आध्यत्मिक गुरू सरश्री यांना प्रत्यक्ष पाहण्याची व ऐकण्याची सुवर्णसंधी
Newsworldmarathi Pune : तुमचा मूड वारंवार खराब होतो का? मूड गेल्याने तुम्हाला निरुत्साह किंवा चिडचिड जाणवते का? नवीन वर्षात तुम्हाला आपल्या मूडवर, भावनांवर ताबा मिळवून मूड मास्टर बनायचे असेल, जाणून बुजून मूड चांगला करायला शिकायचं असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
तेजज्ञान फाउंडेशनतर्फे 26 जानेवारी 2025 रोजी, दुपारी 1 ते 4 या वेळात मनन आश्रम, सिंहगड रोड, पुणे येथे तेजगुरू सरश्री यांचे ‘जानबूझकर मूड अच्छा कैसे करे?, Mood Mastery in 2025 हे मार्गदर्शक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम संपूर्णपणे निःशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे. याचे थेट प्रक्षेपण यू ट्यूब, फेसबुक आणि झूमच्या माध्यमातूनही केले जाणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घेऊन आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि कायमस्वरूपी बदल घडवावा असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
तेजज्ञान फाउंडेशनची वेबसाईटवर https://happythoughts.global/26jan_live येथे रजिस्टर करून तुम्ही या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी 9921008060 या नंबरवर कॉल करा
इनोव्हेट यु टेकाथॉन’ या राष्ट्रीय हॅकाथॉन स्पर्धेच्या नोंदणीला सुरूवात
Newsworldmarathi Pune : इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे पुण्यातील AISSMS येथे ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे अयोजन येत्या 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी कऱण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात करण्यात आली असून राज्यभरातील सर्व विद्यापीठातील तसेच सर्व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात.स्पर्धक विद्यार्थ्यांना सात विषय संशोधन प्रकल्प सादर करण्यासाठी दिले आहेत. या स्पर्धेत विजयी व सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 7.5 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.त्यातील पहिले बक्षीस 2 लाख रुपयांचे, दुसरे बक्षीस 1 लाख रुपयांचे तर तिसरे बक्षीस 75 हजार रुपयांचे असणार आहे, इनोवेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कल्पेश यादव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.
इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत कल्पेश यादव बोलत होते. याप्रसंगी इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कल्पेश यादव म्हणाले, ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या स्पर्धेसाठी एआयएसएसएमएस- इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एआयसीटीई, राज्याचा तंत्रशिक्षण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रतन टाटा महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयडीटीआरएस यांचे सहकार्य लाभले आहे.
शिक्षण आणि संशोधन हा देशाच्या विकासाचा पाया आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. इनोवेशन फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेमधून समाजोपयोगी संशोधन निर्माण व्हावे. उद्योजकांना पूरक असणाऱ्या संशोधनाची निर्मिती व्हावी. समाजाचे जीवनमान उंचविण्यासाठी आवश्यक संशोधन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बाहेर यावे, विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रिसर्च कल्चर निर्माण व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.
‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ या राष्ट्रीय पातळीवरील हॅकाथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थी innovateyou.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क 999 रुपये तर महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क 1,999 रुपये आहे. नोंदणी केल्यानंतर संबंधित स्पर्धक गटाने गूगल फॉर्म च्या माध्यमातून प्रॉब्लेम स्टेटमेंट सबमिट करावयाचे आहे. मागील वर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत 39 शहरांमधील आणि 9 राज्यांमधील 600 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मागील वर्षी मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर पुन्हा एकदा संशोधनाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इनोव्हेशन फाउंडेशनतर्फे ही स्पर्धा आयोजित केली जात आहे, असेही कल्पेश यादव यांनी सांगितले.
*इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित ‘इनोव्हेट यु टेकाथॉन 2.0’ स्पर्धेचे विषय*
1) एज्यूटेक
२) ट्राफिक मॅनेजमेंट
3) स्टुडन्ट इनोवेशन
4) एन्व्हायरमेंट
5) डिझास्टर मॅनेजमेंट
6) हेल्थ केअर
7) ॲग्रीकल्चर
स्पर्धेची सविस्तर माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीपत्रकात नमूद केलेली आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रतन टाटा यांच्या स्मरणार्थ रतन टाटा इनोव्हेटिव्ह माईंड अवॉर्ड आणि बेस्ट इनोवेशन युजिंग अवॉर्ड दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे दहा हजार रुपये रक्कमेची 35 स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत.
नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना रजिष्ट्रेशन किट त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना innovateyou.in/hackathon या लिंकचा वापर करता येईल. नोंदणी करताना तांत्रिक अडचण निर्माण आल्यास विद्यार्थी 9689742929, 9623337777 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. त्यासाठी प्राचार्य आणि पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रदीप माने आणि संजय ससाणे यांनी केले आहे.
अजित पवार व्यासपीठावर असताना सुप्रिया सुळे अन् पंकजा मुंडेंची गळाभेट
राजकारणात वैचारिक मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप हे जरी सामान्य असले, तरी वैयक्तिक नातेसंबंध वेगळ्या स्तरावर टिकवून ठेवणे हे काही नेत्यांसाठी महत्वाचे असते. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांचे उदाहरण हेच दाखवते की राजकीय मतभेद असूनही व्यक्तिशः सौहार्दपूर्ण संबंध राखता येतात. पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांनी अजितदादा व्यासपीठावर असताना एकमेकींना मिठी मारली.
बारामतीतील या प्रसंगातून असे स्पष्ट होते की राजकीय व्यासपीठावरील संघर्ष हा फक्त त्यांच्या भूमिकांचा भाग आहे आणि तो वैयक्तिक जीवनात प्रतिबिंबित होत नाही. अशा घटना केवळ राजकारणातील मानवतावादी बाजू दाखवत नाहीत तर समाजातही एक सकारात्मक संदेश देतात की मतभेद असले तरी परस्पर आदर कायम ठेवावा.
यासारख्या घटना नेहमीच चर्चेचा विषय ठरतात आणि लोकांना राजकारणाच्या पलीकडील नातेसंबंधांची झलक दाखवतात.
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, आमदार पंकजा मुंडे, क्रीडा-युवक-कल्याण-अल्पसंख्याक विका व औफाक मंत्री दत्तात्रय भरणे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे उपस्थित होते.
बारामतीतील या प्रसंगाने राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये चांगलीच चर्चा रंगवली. सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यातील दिलखुलास भेट, हस्तांदोलन आणि मिठी या गोष्टींनी राजकीय मैत्रीचा एक वेगळा अध्याय उलगडला. विशेष म्हणजे, याच व्यासपीठावर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती, ज्यामुळे या प्रसंगाला आणखी रंगत आली.
सुनेत्रा पवार यांनी पंकजा मुंडे यांना हास्याने प्रतिसाद दिला, परंतु सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात संवाद न झाल्यामुळे विविध तर्क-वितर्क मांडले गेले. मात्र, पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्या या उघडपणे दिलखुलास भेटीमुळे राजकारणातील वैयक्तिक सौहार्दाची एक झलक समोर आली.
हा प्रसंग केवळ राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन मानवी नातेसंबंधांचे महत्त्व अधोरेखित करतो, हे नक्की. यामुळे कार्यक्रमस्थळी आणि माध्यमांमध्ये विविध चर्चांना उधाण आले, आणि हा प्रसंग अनेकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
पुण्यातून पहिली कुंभमेळा विशेष गाडी रवाना
Newsworldmarathi Pune : कुंभमेळ्यासाठी पुण्यातून पहिली विशेष रेल्वे गाडी उत्तर प्रदेशातील प्रयागराजसाठी रवाना करण्यात आली. यावेळी ढोल ताशांच्या गजरात, प्रवाशांचे स्वागत करण्यात आले. आयआरसीटीसी मार्फत भारत गौरवची विशेष रेल्वे पुण्याहून कुंभमेळ्यासाठी बुधवारी (दि.15) सोडण्यात आली. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर सायंकाळी सात वाजून 50 मिनिटांनी कुंभमेळा विशेष रेल्वे गाडी प्रयागराजच्या दिशेने रवाना झाली.
ज्येष्ठ प्रवाशांच्या हस्ते फीत कापून या गाडीचे उद्घाटन करण्यात आले. केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेअंतर्गत भारतगौरव ही विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही गाडी पुणे, वाराणसी, प्रयागराज, आयोध्या, पुणे अशी धावणार आहे. यावेळी रेल्वेच्या पुणे विभागाचे झोनल मॅनेजर गुरूराज सोन्ना व अन्य उपस्थित होते.
रेल्वे गाडीत विशेष सुविधा : पुण्यातून कुंभमेळ्यासाठी विशेष गाडीचे नियोजन केले आहे. या गाडीमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सीसीटिव्ही, जेवणाची व्यवस्था असणार आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या ठिकाणी राहण्यासाठी टेंटसिटीची व्यवस्था करण्यात आली आहे. येथेही प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. प्रथमोपचार सुविधा देखील असणार आहे.
बारामतीच्या विकासाने पंकजा मुंडे भारवल्या
Newsworldmarathi Mumbai : बारामतीत विविध विकासकामांच्या उद्घाटनांच्या निमित्ताने आलेल्या राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बारामतीच्या विकासाची पाहणी केली. बारामती शहरासह मतदारसंघात झालेल्या सर्वांगीण विकासाने त्या अक्षरशः भारावून गेल्या. बारामतीच्या प्रत्येक विकासकामाकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. दादांच्या व्यक्तिमत्त्वातील काटेकोरपणा, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, नियोजनबद्धता, झपाटून काम करण्याची पद्धत यांसह खूप काही गोष्टी अजितदादांकडून शिकण्यासारख्या असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तोंडभरून कौतुक केले. बारामतीच्या धर्तीवरच आपल्या स्वतःच्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. या निमित्ताने त्यांनी बारामती शहरासह बारामती तालुक्यातील विविध विकासकामांना भेट देऊन त्यांची सविस्तर माहिती घेतली. बारामतीच्या विकासाबद्दल भरभरून बोलताना त्या म्हणाल्या, “एका वेगळ्या विकासाच्या दृष्टीतून बारामती आणि बारामतीचा विकास बघण्याचा आज योग आला. बारामती मतदारसंघात झालेली विविध विकासकामे, त्यांचा दर्जा हा अत्यंत सुंदर आहे. बारामती मतदारसंघातील प्रत्येक कामावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष असते. त्यांचा दिवस सकाळी सहा वाजता सुरू होतो. प्रत्येक काम नियोजनबद्ध पद्धतीने करण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळेच त्याचे प्रतिबिंब बारामतीतील प्रत्येक विकासकामांमध्ये दिसत आहे.
काटेकोरपणा, वक्तशीरपणा यांसह उपमुख्यमंत्री अजित दादांच्या अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बारामतीच्या विकासाशी अजितदादांचे वेगळे नाते निर्माण झाले आहे, त्यांच्या प्रदीर्घ अनुभवासह अनेक वर्षे सत्तेत असल्याचा फायदा बारामतीच्या विकासात निश्चित झालेला आहे. बारामतीत झालेल्या विकासकामांच्या धर्तीवरच माझ्या मतदारसंघासह मराठवाड्याचा विकास करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,” असा निर्धार यावेळी व्यक्त करत मंत्री पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बारामतीच्या विकासाचे विशेष कौतुक केले.
आमदारांनो साधे राहा, प्रतिमा जपा : नरेंद्र मोदी
Newsworldmarathi Mumbai : सामान्य जनता बोलत नाही, पण तिचे तुमच्या कारभारावर बारीक लक्ष असते, तेव्हा चांगली प्रतिमा जपा, बडेजाव नको; साधे राहा. बदल्यांच्या फायली घेऊन फिरत बसू नका. महायुतीचा धर्म पाळून पुढे जा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीचे सर्व आमदार आणि मंत्र्यांच्या बैठकीत दिला.
आयएनएस सभागृहात झालेल्या दोन तासांच्या संवादात मोदी यांनी विकासविषयक काही आमदार, मंत्र्यांची मते जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते. फडणवीस यांनी प्रास्ताविकात महायुतीचे मोठे यश आणि सरकारची भविष्यातील वाटचाल यावर मत व्यक्त केले.
मोदी यांनी त्यांच्या भाषणात तिन्ही पक्षांच्या मंत्री, आमदारांशी भावनिक संवाद साधताना काही कठोर मतेही व्यक्त केली. पैसा नाही तर चांगली प्रतिमा महत्त्वाची आहे.
बदल्यांच्या फायली घेऊन फिरू नका, या शब्दात त्यांनी सगळ्यांचे कान टोचले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना बदल्यांच्या अनेक फायली यायच्या, मी ते बंद केले होते, असेही ते म्हणाले.
महायुतीच्या तीन पक्षांमधील समन्वय खाली गावांपर्यंत गेला पाहिजे. तिन्ही पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यक्रम, सभांना जायला हवे. डबे पार्टी करा, असा सल्लाही मोदी यांनी
फडणवीसांचा ‘देवाभाऊ’ असा उल्लेख
मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख ‘देवाभाऊ’ असा करत त्यांच्या नेतृत्वात चांगले सरकार सक्षमपणे चालेल, असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
निःस्पृहपणे जनसेवा कशी करायची हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शिकायला हवे. संघकार्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे, अशी भावनाही मोदी यांनी बोलून दाखविली.
देश मी पंतप्रधान होण्याआधी पाहून झालेला होता. मला या गोष्टीचा खूपच फायदा झाला. तुम्हीही फिरले पाहिजे, खेड्यात मुक्कामी राहिले पाहिजे, संवाद वाढविला पाहिजे, अशा अपेक्षा मोदी यांनी यावेळी व्यक्त केल्या.
देवयानी पवार करणार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे नेतृत्व
Newsworldmarathi Pune : बारामतीतील देवयानी पवार वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दावोस येथे होणाऱ्या वार्षिक बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. २० ते २४ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंड येथील दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीसाठी तरुण उद्योजक व ग्लोबल शेपर्स कम्युनिटीच्या बारामती हबच्या सदस्या देवयानी पवार यांची निवड करण्यात आली आहे.
ग्लोबल शेपर्स कम्यूनिटीच्या जगभरातील ५० प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासाठी निवडलेल्या २ भारतीयांमध्ये देवयानी पवार यांचा समावेश आहे. ग्लोबल शेपर्स कम्युनिटी हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा एक उपक्रम असून या अंतर्गत जगभरातील युवक हे आपापल्या भागातील स्थानिक, प्रादेशिक यांबरोबरच जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्रितपणे काम करतात
या निवडीबाबत बोलताना देवयानी पवार म्हणाल्या, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मिळालेली संधी ही मी माझा सन्मान समजते. दावोसच्या या भेटीमध्ये मला जागतिक नेत्यांसोबतच सकारात्मक काम करीत समाजात बदल घडविणाऱ्या अनेकांना भेटण्याची आणि त्यांसोबत नेटवर्किंग करण्याची संधी मिळेल. याबरोबरच या परिषदे दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक असलेले क्लॉस श्वाब यांसोबत होणाऱ्या एका विशेष सत्रासाठी देखील मी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
या व्यासपीठाचा उपयोग स्थानिक पातळीवर भारतासाठी आणि माझ्या सहकारी हब्ससाठी नव्या कल्पना आणि प्रगतीशील उपक्रम राबवण्यासाठी मी करणार असल्याचे देवयानी पवार यांनी सांगितले.
दरवर्षी जानेवारी महिन्यात दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक आयोजित करण्यात येत असते. जागतिक व्यवसाय, विविध देशांतील सरकारे, मीडिया आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचे गट सध्याच्या काळातील गंभीर समस्या सोडवण्यासाठी आणि त्यावरील उपायांवर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात. कोलॅबोरेशन फॉर दी इंटेलिजन्स एज ही या वर्षीच्या वार्षिक सभेची संकल्पना आहे.
धुक्यात हरवली वाट
Newsworldmarathi Pune : पुणे शहरात सध्या कधी कडाक्याची थंडी कधी ऊन तर कधी पावसाचा खेळ सुरु आहे. पण आज सकाळी पहाटेच्या वेळी शहरात अनेक ठिकाणी कात्रज, सातारा रोड, बिबवेवाडी स्वारगेट या परिसरात दाट धुक्यानी महामार्गावरील व अंतर्गत रस्त्यावरील वाटा हरवून गेले होते. गडद धुक्यामुळे सर्व वातावरण धूसर बनले होते. ‘वाट एक जुनी, हरवली दाट धुक्यात लपलेले दवबिंदू कुठे चमकतात पानात’, या कवितेसारखे आल्हाददायक चित्र सर्वत्र पाहायला मिळाले. या धुक्यामुळे सकाळी नऊपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नव्हते. सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनी गडद धुक्याची अनुभूती घेतली.
‘मॉर्निंग वॉक’ला दाट धुक्याची अनुभूती
‘सकाळ’च्यावेळी मॉर्निंग वॉकला जात असलेल्या नागरिकांना शनिवारी पडलेल्या दाट धुक्यामुळे निसर्गातील सौंदर्य पाहायला मिळाले. अचानक पडलेल्या या धुक्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांना सुखद अनुभव घेता आला. दाट धुके पडल्याने त्याचा आनंद घेतला. गेल्या आठ दिवसांपासून वातावरणात बदल होऊन रात्री कडाक्याची थंडी पडत असून सकाळच्यावेळी धुक्याची झालर पाहायला मिळत आहे.शिवाय अचानक पाऊस देखील हजेरी लावत आहे. काळी शाळेला जाणारी मुले बोचऱ्या थंडीने कुडकुडत होती. पुणे-मुंबई महामार्गावरदेखील प्रचंड धुके पसरले होते. पहाटे साडेपाचपासून जाणवणाऱ्या धुक्यात वाढ होत असल्याचेही अनेकांनी सांगितले.
पहाटे धुक्याची चादर
पुणे शहरात आज पहाटे धुक्याची चादर पसरली होती. पहाटे पाचपासून धुके दाटले ते सकाळी साडे आठपर्यंत कायम होते. दाट धुक्यामुळे पुढील व्यक्ती दिसणेही अवघड झाले. त्यामुळे १५ ते २० फुटावरील दृश्य पाहण्यास देखील अडचण निर्माण झालेली होती. सकाळी पडलेल्या धुक्याचे क्षण अनेकांनी आपल्या घराच्या खिडकी, गॅलरी, गच्चीवरून मोबाइलमध्ये टिपले
धनंजय मुंडेच सरपंच संतोष देशमुखचे खरे खुनी; आरोपामुळे राज्यात खळबळ
Newsworldmartahi Mumbai : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. या अत्यंत क्रूर हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये आणि देशमुख कुटुंबीयांमध्ये दु:ख आणि संताप आहे. या प्रकरणी तपास करताना आरोपी वाल्मिक कराडवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मकोका दाखल केल्याने या प्रकरणाचा तपास अधिक तीव्रतेने होईल आणि गुन्हेगारांना कडक शिक्षेसाठी मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आहे. देशमुख कुटुंब आणि मस्साजोग गाव न्यायाच्या प्रतीक्षेत असून प्रशासनावर या प्रकरणी कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव आहे.
वाल्मिक कराडवर मकोकाचा गुन्हा दाखल झाल्याने परळीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. दोन दिवस कडकडीत बंद केलाय. सर्वत्र वातावरण पेटलेलं असताना मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी खळबळजनक आरोप केला आहे.
वाल्मिक कराड सुटायला नको, बीडची केस अंडर ट्रायल चालवण्यात यावी. बीड मधील हत्या धनंजय मुंडे यांनी करायला लावली असा आम्हाला संशय आहे. खंडणीतून झालेल्या खून मध्ये धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा आम्हाला संशय आहे.
दरम्यान, खंडणीतले आरोपी, खुनातील आरोपी यांनी कोणाला फोन केले, कोणाला भेटले हे सगळे चार्जशीट मध्ये यायला पाहिजे असे देखील जरांगे पाटील म्हणालेत. ना जातीचं देणे घेणे नाही, फक्त पैसे पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी खंडणी आणि खुनातील सगळ्या आरोपींवर मकोका आणि ३०२ कलम लावला असे म्हणत हे पाप धनंजय मुंडेंचं आहे, पाप झाकण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना मध्ये घेतोय असा हल्लबोल जरांगे यांनी मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केला आहे.
पुणे विद्यापीठ चौकातील वाहतुकीत बदल
Newsworldmarathi Pune : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथे मेट्रोच्या दुमजली उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. हे बदल १५ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असून, पुढील आदेश येईपर्यंत ते कायम राहतील.
वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे यांनी यासंबंधी आदेश जारी केले आहेत. या बदलामुळे वाहनचालकांना होणाऱ्या गैरसोयी टाळण्यासाठी खालील पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
गणेशखिंड रस्ता टाळून वाहनचालकांनी पाषाण रस्ता, बावधन मार्ग, किंवा अन्य पर्यायी रस्त्यांचा उपयोग करावा. विद्यापीठ चौकाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी एकतर्फी वाहतूक मार्ग तयार केला जाईल.रस्त्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून वाहतुकीवरील ताण कमी करावा. बांधकाम काळात वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोंडी टाळणे यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे सर्व वाहनचालकांसाठी आवश्यक आहे.
वाहतूकीत पुढील प्रमाणे असतील बदल
बाणेरकडून शिवाजीनगर कडे जाणारी वाहतूक –
बाणेरकडून येणारी वाहतूक औंध रस्त्यावर वळविण्यात येणार आहे. राजभवन समोरून (पंक्चर) वाहनांनी वळून पुन्हा गणेशखिंड रस्त्यावर यावे. तेथून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त झेंडे यांनी केले आहे.
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक –
शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहने विद्यापीठ चौकातून सरळ औंध रस्त्याने इच्छितस्थळी जातील.
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक –
औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहने चतु:शृंगी पोलीस ठाण्याजवळील विद्यापीठाच्या मिलिनयम गेटमधून वळविण्यात येणार आहे. तेथून बाहेर पडणारी वाहने विद्यापीठाच्या आवारातून इच्छितस्थळी जातील.
नागरीकांनी वरील मार्गाचा वापर करावा तसेच वाहतुक कर्मचारी तथा स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

