्याचा जोर मुंबई आणि उपनगरांत पुढील २४ तासांत ढगाळ वातावरणासह मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणातही काही भागांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात या भागांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात मान्सूनचं आगमन कधी? २८ मे रोजी गडचिरोलीत आलेला मान्सून आठवडाभर तिथेच अडकलेला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १३-१४ जून दरम्यान यवतमाळ, अमरावती, अकोला या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय होईल. १७-२० जूनदरम्यान पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. तोवर विदर्भात तापमान ३९-४० अंशांच्या घरात राहील, त्यामुळे उकाडा काहीसा कायम राहण्याची शक्यता आहे.

Jalindar Supekar : “जालिंदर सुपेकरांचा काळा कारभार उघड! बँकेच्या लॉकरमधील पैसे अन् सोनं हडपलं; 500 कोटींचा भ्रष्टाचार

Newsworldmarathi Pune: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर चर्चेत आलेले विशेष महानिरीक्षक (कारागृह) जालिंदर सुपेकर यांच्यावर आता आणखी गंभीर आरोपांची मालिका समोर येत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी सुपेकर यांच्यावर तब्बल 150 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. वकील निवृत्ती कराड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सुपेकरांनी अमरावती कारागृहात कैद असलेल्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामिनाच्या मोबदल्यात तब्बल 550 कोटी रुपये मागितले होते. कराड यांनी या प्रकरणी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली असून त्यांनी या प्रकरणाचे अनेक धक्कादायक तपशील उघड केले आहेत. गायकवाड यांचे बँक लॉकर, सोनं व मोठ्या प्रमाणातील रोख रक्कम जप्त करताना जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मिळून 100 ते 150 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हे जप्ती दरम्यान झाले असून, याची चौकशी व्हावी, अशी मागणी कराड यांनी केली आहे. कराड यांनी असा दावाही केला की, अमरावतीला स्थानांतर केल्यानंतर सुपेकर यांनी दोघा कैद्यांना धमकावले व मारहाण केली. “तुम्ही मला पैसे दिले नाही, तर तुम्हाला जामीन मिळणार नाही, मीच तुम्हाला अडकवले आहे,” असे म्हणत सुपेकर यांनी दबाव टाकल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर, सुपेकरांनी कारागृहातील अधिकाऱ्यांना या कैद्यांना छळण्याचे आदेश दिले होते. जे अधिकारी त्यात सहभागी झाले नाहीत, त्यांना निलंबित करण्यात आले. या सगळ्या पार्श्वभूमीवर कारागृहातच एका कैद्याने नानासाहेब गायकवाड यांच्या गळ्यावर पत्र्याने वार केल्याची घटना घडली असून, यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही प्रकरणे उघड झाल्याने महाराष्ट्रातील तुरुंग प्रशासन आणि पोलीस विभागातील कार्यप्रणालीवर अनेक प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत. आता या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? आणि सुपेकर व संबंधितांवर कारवाई होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bengaluru Stampede : RCB चा ऐतिहासिक विजय काळवंडला! बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू, RCBची मोठी प्रतिक्रिया…

Newsworldmarathi Banglur : आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाच्या विजयी मिरवणुकीत एक भीषण दुर्घटना घडली. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर निर्माण झालेल्या प्रचंड गर्दीत चेंगराचेंगरी झाली, ज्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून ४० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे RCBच्या ऐतिहासिक विजयाला मोठे गालबोट लागले आहे. घटना कशी घडली? ४ जून रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास RCB च्या विजयोत्सवासाठी हजारो चाहते चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर जमले होते. मिरवणुकीसाठी नियोजित ‘ओपन बस रॅली’ रद्द करण्यात आली, परंतु चाहत्यांचा ओघ थांबला नाही. गेट नंबर ३ जवळ अफवांचा गोंधळ, अकार्यक्षम व्यवस्था आणि गर्दीच्या नियंत्रणाचा अभाव यामुळे संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. या भीषण घटनेत एका लहान मुलासह ११ जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर बोवरिंग व व्हिक्टोरिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. RCB संघाची भावनिक प्रतिक्रिया या दुर्घटनेनंतर RCB संघाने अधिकृत निवेदन जारी करत शोक व्यक्त केला. त्यामध्ये ते म्हणाले आहेत की, “बंगळुरूमध्ये झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे आम्ही हादरलो आहोत. लोकांच्या सुरक्षिततेला आमच्याकडून नेहमीच प्राधान्य देण्यात येते. मृतांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो. परिस्थिती समजताच आम्ही आमचे संपूर्ण वेळापत्रक बदलले आणि प्रशासनाच्या सल्ल्याचे पालन केले.” १८ वर्षांनंतरचा विजय… आणि नियोजनातील त्रुटी RCB ने १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे जेतेपद पटकावले. यामुळे संपूर्ण कर्नाटकात उत्सवाचे वातावरण होते. RCB आणि राज्य सरकारने बेंगळुरूमध्ये विजयी मिरवणुकीचे भव्य आयोजन केले होते. मात्र, योजनांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अपेक्षित खबरदारी घेतली गेली नव्हती, असा आरोप नागरिकांकडून होत आहे.