Devendr fadanvis: शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं वर्णन कसे कराल? जयंत पाटील यांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले.. “भरवसा नाही”..

0
Newsworldmarathi Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्याचं राजकारण वेगवेगळ्या विषयांवरून चांगलंच ढवळून निघालं आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यातच नागपूरमध्ये दंगलीची घटना घडली. यावरून उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला भाजपाकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील विविध विषयांच्या संदर्भात प्रश्न विचारले. या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरे दिली. लोकमत वृत्तसंस्थेच्या एका पुरस्कार सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत दिली. यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत एक प्रश्न विचारला. या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी देखील एका वाक्यात उत्तर दिलं. जयंत पाटलांनी काय प्रश्न विचारला? शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचं दोन-दोन वाक्यात तुम्ही कसं वर्णन कराल? असा प्रश्न जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी दोन वाक्याऐवजी एका वाक्यात उत्तर दिलं. फडणवीसांनी म्हटलं की, “एका वाक्यात उत्तर देतो. वाईट वाटून घेऊ नका. काही भरवसा नाही. या वाक्यात दोघांची देखील वागण्याची पद्धत आली. काही भरवसा नाही”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मंत्र्यांच्या बेजबाबदार विधानांबाबत फडणवीस काय म्हणाले? नागपूरमध्ये दंगल उसळल्यानंतर सरकारमधील काही मंत्री चिथावणीखोर विधाने करत असल्याबाबतचा आरोप विरोधकांनी केला. मंत्र्यांच्या या विधानांवर मुख्यमंत्र्यांनी अंकुश लावावा, अशी मागणी होत आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे. संविधानाने आपल्याला कुणाहीबरोबर अन्याय न करता वागण्याची जबाबदारी टाकली आहे. मंत्र्यांनी बोलत असताना संयम बाळगला पाहिजे. आपल्या बोलण्याने कुठेही तेढ निर्माण होणार नाही, हा प्रयत्न केला पाहिजे. कधी कधी तरूण मंत्री बोलून जातात. अशावेळी मी त्यांच्याशी संवाद साधतो त्यांना समजावून सांगतो. मंत्री असल्यामुळे संयम बाळगूनच बोलले पाहिजे”,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

पुणे जिल्हा परिषदेचा २९२ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर

0
पुणे जिल्हा परिषदेने २०२५-२६ या वर्षाचा २९२ कोटी ७५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी मांडला. मुद्रांक शुल्क, तसेच जलसंपदा विभागाकडे थकीत पाणीपट्टीपोटी मिळणाºया रकमेमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात ५८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. शाळा सुधारणा, प्राथमिक आरोग्य केंद्राचे सक्षमीकरण, अंगणवाड्यांसाठी सोलर पॅनेल, लघू पाटबंधारे,फेलोशिप योजना आदींचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेने मुख्य वित्त लेखा अधिकारी विशाल पवार यांनी २०२५- २६ या वर्षाचा अर्थसंकल्प हा मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रशासक गजानन पाटील यांच्याकडे सादर केला. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सल्लागार समितीकडे प्रशासक पाटील यांनी हा अर्थसंकल्प समितीपुढे मांडला आणि त्याला मंजुरी देण्यात आली.या वेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, वित्त लेखा अधिकारी विशाल पवार, उपमुख्य वित्त लेखा अधिकारी अभिजित पाटील, सहायक लेखाअधिकारी जितेंद्र चासकर, याशिवाय विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक समाज मंदिरे ओस पडली आहेत. त्याठिकाणी चुकीचे कृत्य सुरू असतात. त्यामुळे त्या ठिकाणी आता ग्रंथालये करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी २२३ समाजमंदिरांचे ज्ञानमंदिरात अर्थात ग्रंथालयात रूपांतर झाले. आता पुन्हा ४५० समाजमंदिरांचे ज्ञानमंदिरात रूपांतर करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील ३०३ शाळांचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील १०८ प्राथमिक आरोग्य केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. खासगी आरोग्य सेवेच्या धर्तीवर आरोग्य केंद्रावर रुग्णसेवा देण्यावर भर देण्यात येणार आहे.अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार, सुमारे ४५ हजार लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ योजनेच्या (डीबीटी) माध्यमातून लाभ मिळणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा तसेच अंगणवाड्यांसाठी आवश्यक वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी सोलर योजना राबविली जाणार आहे. जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश भाषांचे ज्ञान असलेल्या शिक्षकांमार्फत सध्या धडे दिले जात आहेत. त्यामुळे आता जास्त विद्यार्थी पटसंख्या असणाºया शाळांमध्ये या भाषेच्या खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून जिल्हा परिषद फेलोशिप योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यांना दरमहा २५ हजार रुपयांचे मानधन दिले जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामाचा अनुभव घेता येणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितता आणि शिस्तीसाठी सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. शाळेच्या सक्षमीकरणांतर्गत शिक्षकांसाठी बायोमेट्रिक फिंगरप्रिंट किंवा फेसरीडिंग हजेरी प्रणाली सुरू करण्याचा मानस आहे.

Shivjayanti: सम्राट ग्रुपतर्फे आयोजित शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

0
Newsworldmarathi Pune : पारंपरिक वेशभूषेत नटलेले आबालवृद्ध… ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष… अग्रभागी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा… अशा स्फूर्तिदायी अन् ‘शिवमय’ वातावरणात शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. निमित्त होते विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुप आयोजित शिवाजयंती सोहळ्याचे.. सोमवार पेठेत सम्राट ग्रुपच्या वतीने भव्यदिव्य अशा शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच केंद्रीय राज्यमंत्री सहकार आणि नागरी विमान वाहतूक खासदार मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य सांगली पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैहाकीय शिक्षण, अल्पसंख्यांक विकास माधुरी मिसळ, आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने, तसेच भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राजमुद्रा ग्रुप आणि पुणे स्पोर्ट्स अकॅडमी च्या वतीने मर्दानी खेळ सादर करण्यात आले. यावेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपली सर्वोत्कृष्ठ कामगिरी करण्याचे ध्येय बाळगावे असे आवाहन केले. आमच्या पुढच्या पिढीला शिवाजी महाराजांचे विचार पोहचविण्यासाठी गेली अनेक वर्ष पूर्व भगत शिवजयंती आम्ही साजरा करतो.या शिवजयंती मुळे आम्हा सर्वांना समाजासाठी काम करण्याची एक प्रेरणा मिळते. या शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम रबविले जातात असे, आयोजक माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक पिढीला प्रेरणा आणि संदेश देण्याचे काम केले आहे. त्यामुळे मी आणि आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेल्या मार्गावर काम करित राहिले पाहिजे.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संकल्पनेतील जो महाराष्ट्र होता.जे स्वराज्य होत,ते सर्वांनी मिळून आणण्याचा प्रयत्न करावा,तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सरकारच्या माध्यमातून तो प्रयत्न करीत असून या कामासाठी चळवळ उभारली गेली पाहिजे”,असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. या शिवजयंती उत्सव उत्साहात पार पाडण्यासाठी आयोजक गणेश बिडकर, अध्यक्ष शुभम पवार, मार्गदर्शन विशाल दरेकर, तसेच विजय मित्र मंडळ ट्रस्ट आणि सम्राट ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.

नव्याने समाविष्ठ बत्तीस गावांसाठी महापालिकेने दिले काय? : आमदार भीमराव तापकीर यांचा सवाल

0
Newsworldmarathi Pune: पुण्यामध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या ३२ गावांनी पुणे महापालिकेला किती मिळकत कर दिला? आणि महापालिकेने काय सोयी सुविधा उपलब्ध करून दिला? पुणे महापालिका आयुक्तांनी या गावांबाबत कोणताच निर्णय घेतला नाही त्यांच्याकडे ती क्षमताच नाही अशी खरमरीत टीका खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसेभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. पुणे शहराच्या चोहू बाजूने असलेल्या ३२ ग्रामंपंचायती पुणे महापालिकेत विसर्जित करून पुणे शहाराचा विस्तार करण्यात आला. त्यामुळे या गावांचा महसुली कर ग्रामपंचायत ऐवजी महापिलेकत जमा होत आहे. ३२ गावांतून कोट्यवधी रुपयांचा कर महापालिकेला मिळत आहे मात्र त्या तुलनेत या गावांमध्ये ना रस्ते, ना ड्रेनेज, ना शुध्द पाणीपुरवठा महापालिकेत पुरवते आहे, त्यामुळे या गावांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन करून अनेकवेळा आंदोलन केले आयुक्तांना निवेदने दिली आहेत. मात्र आयुक्तांनी त्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे आमदार भीमराव तापकीर यांनी ३२ गावांचा प्रश्न विधानसभेत विचारला. आमदार तापकीर म्हणाले की, ३२ गावांनी मिळून महापालिकेला आत्तापर्यंत किती टॅक्स दिला आहे. तो आकडा मंत्रीमहोदयांनी द्यावा तो आता उपलब्ध नसेल तर तातडीने या गावांच्या समस्या सोडविण्यासाठी एक बैठक घ्यावी आणि त्यावेळी या गावातून मिळालेले महसूली उत्पन्न सांगावे. गावनिहाय कराची रक्कम सांगावे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी याबाबत तातडीने बैठक घेण्याची सुचना मंत्री उदय सामंत यांना दिली. कौशल्य विकास केंद्र लवकरच तब्बल १९० कोटी रुपयांचे देशातील सर्वात मोठे कौशल्य विकास केंद्र पुण्यामध्ये लवकरच होणार आहे. उद्योजक रतन टाटा हयात असताना याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी १६० कोटी रुपये टाटा ग्रूपकडून सीएसआर व्दारे मिळणार आहे तर उर्वरित रक्कम पुणे महापालिका देणार आहे. याची बैठक लवकरच होणार असून त्या बैठकीला सर्वांना बोलाविण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Pune University: पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वासतिगृहात दारूच्या बाटल्या अन सिगारेटची पाकीट…

0
Newsworldmarathi Pune : पुणे हे विद्येचं माहेर घर असून येथे देशासह जगभरातील विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. राज्यातील विविध ठिकाणांहून लाखो तरूण येथे चांगेल शिक्षण मिळते म्हणून पुण्याची वाट धरतात. तर पुणे विद्यापीठात प्रवेश मिळावा म्हणून कसूनन तयारी करतात. मात्र आता याच सावित्रीबाई फुले विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून मुलींच्या वसतीगृहात दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेटची पाकिटं सापडली आहेत. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठमधील मुलींच्या वस्तीगृहात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात दारू आणि धूम्रपान केलं जात असल्याचं उघड झाले आहे. हा प्रकार वसतीगृहातील मुलींकडूनच सुरू असल्याचा आरोप एका विद्यार्थीनी केल्याने समोर आला आहे. विद्यापीठातील मुलींच्या वस्तीगृहात मुलींकडूनच मद्यप्राशन आणि धूम्रपान सुरू होता. याबाबत वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीने वसतिगृह महिला अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. एनेकदा तक्रार करूनही यावर कोणताच तोडगा निघत नव्हता. यामुळे संबंधित विद्यार्थिनीने प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू यांना पत्रातून सर्व घटनाक्रम सांगितला. मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप त्या मुलीने केला आहे. दरम्यान आता विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहामध्ये मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटं आढळून आलेली आहेत. मुलींच्या रुममधील काही फोटो आता समोर आली आहेत. यामुळे विद्यापीठात नेमकं काय सुरूय असा सवाल उपस्थित होत आहे. तर संबंधित मुलीने जुलै महिन्यापासून तिच्या रुममेट्सने तिला अंमली पदार्थांचे सेवन करुन त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तसेच या मुलींच्या दारु, सिगारेटमुळे मायग्रेनचा त्रास झाला असून मानसिक आणि शारिरीक छळ केला जातोय असाही दावा तीने केला आहे. याच या त्रासाला कंटाळून तिने वारंवार तक्रार केली होती. मात्र या तक्रारीवर कोणतीच कारवाई झाली नाही.

Pune Accident: पुण्यात भीषण दुर्घटना ! ट्रॅव्हलरला आग लागून चार जणांचा होरपळून मृत्यू

Newsworldmarathi Pune : हिंजवडी फेज 1 मध्ये आज (दि. 19 मार्च) सकाळी भीषण अपघात घडला. व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या 12 कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलर टेम्पोला अचानक आग लागली. या दुर्घटनेत चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी सुमारे ८ वाजता टेम्पो हिंजवडी फेज वनमध्ये जात असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच चालक आणि समोरील कर्मचारी गाडीतून तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता आला नाही, त्यामुळे मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेत इतर काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक अंदाजानुसार, टेम्पोच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आग लागली असावी. तसेच, गाडीच्या मागील दरवाज्याच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे.

सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप पोहचल्या त्या क्षणाची छायाचित्रे…

सुनीता विल्यम्सची परती सुनीता विल्यम्स तब्बल 9 महिने अंतराळ स्थानकात राहून पृथ्वीवर परतल्या आहेत.
Oplus_131072
पहाटे लँड 19 मार्चला पहाटे त्यांचे यान पॅरॅशूटने पृथ्वीवर लँड झाले.
Oplus_131072
फ्लोरिडा समुद्र स्पेसएक्सचे ड्रगन यान फ्लोरिडा समुद्रावर पॅरॅशूटने लँड झाले.
Oplus_131072
मोठा पॅरॅशूट या फोटोमध्ये तुम्ही हा भला मोठा पॅरॅशूट पाहू शकता जो ड्रॅगनला कॅरी करताना दिसतोय.
Oplus_131072
डॉल्फिनने केले स्वागत या ऐतिहासिक क्षणात चक्क डॉल्फिनने सुनीता विलियम्सचे स्वागत केले.
Oplus_131072
ड्रॅगन कॅप्सुल नंतर या ड्रॅगन कॅप्सुलमधून अंतराळवीरांना बाहेर काढण्यात आले.
Oplus_131072
जगभर आनंद सुनीता विलियम्सच्या पृथ्वीवर सुखरूप परतीने जगभर आनंद साजरा केला जात आहे.
Oplus_131072

Pune Jilha Parishad : उद्या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

0
Newsworldmarathi Pune: जिल्हा परिषदेचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प उद्या गुुरुवारी (दि़ १९ ) सादर केला जाणार आहे़. दरम्यान अर्थसंकल्पात यंदा कोणत्या नाविन्यपुर्ण योजना सादर केल्या जाणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वैयक्तिक योजनांना कात्री लावली होती़, मात्र यंदा वैयक्तिक योजनांचा समावेश केला आहे का, याबाबत उत्सुकता लागून राहीली आहे़. जिल्ह्यात भेडसावत असणाºया कचरा, सांडपाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात काही तरतुदी केल्या आहेत का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे़. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्यासाठी काय तरतूदी केल्या आहेत का हे देखील महत्वाचे ठरणार आहे़.

Nagpur Violence: कुऱ्हाडीने हल्ला झालेल्या पोलीस उपायुक्तांशी मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

0
नागपूरमध्ये सोमवारी रात्री मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या घटनेत तीन पोलीस उपायुक्तांसह ४० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले आहेत. यामध्ये जमावाने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीने वार केला. रक्तबंबाळ झालेल्या कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज 18 मार्च मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलद्वारे पोलीस उपायुक्त कदम यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंट पोलिस उपायुक्त कदम यांच्यासोबतचा व्हिडीओ कॉलचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच, फडणवीस यांनी लवकर बरे होण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास महाल परिसरात दोन गटांमध्ये औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून तणाव निर्माण झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि जमावाने दगडफेक सुरू केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवत जाळपोळ सुरू केली. यावेळी जमावाने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार केला. तर जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेत डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे. या तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Purandar Airport! अखेर पुरंदर विमानतळचा मार्ग मोकळा; खाजगीकरणातून होणार टेकऑफ

0
पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळासाठी ३३०० सर्व्हे क्रमांकातील सुमारे २ हजार ८३२ हेक्टर जमीन राखीव केली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिनियमानुसार हे क्षेत्र निश्चित केल्याने पुरंदर विमानतळ खासगीकरणातूनच करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुरंदर विमानतळासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केलेली नाही. मात्र, पुरंदर विमानतळाच्या संदर्भातील निर्णय प्रकिया शासनाकडून सुरू केली आहे. या ठिकाणी जाण्याकरिता पुणे महानगर प्राधिकरणाच्या वतीने रस्तेदेखील सोडले आहेत. याचबरोबर पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाणे, कुंभार वळण, इखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या गावांतील जमिनीचे सर्व्हे क्रमांक त्याच्या क्षेत्रफळासह औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. शासनाच्या वतीने निधीची तरतूद नसतानादेखील पुरंदर विमानतळाचा प्रकल्प आता सुरू केला आहे. पुरंदर विमानतळ खासगीकरणातूनच उभे करण्यासाठी यापूर्वी चाचपणी केली होती. विमानतळाशेजारी उद्योग व्यवसाय उभे करून यातूनच मोठ्या प्रमाणात खर्चाचे संकलन करण्याचे नियोजन सुरू केले आहे. विमानतळासाठी पूर्वी निश्चित केलेल्या गावांना आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा दिला असून, त्यामध्ये रस्ते, पाणंद, ओढा यासाठी काही जागा संपादित केली जाणार आहे. या सर्व सात गावांच्या चतुःसीमा निश्चित केल्या आहेत. त्या लाल रंगाच्या रेषेने दाखवण्यात आल्याचे अधिसूचनेमध्ये सांगण्यात आलेले आहे पुरंदर तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या विमानतळाला शासनाने हिरवा कंदील दिला आहे. याकरिता शासनाने शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे अपेक्षित आहे. केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यापेक्षा अधिक मोबदला आम्हाला मिळणे अपेक्षित आहे. आमची शेती आम्ही या विमानतळाकरिता देत आहोत, तर याकरिता शासनानेदेखील शेतकऱ्यांचा विचार करणे आवश्यक आहे. – के. डी. गिरमे, शेतकरी, पुरंदर