भीमा कोरेगाव चौकशी आयोगासमोर शरद पवारांचे पत्र सादर करा; ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी

0
Newsworldmarathi pune: आज भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगासमोर सुनावणी पार पडली. या सुनावणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाकडे एक महत्त्वाचा अर्ज दाखल केला होता.
Oplus_131072
या अर्जात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र सादर करण्याची मागणी करण्यात आली होती. या पत्रात “भीमा कोरेगाव येथील हिंसाचार पूर्वनियोजित होता,” असे नमूद करण्यात आले होते. या संबंधित पत्राची बातमी तत्कालीन सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. शरद पवार यांच्याकडे जर हे पत्र अस्तित्वात असेल, तर ते आयोगासमोर सादर व्हावे, अशी आमची भूमिका असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. आयोगाने आमची बाजू विचारात घेतली असून या संदर्भात लवकरच निर्णय आयोग घेणार आहे. लवकरच या संदर्भातील पुढील सुनावणी होणार आहे.

हॉटेलच्या बाहेर बसलेल्या कौस्तुभ यांना गोळी लागल्यावर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला… अर्धा तास मिळाली नाही मदत..

0
Newsworldmarathi Pune : कौस्तुभ गनबोटे हे शनिवारी पुण्यातून विमानाने जम्मू काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मित्र संतोष जगदाळे हे देखील होते. काश्मीर खोऱ्यातील पहलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. गोळीबार सुरु होता संतोष जगदाळे कौस्तुभ गनबोटे व इतर पर्यटक हॉटेलच्या बाहेर बसले होते. गोळीबारचा आवाज झाल्याने आरडा ओरड सुरु झाली. पर्यटक धावपळ करू लागले त्यामुळे दहशत वाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला.
Oplus_131072
त्यात संतोष जगदाळे यांच्या खांद्याजवळ तर कौस्तुभगनबोटे यांच्या कमरेच्या खाली गोळी लागुन गेली. कौस्तुभ गनबोटे यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. शुगरचा त्रास असल्याने रक्त थांबत नव्हते. तर जवळच असणारे संतोष जगदाळे यांना देखील मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने कौस्तुभ गनबोटे घाबरून गेले होते. त्यांच्या पत्नी देखील जवळच होत्या गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही. तर अॅम्बुलन्स देखील आली नाही. गोळीबार झाल्यानंतर सुरुवातीला धावपळ सुरू होती त्यामुळे कौस्तुभ गनबोटे यांचा त्यांच्या पत्नीने शोध घेतला त्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांना जखमी अवस्थेत बघून त्यांच्या पत्नीला देखील मोठा धक्का बसल्याने त्यांच्यावर देखील उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळाली. तसेच कौस्तुभ गनबोटे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळतच त्यांचा मुलगा कुणाल हा तात्काळ त्यांच्याकडे विमानाने रवाना झाला. कौस्तुभ गनबोटे यांचा मागील तीस वर्षांपासून गनबोटे फरसाण हाऊस या नावाने व्यवसाय होता. अगदी छोट्याश्या व्यवसायातून आज त्यांनी गनबोटे फरसाण हाऊस हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. कौस्तुभ गनबोटे यांना एक मुलगा असून त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला होता. अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह आज विमानाने पुण्याला आणणार असल्याची माहिती मिळत आहे.

निष्पाप जीवांना मारणाऱ्या त्या दहशतवाद्यांचा चेहरा आला समोर…

Newsworldmarathi Team : जम्मू-काश्मीरमधील पेहेलगाम येथे मंगळवारी दुपारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. पेहेलगाम येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्या एका अतिरेक्याचा फोटो समोर आला आहे. घटनास्थळावरचा हा फोटो आहे. या दहशतवाद्याच्या हातात बंदूक दिसत आहे. फोटोमध्ये दहशतवाद्याचा चेहरा दिसत नाहीय. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधसाठी सर्च ऑपरेशन सुरु आहे. NIA ची टीम श्रीनगमरध्ये पोहोचली आहे.
Oplus_131072
फॉरेन्सिक टीम सुद्धा दाखल झाली आहे. आर्मी, सीआरपीएफ, एसओजी, जम्मू पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या सहाय्याने दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस मुगल रोडवर तैनात आहेत. दरम्यान सुरक्षा यंत्रणांकडून पेहेलगाम हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांच स्केच जारी करण्यात आलं आहे. पहलगाममध्ये सुरक्षा पथकांच ऑपरेशन संपल्यानंतर एनआयएची टीम लोकेशवर पोहोचली आहे. पेहेलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह पहलगाम हॉस्पिटलमधून श्रीनगरला पाठवण्यात आले आहेत. पहलगामच्या बैसारन खोऱ्यात हा हल्ला झाला. यात लोकांना निवडून-निवडून लक्ष्य करण्यात आलं

डोंबिवलीच्या मावसभावंडांची काश्मीर सहल ठरली अखेरची

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. मुलाची 10वीची परीक्षा संपली, वर्षभराचा ताण उतरला, रिलॅक्स होण्यासाठी डोंबिवलीतील हेमंत जोशी हे कुटुंबासह फिरायला बाहेर पडले. काश्मीरला जाऊन तेथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी ते सहलीला गेले, पण तीच ट्रीप त्यांची अखेरची ठरली. पहलगाममध्ये काल दुपारी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात डोंबवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासह अतुल मोने, संजय लेले यांचाही बळी गेला. तर पुण्यातील 2 आणि नवी मुंबईतील एकानेही जीव गमावला आहे. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला. हेमंत जोशी हे आपल्या पत्नी व मुलासह फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते. त्यांचा मुलगा ध्रुव याची दहावीची परीक्षा संपली होती. त्यामुळे त्यांनी काश्मीरला फिरण्याचा प्लान केला होता. मात्र काल दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारत हेमंत जोशी यांचा मृत्यू झालाय. हेमंत जोशी हे डोंबिवली भाग शाळा मैदानासमोरील सावित्री या इमारतीमध्ये राहत होते . त्यांच्या मृत्यूची बातमी समजतात आजूबाजूच्या रहिवाशांमध्ये शेजाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
Oplus_131072
हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा पहलगाममधील हल्ल्यात मृत्यू झाला. संजय लेले शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेहुणे होते. तिघेजण कुटुंबियांसह काश्मीरात फिरण्यासाठी गेले होते. त्यांची ही सहल मात्र अखेरची ठरली. हे तिघे डोंबिवली पूर्व पश्चिम भागातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली या भागातील रहिवासी आहेत. संजय लेले यांच्या मुलाच्या हाताच्या बोटाला गोळी घासून गेली. या हल्ल्यात कुटुंबातील बाकी सदस्य बचावले आहेत.

पतीवर गोळ्या झाडताच पत्नी म्हणाली, मलाही मारून टाका; दहशतवादी म्हणाला.; हृदय पिळवटून टाकणारी घटना

Newsworldmarathi Team : काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये कर्नाटकातील एका व्यावसायिकाचाही समावेश होता. मंजुनाथ राव असं त्यांचं नाव होतं. ते तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलासह जम्मू-काश्मीरला फिरण्यासाठी गेले होते. मुलाला पीयूच्या परीक्षेत 97 टक्के गुण मिळाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ते तिघं काश्मीरला गेले होते. परंतु पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात राव यांच्या कुटुंबीयांनी आपलं सर्वस्व गमावलंय. पत्नीसमोरच दहशतवाद्यांनी मंजुनाथ यांना गोळ्या झाडल्या. एका दुकानदाराशी ते बोलत असताना दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. अतिरेक्यांनी मंजुनाथ यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. पतीला आपल्या डोळ्यासमोर प्राण गमावताना पाहून मंजुनाथ यांच्या पत्नीने “मलाही मारून टाका..” असं दहशतवाद्यांना म्हटलं होतं.
Oplus_131072
मंजुनाथ आणि त्यांचे कुटुंबीय 19 एप्रिल रोजी काश्मीरसाठी रवाना झाले होते. ते 24 एप्रिलला काश्मीरहून शिवमोग्गाला परतणार होते. एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी ही ट्रीप बुक केली होती. हल्ल्यानंतर एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मंजुनाथ यांच्या पत्नीने हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग सांगितला. “माझ्या मुलाने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. माझा पती एका दुकानदाराशी बोलत होता, तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. त्यांनी माझ्या पतीच्या डोक्यात गोळी झाडली. जेव्हा मी आणि माझा मुलगा त्यांच्याजवळ गेलो, तेव्हा त्यांनी आपले प्राण गमावले होते. मी दहशतवाद्यांना ओरडून म्हणाले की, तुम्ही माझ्या पतीला मारलंत, मलाही मारून टाका. माझ्या मुलानेही तेच म्हटलं. पण तो अतिरेकी म्हणाली, नाही मारणार.. मोदीला जाऊन सांग. ही भयानक घटना तू मोदीला जाऊन सांगावं यासाठी तुला सोडून देतोय, असं म्हणून तो तिथून निघून गेला”, असं त्यांनी सांगितलं

आमचा कौस्तुभ गेला.. आमचा आधार गेला.. गणबोटे कुटुंब भावुक….

0
पुणे- काल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला करीत गोळीबार केला, या गोळीबारात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे, यातील दोन पर्यटक हे पुण्याचे असून, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा यात मृत्यू झालाय. पुण्यातील कोंढवा साईनगर येथे कौस्तुभ गणबोटे राहत होते, तर कर्वेनगर येथे संतोष जगदाळे राहायला होते. या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगरा कोसळलाय.
Oplus_131072
आमचा आधारच गेला आहे :पहलगाममध्ये झालेल्या घटनेत कौस्तुभ गणबोटे यांचा मृत्यू झालाय. त्यानंतर त्यांच्या काकी ज्योती गणबोटे म्हणाल्या की, कौस्तुभ जाण्याच्या आधी मला येऊन भेटला होता आणि त्याने सांगितलं होतं की, मी माझ्या मित्राच्या बरोबर फिरायला चाललोय, तेव्हा मी बोलली होती की, जा पण काळजी घे, परंतु काल फक्त गोळीबाराची बातमी समजली होती आणि आज अशी बातमी आल्याने आमचा आधारच गेला आहे. तो आमच्या घरातील सर्वात मोठा होता, असं म्हणत काकी ज्योती गणबोटे या भावूक झाल्यात.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू

Newsworldmarathi Kashamir : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय.
Oplus_131072
डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत. महाराष्ट्रातील मृतांची नावे- 1) अतुल मोने – डोंबिवली 2) संजय लेले – डोंबिवली 3) हेमंत जोशी- डोंबिवली 4) संतोष जगदाळे- पुणे 5) कौस्तुभ गणबोटे- पुणे 6) दिलीप देसले- पनवेल जखामींची नावे- 1) एस बालचंद्रू 2) सुबोध पाटील 3) शोबीत पटेल

ट्रोलिंगवर शुभमचा सल्ला काय असतो? माजी सरपंच निर्मला नवलेनी ‘स्टोरी डॉट कॉम’ च्या मुलाखतीत सांगितले उत्तर….

0
Newsworldmarathi Pune : प्रत्येक काम करताना चांगले वाईट अनुभव येत असतात. पण आपल्याला चांगले काम करायचे असेल तर वाईट गोष्टीकडे लक्ष न देता आपल्या ध्येया कडे लक्ष केंद्रीत कर असा सल्ला माझा शुभम हा नेहमी मला देतो आणि माझा पाठीशी खंबीरपणे उभा असतो. त्यामुळे मी अशा ट्रोलिंगकडे लक्ष देत नसल्याचे माझी सरपंच निर्मला नवले यांनी सांगितले. स्टोरी डॉट कॉम या यु ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखती वेळी त्या बोलत होत्या.
Oplus_131072
यावेळी त्यांनी गावात अनेक विकास कामे केली त्याचा आढावा दिला. शिवाय गावाकऱ्यांच्या साथीने गावात सर्वात जास्त कर संकलन करणारी आमची ग्रामपंचायत आहे. यावेळी जास्तीत जास्त महिलांनी राजकारणात यावे आणि समाजसेवा करावी असा सल्ला निर्मला नवले यांनी दिला. गावात नळ पाणी पुरवठ्याचे काम पूर्ण करण्यात मला यश आले याचा मला खूप आनंद वाटतो. ही योजना तात्पुरती चालू न राहता कायम स्वरूपी कशी सुरु राहील या साठी मी आणि गावकरी मिळून टेकनॉलॉजीचा वापर करून नळ मिटर लावून घेतला आणि ही योजना मला यशस्वी करता आल्याचेही नवले यांनी सांगितले. स्टोरी डॉट कॉमची निर्मला नवले यांची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…. https://youtu.be/YC_rEY5E_Jc?si=7OhcDjB4u2ospb6_

हृदयद्रावक…! रुळांजवळचे भांडण बेतले जीवावर; लोकलच्या धडकेत दोन मित्रांचा मृत्यू

0
Newsworldmarathi Mumbai : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुळालगत भांडण करत असलेल्या तीन मित्रांपैकी दोघांनी रेल्वे रूळ ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न करताना वेगात आलेल्या लोकलच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ऐरोली व दिघा रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे. सागर संजीव सोनवणे (वय-२२), सचिन छबुराव रोकडे (वय-२४) अशी या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या अपघाताप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सागर सोनवणे आणि सचिन रोकडे हे ऐरोली नाका परिसरात राहत होते. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास सागर आणि सचिन व त्यांचा तिसरा साथीदार नरेश सोनवणे (वय-२७) हे तिघेही ऐरोली व दिघा गाव या रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाजवळ एकमेकांसोबत भांडण करत होते.
Oplus_131072
या भांडणादरम्यान नरेश दोघांना मारण्यासाठी त्यांच्या मागे धावला असता सागर आणि सचिन या दोघांनी त्याच्यापासून दूर पळून जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलने सागर आणि सचिन या दोघांना जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सागर व सचिन या दोघांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती रेल्वे पोलिसांना आणि आरपीएफच्या जवानांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह ठाणे येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये पुढील कार्यवाहीसाठी पाठवून दिले. या अपघाताप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांनी दिली आहे.

साने गुरुजी शाळेचा माणूस घडवणारा उपक्रम : शिवाजी खांडेकर

0
Newsworldmarathi Pune : समाजात प्रचंड असंवेदनशीलता, क्रूरता, हेवेदावे, माणूसकीचा अंत आणि अस्वस्थता माजवणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटना घडू नये असे वाटत असेल तर बालवायताच संवेदनशीलता हे मूल्य प्रत्येक शाळेत रुजवले गेले पाहिजे. माणूस म्हणून जगताना माणूसकीचा अर्थ प्रत्येक विद्यार्थ्याला समजला गेला पाहिजे तरच समाज सुखी आणि समृद्ध होईल असे प्रतिपादन शिवाजी खांडेकर यांनी केले. नुकतेच राष्ट्र सेवा दल संचालित शिक्षण प्रशासक मंडळाच्या साने गुरुजी प्राथमिक शाळेत ” संवेदना निधी प्रदान समारंभ” पार पडला.त्या प्रसंगी ते बोलत होते.
Oplus_131072
मन समृद्ध माणसं समाज समृद्ध करतात, आदर्श मूल्य संस्कार हेच सामाजिक भान निर्माण करतात या उद्देशाने साने गुरूजी प्राथमिक शाळेत मधूकरराव निरफराके सहज शिक्षण प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जातात त्यापैकी सर्व समाजाला दिशादर्शक ठरावा असा हा संवेदना निधी उपक्रम नूकताच संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत दर शुक्रवारी संवेदनशीलता मूल्यावर अधारित एक कथा सांगितली जाते व दर शनिवारी प्रत्येक विद्यार्थ्याला एक रुपया आणण्याचे आवाहन केले जाते. वर्षभर हा निधी संवेदना निधी डब्यात टाकला जातो. जमा झालेला हा निधी दरवर्षी अंध, अपंग,वृद्धाश्रम अशा समाजातील दुर्लक्षित संस्थेला प्रदान करण्यात येतो.संवेदनशिलतेबरोबरच अशा दुर्लक्षित व्यक्तिंविषयी आपूलकी निर्माण व्हावी व आपणही समाजाचे काही देणे लागतो ही भावना विद्यार्थ्यांत निर्माण व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या वर्षी हा निधी नर्हे येथील लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या आश्रमास प्रदान करण्यात आला. संस्थेचे प्रमुख अर्जून केंद्रे यांनी तो कृतज्ञतेने स्वीकारला. सोबत शिक्षक,पालक व विद्यार्थ्यांनी “एक मूठ तांदूळ एक मूठ साखर” हा उपक्रम राबवत साधारण ५० -५० किलो तांदूळ व साखरही या संस्थेकडे सुपूर्द केली. यात इनरव्हील क्लब ऑफ पुणे प्लॅटीनमच्या कोषाध्यक्षा माधूरी बोरा, अध्यक्षा प्रिती शिरुडकर, चिटणीस वृषाली शिरूडकर, सदस्या संगिता गोवळकर यांचाही वाटा मोठा होता. यावेळी व्यासपीठावर प्रशासक मंडळाचे सचिव मा शिवाजी खांडेकर, मुख्याध्यापक मीना काटे, सामाजिक कार्यकर्ते अमोल कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, तेजस्विनी फूलफगर, विठ्ठल शेवते,शितल खेडकर, लक्ष्मी कांबळे यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक मुख्याध्यापक मीना काटे यांनीकेले.सूत्रसंचालन सोपान बंदावणे यांनी केले तर आभार संगिता गोवळकर यांनी मानले.