Newsworldmarathi London : गुरुवारी अहमदाबाद येथून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया AI171 या विमानाच्या भीषण दुर्घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून भारत आणि ब्रिटनमधील नागरिकांचा समावेश आहे.
या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “मी आणि अक्षता एअर इंडिया दुर्घटनेची बातमी ऐकून अत्यंत सुन्न झालो आहोत. ही घटना अत्यंत वेदनादायी आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारत आणि ब्रिटन यांच्यातील नातं हे केवळ मैत्रीचं नव्हे, तर एक विशेष बंध आहे. या भीषण घटनेत जी कुटुंबं भारतीय आणि ब्रिटिश नागरिकांना गमावून बसली आहेत, त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्यासाठी आमच्या प्रार्थना आणि भावना आहेत.
भारतातील आणि ब्रिटनमधील नागरिकांच्या एकजुटीचे प्रतीक – ऋषी सुनक यांचा भावनिक संदेश
ऋषी सुनक यांनी या संदेशातून भारत आणि ब्रिटन यांच्यातील नात्याचा उल्लेख करत, दोन्ही देशातील लोकांसोबत सहवेदना व्यक्त केली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे दोन्ही देशांतील नागरिकांच्या मनातील दुःखाला आधार मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.


Recent Comments