‘एमपीएल’च्या तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज

0
Newsworldmarathi Pune : लोकप्रिय ठरलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या (एमपीएल) तिसऱ्या हगामांसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’चा ‘कोल्हापूर टस्कर’ संघ सज्ज झाला आहे. या लीगसाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावामध्ये (ऑक्शन) संघातील जुन्या खेळाडूंबरोबरच नवीन गुणी चेहऱ्यांनाही ‘पुनीत बालन ग्रुप’ने संधी दिली आहे. ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ने इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) धर्तीवर ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (एमपीएल) सुरू केली आहे. २०२३ पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी, संभाजीनगर, नाशिक आणि सोलापूर या सहा संघाचा समावेश आहे. त्यात ‘कोल्हापूर टस्कर’ या पुण्यातील युवा उद्योजक आणि ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष पुनीत बालन यांच्याही संघाचा समावेश आहे. दरम्यान लीगच्या तिसऱ्या हगामांसाठी पुण्यात गुरुवारी खेळाडूंच्या लिलावाची प्रक्रिया पार पडली. त्यात ‘कोल्हापूर टस्कर’ या संघाने जुन्या ११ खेळाडूंना आपल्याकडे कायम ठेवत नव्याने तब्बल १८ खेळाडूंसाठी बोली लावत त्यांचाही आपल्या संघात समावेश केला आहे. त्यामुळे ‘कोल्हापूर टस्कर’ संघाकडे आता तब्बल २९ खेळाडू असणार आहेत आणि हा एमपीएल मधील हा सुपर संघ ठरला आहे. या संघातील रजनीश गुरबानी या खेळाडूंवर सर्वाधिक ५ लाख २० हजारांची बोली लागली होती. त्यामध्ये ‘पुनीत बालन ग्रुप’ने बोलीची सर्वाधिक रक्कम देत या खेळाडूला संघात घेतले. – असा आहे कोल्हापूर टस्कर संघ जुने खेळाडू- राहुल त्रिपाठी (आयकॉन प्लेअर), अंकित बावणे ( कर्णधार), अथर्व डाकवे, आत्मन पोरे, सिध्दार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे, श्रेयस चव्हाण, सचिन दास, निहाल तुसमाड, सुमित मरकाली नवीन खेळाडू- रजनीश गुरबानी, अथर्व वनवे, दिग्विजय जाधव, आनंद ठेंगे, दीपक डांगी, भार्गव पाठक, हार्दिक कुरंगळे, वेदांत पाटील, आर्यन शहा, विशांत मोरे, सुमित ढेंगरे, आयुष उभे, ऋतुराज विरकर, शुभम माने, निलय निवासकर, राजवीर जगताप, दिलीप मालवीय आणि सुनील यादव.
‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’च्या (एमपीएल) दोन्ही हंगामात आमच्या ‘कोल्हापूर टस्कर’ संघाने चांगली कामगिरी केली. गतवर्षीच्या स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारली, मात्र आम्हाला निसर्गाची साथ लाभली नाही. आता तिसऱ्या हगामांसाठी ‘कोल्हापूर टस्कर’ संघ पुन्हा सज्ज झाला आहे. आमच्या संघात आम्ही नव्याने गुणी आणि होतकरु खेळाडूंना संधी दिली आहे. कोल्हापूर संघाला घवघवीत यश मिळवून देण्याबरोबरच हे खेळाडू पुढे भारतीय संघात जाऊन देशाचंही नाव उज्ज्वल करतील, अशी अपेक्षा आहे.
– पुनीत बालन मालक, कोल्हापूर टस्कर व अध्यक्ष, पुनीत बालन ग्रुप
‘‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ (एमपीएल) यावर्षीही अतिशय जोमाने संपन्न होईल. राज्याच्या कानाकोपऱ्यातील होतकरु खेळाडूंना संधी देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शिवाय अधिकाधिक प्रेक्षक या लीगसोबत जोडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. इतर राज्याच्या लीगच्या तुलनेत डिजिटल मीडियावरही ‘महाराष्ट्र प्रीमियर लीग’ला अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि तो यावर्षी आणखी वाढेल याची आम्हाला खात्री आहे.’’
रोहित पवार आमदार व अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन

धक्कादायक…! १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अनेकवेळा लैंगिक अत्याचार

0
Newsworldmarathi Mumbai : बिहार राज्यातून आलेल्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गत महिनाभरात अनेकवेळा जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार मुंबईच्या वाशीमध्ये घडला आहे. या घटनेतील पीडित मुलीने आपल्या मैत्रिणीला या प्रकाराची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. वाशी पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विनोद भागेसिंग बिष्ट (वय-४६) याला बलात्कार आणि पॉक्सो कलमाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी मूळची बिहार राज्यातील आहे, तर आरोपी विनोद बिष्ट हा उत्तराखंड राज्यातला आहे. आरोपी वाशी सेक्टर १० मधील जे.एन. २ वसाहतीत राहण्यास आहे. आरोपी विनोद बिष्ट हा भोजपुरी चित्रपटाच्या प्रोडक्शनमध्ये काम करत असल्याने काही दिवसांपूर्वी त्याची बिहार राज्यात राहणाऱ्या पीडित मुलीच्या आईसोबत ओळख झाली होती. त्यावेळी त्याने पीडित मुलीच्या आईसोबत चर्चा करताना त्यांच्या मुलीला चांगले काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे पीडित मुलीच्या आईने मुलीला आरोपीकडे पाठवून दिले होते. त्यानंतर पीडित मुलगी मागील महिनाभरापासून आरोपीच्या घरी राहत होती. याच कालावधीत आरोपीने मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. न्यायालयाने आरोपीची २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

पुणेकरांनो लक्ष द्या! बाबा भिडे पूल दीड महिना वाहतुकीसाठी बंद, वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता

0
Newsworldmarathi Pune : आधीच वाहनांच्या गर्दीने त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी आणखी एक अडथळा निर्माण होणार आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील बाबा भिडे पूल मेट्रोच्या कामामुळे पुढील दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या पूलाशेजारील मेट्रो स्टेशनचे (डेक्कन जिमखाना) पादचारी पुलाचे काम सुरु असल्याने प्रशासनाने हा महत्त्वाचा पूल तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मेट्रो प्रशासनाने “काम सुरु आहे, क्षमस्व” अशी माहिती देणारी पाटीही लावली आहे. वाहतुकीवर होणार मोठा परिणाम बाबा भिडे पूल हा डेक्कन, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवारवाडा परिसरात जाण्यासाठी एक महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे यामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना आता पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. परिणामी, सिंहगड रस्ता, लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन कॉलेज रोड या भागात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांसमोर मोठं आव्हान वाहतूक पोलिसांसाठी या मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवणं हे मोठं आव्हान असणार आहे. नागरिकांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, आणि वेळ वाचवण्यासाठी पर्यायी मार्गांचा आधीपासूनच विचार करावा, असं आवाहन करण्यात येत आहे.. नदीपात्रातील वाहतुकीवर मोठा परिणाम नारायण पेठ, सदाशिव पेठ असे शहरातील प्रमुख भाग तसेच जे एम आणि एफसी रोड या ठिकाणी जाण्यासाठी याच मार्गाचा वापर केला जातो. तर दुसऱ्या बाजूला उपनगरात राहणाऱ्या नागरिकांसाठी नदीपात्रातील रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे आता त्याचा परिणाम नदीपात्रातील वाहतुकीवर सुद्धा होणार आहे.

बीडमध्ये गुन्हेगारीचा कळस! महिला वकिलाला सरपंच आणि कार्यकर्त्यांकडून पाईपने अमानुष मारहाण

Newsworldmarathi Beed : बीड – जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांना अक्षरशः ऊत आला असून, आता अंबाजोगाईतील एका महिला वकिलांवर झालेल्या अमानुष मारहाणीने खळबळ उडवली आहे. ज्ञानेश्वरी अंजान असं या वकिल महिलेचं नाव असून, त्या अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करतात. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्ञानेश्वरी अंजान यांना पाईपने जबर मारहाण केली. इतकी की रक्त साकळलं आणि त्यांच्या अंगावर काळे-निळे व्रण पडले आहेत. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, त्यामुळे जनमानसात संतापाची लाट उसळली आहे. ज्ञानेश्वरी अंजान यांनी माध्यमांशी बोलताना संपूर्ण घटनेचा खुलासा केला आहे. मारहाण का करण्यात आली, यामागे नेमकं कारण काय होतं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नेमकं काय घडलं? महिला वकिलने सांगितला घटनेचा थरार अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथे ही घटना घडली. पीडित वकील महिलेने माध्यमांसमोर मांडली आहे. वकिल महिलेला मायग्रेनचा त्रास आहे. त्यामुळे या पीडित महिलेने मंदिरावरील लाऊड स्पीकर आणि घरासमोर असलेल्या गिरणीमुळं ध्वनीचा होत असल्याने आवाज कमी करण्याची विनंती सरपंचाकडे केली. पण त्यांनी टाळाटाळ केली. त्यानंतर पीडित महिलेने थेट पोलिस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांकडे तक्रार दिल्याने सरपंचासह त्याचे कार्यकर्ते महिला वकिलाच्या घरी आले. त्यांनी तिच्या आई-वडिलांना माफी मागायला लावली. हे प्रकरण तेवढ्यावर मिटले नाही. आरोपींनी महिला वकिलाला एका शेतात नेत काठ्या आणि जेसीबी पाईपने गोल रिंगण करत बेदम मारहाण केली. यात ती महिला वकील बेशुद्ध पडली. तिला दवाखान्यात नेण्यात आले. रात्री उपचार करून घरी पाठवून देण्यात आले. या मारहाणीमुळे तिला चालणे आणि बोलणे सुद्धा कठीण जात आहे

‘बदलापूरची’ पुनरावृत्ती…! कर्जतमध्ये ५ वर्षांच्या चिमुकलींचे स्कूलबसमध्ये लैंगिक शोषण

Newsworldmarathi karjat: कर्जतमधील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसमधील अटेंडण्टने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही मुली अवघ्या ५ वर्षांच्या आहेत.या घटनेने संताप व्यक्त करण्यात येत असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी करण दीपक पाटील (वय-२४, वडाप, ता. कर्जत) या आरोपीला अटक करून त्याच्यावर पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक महिती अशी की, आरोपी करण हा त्यांना बसमधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसायला सांगून त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करायचा. त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाणसुद्धा करायचा. हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले. आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलीच्या आईने केला आहे. रात्रीच आरोपीला पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले होते. दरम्यान, तरुणाला कर्जत न्यायालयात दुपारी आणले असता, पालकांनी गाडीतून उतरणाऱ्या तरुणावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मोठा बंदोबस्त कर्जत न्यायालयाच्या आवारात लावला होता. यापूर्वी बदलापूरमध्ये असाच प्रकार घडला होता, आणि आता कर्जतमध्येही ही विकृती समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

छत्रपती संभाजीराजेंनी घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट; काय झाली चर्चा?

0
Newsworldmarathi Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्यात निमंत्रित करण्यात न आलेले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून कोल्हापुरातील क्रिकेट मैदानासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपण बावनकुळे यांची भेट घेतल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. याबाबत बोलताना संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा मी अध्यक्ष आहे. कोल्हापुरात क्रिकेटच्या मैदानासाठी आम्हाला महसूल विभागाकडून ३० एकर जमीन मिळणार आहे, त्यासाठी बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावर बावनकुळे यांनी सकारात्मक विचार करून निर्णय घेतला आहे, त्यामुळे येत्या काळात मुंबई, नागपूर, पुण्यानंतर कोल्हापुरातही आंतरराष्ट्रीय स्टेडियम होण्यासाठी मदत होणार आहे.

माणुसकीला सलाम… ! मुस्लिम बांधवानी केले बैलाचे विधिवत अंत्यसंस्कार

Newsworldmarathi Tuljapur : समाजामध्ये जाती-धर्माच्या भिंती समज-गैरसमजातून रुंदावत चाललेल्या असताना अजूनही प्रेम, माणुसकी, भूतदया जिवंत असल्याची सुखद घटना अणदूर (ता. तुळजापूर) येथे पाहायला मिळाली. अणदूर येथील पाटील तांड्यावरील शेतकरी राजूभाई शेख व कुटुंबीयांकडे असलेलया एका बैलाचे सोमवारी निधन झाले होते. त्यांनी त्याच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. आपल्याकडे असलेले गाय, बैल, म्हैस, कुत्रा यापैकी ब्रध्दापकाळाने किंवा अन्य कारणाने निधन झाले की त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याची वडीलांनी सुरू केलेली परंपरा आजही सुरू ठेवली आहे. राजूभाई शेख हे परंपरागत शेतकरी आहेत. त्यांच्या मागील दोन पिढ्या येथे वास्तव्यास आहेत. शेती हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. त्यांच्याजवळील गाय, बैल, म्हशी, कुत्रे आदीवर जिवापाड प्रेम करुन त्यांचे संगोपन करण्याचा त्यांना छंद आहे. विशेष म्हणजे आपल्याजवळील एकही गाय किंवा बैलाची ते कधीही विक्री करीत नाहीत. जोपर्यंत गाय दुध देते व बैल शेतीच्या कामात चालतो तोपर्यंत त्यांच्याकडून काम करवून घेतात. काही शेतकरी गाय-बैल म्हातारे झाले की त्यांची कसायाला विक्री करतात. तर कांही शेतकरी आपल्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलणाऱ्या वयोमर्यादा संपल्यावरही कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम करुन अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा सांभाळ करतात, असं राजूभाई शेख यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाकडून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश रद्द : मितेश नहाटा यांना मोठा दिलासा

Newsworldmarathi Delhi : दिवाणी स्वरुपाचे प्रकरण असल्याचेे स्पष्ट करीत मध्य प्रदेश न्यायालयाचा आदेश फेटाळत (ीशीं ईळवश ) सर्वोच्च न्यायालयाने उद्योजक मितेश नहाटा यांचा जामिन तातडीने मंजुर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नहाटा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अहिल्यानगर येथील युवा उद्योजक मितेश नहाटा यांचा साखर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. विविध राज्यात साखर विक्री करतात. मात्र, मध्य प्रदेशातील काही साखर व्यावसायिकांनी नहाटा यांच्या विरोधात फसवणूकीची तक्रार दिली होती. त्यानंतर नहाटा यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली होती. नहाटा यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केला होता. मात्र, या प्रकरणाचा सखोल विचार न करता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला होता. त्यामुळे नहाटा यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची वस्तुस्थिती लक्षात घेऊन मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करीत नहाटा यांचा जामीन तातडीने मंजुर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा आदेश फेटाळून लावताना म्हटले आहे की हे प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असल्याचे दिसते. मध्य प्रदेश न्यायालयाने जामिन मंज़ुर करायला हवा होता असे स्पष्ट केले. नहाटा यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात जेष्ठ वकील गौरव अग्रवाल, एड. राहुल जामदार आणि एड. आनंद लांडगे यांनी काम पाहिले.
व्यावसायिक आणि राजकिय द्वेषापोटी मला या प्रकरणात चुकीच्या पध्दतीने अडकविण्यात आले. मी कुठलेही गुन्हेगारी स्वरुपाचे अथवा मानहानीचे कृत्य केलेले नाही. सर्वोच्च न्यायालायाने मला जामिन मंजुर करून दिलेला आदेश व्यावसायिक स्वांतत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. मी न्यायालयाचा आभारी आहे.
– मितेश नहाटा, युवा उद्योजक

न्यूजवर्ल्ड मराठीच्या प्लॅटफॉर्मवर रंगणार फॅशनच्या अदा

0
Newsworldmarathi Pune : इन अससोसिएशन विथ जगदंब आयोजित अदा या महिलांच्या फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारी 4 वाजता हा फॅशन शो लोकशाहीर आण्णा भाऊ साठे सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या फॅशन शो ला मीडिया पार्टनर न्यूजवर्ल्डमराठी असणार आहे. अदा फॅशन शो चा यंदाचा चौथा सीजन आहे. या फॅशन शो मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून महिला सहभागी होतात. 100 हुन अधिक महिला या मध्ये सहभागी होतात. या फॅशन शो च्या सर्व बातम्या तुम्हाला न्यूजवर्ल्ड मराठीच्या वेब चॅनलला पाहता येणार आहेत.
महिलांच्या कलागुणांना एक व्यासपीठ निर्माण करून देणे, महिलांना प्रोत्साहन देणे. हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या फॅशन शो ला दरवर्षी महिलांचा चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे आम्हाला आनंद होतो.
नीलम शेलार डायरेक्टर, अदा फॅशन शो…

UTT सीझन ६ लिलाव: पीबीजी पुणे जॅग्वार्सने अल्वारो रोब्लेसला ठेवले कायम

0
Newsworldmarathi Mumbai: पीबीजी पुणे जॅग्वार्सने इंडियनऑइल अल्टिमेट टेबल टेनिस सीझन ६ साठी एक मजबूत संघ तयार केला आहे. ज्यामुळे संघ बंगळुरूहून पुण्याला स्थलांतरित होत असताना एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. त्यांच्या रोस्टरचे नेतृत्व स्पॅनिश स्टार अल्वारो रोब्लेस (जागतिक क्रमवारीत ३६) करणार आहे, तर त्यांच्या महिला संघाला इजिप्तची टेबल टेनिस सेन्सेशन दिना मेशरेफ (जागतिक क्रमवारीत ३८) आणि २०२३ यूटीटी चॅम्पियन रीथ रिश्या यांच्या समावेशाने मोठी ताकद मिळाली आहे. या हंगामाचा लिलाव महत्त्वपूर्ण होता, कारण त्यात पहिल्यांदाच खेळाडूंनी लिलाव पूलमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे संघ निवडीमध्ये रणनीतीचा एक नवीन स्तर जोडला गेला. गेल्या वर्षीचे कर्णधार आणि दुहेरीतील मुख्य खेळाडू, अल्वारो रोब्लेस यांना जॅग्वार्सने १८.१ लाख टोकनमध्ये निवडले, ज्यामुळे तो सीझन ६ मधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावणारा खेळाडू ठरला. पुण्याने नाशिकमधील उदयोन्मुख प्रतिभा तनीशा कोटेचा यांना कायम ठेवण्यासाठी त्यांच्या आरटीएम कार्डचा वापर केला. दिना मेशरेफसाठी ११ लाख टोकन्स, २०२३ मध्ये गोव्याच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारी रीथ रिश्या व अनिर्बन घोष यांच्यासाठी प्रत्येकी ४ लाख टोकन्स आणि मुदिती दानीसाठी २.२ लाख टोकन्स त्यांनी मोजले. ” अल्वारो परत आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. गेल्या हंगामात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती आणि तो प्रचंड अनुभव घेऊन येतो. तनीशासाठी राईट टू मॅच कार्ड वापरणे हे सातत्य निर्माण करण्याच्या आमच्या हेतूचे प्रतिबिंब आहे. दिना, रीथ, मुदित आणि अनिर्बन यांना समाविष्ट केल्याने आम्हाला एक संतुलित आणि स्पर्धात्मक संघ मिळाला आहे. या हंगामात आमचे लक्ष केवळ पुण्याचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणारा संघ तयार करण्यावर नाही, तर आमच्या महिला खेळाडूंच्या कौशल्यपूर्ण खेळाचा फायदा घ्यायचा आहे. ज्या सामन्याच्या निकालांना आणि आमच्या एकूण रणनीतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील,” असे पुणे जॅग्वार्सचे मालक पुनीत बालन म्हणाले. यूटीटीचे प्रशिक्षक स्लोव्हेनियाच्या अनुभवी वेस्ना ओज्टेरसेक आणि सुभाजित साहा हे सीझन ६ मध्ये जॅग्वार्ससाठी कोचिंग रोस्टर्सचे नेतृत्व करतील. अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) च्या सह-प्रवर्तक विटा दानी लिलावाबद्दल बोलताना म्हणाल्या, “या लिलावाने संघ कसे तयार करतात यात एक नवीन सखोलता जोडली आहे. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि तरुण भारतीय प्रतिभेला समान लक्ष दिले जात आहे, हे पाहून उत्साह वाढला. हे संतुलन इंडियनऑइल यूटीटीने गेल्या काही वर्षांत भारतीय टेबल टेनिस परिसंस्थेवर कसा प्रभाव पाडला आहे हे प्रतिबिंबित करते. सीझन ६ मध्ये काय आहे आणि ते कोणत्या पातळीचे स्पर्धेचे आश्वासन देते याबद्दल आम्ही उत्सुक आहोत.” सर्व आठही संघ पाच साखळी सामने खेळतील, तर अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखाली नीरज बजाज आणि विटा दानी यांनी सह-प्रमोट केलेली फ्रँचायझी-आधारित लीग २९ मे ते १५ जून दरम्यान अहमदाबादमधील EKA अरेना येथे होईल. पीबीजी पुणे जॅग्वार्स स्क्वॉड: अल्वारो रोब्लेस (स्पेन) – १८.१ लाख टोकन, दिना मेशरेफ (इजिप्त) – ११ लाख टोकन, तनीशा कोटेचा – ४ लाख टोकन (RTM), अनिर्बन घोष – ४ लाख टोकन, रीथ रिश्या – ४ लाख टोकन्स, मुदीत दानी – २.२ लाख टोकन्स UTT २०२५ लिलाव – सर्वोच्च बोली लावलेले खेळाडू (Top Buys) फॅन सिकी – १९.७ लाख (चेन्नई लायन्स) अॅड्रियाना डाएझ – १९.३ लाख (कोलकाता थंडर ब्लेड्स) अल्वारो रोब्लेस – १८.१ लाख (PBG पुणे जॅग्वार्स) झेंग जियान – १७.२ लाख (गोवा चॅलेंजर्स TTC) बेर्नाडेट सॉक्स – १५.३ लाख (यू मुंबई TT) दिया चितळे – १४.१ लाख (दबंग दिल्ली TTC) हर्मीत देसाई – १४ लाख (गोवा चॅलेंजर्स) अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) बद्दल २०१७ मध्ये सुरू झालेला अल्टिमेट टेबल टेनिस (यूटीटी) हा भारताचा प्रमुख फ्रँचायझी-आधारित टेबल टेनिस लीग आहे, जो नीरज बजाज आणि विता दानी यांनी टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (टीटीएफआय) च्या छत्रछायेखाली प्रचारित केला आहे. आज, यूटीटी ही आठ संघांची स्पर्धा आहे, ज्यामध्ये ४८ जागतिक दर्जाचे खेळाडू प्रतिष्ठित विजेतेपदासाठी लढतात. ही लीग भारत आणि जगभरातील अव्वल खेळाडू आणि प्रशिक्षकांना आकर्षित करते, ज्यामध्ये ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांचे पदक विजेते सामील आहेत. यूटीटी राष्ट्रीय रँकिंग स्पर्धांना प्रायोजित करून, टेबल टेनिस सुपर लीग आणि देशात डब्ल्यूटीटी इव्हेंट्सचे सह-आयोजन करून खेळाला प्रोत्साहन देते. प्रत्येक आवृत्तीसह, यूटीटी जागतिक टेबल टेनिसचा उत्सव म्हणून आपले स्थान मजबूत करते, खेळाचा दर्जा उंचावते आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देते.