Newsworldmarathi Mumbai : संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, न्यायालयाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदुंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, अशी टीका शनिवारी मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केली.
पश्चिम बंगालमधील हिंदू नरसंहाराविरोधात भारतीय जनता पक्षाच्या बंगाली प्रकोष्ठच्या वतीने प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ नेते विजय तथा भाई गिरकर, बंगाली प्रकोष्ठचे संयोजक रंजन चौधरी, सुभागत दास, सरचिटणीस निरंजन बोस, मीरा रोडच्या प्रकोष्ठच्या महिला अध्यक्ष मंजुला बसक, रहिम दत्ता आदी उपस्थित होते. प. बंगालमध्ये हिंदुंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी भाजप बंगाली प्रकोष्ठच्या वतीने या वेळी करण्यात आली.
या वेळी अॅड. शेलार म्हणाले की, ममता सरकार हिंदूंवर करत असलेल्या निघृण अत्याचाराविरोधात भाजप उभी आहे. आतंकवादाला धर्म नसतो असे म्हणतात, पण मग दहशतवादी हल्ल्यात एका विशिष्ट धर्माचे लोकच का असतात ? असा सवाल त्यांनी केला. प. बंगालमधील ममता सरकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून, तेथे राजरोसपणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुर्शिदाबाद घटना अत्यंत निंदनीय आहे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हिंदुंना सुरक्षा पुरवण्यात यावी, अशी मागणी शनिवारी भाजप बंगाली प्रकोष्ठच्या वतीने आंदोलनावेळी करण्यात आली.


Recent Comments