Newsworldmarathi Pune : सचोटी इमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत जीवन आहे असे सांगत स्नेह जिव्हाळा जिवंत राहू द्या आभासी दुनियेतून बाहेर पडून एकमेकांना भेटा चर्चा करा निसर्गावर प्रेम करा अशा अनेक मुद्द्यांना हात घालत. नातेसंबंध, मैत्री व व्यवसाय यांची सांगड कशी घालावी व जीवनाचा आनंद कसा घ्यावा याबाबत लेखक गणेश शिंदे यांनी अनेक उदाहरणाचे दाखले देत रियल इस्टेट च्या सभासदांना संबोधित केले.
असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंट या संस्थेच्या सभासदांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. गेली पंधरा वर्षे सातत्याने असोसिएशनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
असोसिएशन च्या उपक्रमाची माहिती देताना अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले की व्यवसायाबरोबर सामाजिक क्षेत्रात असोसिएशन अग्रेसर असून गेली तीन वर्ष मुद्रांक शुल्क वाढ न करणे साठी वेळोवेळी मुख्यमंत्री, महसूलमंत्री,नोंदणी निरीक्षक यांच्याशी संपर्क करून परिस्थितीचे गांभीर्य मांडून असंघटित ग्राहकांन साठी लढा उभा केला आहे तसेच भाडेकराराचे पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन होण्या संदर्भात पुण्याचे पोलिस आयुक्तांशी संवाद साधून जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर प्रमाणित गुंठेवारी घरांच्या पुनर्विक्रीत सर्वसमण्याची होणारी मुस्कटदाबी त्वरित थाबण्या साठी पुणे मनपा आणि महसूल खात्याने इंटिग्रेट करून माहितीचे आदान-प्रदाना चे पाऊल उचलून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी भूमिका घेत सर्वसान्याचा आवाज सरकार दरबारी पोहोचवला आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी असोसिएशनने “आवाज जनतेचा” ह्या पुरस्काराने पत्रकार दिगंबर दराडे आणि संजय कडू यांना सन्मानित करण्यात आले. तसेच समाजसेवेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर (ASP) संस्थेचे सचिव मंगेश पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष सचिन शिंगवी , उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, खजिनदार उमाशंकर यादव, सचिव राजेंद्र दोशी, अनिल पाटील ,गणेश शेलार, कैलास फोफालिया, गणेश घुमे, सचिन कात्रे, एस के शिंगवी, प्रशांत गांधी, शांतीलाल बोरा यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र चौकसे यांनी केले
Newsworldmarathi Pune त्वचेच्या स्वयंप्रतिकार आजारांवरील इलाजासाठी मदत करणाऱ्या ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग डिसीज फाऊंडेशनच्या (एआयबीडीएफ) वतीने थोर समाजसेवक डॉ. मंदाकिनी व डॉ. प्रकाश आमटे यांना गोंदण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच आमटे दाम्पत्याच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘एआयबीडीएफ’चे संस्थापक अशोककुमार सुरतवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. शरद मुतालिक, अनिरुद्ध बंबावाले, जयंत हेमाडे, विजय नांदगावकर आदी उपस्थित होते.
अशोककुमार सुरतवाला म्हणाले, “ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याला यंदाचा पहिलाच ‘गोंदण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. येत्या बुधवारी (ता. २ एप्रिल २०२५) सायंकाळी ६.३० वाजता डेक्कन क्लब हाऊस, डेक्कन जिमखाना, पुणे येथे हा पुरस्कार सोहळा होणार असून, पुरस्कार प्रदान केल्यानंतर प्रसिद्ध निवेदक प्रवीण जोशी आमटे दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेणार आहेत. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.”
डॉ. शरद मुतालिक म्हणाले, “त्वचेच्या आजारांकडे समाज आजही तुच्छतेने पाहतो. त्यामुळे अशा रुग्णांना आजारासोबत अन्य अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक व सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागते. अशावेळी त्वचेच्या आजारांबाबत जागृती करून ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांनी ग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी सुरु केलेला सामाजिक उपक्रम आहे.
अशोककुमार सुरतवाला यांच्या प्रेरणेने दिवंगत जयश्री सुरतवाला यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या फाउंडेशनमार्फत लोकांमध्ये ऑटो-इम्यून ब्लिस्टरिंग आजारांविषयी जागरूकता वाढवण्यासह लवकर निदान व योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन, गरजू रुग्णांना मदत देण्यात येते. तसेच या आजारांतून बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभव पीडितांपर्यंत पोहचवून त्यांना प्रगत उपचार घेण्यास प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. यासह आधुनिक औषधोपचार सर्वांसाठी सुलभ व परवडणारे करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.”
Newsworldmarathi Pune : औंधरोड, बोपोडी भागात वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे लोकांचा वेळ वाया जात आहे. याबाबत उपाय योजना करण्यासाठी आपण प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ता सुनील माने यांनी अतिरिक्त पोलिस आयुक्त तसेच वाहतूक शाखेचे प्रभारी मनोज पाटील यांच्याकडे केली.
याबाबतचे पत्र त्यांनी आज मनोज पाटील यांना प्रत्यक्ष भेटून दिले. लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन या भागातील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी या भेटीत दिले.
सुनील माने यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, औंध रोड आंबेडकर चौक येथे नेहमी वाहतुकीची वर्दळ असते.
त्यातच या भागात सांगवी, स्पायसर कॉलेज या भागातील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी म्हणून येथील मुळा नदीवर पूल बांधण्यात आला आहे. हा पूल औंधरोड येथील चंद्रमणी संघ येथून सुरु होतो. या पूलावरून प्रवास करणे गैरसोयीचे होत असल्याने पुलावर अत्यंत कमी वर्दळ आहे.
औंधरोड कडून सांगवीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना या पुलावरून जाण्यासाठी डिव्हायडर नसल्याने पुणे विद्यापीठाकडून वळसा घालून यावे लागते. हा त्रास वाचवण्यासाठी लोक विरुद्ध दिशेने पुलावरून प्रवासासाठी जातात. यामुळे या रस्त्यावर गर्दी होते.
त्याचप्रमाणे सांगवी कडून येणारी वाहने औंधरोड येथे चंद्रमणी संघाजवळ येतात. पुणे विद्यापीठाकडून येणाऱ्या वाहनांची या रस्त्यावर अगोदरच गर्दी झालेली असते अशावेळी येथे बॉटल नेक तयार होऊन पुन्हा या रस्त्यावर गर्दी वाढते. जवळच येथे औंध रोडचा पीएमपीएमएलचा बस थांबा तसेच रिक्षा स्टँडही आहे. यामुळे आंबेडकर चौकातून रस्ता ओलांडून सांगवीकडे जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास होतो.
याप्रमाणेच बोपोडी कडून येणारी ब्रेमेन चौक व खडकी स्टेशन परिसराकडे जाणारी वाहने औंधरोड आंबेडकर चौकात येतात यामुळे येथे वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याप्रमाणेच खडकी स्टेशन पासून रेंजहिल्सकडे वळताना तसेच खडकी पोलिस स्टेशन जवळील बोगद्याजवळ नेहमी गर्दी होऊन वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. दररोज होणाऱ्या या त्रासाला वाहनधारक वैतागले आहेत. वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत.
यापुढेही एखाद्या गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरी कृपया आपण पाहणी दौरा आयोजित करून औंधरोड, बोपोडी, खडकी येथील वाहतूक समस्येचा आढावा घ्यावा व येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी अशी विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
Newsworldmarathi Pune : अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरलेली पिककर्ज माफी आणि इतर शेतकरीधार्जिण्या योजनांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.”लाडकी बहीण” योजनेमुळे इतर योजनांवर आर्थिक ताण पडल्याचे स्पष्ट दिसत असून, त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे.”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीही राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत परखड भूमिका मांडली होती. आता त्यांनी पिककर्ज माफीबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार की अजून प्रतीक्षा करावी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, त्यांनी अर्थसंकल्प वास्तववादी दृष्टिकोन ठेवून मांडला असून, राज्याच्या आर्थिक शिस्तीवर भर दिला आहे. त्यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना, “सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही” असे म्हणत, सरकारच्या आर्थिक मर्यादांची जाणीव करून दिली आहे.
यावरून राज्यातील खर्चाच्या प्राधान्यक्रमांवर मोठा प्रभाव पडत आहे, हे दिसून येते. लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी वाटप झाल्यामुळे इतर योजनांवर आर्थिक मर्यादा आल्या, असे संकेतही त्यांच्या या वक्तव्यातून मिळतात. त्यामुळेच पिककर्ज माफी किंवा इतर शेतकरी योजनांवर कोणता निर्णय घेतला जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, या वर्षी आणि पुढच्या वर्षी पिककर्ज माफी होणार नाही, कारण राज्याची आर्थिक परिस्थिती तशी नाही. त्यांनी हेही अधोरेखित केले की, “निवडणुकीपूर्वी काही जणांनी कर्जमाफीबाबत वक्तव्ये केली होती, पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही.”
त्यांचा हा निर्णय आर्थिक शिस्तीचा भाग असला तरी, यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होऊ शकते. विशेषतः, निवडणुकीपूर्वी कर्जमाफीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा धक्का बसू शकतो.
Newsworldmarathi Pune: पुणे आणि पिंपरी-चिंचवडसाठी मेट्रोचा विस्तार हे दोन्ही शहरांच्या वाहतूक व्यवस्थेसाठी मोठा निर्णय आहे. महामेट्रोने प्रस्तावित केलेला 42 किलोमीटर लांबीचा नवीन मेट्रो मार्ग पिंपरी-चिंचवडच्या दळणवळणासाठी मोठा बदल घडवू शकतो. सध्या डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार करण्याचे काम सुरू आहे, म्हणजेच लवकरच या प्रकल्पाला अधिकृत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
हा विस्तार झाल्यास शहरातील ट्रॅफिकचा ताण कमी होईल आणि प्रवाशांना पर्यायी, जलद आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होईल. विशेषतः वाढत्या शहरीकरणामुळे वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनली आहे, त्यामुळे मेट्रोच्या विस्तारामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
हा नवीन 42 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी मोठी गेमचेंजर ठरू शकतो. विशेषतः तो मुंबई-पुणे-बेंगळुरू महामार्गाशी जोडला जाणार असल्यामुळे या भागातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होईल.
सध्या सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) युद्धपातळीवर तयार केला जात आहे, याचा अर्थ लवकरच हा प्रकल्प पुढच्या टप्प्यात जाईल. एकदा डीपीआर मंजूर झाल्यानंतर निधी मंजुरी आणि प्रत्यक्ष काम सुरू होण्याची प्रक्रिया गतीने होईल.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील उपनगरांमधील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होईल. यामुळे केवळ प्रवाशांना फायदा होणार नाही, तर वाहतुकीवरील भारही कमी होईल आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी राज्य शासनाकडे पाठवला जाईल. या मार्गाची रचना पाहता, तो निगडी – मुकई चौक – वाकड – नाशिक फाटा – चाकण या प्रमुख भागांमधून जाणार आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग चाकणपर्यंत नेण्यात येत असल्याने औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. चाकण हे महाराष्ट्रातील एक मोठे औद्योगिक केंद्र आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणावर कामगार आणि व्यावसायिक प्रवास करतात.
तसेच, हा मेट्रो मार्ग मुंबई-पुणे-बेंगळुरू महामार्गाशी जोडला जाणार असल्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण कनेक्टिव्हिटी निर्माण होईल. परिणामी, महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होईल आणि सार्वजनिक वाहतूक प्रणाली अधिक कार्यक्षम बनेल.
Newsworldmarathi Pune महिला दिनानिमित्त राष्ट्र सेवा दल संचालित साने गुरुजी विद्यालय प्राथमिक शाळा पुणे व चक्रभेदी सोशल फौंडेशन देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने बॅ नाथ पै सभागृह पुणे येथे गुणवंत पालक, गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सोहळा संपन्न झाला.क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.महिला पालकांनी स्री भ्रुणहत्या व सावित्रीबाई च्या जीवनातील प्रसंगावर आधारित कार्यक्रम सादर केला त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी समतेच्या वाटेनं खणकावित पैंजण यावं हे समुहगीत सादर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व चक्रभेदी संस्थेच्या वैदेही सावंत यांनी विधवा अनिष्ठ प्रथा म्हणजेच नवरा वारल्यांनतर तिचे बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे, जोडवी काढणे इ. समूळ नष्ट झाली पाहिजे. तसेच चक्रभेदी संस्था शिव्या मुक्त समाज अभियान राबवत आहे त्या अनुषंगाने नुकताच गुहागर पाचेरी आगर गावात ८मार्च दिनी महिला सभेत शिव्या मुक्त गावचा ठराव घेण्यात आला त्याच धर्तीवर उपस्थित सर्वांना उद्देशून यशदा ट्रेनर सावंत यांनी शिव्या मुक्त शाळा असा ठराव घेऊया का? असे विचारले सर्वांना मान्य असेल तर हात वर करा असे सुचवले असता सर्वांनी मान्य केले.
शाळेच्या आवारात कोणीही शिव्या द्यायच्या नाहीत असा एकमताने ठराव करण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील ही पहिली शाळा व्यवस्थापण कमिटी आहे जिने अशा प्रकारचा ठराव केला आहे. त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे सावंत यांनी नम्र आवाहन केले
यावेळी व्यासपीठावर संकल्प फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना बिडवे, लोकमतचे वरीष्ठ उपसंपादक दिपक होमकर, महाराष्ट्र लोकविकास मंचचे उपाध्यक्ष एस एन कोंढाळकर, प्रशासक मंडळाचे सदस्य प्रा भगवान कोकणे,साने गुरुजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना काटे, ज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे, व्यवस्थापन समिती सदस्य अविनाश खंडारे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रशासक मंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर यांनी भूषवले.
महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरु करताना संवाद क्षमता, मार्केटिंग स्कील असावे लागते ते सर्व संकल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून दिले जाईल असा विश्वास उपस्थित महिला पालकांना चेतना बिडवे यांनी दिला.
यावेळी शाळेचे पालक सुषमा शिंगाडे व पूनम कदम यांच्या पुढाकाराने सेवा ज्येष्ठ शिक्षक सोपान बंदावणे यांचा कृतज्ञता म्हणून आकर्षक फोटोफ्रेम देऊन सन्मान करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात शिवाजी खांडेकर यांनी शिव्या मुक्त शाळा हा ठराव पास करण्याविषयी समाधान व्यक्त केले .तसेच पालकांकडून स्वयं स्फुर्तीने एखाद्या शिक्षकाचा सन्मान होणे ही महाराष्ट्रातील एक अनमोल घटना असल्याचे सांगितले. शिक्षक सोपान बंदावणे यांचा पालकांकडून झालेला सत्कार हे शिक्षणक्षेत्रात वेगळे पाऊल असल्याचे विचार त्यांनी मांडले.
लोकमतचे वरीष्ठ उपसंपादक दिपक होमकर यांनी विविध उदाहरणांद्वारे महिलांचे कुटुंबातील स्थान कसे असावे याबाबत प्रभावी मांडणी केली. यावेळी वर्षभरात उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना स्व शिला खंडारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अविनाश खंडारे पुरस्कृत गुणवंत विद्यार्थी पुरस्कार देण्यात आला तर स्व वामनराव उबाळे यांच्या स्मरणार्थ मीना काटे पुरस्कृत गुणवंत पालक पुरस्कार देण्यात आला.
इनरव्हील क्लबच्या वतीने शाळेतील दहा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च संगिता गोवळकर यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता गोवळकर यांनी तर आभार शितल खेडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय ससे, विठ्ठल शेवते, तेजस्विनी फूलफगर , लक्ष्मी कांबळे तसेच सुषमा शिंगाडे, पूनम कदम, स्वाती चौरे, सारिका नांगरे, रेणुका गरड मनाली बेंद्रे इ पालकांनी परिश्रम घेतले.
Newsworldmarathi Pune: चैतन्य उत्पात,रा. पंढरपूर अवघ्या देशभरात सुप्रसिद्ध असलेले पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आणि वारीची, संत परंपरेची गाथा आता जगभरात पोहोचणार असून काही वर्षात यु के म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहे.
यानिमित्ताने पुढील महिन्यात (एप्रिल २०२५ ते जून २०२५) पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघणार आहे. यासाठी लंडन येथील श्री विट्ठल रुक्मिणी मंदिर टीम प्रयन्तशील आहेत.
याबाबत माहिती देताना अनिल खेडकर म्हणाले, मी गेल्या ७ वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर पायी अशी वारी करत आहे. अमेरिका, यूरोप, लंडन येथे अनेक भारतीय मंदिरे आहेत. इस्कॉन, अक्षरधाम तसेच राजस्थान येथील देवतांची मंदिरे परदेशात आहेत पण एवढी जुनी संत साहित्य परंपरा असलेले पंढरपूर येथील मंदिर नाही, यासाठी वारी साता समुद्रापार नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
वारीतील प्रेम, जिव्हाळा, सलोखा मी अनुभवला आहे. याचा लाभ जगभरात व्हावा ही प्रामाणिक ईच्छा आहे असे ते म्हणाले. परदेशात मॉरिशस, जर्मनी, न्यू जर्सी येथे भारतीय मंदिरे आहेत, पण वारीची परंपरा, विश्वमालक पांडुरंग यांचे मंदिर नाही, ही मराठी माणसाची खंत होती.
खरेतर दिंडीतील पादुका विमानातून लंडन येथे जाऊ शकतात, पण समर्पण म्हणून सुखी संसाराची वाट सोडून लाखो भाविक पायी वारी करतात, यासाठी सुमारे २२ देशातून १८००० किलोमीटर चा प्रवास करत ही दिंडी निघणार असून भक्तीची परंपरा भारता बाहेर पोहोचणार आहे. दिनांक, १५ एप्रिल ला पंढरपूर येथूनपासूनमार्गस्थ होणार आहे. दि १८ एप्रिल रोजी भारत सोडून नेपाळ, चीन, रशिया, अशा २२ देशातून ७० दिवसात १८ हजार किमी एवढा प्रवास करत कारने या पादुका घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बावीस देशातून वारीचा सुगंध जगभरात दरवळणार आहे. यासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पुर्ण सहकार्य केले असून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी उत्तम नियोजन केले आहे.
या उपक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार उदयनराजे भोसले, एम आय टी चे विश्वनाथ कराड व वारकरी संप्रदयाच्या व्यक्तिनी शुभेच्छा देऊन सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले आहे. यूके मधील ४८+ मराठी मंडळ, आखात, जर्मनी, आयर्लंड, अमेरिका येथील मराठी मंडळ संलग्न होत असून लवकरच भव्य मंदिर उभे करण्यात येणार आहे. तमिळ, कानडी, गुजराथी, तेलगू भाविकही या निमित्ताने जोडले जात आहेत. या लोकांना मराठी भाषा येत नाही पण अभंग म्हणता येतात.
महाराष्ट राज्यातील सातशे वर्षांची जुनी परंपरा, राज्याचे आराध्य दैवत श्री विठ्ठल जगभरात पोहोचणार आहे!
Newsworldmarathi Pune : भोसरी येथे राहणारी दोन दाम्पत्य पुण्याहून नुकतीच फुकेत येथे सहलीसाठी गेले. चौघेही फुकेतमधील कलीम बीचवरील अमरीतसर रेस्टॉरंटमध्ये राहत होते. मात्र सहलीच्या दुसऱ्याच दिवशी एका दाम्पत्याचा झोका खेळताना अपघात झाला आणि दोघेही गंभीररित्या जखमी झाले होते. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना समजताच त्यांनी या दाम्पत्याच्या पुढील उपचारांसाठी भारतात आणण्याची सोय केली. मोहोळ यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे या दाम्पत्यावर पुण्यात यशस्वीपणे उपचार सुरू झाले आहेत.
घडलेल्या प्रकाराबाबत माहिती अशी की, फुकेत सहलीत संध्याकाळी दोनपैकी एक दांपत्य शुभम फुगे (वय २७ वर्षे) आणि त्यांची पत्नी सिद्धी (वय २१ वर्षे) हे दोघेही एकत्र झोका खेळत होते. खेळता खेळता झोका इतका उंच गेला, की त्या झोक्यावरुन ते दोघे सटकले आणि जवळजवळ १० फूट उंचीवरुन जोरात खाली आदळले. या अपघातानंतर त्यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यांना ताबडतोब ‘पटाँग हॉस्पिटल’मध्ये दाखल केले गेले. शुभम यांचे मांडीचे हाड आणि सिद्धी यांचे मणक्याचे हाड मोडले. तेथे त्यांना फक्त पेन किलर गोळ्यांवर ठेवण्यात आले. ऑपरेशनसाठी त्यांना तत्काल भारतात आणणे गरजेचे होते.
या संदर्भात केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, घडलेल्या प्रकाराची माहिती मला माझ्या एका कार्यकर्त्याकडून मिळाली आणि प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आमची सर्व यंत्रणा कामाला लावली. विमानाच्या खुर्चीत बसून येणे दोघांनाही अशक्यप्राय होते, त्यामुळे दोन्ही जखमींना विमानात स्ट्रेचर अरेंजमेंटची गरज होती आणि त्यासाठी डॉक्टर्सपासून तर हवाई वाहतूक कंपन्यांपर्यंत खूपसाऱ्या परवानग्या लागत होत्या. या सगळ्या परवानग्या आणि विमानातल्या जागेची उपलब्धता यावर युद्धपातळीवर काम सुरू होते. कारण स्ट्रेचर ठेवण्यासाठी काही खुर्च्या काढाव्या लागणार होत्या, त्याचीही पूर्तता या सगळ्या करावी लागली’
ते पुढे म्हणाले, ‘परराष्ट्र व्यवहार मंत्रालयासह माझ्या कार्यालयातील यंत्रणाही दाम्पत्याला परत आणण्यासाठी कार्यरत होती. शुभम आणि सिद्धी यांच्यासोबत असलेले दुसरे जोडपे अभिजीत पठारे आणि काजल मोरे यांनाही सोबतच लवकरात लवकर भारतात आणायचे होते. अखेर सर्व प्रयत्नांना यश येत त्यांना इंडिगो एयरलाइनच्या दोन वेगळ्या विमानाने त्यांना आणले. पुण्यात पोहोचल्यावर त्यांच्यावर पुण्यात संचेती रुग्णालयात त्यांना शस्त्रक्रियेसाठी दाखल केले.
गरजूंना मदतीचा हात देणे माझे कर्तव्यच : मोहोळ
परदेशात गेल्यावर अनेकांना विविध अडचणी येतात. असे प्रकार माझ्याकडे आल्यावर त्यावर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असते. म्हणूनच गरजूंना मदतीचा हात देणे, हे मी माझे कर्तव्य समजून सर्व यंत्रणा कामाला लावत असतो. अशा प्रकारांमध्ये आमच्या सरकारचे सर्व विभाग संवेदनशीलपणातून मदत करत असतात. त्याचा फायदा निश्चितच गरजूंना होत असतो.
Newsworldmarathi Pune : आमदार अण्णा बनसोडे (Mla Anna Bansode) यांची संघर्षमय वाटचाल खरोखरच प्रेरणादायी आहे. पानटपरीवर काम करणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्यापासून ते थेट महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा मेहनत, जिद्द आणि राजकीय धैर्याचा उत्तम नमुना आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने ते आता या महत्त्वाच्या पदाची धुरा सांभाळणार आहेत. त्यांची निवड एकमताने झाल्याने हे पद कोणत्याही राजकीय संघर्षाशिवाय त्यांना मिळाले आहे. (Maharashtr politics)
या पदासाठी सुरुवातीला राजकुमार बडोले, संजय बनसोडे आणि अण्णा बनसोडे यांची नावे चर्चेत होती. मात्र अखेर एकमेव अर्ज अण्णा बनसोडे यांचा आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकृत घोषणा केली.
पिंपरी-चिंचवडचे आमदार असलेले अण्णा बनसोडे यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. एका सामान्य कुटुंबातून येत त्यांनी पानटपरीवर काम करत संघर्ष केला आणि राजकारणात उंच झेप घेतली. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) पिंपरी मतदारसंघातून विजय मिळवला. पक्षात गटबाजीच्या पार्श्वभूमीवरही त्यांची निवड झाली, हे विशेष उल्लेखनीय आहे.
विधानसभा उपाध्यक्षपद हे खूप महत्त्वाचे पद असून सभागृहाच्या कामकाजात ते मध्यस्थाची भूमिका बजावणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे-गट यांच्यात तणावाची परिस्थिती असताना त्यांना संतुलन राखण्याचे मोठे आव्हान असेल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभागृहात अनेक वादग्रस्त चर्चा होण्याची शक्यता आहे, त्यावेळी त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल.
अजित पवार गटासाठी ही निवड मोठा दिलासा मानली जात आहे, कारण त्यांच्या गटातील आमदाराला हे पद मिळाले आहे. शरद पवार गट आणि विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडेही लक्ष असेल.
अण्णा बनसोडे यांचा राजकीय प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या बनसोडे यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर स्थानिक पातळीवर मजबूत पकड मिळवली आणि आता ते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष झाले आहेत.
Oplus_131072
राजकारणात येण्यापूर्वी पानटपरी व्यवसाय करत होते. याच काळात सामाजिक आणि राजकीय कार्यात रुची घेतली. पहिल्यांदा 1997 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक लढवली आणि नगरसेवक बनले. त्यानंतर सलग तीन टर्म नगरसेवक राहिले, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची लोकप्रियता वाढली.
महापालिकेतील सर्वात शक्तिशाली पदांपैकी एक असलेल्या स्थायी समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. या काळात महापालिकेतील विविध विकासकामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पहिली निवडणूक 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2014 मध्ये भाजपच्या लाटेत पराभव पत्करावा लागला. 2019 मध्ये त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर त्यांनी 2024 मध्ये अजित पवार गटाची साथ देत तिसऱ्यांदा विधानसभा गाठली.
2024 मध्ये महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर ते मंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना संधी न मिळाल्याने ते काहीसे नाराज होते. नंतर, विधानसभा उपाध्यक्षपद ही संधी त्यांना मिळाली, त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे.
Oplus_131072
2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) पिंपरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. विधानसभा सदस्य म्हणून त्यांनी विविध विकासकामे हाती घेतली आणि स्थानिक जनतेत चांगली प्रतिमा तयार केली. विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आल्यानंतर त्यांची बिनविरोध निवड झाली. आता ते महाराष्ट्राच्या राजकारणात अधिक महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
विधानसभा उपाध्यक्षपद सांभाळताना सर्व पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभागृहात तणावपूर्ण वातावरण राहणार, अशावेळी त्यांनी दिलेल्या निर्णयांकडे लक्ष राहील. अजित पवार गटातील नेते म्हणून त्यांना पक्षसंघटना मजबूत करण्याची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे.
अण्णा बनसोडे यांनी स्थानीय स्तरावरून संघर्ष करत मोठ्या राजकारणात स्थान मिळवले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने सुरुवातीला नाराजी असली तरी विधानसभा उपाध्यक्षपदामुळे त्यांना नवा राजकीय वाव मिळाला आहे. अण्णा बनसोडे यांचा प्रवास सामान्य कार्यकर्त्यापासून एका जबाबदार नेत्यापर्यंतचा आहे. पानटपरीवर काम करणाऱ्या व्यक्तीने नगरसेवक, आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्ष होणे हे मेहनत, संघर्ष आणि राजकीय दूरदृष्टीचा उत्तम आदर्श आहे.
Newsworldmarathi Pimpri: देशभरातील लाखो ऑटो, टॅक्सी, बस ट्रक चालकांच्या मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी अनेक वर्ष लढा दिला जात आहे. राष्ट्रीय चालक आयोग निर्माण झाले पाहिजे.
देशभरातील चालकांसाठी कल्याणकारी बोर्ड निर्माण करून त्या माध्यमातून त्यांना सामाजिक सुरक्षा म्हातारपणी पेन्शन व इतर योजनांचा लाभ मिळाला पाहिजे, ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांवरती बंदी आणली पाहिजे टू व्हीलर टॅक्सीला देशभरामध्ये बंद केली पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचे धोरण ठरवताना पूर्वीचे वाहन वरती कोणतीही बाधा येणार नाही यासाठी सर्व संघटनांना विश्वासात घेण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी नुकतेच दिल्ली येथील जंतर मंतर वरती देशपापी आंदोलन करण्यात आले या आंदोलनातील मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी व्यक्त केला.
दिल्ली जंतर मंतर येथे देश वापी आंदोलन आयोजित करण्यात आले या वेळी मार्गदर्शन करताना बाबा कांबळे बोलत होते.
कष्टकरी, श्रमिक नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली 21 मार्च 2025 रोजी जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात आले,23 तारखेला राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते यासाठी देशभरातील सर्व 28 राज्यातून प्रतिनिधी उपस्थित होते.
यात मिर मोहम्मद शफी,(कश्मीर) अज्जू प्रसाद मंडोली (ओडिसा) सुरेंद्र प्रसाद (पंजाब) मनोज कुमार साहू , वासू एलडी(आंध्र प्रदेश) के.डी.गिल (राजस्थान) रवी रेड्डी (कर्नाटका) आनंद तांबे, राकेश शिंदे (महाराष्ट्र) शिन्तल कुमार (तामिळनाडू) प्रीतम सिंग (छत्तीसगड) गुलजार सिंग (उत्तराखंड) नरेंद्र ठाकूर (हिमाचल प्रदेश ) निजामुद्दीन भाई, विनोद तिवारी (आसाम) भूपेंद्र यादव (बिहार) धर्मेंद्र यादव (दिल्ली एनसीआर) डॉ राजीव मिश्रा (उत्तर प्रदेश) सहभागी झाले होते.
बाबा कांबळे म्हणाले केंद्र सरकार देशभरातील 25 करोड चालकांकडे सहानुभूतीने बघत नाही. त्यामुळे वारंवार निवेदने, आंदोलन करूनही मागण्या सोडविण्याबाबत सरकार उदासीन आहे. देशातील 25 कोटी चालकांसाठी राष्ट्रीय चालक आयोग निर्माण झाले पाहिजे. तसेच चालकांसाठी कल्याणकारी योजना स्थापन झाले पाहिजे. त्यामधून चालकांचे कल्याण होणार आहे. म्हातारपणी पेन्शन मिळाल्यास त्यांना आधार होणार आहे. यासह सामाजिक सुरक्षा योजना मिळावे, यासाठी वेलफेअर बोर्ड म्हणजे कल्याणकारी मंडळ स्थापन झाले पाहिजे. केंद्रीय पातळीवर हे कल्याणकारी महामंडळ स्थापन व्हावा. अन्यथा न थकता आंदोलन सुरूच राहील, असे बाबा कांबळे म्हणाले.