मंगेशकर रुग्णालयासंदर्भातला तो अहवाल जाळून टाका; खासदार सुप्रिया सुळे संतापल्या

0
पुणे-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना वाचवणारा अहवाल जाहीर झाला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात आमचे सहकारी प्रशांत जगताप हे न्यायालयात जात आहेत. त्यामुळे त्याचे मी जाहीर आभार मानते. एखाद्याची लेक, बायको, आई गेली आहे. असे असताना एखादा रिपोर्ट इतका चुकीचा कसा येऊ शकतो? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. एखादे सरकार महिलेबद्दल इतके असंवेदनशील कसे होऊ शकते? हे धक्कादायक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. आम्ही तो अहवाल मानत नाही. त्या अहवालाला कचऱ्याच्या डब्यात नाहीतर जाळून टाकले पाहिजे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. प्रशांत जगताप या संदर्भात न्यायालयात लढत आहेत. आम्ही देखील त्यांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकार माणुसकी विसरले असेल, मात्र आम्ही माणुसकी विसरलो नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भात सुळे म्हणाल्या की, जाहीर झालेल्या या अहवालावर आमचा विश्वासच नाही. त्यामुळे अहवालात काय आहे? काय नाही? यामध्ये आम्ही वेळ घालवणार नाही. आमच्या राज्यात एका बहिणीची हत्या झाली आहे. त्या राज्यात आम्ही पुन्हा दुसऱ्या लेकीची किंवा महिलेची हत्या होऊ देणार नाही. सरकारच्या वतीने आरोपींना वाचवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळेच आम्हाला न्यायालयात जावे लागत आहे. या राज्यात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला न्यायालयात जावेच लागेल. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. मात्र, ज्यांनी ज्यांनी आमच्या लेकीची हत्या केली, त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

खळबळजनक…! घरातून उचलून नेत अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार

Newsworldmarathi Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मित्राच्या घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जणांच्या टोळक्याने उचलून नेत त्याच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी (दि.१४) मध्यरात्री केडगावमध्ये बाह्यवळण रस्त्यावरील नेप्ती मार्केटजवळील मोकळ्या जागेत घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करताना निर्दयी टोळक्याने त्याचे व्हिडिओ काढले. तसेच तिथे त्याला मारहाण करीत नग्न करून सामूहिक बलात्कार केला. याला जिवंत सोडून नका असे म्हणत कापडी पंचाने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथनगर येथील रावण साम्राज्य ग्रुपचा अध्यक्ष मयूर अनिल आगे, शाहरुख अन्सार पठाण, ओमकार ऊर्फ भैया राहिंज, रोहित पंडागळे, सोनू बारहाते, ऋषिकेश सातपुते (सर्व रा. केडगाव) यांच्यासह अन्य सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. याबाबत पीडित युवकाने तीन दिवसांनंतर गुरुवारी (दि. १७) कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किरकोळ वादातून १२ जणांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला मित्राच्या घरातून उचलून नेले. त्याला मारहाण करीत अनैसर्गिक अत्याचार केला. बेशुद्ध अवस्थेत मेला म्हणून सोडून दिल्याने सुदैवाने तो वाचला. या घटनेचं अधिक तपास कोतवाल पोलीस करत आहेत.

आई-वडिलांचे छत्र हरवलं; सासू सासऱ्यांनी वधूला आणण्यासाठी पाठवले हेलिकॉप्टर; धाराशिवमधील शेतकऱ्याची हटके स्टाईल

Newsworldmarathi Dharashiv : धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाथरूड येथे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या वधूचे आदरयुक्त स्वागत करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यासाठी सासरच्या मंडळींनी अस्मिताला पाथरूड येथून नळी वडगाव फाटा येथील विवाहस्थळी आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवत सर्व पाहुण्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अस्मिता तिकटे असं वधूचं नाव आहे. अस्मिता ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिच्या लहानपणीच डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. अस्मिताचा मामाने सांभाळ केला आणि तालुक्यातीलच आंतरवलीच्या तरुणाशी लग्न जुळवून या शेतकरी कन्येचा विवाह सोहळा धूमधडाक्यात पार पडला. लग्नामध्ये चक्क नवरीसाठी पाठवले हेलिकॉप्टर अस्मिता ही भूम तालुक्यातील पाथरूड या मूळ गावची आहे. तिचा तालुक्यातीलच आकाश शिकेतोड याच्याशी शुक्रवारी विवाह सोहळा संपन्न झाला. या माध्यमातून आई-वडिलांचे छत्र हरपलेली एक अनाथ मुलगी शिकेतोड घराण्याची सून झाली. मुलीचे मामा लहू दासू माने यांनी पालक म्हणून कन्यादान केले. अतिशय भारावून टाकणाऱ्या या सोहळ्यासाठी अंतरवली येथील शेतकरी भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या या मुलाच्या लग्नामध्ये चक्क नवरीसाठी हेलिकॉप्टर पाठवले. मामानी केला सांभाळ अस्मिताची आई सुशिला व वडील केशव तिकटे यांचे निधन झाले आहे. या दोघांच्या मृत्यूने अस्मिताच्या डोक्यावरील छत्र हरवले होते. मामा लहू दासू माने हेही सर्वसाधारण शेतकरी असताना यांनी अस्मिता हिचा लहानपणापासून सांभाळ करून पोटच्या मुलीप्रमाणे पालनपोषण करून तिचा विवाह थाटामाटात लावून दिला. अस्मिताच्या सासू-सासऱ्यांनीही यापुढील पालकत्व स्वीकारत तिला हेलिकॉप्टरमधून लग्नस्थळी आणून स्वागत केल्याच्या क्षणाने सगळेच भारावून गेले होते.

लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही! मुलाची वरात थेट हेलिकॉप्टरने

0
Newsworldmarathi Dharashiv : लग्नसमारंभ म्हटलं की गडगडाट वाजंत्री, नाच-गाणी, आणि दमदार वरात यांचीच तर मजा असते. पण या सगळ्यात एक शेतकरी मात्र चांगलाच चर्चेत आला आहे — कारण त्याच्या स्वागताची स्टाईलच काहीशी वेगळी आणि भन्नाट होती! या शेतकऱ्यानं आपल्या मुलाच्या लग्नात वाजतगाजत वरात आणण्याऐवजी यांच्याच लग्नात नवरदेवाची मिरवणूक थेट हेलीकॉप्टरने काढण्यात आल्याने पंचक्रोशीत या फिल्मी स्टाईल लग्नाची चर्चा झाली आहे. यामुळे शेतकऱ्याने आपल्या मुलाची हौसच पूर्ण केली आहे. गावकऱ्यांनी कौतुकाने म्हटलं – “लेका शेतकऱ्याचा नाद करायचा नाही!” या हटके स्वागतामुळे फक्त नववधूच नव्हे, तर पाहुणे आणि सोशल मीडियावरचे युजर्सही भारावून गेलेत. धाराशिव जिल्ह्यातील एका शेतकऱ्याची हौस म्हणून त्याने आपल्या मुलाच्या लग्नाची मिरवणूक थेट हेलिकॉप्टरने काढली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु आहे. धाराशिवच्या भूम तालुक्यातील अंतरवली गावातील शेतकरी भास्कर शिकेतोड या शेतकऱ्याने आपल्या मुलाच्या लग्नासाठी थेड हेलीकॉप्टर मागवला आहे. भास्कर शिकेतोड यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नात ही हेलीकॉप्टरमधून मिरवणूक काढाली होती, असे त्यांनी स्वतः सांगितले. भास्कर शिकेतोड यांच्या स्वतःच्या लग्नात त्यांची मिरवणूक मोटारसायकलवरुन काढण्यात आली होती. आपली हौस भागवण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नात हेलीकॉप्टरने मिरवणूक काढली. यामुळे याची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

Beed crime : बाबासाहेब आगे खून प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपीच्या पत्नीने सांगितले सत्य

Newsworldmarathi Beed : बाबासाहेब आगे यांच्या खून प्रकरणात आता एक वेगळं आणि धक्कादायक वळण समोर आलं आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य व भाजपचे बूथ विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची हत्या १५ एप्रिल रोजी भरदिवसा करण्यात आली होती. ही घटना स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजप कार्यालयाजवळ घडल्याने परिसरात खळबळ माजली होती. आरोपी नारायण शंकर फपाळ याने पुढाकार घेऊन स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होत, “मीच हत्या केली” अशी कबुली दिली होती. नवीन वळण काय आहे? सुरुवातीला ही घटना राजकीय द्वेषातून घडल्याचा संशय होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासानंतर समोर आलेल्या माहितीप्रमाणे, नारायण फपाळ याला आपल्या पत्नीवर आणि बाबासाहेब आगे यांच्यावर ‘अनैतिक संबंधाचा’ संशय होता. याच संशयातून त्याने ही हत्या केली, असे समजले जात आहे. आरोपीच्या पत्नीने सांगितले खरं कारण आता आरोपी नारायण फपाळ याच्या पत्नीने हत्येचे खरे कारण सांगितले असून बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणे होते, त्यांनी केवळ भाऊ म्हणून आम्हाला मदत केली. माझ्या पतीला दारुचे व्यसन आहे. यातून ते नेहमी मला शिवीगाळ करायचे. गावातील काही व्यक्तींचे नाव घेवून संशय घ्यायचे. आगे यांच्याबद्दल देखील त्यांच्या मनात संशय होता. यातूनच हा प्रकार घडला, असे फपाळच्या पत्नीने म्हटले आहे. तर बाबासाहेब आगे हे मला भावाप्रमाणेच होते, असे देखील या महिलेने सांगितले आहे. आरोपीच्या पत्नीनेही काही महत्त्वाचे खुलासे केले असून, तिचे जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. यामुळे हा खून वैयक्तिक सूडातून झाला की यामागे अजून काही मोठं षडयंत्र आहे, हे शोधण्यासाठी तपास अधिक खोलात चालू आहे.

सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या

Newsworldmarathi Solapur : सोलापूर येथील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर यांनी १८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी आत्महत्या केली. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सायंकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी त्यांच्या राहत्या घरी असलेल्या बाथरूममध्ये स्वतःच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळी लागल्यानंतर त्यांना तातडीने त्यांच्या स्वतःच्या वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अहवालांनुसार, डॉ. वळसंगकर हे काही दिवसांपासून तणावाखाली होते, मात्र त्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉ. वळसंगकर हे सोलापूरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित न्यूरोसर्जन होते. त्यांच्या जाण्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ते सोलापूरमधील वळसंगकर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संस्थापक होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एमबीबीएस आणि एमडी पदवी प्राप्त केली होती, तसेच लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनकडून एमआरसीपी ही पदवीही मिळवली होती. त्यांचे पुत्र डॉ. अश्विन आणि सून डॉ. सोनाली दोघेही न्यूरोलॉजिस्ट आहेत. डॉ. वळसंगकर यांचे कार्य हे समर्पण, गुणवत्ता, आणि सेवाभावाचे प्रतीक होते. त्यांच्या जाण्याने सोलापूर व संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, जी सहज भरून निघणे कठीण आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा सुन आणि मुली असा परिवार आहे.सध्या पोलिसांकडून या घटनेचा सविस्तर तपास सुरू आहे.

दिल्लीत 4 मजली इमारत पत्त्याच्या पानासारखी कोसळली; 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Newsworldmarathi delhi : Mustafabad Building Collapsed: दिल्लीतील न्यू मुस्तफाबादमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. शक्ती विहारमध्ये एक चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली 8 ते 10 जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्यातून चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथकाकडून मदतकार्य सुरू आहे. नेमकं काय घडलं… न्यू मुस्तफाबाद येथील शक्ती विहारमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. अग्निशमन दलाला शुक्रवार आणि शनिवारी रात्री 2:50 वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि एनडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. 40 हून अधिक जण बचावकार्य करत आहेत.

युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्टेशनवर अडवली लोणावळा- पुणे लोकल ट्रेन

0
Newsworldmarathi Pune : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाचा गैरवापर करून भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य करण्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. श्रीमती सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस पाठवून केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीचा कळस गाठला आहे. या निषेधार्थ महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने शिवाजीनगर रेल्वे स्थानकावर पुणे-लोणावळा लोकल ट्रेन रोखून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले, “भाजपकडून सुरु असलेली ही राजकीय सूडाची साखळी आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधींवर खोट्या केसेस लावून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर हल्ला आहे. देशात भाजपचा हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही. रस्त्यावर उतरून, रेल्वे अडवून, सरकारला हादरवण्याचं काम युवक काँग्रेस करणार!” मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी सांगितले, “नॅशनल हेरॉल्ड प्रकरण फक्त एक निमित्त आहे – सत्य बोलणाऱ्या राहुल गांधींना धाक दाखवण्याचा हा डाव आहे. पण आम्ही ही इडी, सीबीआय, नोटीसांची भाषा समजून घेतली आहे. जर आमच्या नेत्यांना छळाल तर प्रत्येक युवक काँग्रेस कार्यकर्ता रस्त्यावर उतरून सरकारला प्रश्न विचारेल.” पुणे शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करताना म्हटले, “पुणे शहरातून आम्ही हे स्पष्ट करतो की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे आमचे अभिमानाचे नेते आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला तर पुणे युवक काँग्रेस शांत बसणार नाही. आज ट्रेन थांबवली आहे, उद्या राज्य थांबवू – इतकं लक्षात ठेवा! या आंदोलनामुळे काही काळासाठी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांना तातडीने हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. युवक शिवराज मोरे, अक्षय जैन, सौरभ अमराळे, तारीख बागवान, प्रथमेश आबनावे, प्रवीण बिरादार, महेश म्हेत्रे, कौस्तुभ नवले, चैतन्य जायभाये मतीन शेख, विक्रांत धोत्रे, राहुल शिंदे, अक्षय बहिरट, मुरली बुद्रराम, हर्षद हांडे, आदी उपस्थित होते.

Anaya Bangar: ‘क्रिकेटर मला घाणेरडे फोटो पाठवायचे’ : संजय बांगर यांच्या मुलीचा खळबळजनक आरोप

Newsworldmarathi Mumbai : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची मुलगी अनया बांगर हिने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. तिने तिच्या लिंग बदलाच्या प्रवासानंतर क्रिकेट क्षेत्रात तिला आलेल्या त्रासांविषयी आणि भेदभावांविषयी उघडपणे बोलले आहे. अनया बांगरचा खुलासा अनया, जी पूर्वी आर्यन म्हणून ओळखली जात होती, तिने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर तिच्या ओळखीचा स्वीकार केला. तिच्या या प्रवासानंतर, तिला क्रिकेट क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तिने सांगितले की, काही क्रिकेटपटूंनी तिला अश्लील फोटो पाठवले आणि तिला त्रास दिला. तिच्या मते, क्रिकेट क्षेत्रात अजूनही “toxic masculinity” म्हणजेच विषारी पुरुषत्वाची संस्कृती आहे, ज्यामुळे तिला तिच्या ओळखीबद्दल गुपित ठेवावे लागली. अनेक क्रिकेटपटूंसोबत क्रिकेट खेळली अनायाने सांगितले की, “ती मुशीर खान, सरफराज खान आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या प्रसिद्ध क्रिकेटपटूंसोबत खेळली आहे. माझे वडील एक सेलिब्रिटी असल्याने मला स्वतःबद्दल सर्व काही लपवावे लागले. क्रिकेटचे जग असुरक्षितता आणि विषारी पुरुषत्वाने भरलेले आहे.” लिंग बदल शस्त्रक्रियेनंतर सहकारी क्रिकेटपटूंच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता, अनायाने सांगितले की, “मला पाठिंबा मिळाला आहे आणि काही छळ देखील झाला आहे. क्रिकेट कारकिर्दीतील अडचणी अनया बांगरने इस्लाम जिमखाना आणि इंग्लंडमधील हिन्कले क्रिकेट क्लबसाठी खेळले आहे. तिच्या लिंग बदलानंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ट्रान्सजेंडर महिलांना महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे, ज्यामुळे तिच्या क्रिकेट कारकिर्दीत अडथळे निर्माण झाले. अनयाचा अनुभव अनयाने लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ती आठ-नऊ वर्षांची असताना तिला वाटायचे की ती मुलगी आहे. तिने तिच्या आईच्या कपड्यांमध्ये स्वतःला पाहून, “मी मुलगी आहे, मला मुलगी व्हायचं आहे” असं स्वतःला सांगितलं. अनयाच्या या धाडसी खुलाशामुळे क्रिकेट क्षेत्रातील ट्रान्सजेंडर व्यक्तींना येणाऱ्या अडचणी आणि भेदभाव समोर आले आहेत. तिच्या या अनुभवामुळे, क्रिकेट क्षेत्रात समावेशकतेबद्दल आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या हक्कांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचा हा ज्येष्ठ नेता अडकणार रिंकूसोबत विवाह बंधनात

Newsworldmarathi Delhi : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालमधील माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष वयाच्या 61व्या वर्षी विवाह बंधनात अडकणार आहेत. माजी खासदार आणि माजी आमदार असलेले दिलीप घोष हे आज (शुक्रवारी) न्यू टाऊन स्थित आपल्या निवासस्थानी साधेपणाने होणाऱ्या विवाह सोहळ्यात रिंकू मजूमदार यांच्यासोबत लग्नगाठ बांधणार आहेत. भाजप नेते दिलीप घोष त्यांच्या ज्वलंत भाषणांमुळे अनेकदा चर्चेत असतात.त्यांची वधू रिंकू मजुमदार आहे, दक्षिण कोलकाता येथील भाजप महिला मोर्चाच्या त्या नेत्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही कोलकात्यातील न्यू टाउन येथे मॉर्निंग वॉक दरम्यान भेटले होते. भाजप नेते दिलीप घोष लग्न करणार आहेत आणि या बातमीने बंगालच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर घोष एकटे पडले होते. त्याच कठीण काळात ज्या महिलेने त्यांना साथ दिली ती त्यांची जोडीदार आहे, असे वृत्तांमधून समोर आले आहे. हा विषय सध्या चर्चेचा विषय बनला असला तरी, राज्य भाजपचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणात गप्प राहिले आहेत.विरोधी पक्ष तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. हे लग्न अगदी साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले नाही. वृत्तानुसार, शुक्रवारी कोलकाता येथील दिलीप यांच्या निवासस्थानी एका साध्या समारंभात त्यांचे लग्न होणार आहे. रिंकू मजुमदार त्याची वधू होणार आहे. ती भाजपचीही सदस्य आहे. दिलीप घोष आतापर्यंत अविवाहित होते. वृत्तानुसार, रिंकू यांनी पहिल्यांदा लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, विशेषतः गेल्या लोकसभा निवडणुकीत दिलीप घोष यांचा पराभव झाल्यानंतर त्या त्यांच्या सोबत उभ्या राहिल्या, त्यांना साथ दिली. हे लग्न अगदी साध्या आणि कौटुंबिक वातावरणात पार पडणार आहे, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक आणि मित्र उपस्थित राहणार आहेत. सध्या कोणत्याही प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचे नियोजन केलेले नाही.