Homeपुणेपुण्यातील भाजपने गाजावाजा केला पण ढिसाळ कारभार ; काँग्रेस नेत्यांची टीका...

पुण्यातील भाजपने गाजावाजा केला पण ढिसाळ कारभार ; काँग्रेस नेत्यांची टीका…

Newsworldmarathi Pune : पुण्यातील भाजपच्या ढिसाळ कारभारावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने खरमरीत टीका केली आहे. भाजप मंत्र्यांचे सत्कार झाले, आश्वासने झाली, 9 वर्षे उलटूनही जायका प्रकल्प अजून अपुराच आहे. प्रकल्पाबाबत भाजपकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. निवडणूक प्रचारात अनेक मोठं मोठी आश्वासने भाजपच्या नेत्यांनी दिली. मात्र, आता हे सर्व नेते निवांत आहेत. अशी टीका माजी आमदार, प्रदशे काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

शहरातील सांडपाणी व मैलापाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी सुरु असलेल्या ‘जायका’ प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून महापािलकेला शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प पुर्ण होण्याची मुदत संपत असुन, ती एक वर्षाने वाढवावी अशी मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. दरम्यान भाजपच्या या आश्वासनाचा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांन खरपूस समचार घेतला आहे.

मुळा आणि मुठा नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी जायका प्रकल्प हाती घेऊन नऊ वर्ष झाली तरी अजूनही निम्मेही काम पूर्ण झाले नाहीत. जायका प्रकल्पाच्या कामाची प्रगती ५० टक्क्यापेक्षा अधिक नाही, असे महापालिका प्रशासनच्या निवेदनातून स्पष्ट होत आहे. स्मार्ट सिटी, नदी सुधार योजना, रिंगरोड, मेट्रोचे शहरभर जाळे अशा मोठमोठया घोषणा भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान केल्या. त्यापैकी जायका प्रकल्प ही सुद्धा त्यातीलच एक घोषणा आहे. या सर्वच घोषणा अर्धवट अवस्थेत असून निवडणुका झालेल्या असल्याने भाजपचे मंत्री, खासदार, आमदार असे सर्वच जण या बाबत सोयीस्कर मौन पाळून आहेत. असा आरोप मोहन जोशी भाजप नेत्यांवर केला आहे.

मुठा आणि मुळा नद्यांमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा फेर वापर शेतीसाठी करावयाचा असा हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत राबविला जात आहे. केंद्र सरकारमध्ये प्रकाश जावडेकर पर्यावरण राज्यमंत्री असताना तो प्रकल्प मंजूर झाला. या निमित्ताने बालगंधर्व रंगमंदिरात जावडेकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

या प्रकल्पादरम्यान, भाजपने गाजावाजा, प्रसिद्धी खूप केली. निवडणूक प्रचारात आश्वासने दिली. २०१६ साली कामाला सुरुवात झाली. ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. काम सुरू होऊन ९ वर्षे लोटली. मुदतीत ५० टक्क्यांहूनही अधिक काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पालिका प्रशासन मुदतवाढ मागत आहे. तसेच मध्यंतरी जादा पाणी वापराबद्दल राज्य सरकारने महापालिकेला भुर्दंड ठोठावला. त्याही वेळी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास महापालिका अपयशी होत असल्याचा ठपका महायुतीच्या सरकारने ठेवला होता. याप्रकरणी एकंदरच टोलवाटोलवी आणि भाजपचा नाकर्तेपणा दिसून येतो, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

Ad Banner
Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments