Newsworldmarathi Delhi: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवार रात्रीपासून जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हवाई हल्ला केला होता. मात्र, भारतीय लष्कराने वेळेवर प्रत्युत्तर देत हे सर्व हल्ले परतवून लावले आणि पाकिस्तानमध्ये घुसून शत्रूच्या ठिकाणांचा यशस्वीपणे नाश केला. भारतीय सैन्याने वायूदल, नौदल आणि पायदळ अशा तिन्ही आघाड्यांवर ताकद दाखवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले.
या कारवाईमुळे पाकिस्तान सध्या अडचणीत असून, आता तो पुन्हा एकदा छुप्या मार्गाने भारतावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण काही तासांपूर्वीच पाकिस्तानने अरबी समुद्रातील गुजराती मच्छिमारांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत. या मच्छिमारांना जिवंत सोडण्यात आले असले तरी बोटी मात्र पाकिस्तानच्या ताब्यात आहेत.
ही घटना लक्षात घेता, 26/11 च्या मुंबई हल्ल्यासारखी घुसखोरी पुन्हा समुद्री मार्गाने होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भारताने आपली समुद्रसीमा अधिक सजगपणे पहार्यावर ठेवावी, अशी मागणी सुरक्षाविशेषज्ञांकडून होत आहे. पाकिस्तानच्या या हालचालींमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.


Recent Comments