पुस्तक देण्यासाठी घरी आला अन् विनयभंग करून गेला; शिक्षकास तीन वर्षे सक्तमजुरी

Newsworldmartahi Kolhapur: दहावीचे पुस्तक देण्यासाठी घरी आलेल्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना ९ फेब्रुवारी २०१९ मध्ये दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास घडली होती. आरोपी शिक्षक महेश नारायण नाजरे (वय-५८, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर.) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (१) पी. एफ. सय्यद यांनी तीन वर्षे सक्तमजुरी तसेच १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी बुधवारी २३ एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल लागला आहे. या प्रकरणी सरकारी वकील ॲड. मंजूषा पाटील यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी महेश नाजरे हा शिक्षक आहे. गुन्हा घडलेल्या दिवशी आरोपी पीडित मुलीच्या घरी दहावीचे इतिहासाचे पुस्तक आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी मुलीच्या आईने पुस्तकाच्या झेरॉक्स काढून त्या नाजरे यांच्या घरी पोहोच करण्यास तिच्या मुलीला सांगितले. त्यानुसार ती दुपारी सव्वाबाराच्या सुमारास पुस्तकाच्या झेरॉक्स घेऊन आरोपी नाजरे याच्या घरी गेली. दरम्यान, त्यावेळी तो त्याच्या घरात मोबाइलवर अश्लील चित्रफिती बघत बसला होता. घरात दुसरे कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीशी अश्लील कृत्य केले. तिला आतल्या खोलीत ओढून नेत असतानाच तिने हिसडा देऊन घरी पळून गेली. या प्रकरणी तिच्या आईने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. न्यायाधीशांनी आरोपी नाजरे याला बाललैंगिक प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सोंतर्गत कलम ८ नुसार ३ वर्षे सक्तमजुरी, पाच हजार रुपये दंड आणि कलम १२ नुसार १ वर्ष सक्तमजुरी तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

PM Narendra Modi : दहशतवाद्यांच्या काळजात धडकी भरणार; मोदींकडून ‘आरपार’च्या लढाईची घोषणा; म्हणाले, आता गाडण्याची वेळ…

Newsworldmarathi pune : PM Narendra Modi : बिहारमधील मधुबनी जिल्ह्यात पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपले भाषण सुरू केले. भाषण सुरू करण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. तसेच पहलगाम हल्ल्याबद्दल दुःख व्यक्त केले. पहलगाम हल्ल्यावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी ज्या क्रूरतेने निष्पाप नागरिकांना मारले त्याबद्दल संपूर्ण देश दुःखी आहे. कोट्यवधी नागरिक दुःखी आहेत. संपूर्ण देश सर्व पीडित कुटुंबांच्या दुःखात त्यांच्यासोबत उभा आहे. उपचार घेत असलेल्या कुटुंबातील सदस्य लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पुढे बोलताना मोदी म्हणाले, मित्रांनो, या दहशतवादी हल्ल्यांमध्ये कोणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जोडीदार गमावला, त्यापैकी काही बंगाली बोलत होते, कोणी कन्नड बोलत होते, तर काही मराठी बोलत होते. कोणीतरी गुजराती होते. आज, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, त्या सर्वांच्या मृत्युबद्दल समान दुःख आहे. रागही तसाच आहे. देशाच्या शत्रूंनी भारताच्या श्रद्धेवर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. मी अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला. जम्मू काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी उच्चस्तरीय बैठक घेते पाकिस्तानवर कठोर कारवाई सुरु केली. सिंधू पाणी करार रद्द करत इतर पाच मोठे निर्णय घेण्यात आले. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर नरेंद्र मोदी यांची पाहिलीच जाहीर सभा गुरुवारी झाली. यावेळी पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर कठोर शब्दांत पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला.

चुलता, चुलतीच्या त्रासाला कंटाळून पुतण्याची आत्महत्या; आंबेगाव तालुक्यातील घटना

Newsworldmarathi Pune : आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे जमिनीच्या वादातून तसेच चुलता आणि चुलतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पुतण्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. निखिल अजय मिंडे (वय २८) असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी मांदळेवाडी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी रोहित अजय मिंडे यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृत निखिलचा चुलता संजय नारायण मिंडे व चुलती कुंदा संजय मिंडे (दोघे रा. कौलीमळा थोरांदळे, पाटीलमळा रोड, ता. आंबेगाव) यांच्यावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित अजय मिंडे, निखिल मिंडे व त्याचे कुटुंबीय थोरांदळे येथे राहत आहेत. फिर्यादी रोहित यांचा चुलता संजय नारायण मिंडे यांच्यात शेतजमिनीच्या वाटपावरून वाद सुरू होते. त्याबाबत घोडेगाव न्यायालयात दावा दाखल असून, तो न्यायप्रविष्ट आहे. रविवारी (दि. २०) फिर्यादी रोहित आणि निखिल तसेच चुलता संजय, चुलती कुंदा यांच्यात जमिनीच्या वादातून भांडण झाले होते. चुलता संजय याने फिर्यादी रोहित व निखिल यांच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतरसुद्धा चुलता व चुलतीने फिर्यादी रोहित आणि निखिल यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे फिर्यादी आणि त्याचा भाऊ निखिल मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच निखिलने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत.

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या मेहुण्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Newsworldmarathi Sangali: मिरज तालुक्यातील बेडग येथे शेत जमिनीचा ताबा घेण्यासाठी मारहाण करून शेतातील झोपडी पडली. याप्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवा राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ऊर्फ बाळासाहेब ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत राहुल सुरेश ओमासे (वय 24, रा. बेडग) यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे जितेंद्र ओमासे व राहुल ओमासे यांच्यात बेडग येथील दीड एकर शेतजमिनीच्या मालकीवरून वाद आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. न्यायालयाकडून आदेश मिळाल्याचा दावा करत २२ एप्रिल रोजी जितेंद्र ओमासे, रघु नागरगोजे, नेताजी ओमासे, मल्हारी खाडे, स्वप्निल साबळे हे सर्वजण राहुल ओमासे यांच्या शेतात गेले. जमीन ताब्यात घेण्यासाठ राहुल यांना झोपडीतून घराबाहेर काढून त्यांची झोपडी पाडली. राहुल यांचे वडील सुरेश यांना मारहाण केली व त्यांच्या आईला शिवीगाळ केली, असं तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात जितेंद्र ओमासे यांच्यासह चार साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयितांना अद्याप अटक केली नसून अधिक तपास सुरु आहेत.

शरद पवार यांनी घेतले कौस्तुभ गणबोटे यांचे अंत्यदर्शन; आम्ही टिकल्या काढून टाकल्या.. मोठं मोठ्याने अजान वाचली…संगीता गणबोटे यांनी सांगितला थरारक अनुभव

0
Newsworldmarathi pune: जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गणबोटे दुर्दैवी मृत्युमुखी पडले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाचे राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. गणबोटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत गणबोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांच्या समोर कौस्तुभ यांची पत्नी यांनी घडलेला सर्व थरारक अनुभव सांगितला. पत्नी संगीता कौस्तुभ म्हणाल्या, आम्हाला निर्बल लोकांना बघून ते अतिरेकी आले. आम्ही महिलांनी कपाळाच्या टिकल्या काढून टाकल्या मोठं मोठ्यांनी आजन वाचली तरी आमच्या माणसांना त्या अतिरेक्यानी मारले. त्यावेळी तिथे आमच्या मदतीला कोणीच नव्हते. आम्ही महिला आमचा जीव वाचावात तिथून पळत निघालो. हा थरारक अनुभक कधीही विसरता येणार नाही… आज कौस्तुभ गणबोटे यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या अगोदर त्यांचे पार्थिव त्यांच्या कोंढव्यातील साईनगर च्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. अंत्यदर्शन घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

0
Newsworldmarathi Pune : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटक अडकले असून त्यांना पुन्हा आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या खर्चातून ही व्यवस्था मोहोळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहोळ यांच्यात पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मोहोळ यांनी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विमानांमधून १८३ महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगर मुंबई येथे आणण्यात येणार आहे गुरुवारी दोन विशेष विमाने आल्यानंतर आणखी काही पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून जितके महाराष्ट्रातील नागरिक असतील, त्या सर्वांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे या पर्यटकांना मोफत आणले जात असून याचा खर्च राज्य सरकार करत आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘मंगळवारी संध्याकाळपासून माझ्या कार्यालयासह वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून संपर्क होत असून महाराष्ट्रातील पर्यटक घडलेल्या घटनेमुळे भीतीच्या वातावरणात होते. मात्र सर्वांशी संवाद साधल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला असून प्रत्येकाला आणण्याची व्यवस्था केली जात आहे. गुरुवारी दोन विशेष विमाने पोहोचल्यानंतर उरलेल्या पर्यटकांना देखील आणण्याची जबाबदारी आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आम्ही उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्रातील शेवटचा नागरिक महाराष्ट्रात येईपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. मोहोळ यांच्याकडून २४ तास वॉररूम कार्यान्वित… महाराष्ट्रातील काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांची संख्या मोठी असण्याची शक्यता असून घटनेच्या 24 तासानंतरही विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांचे फोन मोहोळ यांच्या कार्यालयात धडकत आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी गेल्या 24 तासापासून वॉर रूम कार्यान्वित केली असून या माध्यमातून अडकलेल्या प्रवाशांची माहिती एकत्रित करणे, विमानांची सोय झाल्यानंतर प्रवाशांना सुचित करणे आणि गरजूंना आवश्यक ती मदत पुरवणे याबाबत वॉर रूममधून काम सुरु झाले आहे. मोहोळ यांनी स्वतः वॉररूममध्ये थांबून अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

दहशतवादी हल्ल्या विरोधात भाजपाची निदर्शने

0
Newsworldmarathi Pune : पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज) येथे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील, देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेशाच्या चिटणीस वर्षा डहाळे पहालगाम येथे मृत्यू मुखी पडलेल्या कै.कौस्तुभ गनबोटे यांच्या भगिनी श्रीमती अर्चना देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती. जावडेकर म्हणाले, काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर, तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुधारत होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला खिळ बसावी या उद्देशाने हा भ्याड हल्ला केला. त्याला चोख उत्तर दिले जाईल. यावेळी पुणे शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला सुखरुप घरी परत आणणे हीच प्राथमिकता; उपमुख्यमंत्री अजित पवार

0
Newsworldmarathi Mumbai: पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे सांगत, अडकून पडलेल्या पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातवाईकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संपर्क साधून विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद व सुरक्षीत परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री पवार स्वतः लक्ष ठेवून असून, राज्य व केंद्र सरकारशी संबंधित यंत्रणांशी ते सातत्याने संपर्कात आहेत. राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेवर ठेवले असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशीदेखील उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना मदतीसह धीर दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठीही उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाने नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या कुटुंबियांशी नियमित संपर्क साधून त्यांना वस्तुनिष्ठ व वेळोवेळी माहिती पुरवली जात आहे. पर्यटकांची यादी, त्यांच्या वास्तव्याच्या जागा आणि परतीच्या संभाव्य वेळापत्रकाची माहिती संकलित केली जात असून, ही संपूर्ण कार्यवाही समन्वयाने आणि जलदगतीने पार पाडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या आहेत.

तुझी रोज आठवण येईल नरवाल; आख्ख्या देशाच्या डोळ्यात पाणी, वीरपत्नीचा लेफ्टनंट पतीला अखेरचा सॅल्यूट…

Newsworldmarathi Team : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांना दिल्लीत अंतिम श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंचा जनसागर लोटला होता. लेफ्टनंट नरवाल यांचा विवाह अवघ्या सात दिवसापूर्वी झाला होता. नववधू असलेल्या त्यांच्या पत्नीने पतीच्या पार्थिवाला अखेरचा निरोप देताना फोडलेला टाहो, उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला. नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा जम्मू काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच लग्न सात दिवसांपूर्वी हिमांशीसह झालं होतं. आज त्यांच्या विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेताना पत्नी हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. विनय नरवाल हे पत्नी हिमांशीसह काश्मीरला दोन दिवसांपूर्वी आले होते. १६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर हे दोघंही मधुचंद्रासाठी आले होते. मधुचंद्राच्या मधुर आठवणी रंगवण्याआधीच दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना ठार केलं. विनय नरवाल यांच्या पार्थिवाचं अखेरचं दर्शन घेताना पत्नी हिमांशीच्या अश्रूंचा बांध फुटला. विनय नरवाल हे पत्नी हिमांशीसह काश्मीरला दोन दिवसांपूर्वी आले होते. १६ एप्रिलला लग्न झाल्यानंतर हे दोघंही मधुचंद्रासाठी आले होते. मधुचंद्राच्या मधुर आठवणी रंगवण्याआधीच दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना ठार केलं.

नेमबाजीत मनस्वी जाधवची सुवर्ण कामगिरी

0
Newsworldmarathi Pune : नागपूर जिल्हा रायफल असोसिएशन(NDRA) यांनी दि:-18/04/2025 ते 20/04/2025 या कालावधीत नागपूर प्रियदर्शनी कॅम्पस येथे महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटिशन एप्रिल-2025/1 आयोजित केलेले होते सदर स्पर्धेकरिता संपूर्ण महाराष्ट्रातून 250 नेमबाज स्पर्धक हजर होते.
Oplus_131072
सदर स्पर्धेमध्ये मनस्वी जाधव हिने 10 मी एअर पिस्टल या प्रकारात 352गुण मिळवून *सुवर्णपदक* प्राप्त करून आगामी होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेकरिता पात्र ठरली आहे,कु. मनस्वी ही पुणे शहरामध्ये वानवडी भागातील असून सनग्रेस हायस्कूल मध्ये इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे तसेच प्रशिक्षक- स्नेहा नाळकर यांचे मार्गदर्शनाखाली हेवन पार्क येथील शूटिंग रेंज वर सराव करीत आहे. मनस्वी चे वडील महेश जाधव हे पुणे पोलीस दलात कार्यरत असून त्यांनीही. नेमबाजी या प्रकारात महाराष्ट्र पोलीस चे प्रतिनिधित्व केले आहे, त्यांचे देखील कु.मनस्वीला प्रोत्साहन व पाठींबा मिळत आहे मनस्वी हिने सुवर्णपदक प्राप्त केल्याने पुणे शहर व वानवडी भागातील मान्यवरांनी पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या आहेत,