Homeपुणेमहाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ! पराभूत होताच पैलवान शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गोंधळ! पराभूत होताच पैलवान शिवराज राक्षेने पंचाला लाथ मारली

Newsworldmarathi Nagar : महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धेत मोठा गोंधळ झाल्याची ही घटना आहे. अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षे याने पृथ्वीराज मोहोळकडून पराभूत होताच संतापाच्या भरात पंचाला लाथ मारली. त्यामुळे मैदानात तणाव निर्माण झाला आणि पोलिसांनी हस्तक्षेप करावा लागला.

Advertisements

ही घटना केवळ खेळातील आक्रमकतेपुरती मर्यादित राहिली नाही, तर दोन्ही पैलवान थेट व्यासपीठावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे गेले. अजित पवारांनी या गोंधळावर काय प्रतिक्रिया दिली आणि पुढील कारवाई काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisements

महाराष्ट्र केसरी 2025 ची गादी विभागात अंतिम लढत नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ अशी लढत झाली. ही लढत पृथ्वीराज मोहोळने जिंकली. पण शिवराज राक्षेला त्याचा पराभव मान्य झाला नव्हता. त्याने पंचांच्या निर्णयाला विरोध केला. नंतर राग अनावर झाल्यानंतर त्यांने पंचांची कॉलर खेचली आणि लाथही मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलं. मात्र, “माझी पाठ टेकली नव्हती,” असे स्पष्ट करत शिवराज राक्षेने आरोप फेटाळले आहेत. आता या घटनेवर महाराष्ट्र कुस्ती महासंघ काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, माती विभागात सोलापूर जिल्ह्याच्या महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीच्या साकेत यादव यांच्यात सामना रंगणार होता. या लढतींमध्ये महेंद्र गायकवाड यांनी मैदान मारले. त्यानंतर महाराष्ट्र केसरी किताबासाठी महेंद्र गायकवाड विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ यांच्या सामना रंगला आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments