क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे अध्यक्ष म्हणून मनीष जैन यांची नियुक्ती

0
Newsworldmarathi Pune: पुण्यातील खाजगी बांधकाम व्यवसायिकांची सर्वोच्च संस्थाअसलेल्या क्रेडाई पुणे मेट्रोच्या अध्यक्षपदी २०२५-२७ या कार्यकाळासाठी श्री.मनीष जैन यांची निवड करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व प्लांट बायोटेक्नॉलॉजीक्षेत्रात त्यांचा प्रदीर्घ अनुभव असून, त्यांनीयुनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न मिसिसिपी येथून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.   क्रेडाई पुणे मेट्रोचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मनीष जैन म्हणाले, “ही भूमिका स्वीकारण्याचा मला सन्मान वाटतो आणि पुण्याच्या रिअल इस्टेटक्षेत्राच्या वाढीसाठी आणि शाश्वततेसाठी काम करण्यास मी उत्सुक आहे. क्रेडाई पुणे मेट्रोकडून विकासक, घर खरेदीदार आणि सर्व स्टेकहोल्डर्ससाठी चांगले भविष्यघडविण्यासाठी नावीन्यपूर्णता, पारदर्शकताआणि सहयोगी प्रयत्नांवर भर दिला जाईल.”  त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अनेक महत्त्वाच्या विषयांवरलक्ष केंद्रित करणार आहे. यामध्ये पीसीएमसी (PCMC)व आजूबाजूच्या ५ किमी परिसरातील पर्यावरण मंजुरीच्या समस्या सोडवणे, पीएमआरडीएचा (PMRDA) विकास आराखडा (DP) अंतिम करणे,प्रकल्पांसाठी योग्य पाणी वाटप व मीटरिंग सुनिश्चित करणे, तसेच उद्योग सुलभतेसाठी प्रक्रियांत सुधारणा करणे यांचा समावेश आहे. तसेचबांधकाम क्षेत्रातील दर्जा,वेग आणि खर्च कार्यक्षमतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंबवाढविण्यावर भर दिला जाणार आहे. संघटनेच्या कार्यपद्धती व प्रणालींच्या सविस्तररचनेवरही ते देखील लक्ष केंद्रित करतील.  क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष मनीष जैन यांनी माजी अध्यक्ष आणि आता क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष रणजित नाईकनवरे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. नवीन कार्यकारिणीत _उपाध्यक्ष म्हणून अरविंद जैन, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, आय.पी.इनामदार, नितीन न्याती, जे.पी.श्रॉफ, सचिव म्हणून अश्विन त्रिमल आणि संयुक्त सचिव म्हणून तेजराज पाटील आणि अखिल अगरवाल हे खजिनदार म्हणून असतील तसेच जनसंपर्क प्रमुख म्हणून कपिल गांधी_ यांच्याकडे ही जबाबदारीराहील.  व्यवस्थापकीय समितीमध्ये _संजय देशपांडे, मनीष कनेरिया, अनुप झमतानी, पुनित ओसवाल, केतन रुईकर, दिलीप मित्तल, रिंकू शेवानी, सिद्धार्थ मूर्ती, ईशान मगर, कपिल त्रिमल, सपना राठी, मिलिंद तलाठी, हिरेन परमार, आशिष जैन, भूषण पलशरे आणि भूषण पलशरे_ यांचा समावेश आहे.  या नवीन कार्यकारिणीचा अधिकृत स्थापना चेंज ऑफ गार्ड समारंभ २६ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केला जाणार आहे.

बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेचा खरा चेहरा उघड

0
Newsworldmarathi Beed : बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. रणजित कासले स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले असे सांगत होता, ते पैसे मुळात अंबाजोगाई येथील संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन चे मालक सुदर्शन काळे यांनी पाठवले असल्याचे उघड झाले आहे. याबाबत आता सुदर्शन काळे यांनीच स्वतः पोलिसात पैसे दिल्याच्या पुरावा सहित तक्रार दाखल केली आहे. रंजीत कासले हा पोलीस उपनिरीक्षक असताना मागील वर्षी अंबाजोगाई येथे कार्यरत होता, त्या काळात आपली त्याच्याशी ओळख झाली. डिसेंबर 2024 मध्ये रणजीत कासले याने आपल्या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलाच्या फीची अडचण असल्याचे सांगत दहा लाख रुपयांची उसनवारी ने मागणी केली. एका कामाचे बिल आल्यानंतर मी त्यांना त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या वैयक्तिक खात्यावर ते दहा लाख रुपये पाठवले. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी मला दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवण्याचा आग्रह केला होता मात्र मी तसे न करता वैयक्तिक त्यांच्याच बँक खात्यावर पैसे पाठवले. त्यांनी लवकरच ते पैसे परत देतो, असे सांगितले होते. साधारण दीड ते दोन महिने उलटल्यानंतर मी त्यांना पैशाची परत मागणी केल्यावर त्यांनी टाळाटाळ केली. माझे पैसे मला गरजेच्या वेळी परत न दिल्यास मी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले, किंवा त्यांनी गुजरात मधून मला काही रक्कम पाठवली. तसेच सायबर ठाण्यातील गिरी नामक कर्मचाऱ्यांच्या हाताने दोन लाख रुपये, असे तीन वेळा मिळून साडे सात लाख रुपये परत दिले आहेत. तर उर्वरित अडीच लाख रुपये परत मिळवून द्यावेत, अशी मागणीही काळे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सुदर्शन काळे यांनी आपल्या तक्रारी सोबत कासले याला पैसे पाठवल्याचे पुरावे देखील जोडले आहेत. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासन कासले वर काय कारवाई क याकडेही आता लक्ष लागले आहे.

तरुणांनो, बोलते व्हा, व्यक्त व्हा… टोकाचा निर्णय घेऊ नका; कनेक्टिंग ट्रस्टची साद

0
Newsworldmarathi Pune : ‘तरुणांनो, टोकाचा निर्णय घेऊ नका. बोलते व्हा, आपले मनमोकळे करा. मनातील नैराश्याचे ओझे दूर करून कणखरपणे उभे राहा,’ अशी साद कनेक्टिंग ट्रस्टने तरुणाईला व समाजात नैराश्य, तणावाने ग्रस्त लोकांना घातली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यात पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या परिसरात २२४ आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुणांचे असून, १७७ आत्महत्या पुरुषांनी केल्या आहेत. ही आकडेवारी चिंताजनक आहे. तरुण पिढीच्या मानसिक व भावनिक समस्यांकडे अतिशय गंभीरतेने बघायची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कनेक्टिंग ट्रस्टने टोकाचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन केले आहे. मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंध यासाठी २० वर्षांपासून कनेक्टिंग ट्रस्ट हेल्पलाईनद्वारे काम करीत आहे. तणावाखाली, नैराश्यात असलेल्याना भावनिक आधार देत, त्यांना व्यक्त होण्याची संधी देत आत्महत्येपासून परावृत्त केले जात आहे. यासाठी ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या दोन विनामूल्य हेल्पलाईन आठवड्यातील सातही दिवस सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत कार्यरत आहेत. कॉलच्या सुविधेसह अपॉइंटमेंटद्वारे प्रत्यक्ष भेटून बोलायची सोयही आहे. विनामूल्य अपॉइंटमेंट ८४८४०३३३१२ ह्या क्रमांकावर फोन, मेसेज करून घेता येते. ईमेलद्वारे व्यक्त व्हायचे असेल, तर distressmailsconnecting@gmail.com यावर बोलता येते. या सर्व सुविधा विनामूल्य आहेत. कनेक्टिंग ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार म्हणाले, “गेल्यावर्षी (२०२४) एकूण ९३४० कॉल आले. त्यामध्ये ६५ टक्के पुरुषांचे, तर ३५ टक्के महिलांचे कॉल आले होते. या हेल्पलाईनवर सर्वाधिक कॉल १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींकडून आल्याचे निरीक्षण आहे. हेल्पलाईनवर कोणतेही सल्ला न देता व कोणतीही वैयक्तिक किंवा नैतिक निकष लावलेले निर्णय न देता केवळ सहृद्ध भावनेने त्यांचे ऐकून घेऊन भावनिक आधार दिला जातो. मन मोकळे होऊन भावनिक ताण कमी होण्यास मदत होते. सध्या ४७ प्रशिक्षित स्वयंसेवक ही हेल्पलाईन चालवत आहेत. या कार्यात नवीन स्वयंसेवकांना जोडण्याची संधी आहे. त्यासाठी जूनमध्ये अडीच महिन्याचे प्रशिक्षण आयोजिले आहे. इच्छुकांनी ९८३४४०६०३३ ह्या क्रमांकावर चौकशी करावी.” “एका बाजूला तरुण वर्गामध्ये मानसिक आरोग्याविषयी वाढत असलेली जागरूकता आणि संवेदनशीलता दिसते, तर दुसरीकडे याच तरुणाईमध्ये तीव्र मानसिक ताणतणाव आणि आत्महत्येचे वाढते प्रमाण बघायला मिळते. शिक्षण व नोकरीमध्ये येणाऱ्या समस्या, नातेसंबंधांमधील तणाव, आर्थिक अडचणी, मानसिक आजार, कौटुंबिक कलह, सामाजिक विषमता, लैंगिक समस्या, प्रेम प्रकरणातील ताण, व्यसनाधिनता या आणि अशा अनेक समस्या आजच्या तरुणवर्गाला भेडसावत आहेत. या समस्यांचे रूपांतर मानसिक नैराश्यात होऊन आत्महत्येच्या विचारांमध्ये होत आहे. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. याची कारणमीमांसा करायला गेलो, तर अनेक तर्क केले जातात. पुरुष आपल्या समस्यांविषयी सहज बोलते होत नाहीत. पुरुष हा घरातला कर्ता असल्यामुळे त्याने मानसिकरीत्या सक्षम असले पाहिजे, आपला समाज पुरुषांना अतिसंवेदनशील असू देत नाही, अशी काही कारणे यामागे आहेत. तसेच सर्व कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक अपेक्षांच्या ओझ्याखाली बहुतेक पुरुषवर्ग दबला गेला आहे. ज्यामुळे त्यांना आपल्या भावना व्यक्त करणे कठीण होऊन बसते. पुरुष आपल्या मानसिक, भावनिक ताण किंवा समस्यांविषयी आपल्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारात बोलू शकत नाहीत. भौतिक समस्या, तीव्र भावनिक ताण, नैराश्य आणि कुचंबणा याचे रूपांतर आत्महत्येच्या विचारांमध्ये होते,” असेही पवार यांनी नमूद केले.

जेईई मेन्स-२०२५ परीक्षेत चाटे शिक्षण समुहाचे २३१ विद्यार्थी यशस्वी

0
Newsworldmarathi pune : नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई-मेन-२०२५ या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच वेबसाईटवर जाहीर झाला असून या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या चाटे क्लासेस, व ज्युनियर कॉलेजच्या २३१ विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत यश मिळविले असून ते सर्व विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हॉन्ससाठी पात्र ठरले आहेत. समुहाच्या रूद्र माळगी (९९.४९), यशदिप पोरे (९९.३८), आर्या खापणे (९८.९०), आयुष पोवार (९८.६४), ओम फराकटे (९८.५५) या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले आहे. हे यश चाटे पॅटर्ननुसार मेहनत घेणार्‍या विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे आहे असे प्रतिपादन समुहाचे संचालक प्रा. फुलचंद् चाटे यांनी केले. या निकालाविषयी सविस्तर माहिती देताना प्रा.फुलचंद चाटे म्हणाले, देशभरातील आयआयटी, एनआयटी, आयआयआयटी आणि राज्य पातळीवरील शासकीय व अनुदानित अभियांत्रिकी कॉलेजमधील सर्व प्रवेश जेईई-मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स या परीक्षांच्या आधारे पूर्ण होतात. या परीक्षेमधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई-अ‍ॅडव्हान्स ही परीक्षा १८ मे रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंबंधी अधिकची माहिती आणि मार्गदर्शनासाठी चाटे शिक्षण समुहाच्या शाखेवर विद्यार्थ्यांनी भेट द्यावी असे आवाहन चाटे व्यवस्थापनातर्पेâ करण्यात आले आहे. ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स २०२५’ साठी पात्र ठरलेले चाटे शिक्षण समुहाचे काही विशेष गुणवंत विद्यार्थी व त्यांचा एनटीए स्कोर पुढीलप्रमाणे – रूद्र माळगी (९९.४९), यशदिप पोरे (९९.३८), आर्या खापणे (९८.९०), आयुष पोवार (९८.६४), ओम फराकटे (९८.५५), मिहीका कुंभोजकर (९७.६३), हर्षवर्धन शिंदे (९७.३०), सोहम खतकर (९६.५७), श्रेयस फराकटे (९५.४०), ओंकार पाटील (९५.२३), अखिलेश कदम (९४.६४), प्रथम जैन (९४.४७), सृजन कापसे (९४.३७), शृती दिसले (९४.१०), सेजल जाधव (९४.०६), पृथ्वीराज निचिते (९४.०२), सिद्धांत देशमुख (९३.९५), जयवर्धन मोहिते (९३.५५), ओम जंगम (९३.४७), हर्षवर्धन साळुंखे (९३.२९), नीरज कामत (९३.०४), विनीत वडीणगेकर (९२.९०), अभिनव मिश्रा (९२.२९), आयुष पाटील (९२.२७), उझेर सय्यद (९२.१६), तेजस उपड (९१.८३), आदर्श कुंभार (९१.६१), सोहम गुरव (९१.०२). चाटे शिक्षण समुहाचे कॉलेज व क्लासचे सर्व प्राध्यापक, शाखा व्यवस्थापक, प्राचार्य व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी गुणवंतांचे त्यांच्या उज्ज्वल यशाबद्दल अभिनंदन केले व त्यांना पुढील उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या़ .

विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकही शाळेत गणवेशात येणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा निर्णय

0
Newsworldmarathi Mumbai : शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना गणवेश लागू करण्यात येणार आहे. शालेय शिक्षकांना राज्यात ड्रेसकोड लागू होणार, असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सूतोवाच केले आहे. ‘ड्रेसकोडसाठी शासन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शाळेला त्यांनी भेट दिली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे सुतोवाच केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही गणवेशात दिसणार आहेत. राज्यातील काही शाळांमधील शिक्षकांना ड्रेसकोड आहे. तर काही जिल्ह्यातील शाळांमध्ये गणवेश नाही, त्यामुळे सरकार सर्वच शाळांमधील शिक्षकांना गणवेश अनिवार्य करणार असल्याचं शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी म्हणाले. अजंगमधील शाळेत एका कार्यक्रमात बोलताना भुसे म्हणाले, राज्यातील शिक्षकांनाही गणवेशात यावे लागेल. त्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी अजंगच्या शाळेच्या व्यवस्थापनावर कौतुकाची थाप दिली आणि तेथील शिक्षकांचं कौतुक केलं. अजंगच्या शाळेतील शिक्षक हे गणवेशात आले होते, त्यामुळे दादाजी भुसे यांनी अजंगच्या शिक्षकांचं कौतुक केलं. राज्यातील सर्व शालेय शिक्षकांना ‘ ड्रेसकोड ‘ लागू करणार असून त्यासाठी खारीचा वाटा म्हणून शासन निधी देखील उपलब्ध करून देणार असल्याचे सुतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत ओएनजीसी व अवंत फाऊंडेशनच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ( CSR ) अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्कसह शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले यावेळी मंत्री भुसे बोलत होते. शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यास पुढील काळात विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही गणेवशात दिसणार आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार व आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शासन शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत उपस्थित राहून ज्ञानार्जन करावे, पालकांनी मुलांशी संवाद साधावा आणि शाळांनी सहलींसारखे उपक्रम राबवावेत, असेही मंत्री भुसे यांनी यावेळी आवाहन केले.

निष्ठावंत हटके भक्तांमुळे गीतरामायणाला महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले

0
Newsworldmarathi Pune : मराठी माणसाच्या काळजातील एक खास कप्पा ‘गीतरामायण’ने व्यापलेला आहे. वेगवेगळ्या व्यवसायांत कार्यरत असलेली अनेक मंडळी या हटके म्युझिकल ग्रुप द्वारे, आपापल्या मार्गाने या अजरामर काव्याचा प्रसार करण्यासाठी एकत्र येतात,हीएक विलक्षण बाब आहे. ‘गीत रामायण’चा आदरभाव पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी हटके म्युझिक या ग्रुप सातत्याने प्रयत्नशील आहेत. या काव्यरचनेला जे महाग्रंथासारखे पावित्र्य लाभले आहे,त्यामागचेखरे कारण म्हणजे अश्या प्रकारच्या निष्ठावंत हटके भक्तांचे अविरत कार्य आणिसमर्पणभाव, अशी भावना लेखक आनंद माडगूळकर यांनी व्यक्त केली. हटके म्युझिक ग्रुप यांची गीतरामायण सादरीकरणाच्या उल्लेखनीय कार्याबद्दल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये जागतिक विक्रमम्हणून नोंद झाली आहे. यानिमित्त हटके गीत रामायण विश्वविक्रम सोहळा कार्यक्रमाचेआयोजन टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश हॉलमध्ये करण्यात आले होते.यावेळी हटके म्युझिक ग्रुपचे संचालक शिरीष कुलकर्णी, जेष्ठ व्यावसायिक पुष्कराज ग्रुप चे सर्वेसर्वा शैलेन्द्र गोस्वामी, फ्लुइड कंट्रोल्स चे संचालक तानसेन चौधरी आणि श्रेष्ठ गायक आणि हार्मोनिअम वादक अनिल मोटे आदी उपस्थित होते. यावेळी गीतरामायणातील निवडक गीते सादर करण्यात आली. हटके म्युझिक ग्रुप या विश्वविक्रमाचे सर्व श्रेय – ज्यांनी गीत रामयणाचे लेखन केले ते आधुनिक वाल्मिकी गदिमा आणि ज्यांनी संगीत दिले ते सांगीतिक दिग्गज बाबुजी यांना दिले आणि ते वंशा प्रमाणे सर्व माडगूळकर आणि सर्व फडके कुटुंबीयांना धन्यवाद व्यक्त केले. हटके म्युझिक ग्रुपच्या संगीत सेवेचे उपक्रम अत्यंत मनोभावे आणि सातत्याने पार पाडले आहेत. दि. २० एप्रिल २०२४ रोजीगीतरामायणातील संपूर्ण ५६ गीतांचे सलग आठ तास सादरीकरण विनामूल्य आणि सेवाभावातून करण्यात आले. त्यानंतर गीतरामायण महायज्ञ ५६ या उपक्रमाअंतर्गत हेच गीतरामायण ५६ वेळा विविध ठिकाणी देवालये, सेवाभावी संस्था, वृद्धाश्रम,आणिसमाजासाठी कार्य करणा-या संस्थांमध्ये सादर करण्याचा संकल्प घेऊन एक वर्षात तोपूर्ण सुद्धा झाला. १० दिवस सलग देवालयात सकाळीनिवडक गीतरामायणातील गीतेसादर करण्याचा संगीत सेवेच्या उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. अनिल मोटे म्हणाले, गीत रामायण हे केवळ एक काव्यसंग्रहनाही, तर त्यातून अनेक गोष्टी शिकता येण्यासारख्या आहेत. गीतरामायण हे मराठी भाषेच्या, उच्चारशुद्धतेच्या, लय, ताल, रागआणि रसांच्या शिक्षणाचेही एक अद्वितीय माध्यम आहे. शिरीष कुलकर्णी म्हणाले, यापुढेही हटके म्युझिक ग्रुप या माध्यमातूननवनवीन कार्यक्रम देत, सांगीतिक विश्वात तेजी आणून, अविरत संगीत सेवा देण्याचा अविरत प्रयत्न करत राहील.

हवेली भूमी अभिलेख घोटाळा – उपअधीक्षक व मोजणी अधिकारीवर गुन्हा दाखल

0
Newsworldmarathi Pune :पुणे जिल्ह्यातील हवेली येथील भूमी अभिलेख विभागाच्या दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीन मोजणीच्या प्रकरणात ५० लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर ती दिली नाही म्हणून चुकीची ‘क’ प्रत तयार केल्याप्रकरणी हवेली येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील आणि मोजणी अधिकारी किरण येटाळे या दोघांवर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय प्रकरण… याबाबत माहिती अशी की, संबंधित तक्रारदाराने हडपसर येथील मिळकतीची शासकीय शुल्क भरून मोजणी करून घेतली होती. त्यानंतर या मिळकतीची हद्द निश्चित करण्यासाठी संबंधित तक्रारदार हे हवेली भूमी अभिलेख कार्यालयात पाठपुरावा करत होते. या दरम्यान, त्यांना भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह पाटील या अधिकाऱ्याने हद्द निश्चित करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. तर मोजणी अधिकारी किरण येटाळे याने २५ लाख रुपयात हे काम करून देतो असं सांगितलं. तसेच तुम्ही रक्कम दिली नाही तर अमरसिंह पाटील हा अधिकारी हेलिकॉप्टर शॉट लावेल अशी धमकी देत मालमत्तेचं नुकसान करण्याची भीती घातली. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने या अधिकाऱ्यांनी तक्रारदाराच्या मिळकतीलगतच्या जमिनींची चुकीची ‘क’ प्रत तयार केली. त्यामुळं तक्रारदाराला अक्षरश: मानसिक आणि आर्थिक सोसावा लागला. या तक्रारदाराने थेट महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीला सुरुवात झाली. या प्रकरणी पोलिसांनी आता भूमी अभिलेख उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि मोजणी अधिकारी किरण येटाळे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र खाडे हे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अमरसिंह पाटील या अधिकाऱ्याने यापूर्वी बारामतीतही काम केले आहे. हवेली येथे नियुक्ती झाल्यापासून हा अधिकारी चर्चेत होता

गौरव संविधानाचा’ कार्यक्रमातून उलगडला महामानवाचा संघर्षमय प्रवास

0
Newsworldmarathi Pune: भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) तर्फे जागर संविधानाचा या उपक्रमाअंतर्गत आज ‘गौरव संविधानाचा’ या सांगीतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवनप्रवास उलगडला, तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याला ‘गौरव संविधानाचा’ मधून उजाळा देण्यात आला.  विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणे  आणि रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश संघटक  सचिव परशुराम वाडेकर, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर  यांच्या पुढाकारातून  यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, प्रियदर्शी सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज  राजर्षी शाहू महाराज चौक बोपोडीमध्ये दिमाखदार सांगीतिक कार्यक्रम  पार पडला. या कार्यक्रमाला पुण्यातील आंबेडकर प्रेमी जनतेची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या एकाहून एक सुमधूर व दर्जेदार गीतांना उपस्थितांनी उत्स्फूर्त  दाद दिली. उदय साटम निर्मित – दिग्दर्शित ‘गौरव संविधानाचा’ या कार्यक्रमाची सुरुवात ‘नमस्कार घ्यावा अहो बुद्धदेवा’ या गीताने करण्यात आली, त्यांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकर यांच्यावरील  ‘दोनच राजे इथे ….’ , महात्मा फुले यांच्या वरील ‘धन्य धन्य ते महात्मा फूले’, ‘बुद्ध -कबीर – भीमराव – फुले’ यासह डॉ. आंबेडकर यांचा संघर्षमय जीवणप्रवास विविध गीते आणि संगीत नाटिका मधून उलगाडण्यात आला. या कार्यक्रमाचे लेखन आणि निवेदन प्रतिक जाधव यांनी केले होते तर गायक दर्शन साटम, गायिका   उमा गावड, स्वाती हरवंदे यांनी गाण्यांचे सादरीकरण केले तर संगीत संयोजन शरद वाणी, अभिजीत मोरे यांनी केले होते.  यावेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते शैलेन्द्र चव्हाण, सांसकर्तीक महोत्सव समितीचे सचिव दीपक म्हस्के यांच्यासह समितीचे पदाधिकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे शिवाजीनगर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

दुर्दैवी घटना…! नदीपात्रात पाय घसरुन पडलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू; परिसर हळहळला

Newsworldmarathi Rajapur: राजापूर तालुक्यातील रायपाटण येथे १७ एप्रिल रोजी सकाळी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा नदीच्या पात्रात पाय घसरून बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गंधार अमित पळसुलेदेसाई (१५ मु. रायपाटण, कदमवाडी) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो रायपाटण येथील जिजामाता विद्यामंदिरात इयत्ता नववीमध्ये शिकत होता. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गंधार गुरुवारी सकाळी परीक्षा देऊन घरी निघाला होता. वाटेतच असलेल्या अर्जुना नदीवर हातपाय धुण्यासाठी मित्रांसमवेत तो गेला असता, नदीच्या पात्रातील एका दगडावर त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गंधारला पाण्यातून बाहेर काढले आणि नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनानंतर गंधारचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. गुरुवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी रायपाटण येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात गंधार याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, मोठा भाऊ, काका, आजी-आजोबा आणि इतर कुटुंबीय आहेत. दुःखद घटनेमुळे रायपाटण परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्यातील काँग्रेसला मोठा धक्का; संग्राम थोपटे उद्या करणार ‘मन की बात’

0
Newsworldmarathi Pune : Sangram Thopate राज्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा दिला आहे. शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे. हा पक्ष प्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या (20 एप्रिल ) काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून ते आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची ही चर्चा आहे. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते. तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते. त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. मागील काही दिवसांपासून: थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेली भेट आणि त्यांच्या हालचालींनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग दिला होता. पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण थोपटे घराणं या मतदारसंघात अनेक वर्षांपासून प्रभावी राहिलं आहे. भाजपच्या गोटात स्वागताची तयारी सुरू: भाजपकडून त्यांच्या प्रवेशासाठी जोरदार तयारी सुरू आहे आणि थोपटे यांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. कारखाना अडचणीत असल्याने भाजप प्रवेश? संग्राम थोपटे अध्यक्ष असलेला राजगड सहकारी साखर कारखाना हा अडचणीत असल्याची माहिती आहे. या कारखान्याला राज्य सरकारने 80 कोटींचे मार्जिन लोन मंजूर केलं होतं. पण लोकसभेत संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. त्यानंतर अजित पवारांच्या विरोधाने त्यांच्या कारखान्याला जाहीर करण्यात आलेली मदत मागे घेण्यात आली होती.