Homeक्राईमचार दिवसांवर लग्न... आणि अचानक मृत्यू! लग्नघरी नेमकं काय घडलं?

चार दिवसांवर लग्न… आणि अचानक मृत्यू! लग्नघरी नेमकं काय घडलं?

Newsworldmarathi Ahmadnagar: ‘जो आवडतो देवाला तोच आवडे सर्वांना’, हे वाक्य सत्य ठरवत सुषमा श्रीमंत जाधव या बीएससी पदवीधर नववधूच्या आयुष्याला नियतीने करुण पूर्णविराम दिला. येत्या २० मे रोजी तिचा विवाह साजरा होणार होता. साखरपुडा नुकताच पार पडला होता आणि घरात लग्नाची तयारी अंतिम टप्प्यात होती.

मात्र मंगळवारी (१४ मे) दुपारी १ वाजता घरातील साफसफाईदरम्यान सुषमा कुलरच्या पिनशी संपर्कात आली आणि तिला जोरदार विद्युत शॉक बसला. तिथेच तिचा मृत्यू झाला. घरातील आनंद एका क्षणात शोकात बदलला. गावात हंबरडा फुटला आणि सुषमाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

सुषमा ही हिप्पळगाव येथील जाधव कुटुंबातील ज्येष्ठ कन्या होती. वडील श्रीमंत आणि आई चंद्रकला यांनी कष्ट करून तिला शिकवले. सुषमाचे स्वप्न मोठ्या पदावर जाण्याचे होते. पण तिचे लग्न नात्यातीलच सुनील सूर्यवंशी (रा. येलदरा, ता. जळकोट) यांच्यासोबत निश्चित झाले होते.

दुर्दैवाने हळदीऐवजी तिच्या देहावर अंत्यसंस्काराचे फुले वाहण्यात आली. मंगळवारी सायंकाळी ५ वाजता शोकमग्न वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ad Banner
News World
News Worldhttps://newsworldmarathi.com
News World Marathi Official
Ad Banner
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments