Homeपुणेपार्श्व प्रतिष्ठानकडून भाविकांसाठी विशेष बसचे आयोजन

पार्श्व प्रतिष्ठानकडून भाविकांसाठी विशेष बसचे आयोजन

Newsworldmarathi Pune :प.पू.गणेशलालजी महाराजसाहब यांनी देशभर अहिंसा प्रसाराचे मोठे कार्य केले, ते जैन समाजाचे महान तपस्वी होऊन गेले, सोबत खादी प्रचार प्रसार, अंगीकार, गोशाळा उभारणी आणि इतर अनेक मोठी कार्यें केली. त्यांच्या प्रेरणेने देशभरातील मंदिरात धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अनेक पशु हत्या बंद झाल्या.

गेल्या 132 महिन्यांपासून अमावस्येला पुणे ते जालना ( गुरुगणेश धाम ) ते आहिल्यानगर (आनंदधाम) ते पुणे अशी बस यात्रा अगदी नाममात्र मूल्य घेऊन पार्श्व प्रतिष्ठान च्या वतीने सुरु केली.

मार्गदर्शक महेंद्र सुंदेचा व पार्श्व प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सौरभ पारसमल धोका यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २८ जानेवारी २०२५ रोजी जवळपास 200 पेक्षा जास्त भाविकांना नाम मात्र मुल्यात – सेवा रुपात नेण्यात आले.
सौ. जया महेंद्रजी सुंदेचा मुथ्था, सौ. दिक्षा सौरभजी धोका, सौ.पुनिता रोहनजी भटेवरा व गुरुभक्त परिवार यांच्या विशेष सहयोगाने यात्रा आयोजित झाली.

२८ जानेवारी २०२५ रोजी पुण्यातून रात्री 8:30 वाजता युवारत्न महेंद्रजी सुंदेचा मुथ्था, समाजरत्न प्रकाशजी भंडारी, राजेंद्रजी ताथेड़, सुनिलजी पारख, युवा उद्योजक पवन चोरडिया, गौरव धोका, देवेंद्र पारख, संदेश गादिया आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत जैन ध्वजा दाखवून या बसेस सोडण्यात आल्या.

या यात्रेला भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या यात्रेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी पार्श्व प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सौरभ पारसमल धोका, उपाध्यक्ष चेतन पारख, खजिनदार प्रशिल ताथेड यांनी मेहनत घेतली.
तसेच जालना श्री संघ यांनी खुप चांगली व्यवस्था केल्याने सर्वांनी आभार मानले.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments